गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, December 25, 2022

सुधाकर कदमांची शब्द-स्वरसंपदा...


      आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’#फडे_मधुर_खावया…’ (स्फूट लेख),’#सरगम’ (स्वरलिपी), ’#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' व '#काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’#भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), '#अर्चना’ (टी सिरीज)', '#खूप_मजा_करू’ (फाऊंटॆन म्युझिक कं), ’#काट्यांची_मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’#तुझ्यासाठीच_मी...’( युनिव्हर्सल म्युझिक कं) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.नव्याने केलेला #रे_मना हा त्यानेच लिहिलेल्या स्वरबद्ध गीत-गझलांचा अलबम spotify या ऑडिओ चॅनलवर उपलब्ध आहे.तसेच रविप्रकाश चापके यांच्या मराठी गझलांचा #गझल_गुलाबो हा अलबम लवकरच spotify वर प्रसिद्ध होत आहे.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेश भट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके व दस्तुरखुद्द सुधाकर कदम हे आहेत.

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे....

आयुष्याच्या अत्यंत समृद्ध टप्प्यावर माझा हा कलंदर मित्र उभा आहे.त्याला आरोग्यपूर्ण,समृद्ध दीर्घ आयुष्य लाभॊ यासाठी माझ्या शुभेच्छा..

-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

संस्थापक अध्यक्ष

सुरेश भट गझल मंच

पुणे.


(चकव्यातून फिरतो मौनी मधून...)

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना

#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७.गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.माझी गझल गुलबो-रविप्रकाश चापके

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-         "

५४.जळलो धुपापरी मी-                  "

५५.प्रतीक्षा पार्थना झाली-                "

५६.काट्यास फूलआले -                  "

५७.जो तो दिसावयाला दिसतो सुखात "

५७.असे पत्र आता तुला मी लिहावे-    "

५८.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत


#मराठी_गीते


१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

४४.रे मना तुज काय झाले सांग ना-सुधाकर कदम

४५.काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर- "

४६.हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा-    "

४७.स्पर्शून एकदा तू केले मला ययाती-       "

४८.कशी वेदना विसरायाची सांग मला तू-   "

४९.जीवनाची एकतारी-                           "

५०.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी "

५१.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे-आशा पांडे

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती राव (बालिगा)


#उर्दू_ग़ज़ल


१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

१२.ना सही लब न खोलिए साहब-हनीफ़ साग़र 

१३.उनकी गलियों से उठाई है ग़ज़ल-अशोक अंजुम

----------------------------------------------------


#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील '#नग़्म_ए_ग़ज़ल' आणि '#प्रसार_गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...

#उर्दू_ग़ज़ल

१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

 ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

 गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६


-निषाद कदम

-------------------------------------------------------------------

●ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ मधील फेसबुकवरील स्वररचना...


