गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, July 14, 2022

मैत्री...

  •  .           एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा, अडीअडचणीत कामी येण्याचा, वेळप्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याचा व संकटकाळी धावून जाण्याचा अलिखित करार म्हणजे 'मैत्री'! 

     संघटन करून राहण्याची वृत्ती जेव्हापासून माणसाने जोपासली तेव्हापासून, नात्यांसोबत मैत्री हा प्रकारही अस्तित्वात आला असावा.समविचारी, समआचारी व्यक्तीशीच मैत्री जुळते. कुठे ना कुठे तरी एखादा सूर जुळल्याशिवाय मैत्री होऊच शकत नाही. भिन्न भिन्न विचाराच्या व्यक्तींमधेही एखादा समान धागा मैत्री निर्माण करताना दिसतो.

      मैत्रीचे व मित्रांचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आपणास दिसून येतात. त्यातील राजकीय मैत्री हा फार गहन विषय आहे.हिंदी-चिनी भाई भाई म्हणत १९६२ मध्ये युद्ध पुकारून उत्तर पूर्व भागाचा लचका तोडणाऱ्या चीनची मैत्री साऱ्या जगाला माहीत आहे. (सध्याही युद्ध न करता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे.) पंडित नेहरू व लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मैत्रीची चर्चा आजही चवीने केली जाते. हिटलर मुसोलिनी मैत्री सुद्धा प्रसिद्ध आहे. महायुद्धाच्या काळात 'मित्रराष्ट्र' हा शब्द तर परवलीच्या शब्दाइतका महत्वाचा ठरला होता.

     कृष्ण सुदाम्याची मैत्री सर्वश्रुतच आहे. या मैत्रीला कोणते नाव द्यावे कळत नाही.धन्य तो कृष्ण व धन्य तो सुदामा! आज तर मोठ्या पदावर गेल्यावर आपल्या आईवडिलांना त्यांच्या गावरान पेहेरावामुळे ओळख न दाखवणारे महाभाग आपण बघतो.ते अशा सुदाम्याला काय ओळख दाखविणार?

     कृष्णाच्या मित्रप्रेमात गरिबी श्रीमंती आड आली नाही. तशीच कर्ण व दुर्योधनाच्या मैत्रीतही कोणत्याच बाबी आड आल्या नाहीत.पांडव आपले सख्खे भाऊ आहेत हे समजल्यावर जर कर्णाने जर दुर्योधनाचा पक्ष सोडला असता तर युद्धिष्ठिराऐवजी तोच हस्तिनापूरच्या गादीवर बसला असता. पण मृत्यू समोर दिसत असूनही त्याने मित्राशी इमान राखून मृत्यूला कवटाळले व मैत्रीची शान वाढविली.

     मित्र कसा असावा याबद्दल प्रत्येकाचे मत सारखेच असते.पण हे मत मित्राने आपल्याशी कसे वागावे याबद्दलचे असून,स्वतःवर पाळी आल्यावर मात्र यात बदलही होऊ शकतो. मैत्रीची जाण ठेवून मित्राचे उपकार स्मरून वागणाऱ्यांची अपवाद सोडून वानवाच आहे.मतलबापुरते मैत्रीचे ढोंग करणारेच बहुतकरून दिसून येतात.तुम्हाला वापरून फेकणारी मित्राची ही जात अतिशय घातक असून केसाने गळा कापण्यात वस्ताद असते.त्यामुळे मित्रासाठी जीव देणारे वा जीव लावणारे आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. असे जरी असले तरी पण प्रत्येकाला एका सच्च्या मित्राची सतत आवश्यकता भासत असते, हे ही तितकेच खरे!

