जवळ-जवळ ३० वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील कवी-गायक-वादक कलावंतांना घेऊन तयार केलेलं हे वर्हाडी गीत आपल्या सेवेत सादर करीत आहे...
सांगु कशी राया तुले नाही वाचता ये मले
आलं पतुर तुह्य तं आता दाखवू कोनाले ?
नाही शायेत मी गेली नाही कवाच शिकली
आता पटलं बाइ व मी तं खरच फसली
आता आठोनीत काय मन उगिच हे भुले !
वाटे माही मले लाज, सिक्सनंच खरा साज
चुकी झाली जरी माही जाइन सिकाले व आज
जवा येइन वाचता, सुख वाटन जिवाले...
जवा सिकीन मी साया तोह पतुर रे राया
मी त वाचीन यकली फुलारून येइ काया
निर्या इचारान बाइ, मन भलकसं फुले
गायिका-वैशाली पुल्लीवार
गीत-शंकर बडे
संगीत-सुधाकर कदम
*शब्दार्थ*
मले=मला
पतुर=पत्र
शायेत=शाळेत
आठोनीत=आठवणीत
सिकाले=शिकायला
जवा=जेव्हा
साया=शाळा
तोह=तुझं
यकली=एकटी
निर्या=फक्त
इचारान=विचाराने