     माणसाच्या आयुष्यात मित्राईतकेच महत्व मैत्रिणीलाही आहे. (हे बायकोला कसे समजावून सांगावे हा प्रश्नच आहे.) पण विवाहित पुरुषाला जर एखादी मैत्रीण असली तर बायको खपवून घेत नाही. (अर्थात, बायकोला जर मित्र असला तर नवराही खपवून घेत नाही.ही गोष्ट वेगळी.) मोठमोठे पुढारी,राजकारणी,

नेते,साहित्यिक ,गायक,संगीतकार,संशोधक यांना

 त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी (यांना ते 'प्रतिभा' असे म्हणतात.) त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेल्या दिसतात. (हे विधान सगळ्यांनाच लागू होते असे नाही.) ह्या 'प्रतिभां'च्या निकट सानिध्यामुळे बरीच मंडळी आपले ध्येय साध्य करतांना दिसून येते. (कुणाकुणाची पत्नी पण त्याची 'प्रतिभा' असू शकते.)

विवाहित पुरुषांच्या मैत्रिणीमुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाल्याच्याही अनेक घटना आहेत. ते काहीही असले तरी मैत्रीण असणे ही आयुष्यातील एक सुखद अनुभूती आहे असे अनेकजण मान्य करतांना दिसतात.कोणाच्या नशिबात असते,कोणाच्या नाही! त्यामुळे उगाच जळफळाट करून घेण्यात काहीच अर्थ नाही.

     राजकीय मैत्रीबद्दल तर न लिहिलेलेच बरे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात केव्हा गळा घालून 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा' हे गाणे आळवील हे सांगता येत नाही. या चुम्माचाटीमुळे पक्षांची शकलं झालेली आपण सर्वजण बघत आहोतच.राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो व कोणी कोणाचा मित्र नसतो. वेळ पाहून रंग बदलणारी ही जमात आहे. त्यामुळे यांच्यावर जास्ती लिहीण्यात काही मजा नाही.

-सुधाकर कदम

Thursday, June 16, 2022

आद्य मराठी गझलगायकाचा वाचनीय कवितासंग्रह...डॉ.अविनाश सांगोलेकर

  • आद्य मराठी गझलगायकाचा वाचनीय कवितासंग्रह

          कविवर्य  सुरेश भट ह्यांनी अनेकांना लिहिते केले , तर अनेकांना गातेही केले. आद्य मराठी गझलगायक , गझलगंधर्व सुधाकर कदम हे मात्र अधिक भाग्यवान आहेत.कारण त्यांना मराठी गझलविश्वात सुरेश भटांनी गाते तर  केलेच , शिवाय लिहितेही केले.कदम हे उत्तम गझलगायक आणि तितकेच उत्तम संगीतकार आहेत , हे सर्वश्रुतच आहे.मात्र कदमांच्या प्रसिद्धीपराड्गमुख वृत्तीमुळे ते कवी आहेत , हेच त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित होऊनही काव्यप्रेमींना फारसे माहीत होऊ शकलेले नाही.
             ' काळोखाच्या तपोवनातून ' हा कदमांचा दुसरा कवितासंग्रह असून तो सासवडच्या स्वयं प्रकाशनाने पुण्यात २१ डिसें. २०२१ रोजी समारंभपूर्वक प्रकाशित केला आहे. हा संग्रह वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की ,सुधाकर कदमांचे गझलगायन जसे श्रवणीय आहे,तसेच त्यांचा हा कवितासंग्रहही वाचनीय आहे.त्यात ८३ कवितांचा अंतर्भाव असून ह्या कविता गझल , हझल , गीत,अभंग , विडंबनकविता , तसेच अन्यही  कविताप्रकारांमधील आहेत.ह्या संग्रहाचे मर्म उलगडून दाखवणारी अभ्यासपूर्ण अशी सहा पृष्ठांची प्रस्तावना डॉ.राम पंडित ह्यांची लाभलेली आहे.
         कदमांच्या तत्त्वचिंतक आणि त्याच वेळी कलंदर असलेल्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे हृद्य दर्शन त्यांच्या बहुतांश कवितांमधून घडते. वानगीदाखल ' सध्यात्म ' ही कविता पहावी.अध्यात्माचे सध्याचे रूप हे सश्रद्ध माणसालाही कसे अश्रद्ध करते , हे ह्या कवितेतून कदम फार भेदकपणे चित्रित करतात. दुसरे असे की , ते वयोवृद्ध जरी असले , तरी त्यांच्या काही प्रेमकविता पाहिल्यानंतर मात्र ते ' अभी तो मैं जवान हुं ' असेच म्हणत आहेत , असे वाटत राहते. ह्या आणि अशा इतरही कारणांमुळे कदमांचा हा संग्रह वाचनीय तर झालेला आहेच.शिवाय तो संग्रहणीयही झालेला आहे.म्हणून तो काव्यप्रेमींनी आवर्जून विकत घेऊन वाचायला हवा , संग्रही ठेवायला हवा, असे सुचवावेसे वाटते.

प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ,
डी - २०२ , विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा, 
बाणेर , पुणे - ४११०४५ 
( भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२ )


 

Wednesday, April 27, 2022

मराठी ग़ज़ल गायन में मील का पत्थर...राजेश माहेश्वरी.


     आर्णी जि . यवतमाल के विख्यात संगीतकार एवं ग़ज़ल गायक श्री . सुधाकर कदम जो सन १९७५ से संगीत से जुडे है अब महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे मे स्थित होकर अपनी आवाज एवं संगीत का जादू फैला रहे है . प्रख्यात कवि सुरेश भट के शब्द एवं सुधाकर कदम का सुर यानी ग़ज़ल गायकी में इंद्रधनुष समान प्रतीत होता है . सन १ ९ ७० से सुधाकर कदम ने ग़ज़ल गायन क्षेत्र में कदम रखा . मराठी ग़ज़ल गायन की तीन घंटे की महफिल सजाकर कार्यक्रम करनेवाला महाराष्ट्र मे एक भी ग़ज़ल गायक नहीं था यह बात खुद ग़ज़लकार सुरेश भट कहते थे . सुरेश भट एवं सुधाकर कदम इस जोडी ने मराठी गझल एवं ग़ज़ल गायकी जनता तक पहुंचाने हेतु सन १९८०-८२ से इन तीन वर्षों तक पूरे महाराष्ट्र का दौरा कर गझल के कार्यक्रम प्रस्तुत किए . तभी से महाराष्ट्र में मराठी ग़ज़ल क्या चीज है इसका पता चला , लोकप्रियता बढने लगी , तभी से कई गायकों न ग़ज़ल गायकी की ओर रुख किया . पर आज भी मराठी ग़ज़ल गायकी में सधाकर कदम का स्थान मिल का पत्थर है . इसलिए सुरेश भट जैसे महान कवि ग़ज़लकार उन्हें आदय मराठी ग़ज़ल गायक कहते थे . वह प्रमाणित होता नजर आ रहा है . 


     उर्दू , हिंदी , ग़ज़ल अलग बात है वहाँ मराठी गझल प्रस्तुत करना कठिन था . हिंदी , उर्दू , मराठी यह केवल भाषा नहीं है , भाषा के साथ उसकी संस्कृती के अनुसार भाषाओं का रुप बदलता है . भाषा की विशेषताओं के चलते ही संस्कृति का आंगन फलफूल है . ग़ज़ल के संदर्भ में यह अधिक सटिक बैठता है क्यों कि , उस प्रकार ढंग कोई मराठी का नही . अरबी , उर्दू भी उस प्रकार के काव्यों के गर्भ के भीतर की नाल . कहने का मतलब जो प्रकार अपनी भाषा में नहीं उसको आत्मसात करके सुधाकर कदम ने अपने कार्यक्रमों की प्रस्तुति कर सफलता के कदम चुमे है . उन्होंने हिंदी , उर्दू जैसी आसान राह न चुनते हुए मराठी ग़ज़ल गायन का कांटों से भरा सफर अपना कर मराठी ग़ज़ल गायन को नया 

आयाम देकर उसे लोकप्रियता के शिखर तक पहुंचाया जो कि एक ऐतिहासिक कार्य की पूर्तता करने जैसा है . तथा इनकी मराठी ग़ज़ले भी उर्दू की तरह मधुर एवं कर्ण प्रिय होती है . मराठी ग़ज़ल गाते हुए उसे शब्दों के अनुसार स्वर , साज , संगीत देना भी महत्वपूर्ण है . उसमे भी सुधाकर कदम ने अपने संगीत के बलबूते सफलता प्राप्त की . आज भी उनकी ' हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही , ' ' झिंगतो मी कळेना कशाला , ' ' मस्तीत गीत गा रे , ' लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा , ' ' या एकले पणाचा छेडीत मी पियानो , ' ऐसी गई मराठी ग़ज़ले श्रोता गुनगुनाते है यह उनके संगीतकार के तौर पर सफलता पाने का गौरव है . 


     सन १९८७ में कक्षा १ ते १० तक मराठी शालेय किताबों की कविताओं को संगीतबध्द किया . हाल ही में कक्षा एक एवं पांच के शालेय मराठी के किताब की कुछ कविताओ को संगीत दिया . जिसका ध्यनिमुद्रण पुणे के बालचित्रवाणी में किया गया . जिस की सीडी , कैसेट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडल द्वारा निर्माण की है . सुधाकर कदम द्वारा संगीत बध्द किया गया ' हे शिव सुंदर समर शालिनी महाराष्ट्र माऊली ' यह ज्येष्ठ कवि कुसुमाग्रज व्दारा रचित महाराष्ट्र गीत महाराष्ट्र सरकार के गीत मंच विभाग द्वारा संपूर्ण महाराष्ट्र में छात्रों को पढाये जाने के बाद आज संपूर्ण राज्य में सभी छात्र एवं सुरताल के साथ यह गीत गाते नजर आते है . 


      उर्दू ग़ज़ल गायन संगीतबध्द करने में सुधाकर कदम कम नही . उनका उर्दू ग़ज़लों पर आधारित ' तसव्वूर ' नामक ग़ज़लों भरा नजराना पश्चिम महाराष्ट्र में धूम मचा रहा है . सुधाकर कदम का पूरा परिवार संगीत , सुरों का दीवाना है . भैरवी , रेणू यह दोनों पुत्रियां गायिका एवं पुत्र निषाद जो कि तबले का मास्टर है . तथा उन्होंने ' तसव्वूर ' उर्दू ग़ज़ल एवं ' सरगम तुझ्याच साठी ' यह मराठी गीत गझलो का कार्यक्रम लोकप्रिय हुआ है . सुधाकर कदम द्वारा मराठी ग़ज़लों को स्वर बध्द करने एवं गायकी के योगदान के चलते उन्हे अखिल भारतीय ग़ज़ल परिषद द्वारा ' शान - ए - ग़ज़ल ' पुरस्कार से गौरवान्वित किया गया है . जो कि उनके कार्यों की पहचान है . विख्यात कवि ग़ज़लकार सुरेश भट ने एक कार्यक्रम के दौरान सुधाकर कदम को ' मराठी का मेहदी हसन ' की उपाधि तक दे डाली थी . सुधाकर कदम जो की बडी तन्मयता से गाते है तब शब्दों का अस्तित्व जान पडता है . गुलाबी जख्मों पर धीरे - धीरे सुरुर चढता प्रतीत होता है . पहाडी आवाज , गझलों का चयन , शब्दों का ठोस उच्चार , उनकी विशेषता है . विदर्भ के आणी जैसे छोटे से नगर का अदनासा कलाकार महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे में विदर्भ एवं आर्णी शहर का नाम मराठी ग़ज़ल गायकी एवं स्वरबध्द गीतो से गौरवान्वित किया जा रहा है . 


( दैनिक भास्कर , यवतमाल जिला विशेष परिशिष्ट , २३ / ९ / २००६ )

Sunday, April 10, 2022

मराठी गझल व सुधाकर कदम...प्रा.अशोक राणा



   गझल हा फारसी प्रकार माधव ज्युलियनांनी मराठीत आणला.त्याला मराठमोळे रूप दिले ते सुरेश भटांनी आणि मराठी गझल कशी गावी हे शिकवले सुधाकर कदम यांनी. #अशी_गावी_मराठी_गझल या शीर्षकाखाली महाराष्ट्रभर गझलगायनाचे कार्यक्रम करून गझल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय त्यांना जाते.या कार्यक्रमात कविवर्य सुरेश भटांनी निवेदन करून त्यांच्या ऐतिहासिक कार्यावर शिक्कामोर्तब केले. 

     असा हा लोकविलक्षण गायक व संगीतकार . माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे . त्याची प्रारंभीची वाटचाल मी पाहिली आहे . त्याचबरोबर या क्षेत्रावर आपला ठसा उमटविण्याकरता त्याने केलेला संघर्ष व त्यात त्याची ससेहोलपटसुध्दा मी जवळून अनुभवली । 

     यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या सध्याच्या तालुक्याच्या गावी ( तालुका पण खूप नंतर झाला. ) संगीत शिक्षक म्हणून सुधाकर कदम यांनी आपल्या कामगिरीचा प्रारंभ केला .( त्याअगोदर यवतमाळच्या भाग्योदय कला मंडळात वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी गायक , वादक व संगीतकार म्हणून १० वर्षे काम केले होते . ) विदयार्थ्यांपर्यंत संगीत कलेतील सौंदर्य व लय पोचविण्यात त्यांनी आपले सारे कसब पणाला लावले . पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावून त्याचे गायन शाळा - शाळांमधून केले . पुढे त्याच्या कॅसेट्स महाराष्ट्रत लोकप्रिय झाल्यात . वडील वारकरी संप्रदायाचे गायक असल्यामुळे सुधाकरवर बालपणीच संगीताचे संस्कार झाले होते . वारकरी संप्रदायातील सर्वसमावेशकतेचा वारसाही त्याला लाभला . त्याचा खरा लाभ आर्णीच्या श्री महंत दत्तराम भारती विद्यालयाच्या विदयार्थ्यांना झाला . ते विदयार्थी धन्य होत , ज्यांना सुधाकर कदमांसारखा गुरू लाभला . 

     यवतमाळच्या समर्थवाडीत सुधाकरचे घर होते . मी यवतमाळ येथील हिंदी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून १९७९ मध्ये रुजू झालो . याच शाळेत संगीत शिक्षक पदावर विनायक भिसे कार्यरत होते . दोघेही कलाशिक्षक असल्यामुळे बहुतांश प्रसंगी दोघांवर सारख्याच जबाबदाऱ्या यायच्या . त्यामुळे आमची दोघांची गट्टी जमली . पदवी परीक्षेसाठी मी संगीत विषय घेतल्यामुळे मला अमोलचंद महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला . या महाविद्यालयात प्रा . पुरुषोत्तमराव कासलीकर हे विभाग प्रमुख होते . त्यांच्याकडे माझे संगीत शिक्षण सुरू झाले . तेथेच माझा परिचय सुधाकर कदमांशी झाला . 

     यवतमाळ हे कलारसिकांचे गाव आहे . तेथील काही संगीत प्रेमींकडे गाण्याच्या मैफिली नेहमीच होत . तेथे भिसेंसोबत तानपुरा संगत करायला मी जात असे . तेथे सुधाकर कदम यांचेही गायन हमखास होत असे . भिसे व सुधाकर हे दोघेही कासलीकर गुरुजींचे शिष्य होते.त्यामुळे कासलीकरांनी आयोजित केलेल्या समारंभामध्ये सुधाकरचीही हजेरी राही.वर्षातून एकदा संगीत महोत्सवाचे आयोजन कासलीकर गुरुजी अमोलकचंद महाविदयालयात करीत असत .त्यात विदर्भातील नामवंत कलाकार आपली कला सादर करीत असत.अशाच एका महोत्सवात सुधाकर कदम यांनी #संतूर_वादन केले. .त्याचे रेखाचित्र पेन्सिलने रेखाटले होते . त्यापूर्वी पं . शिवकुमार शर्मा यांचे हुबेहूब रेखाचित्र काढल्याबद्दल मला शाबासकी मिळाली होती.संतूर वादनात मार्गदर्शन न मिळाल्यामुळे पुढे सुधाकरने  फारशी मजल मारली नाही . त्याचा बराचसा काळ विविध कलांशी आपले नाते सांगण्यातच गेला. एक हरहुन्नरी कलावंत व मनमिळावू शिक्षक अशी ओळख करवून देण्यात भरपूर मेहनत केली . अनेक नव - नव्या कवींच्या रचना गाऊन त्याने कवींचा स्नेह संपादन केला . त्यात भर पडली ती एका प्रस्थापित कवीची व ते म्हणजे सुरेश भट . 

      सुरेश भटांच्या कविता सुमन कल्याणपूर , लता मंगेशकर , आशा भोसले , सुरेश वाडकर , अरुण दाते , वगैरे गायकांनी गायिल्या होत्या . त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती . गझल हा फारसी काव्यप्रकार मराठमोळेपणात घोळवून त्यांनी मराठी गझलकार म्हणून ख्याती प्राप्त केली होती . त्यांचे हे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न तत्कालिन अनेक प्रस्थापित कवींनी करून पाहिला . पण त्यांना यात यश मिळाले नाही . या काव्यप्रकारावर आपली पकड कायम राहावी याकरीता सुरेश भट सतत सावधगिरी बाळगून खूप मेहनत घ्यायचे . त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये सदरे लिहून गझल कशी लिहावी याचे धडे नवकवींना दिलेत . ' गझलेची बाराखडी ' या नावाने त्यांनी अनेकांना दस्तावेज पाठविला . एक चळवळ म्हणून सुरेश भटांनी सातत्याने हा उपक्रम राबविला . मी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयामध्ये बी . ए . भाग २ मध्ये असताना सुरेश भटांचा ' रंग माझा वेगळा ' हा काव्यसंग्रह मराठी कला साहित्य या प्रश्नपत्रिकेसाठी नेमलेला होता . तो विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे एका वहीत त्यातील सर्व कविता मी लिहून काढल्या . त्यांच्या अनुकरणातून मीही गझला लिहिल्यात . त्या कुणी तरी गाव्यात म्हणून मी गायकाच्या शोधात होतो . सुधाकर कदम माझी गझल केव्हा तरी गायील अशी आशा मला होती . पण त्याला माझ्या गझला दाखविण्याचे धाडस मला झाले नाही . 

      पुढे सुरेश भटांचा व सुधाकर कदमांचा परिचय झाला . जवळीक वाढली . एकमेकांकडे येणेजाणे सुरू झाले . सुरेश भटांच्या गझला सुधाकरने स्वरबध्द करून कार्यक्रमांमधून व आकाशवाणीवरून गायला सुरुवात केली . अशा प्रकारे सुरेश भट व सुधाकर कदम हे समीकरणच बनले . यातूनच ' #अशी_गावी_मराठी_गझल ' या कार्यक्रमाची निर्मिती झाली . आपल्या आवाजात सुरेश भटांच्या गझला अल्बमच्या रूपाने रसिकांपुढे येतील अशी आशा सुधाकरला असावी व तसे ते स्वाभाविकही होते . कारण की सुरेश भटांनी तसे आश्वासन त्यांना दिल्याचे माझ्या ऐकिवात होते.

     सुरेश भटांचा ' एल्गार ' हा संग्रह त्याच्या सामाजिक आशयातील गझलांमुळे आगळावेगळा ठरला . त्यातील बहुतांश गझलांची निर्मिती सुधाकर कदमांच्या आर्णी येथील निवासस्थानी झाली होती . त्यावेळी ते वर्षातील अनेक दिवस , आठवडे आर्णीला राहत असल्याचे माझ्या काही मित्रांनी मला सांगितले . सुरेश भटांना एक दिवस सांभाळणे हे एक आव्हानच असायचे हे त्यांच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे . या पार्श्वभूमीवर सुधाकर कदम यांची किती दमछाक झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी . 

      सुधाकर कदम यांच्या तपश्चर्येला जे अपेक्षित फळ यायला हवे होते तसे मात्र आले नाही . अर्थात सुरेश भटांच्या गझला कॅसेटच्या रूपात रसिकांपर्यंत पोचल्या नाहीत . कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक , प्रत्यक्ष गझल रेकॉर्ड झाल्या त्या अरुण दाते , सुरेश वाडकर ,
इ . पुरुषांच्या आवाजात . एक स्वप्न भंगले . या अनुभवातून सुधाकर जाताना मी पाहिला . म्हणून काही अप्रिय अनुभवाची नोंद मला करावी लागत आहे . त्याबद्दल सुरेश भरांचे भक्त मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे . मी तसे केले नाही तर मात्र मी करणे कठीण जाईल असे वाटते . 

     काही कारणांनी भटांनी काही कालावधीनंतर सुधाकर कदमांना जाहीर कार्यक्रमातर आपल्या गझला गाण्यास मज्जाव केला . एका खाजगी कार्यक्रमात तर त्यांनी कहरच केला नागपूरच्या आमदार निवासात आमदार हरिश माणधना यांनी आमदारांसाठी सुधाकर का यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . हे जेव्हा सुरेश भटांना कळले तेव्हा ते ताडताड पाय आपटत व काठी हवेत उडवीत तेथे गेले . असा कसा सुधाकर कदम माझ्या गझल गातो ते मी पाहतोच असे म्हणून त्यांनी तेथे धिंगाणा घातला . त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि हे सगळे कशासाठी तर मानधनासाठी . ' माझ्या गझला गाऊन पैसे कमवतो , तर मला मानधन शून्य !' अनेक वर्षांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सहवासानंतर व अनेक कार्यक्रम सोबतीने केल्यानंतरचा हा भटांचा अवतार न पाहवता आलेला सुधाकर थोडा खचला होता . 

     आर्णीसारख्या खेड्यातून बाहेर पडण्यासाठी सुधाकरने जे जे आधार शोधलेत ते सो कुचकामी ठरले . शेवटी सेवानिवृत्तीची वाट न पाहता स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने घेतला . पुण्यात जाऊन नशीब आजमावण्याचा त्याचा निर्णय खरोखरच शहाणपणाच होता . पण तो त्याने उशिरा घेतला . उशिरा का होईना सुधाकरने संगीत दिलेल्या मराठी गझलच्या अल्बमला सुरेश वाडकर यांच्यासारख्या विख्यात गायकाचा आवाज लाभला हे मात्र आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे . मराठी गझलगायकीचे प्रात्यक्षिक पहिल्यांदा महाराष्ट्राला देणारा सुधाकर कदम मात्र सोईस्कर रीतीने विस्मरणाच्या गर्तेत टाकण्याचा प्रयत्न झाला. नुकत्याच झालेल्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्याच्या ऐतिहासिक कामगिरीची जाणीवपूर्वक नोंद घेतली गेली, तेव्हा मात्र हायसे वाटले. 

     आज ' #गझलगंधर्व  ' या सन्मानाने गौरविला गेल्यानंतर त्याची दखल घेणे भाग पडले . त्याच्या या ओळखीसाठी त्याला किती खस्ता खाव्या लागल्या हे मात्र फार कमी लोकांना माहीत आहे . त्याने स्वत : या आठवणी लिहन काढल्या तरच या विषयीची माहिती आपणास मिळू शकेल . पत्रकार म्हणून कार्य करणारा , सडेतोड लिहुन अनेकांची नाराजी ओढवून घेणारा सुधाकर केव्हा तरी या दिशेने आपली लेखणी वळवील अशी आशा करायला हरकत नाही . तसे झाले तर अनेक नव्या दमाच्या गझलगायकांना दिशा मिळेल.आज सुधाकर समाधानी आहे . कारण त्याची स्वप्ने पूर्ण व्हायला लागली आहेत.मराठी गझलगायकीमध्ये आणखी खूप काही करता यावे यासाठी त्याला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा !



 

 





संगीत आणि साहित्य :