-मराठी-


१.तुझे माझ्याजवळ असणे सुखद होते-विद्या देशपांडे

२.प्रेम होते कसे स्वप्न पडते कसे-संजय गोरडे

३.एखाद्या दुपारवेळी मी खिन्न एकटा असतो-प्रियंका गिरी

४.जे जे मला मिळाले साभार देत आहे-आशा पांडे

५.डोळ्यात आसवांना मी आणणार नाही-डॉ.मनोज सोनोने

६.भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला-अनिल जाधव

७.तुझ्या माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे-कविकुमार

८.केवढे झाले सहज जाणे तुझे-शरद काळे

९.नेहमी तुझ्याच आसपास मी-अश्विनी बोंडे

१०.ओठात नाव येता सांजावला शहारा-साईनाथ फुसे

११.अशा सांजवेळी दिवेलागणीला-सविता बन्सोड

१२.दिवस येतो दिवस जातो-डॉ.अविनाश सांगोलेकर

१३.वंचना जखमा जुन्या उसवून येते-अमिता गोसावी

१५.कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते-सचिन साताळकर

१६.आपण सारे इथे बुडबुडे-अशोक कुलकर्णी

१७.दुःखात का जीवाला झुरवत बसायचे-गौरी शिरसाट 

१८.एकरूप व्हायचे, प्रेमगीत गायचे-दीपाली वझे

१९.पुन्हा थांबेन जर ती यायची आहे-स्मिता गोरंटीवार

२०.झिजल्याशिवाय दरवळ नाही-मीनाक्षी गोरंटीवार

२१.दिशा शृंगारल्या होत्या हवा गंधाळली होती-प्रशांत वैद्य

२२.झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या-प्रतिभा सराफ

२३.दुःख माझे दूर करण्या धावते माझी गझल-प्रसन्नकुमार धुमाळ 

२४.सांग तुजला काय आता आठवाया लागले-सुधाकर इनामदार

२५.ऐक ना! बोलायचे राहून गेले-निर्मला सोनी

२६.कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला-अल्पना देशमुख नायक

२७.भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर-मसूद पटेल

२८.हळूच बोलणे तुझे तसे हळूच हासणे-हेमंत जाधव 

२९.तुला उगाच वाटते तुझ्याविना मरेन मी-दिवाकर जोशी

३०.मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती-वंदना पाटील वैराळकर

३१.मिठीत तुझिया येउन झाला निवांत वारा-डॉ.संगीता म्हसकर

३२.दुःख माझे तुला पण कळू लागले-भैय्या पेठकर

३३.अचानक जीभ ही अडते-अनिल पाटील 

३४.सांजकोवळी क्षितिजावरती-संजय इंगळे तिगावकर

३५.उदास झाले हसरे अंगण-व्यंकटेश कुलकर्णी

३६.केलेत केवढे तू उपकार काय सांगू-श्रीराम गिरी

३७.पुन्हा का तेच ते होते-कीर्ती वैराळकर

३८.तुझ्यावर भाळलेल्या वेदनांचे काय मग?-अंजली पंडित दीक्षित

३९.ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे-म्.भा.चव्हाण

४०.संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

४१.दूर तिथे घन बरसे हलकासा-सदानंद डबीर

४२.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

४३.रात गेली निघून पाऱ्याची-सुरेश भट

४४.मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर-उ.रा.गिरी

४५.आदिशक्ती तू,आई रेणुके-निलकृष्ण देशपांडे

४६.घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली-शिवा राऊत 

४७.भेटली तू मला वादळासारखी-श्रीकृष्ण राऊत 

४८.सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम


-हिंदी/उर्दू-


४९.तुमने किया है प्यार कि घायल किया हमे-डॉ.प्यारेलाल श्रीमाल

५०.जो भी तेरी गली में आता है-हनीफ़ साग़र

५१.इल्म ऐसा वो सीखकर आया-अमित झा राही

५२.शाम होते ही सितारे भी चमक जाते है-सुधीर बल्लेवर 'मलंग'

५३.हो अगर दिल में उजाले तो ग़ज़ल होती है-एजाज़ शेख

५४.दिल तो टूटा है दिल लगाने से-उमाशंकर अश्क

Saturday, December 17, 2022

राग #तोडी आणि मी...


        तोडी या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌ऱ्यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
        तोडी राग जवळ-जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
          अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील ’एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर ’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग ’अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं ’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील ’रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.'मिलकरजुदा' ही अप्रतिम गझल जगजीत-चित्रा यांनी अमर करून ठेवली आहे.
          साबरी बंधुंनी गायिलेली ’अल्ला हे अल्ला...’ ही कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांना बुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी ’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’ या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
          माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,
गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.असो!
       मी सुद्धा काही मराठी-उर्दू गझला तोडी रागात स्वरबद्ध केल्या आहेत.नुकतीच #गझल_गुलाबो या अल्बम करीता रविप्रकाश चापके यांची "जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे" ही गझल स्वरबद्ध करून ध्वनिमुद्रण केले.यातील पहिल्या ओळीची सुरवात कोमल धैवतापासून सुरू होऊन निषादावरील ठहरावासह 'भूप' रागाची अनुभूती देऊन, 'आहे' या शब्दावरील पंचम आणि पूर्ण ओळीत षड्ज नसणे हे  वैशिष्ठयपूर्ण असून हीच ओळ दुसऱ्यांदा गाऊन षड्जावर सोडण्याची प्रक्रिया सुद्धा आनंददायी आहे.तसेच शेरांमध्ये केलेला तोडी रागात नसलेल्या कोमल निषादाचा आणि कोमल मध्यमाचा प्रयोग सुद्धा अत्यंत वेगळ्या विश्वात नेणारा आहे. स्वरांचा हा चक्रव्यूह रसिकांना  नक्कीच भावेल.ऐका तर...
        
जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे
गर्दीत माणसांना एकांत खात आहे

आता तुझ्या स्मृतींची फुलपाखरे उडाली
बेरंग बाग नुसती जळते मनात आहे

ये ना तुझा नशीबा मी हात पाहते रे
माझे नशीब माझ्या ह्या मनगटात आहे

ऐकून घ्या परंतू सांगू नका कुणाला
जो जो सुखात आहे,तो तो भ्रमात आहे

गायिका-गायत्री गायकवाड गुल्हाने



 

 

Wednesday, December 7, 2022

Pioneer gazal singer in marathi...


वर्ष १९८१

बँ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे काँटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या काँटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाला मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.

त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.

त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाँ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.

१९८१ मध्ये ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’Out Standing Young Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’#Pioneer_in_the_introduction_of_MARATHI_GAZALS' असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?

मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी सुरेश भट तर कधी डाँ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डाँ,सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह).

यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले.या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ आँक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.

"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी..........

 ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-मस्त कलंदर

१४.१०.२०११

Thursday, November 17, 2022

#काळोखाच्या_तपोवनातून... रसग्रहण.


गझलगंधर्व सुधाकर कदमांचा हा काव्यसंग्रह प्राप्त होऊन जवळपास एक वर्ष झालंय. पण पुस्तका बाबत व्यक्त व्हायचे राहूनच गेले. आज पुन्हा हा संग्रह चाळताना व्यक्त व्हावेसे वाटले.नुकताच त्यांचा वाढदिवसही साजरा झाला.म्हणून हे दोन शब्द...तसे या पुस्तकावर व्यक्त होणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास, तेव्हा हा एक छोटासा अभिप्राय..
   रंग बिरंगी भावकळांचा उमलून आलेला हा पुष्पगुच्छ मंद मंद दरवळत राहतो मनाच्या गाभाऱ्यात.आणि जाणीवांच्या पार पल्याड जाऊन काही सांगू पाहणारी शब्दकळा  एक अलौकिक अनुभूती देऊन जाते.

ना महाभारत,ना रामायण तरीही
जानकी अन् द्रौपदी लागे पणाला

   मुळात गायकीला समर्पित केलेले कवीचे जीवन असल्यामुळेच असेल, एक लय घेऊन कविता जन्मास येऊन ती प्रवाहित होतांना दिसते. ओलेत्या भावनांनी नखशिखांत चिंब कविता जणू कवीचे हृद्गत खोलून जातात..
   आपलेच शब्द आपल्याच भावना आणि आपलेच विरघळणे ठाई ठाई अनुभवास येते...
   भावनांचा एक एक सरस सुंदर दागिना म्हणजे जणू एक एक कविता.ह्या कविता वाचतांना फार मृदुल अलवारपणे  गुंफल्याचे सतत जाणवते. आपल्याच भावविश्वात रंगलेल्या या कवितांना  विचारांचे सुंदर रेखीव कोंदण सुध्दा लाभले आहे.
त्यात  अमाप शब्द संपदा आणि लाघवी बोल यांचा सुरेख मेळ बघायला मिळतो.
 
   मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
   काट्यास मात्र येथे कसलाच ना निवारा
   
    पुस्तकाचे  नावचं कवीने जीवनाशी केलेला संघर्ष सांगून जातो.तर कधी अनुभवाचे बोल कणखर पणे समाजातील अनिष्ट व्यंगावर सडेतोड प्रहार करतांना 
प्रकर्षाने जाणवतात.तर कधी कविता हळवे पणाचा परमोच्च बिंदू गाठतानाही दिसते.स्वप्नदेशीच्या प्रवासात कवी हरखून आपल्यालाच विश्वात रंगलेले दिसतात.
तर कधी  एखादी कविता जीवनाचे तत्वज्ञान इतकी सहजपणाने व्यक्त करते की आपण स्तिमित होऊन जातो..

जीवनाची एकतारी
पंढरिच्या महाद्वारी

तारणारा मारणारा
तूच रे सर्वाधिकारी

विशेष म्हणजे आपल्या पत्नीसाठी लिहिलेल्या ह्या ओळी  खूप भावस्पर्शी आहेत..

माझ्यासाठी जिवास जाळुन उजेडली जी
ती 'सुलभा' मज मनापासुनी खूप भावली

ही जोडी कायम अशीच आनंदी रहावी ह्या शुभेच्छा सहज ओठांवर येतात..

अंगी असलेला मोठेपणा कवितांमधून सुद्धा जाणवतो.

दीन दु:खितांना | मदत जे करी
तेणे मुक्ती चारी |साधियेल्या

एकंदर एक केवळ अप्रतिम सुंदरअसा हा काव्यसंग्रह आहे यात काही संशयच नाही..

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दु:ख झेलुनी सुखासवे फुलायचे

 ह्या ओळी किती सहजतेने जीवनाचे वास्तव मांडून जातात ना!

सौ. ‌मीनाक्षी नितीन गोरंटीवार....


 

 

Monday, November 14, 2022

कौतुक...डॉ.सुशील देशपांडे

     १९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुर ला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, छान गायलास पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम. 
 एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपुन ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत. 
सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा  ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे. 
संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.  
 सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे. 
  ३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं. 
सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत. 
कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम. 
मेहंदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो. 
कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?
     शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे. 
आज सरांचा वाढदिवस आहे. 
जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 
     कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा
हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।
बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।
💐💐🎂🎂
        डॉ सुशील देशपांडे
          कारंजा लाड


 

Monday, October 3, 2022

अर्चना..


श्रीहरी रे श्रीहरी
नाद केवळ एक घुमतो श्रीहरी रे श्रीहरी

तिमिर झाला कृष्ण आता राधिका ही शर्वरी
तारकांचे चाळ गाती श्रीहरी रे श्रीहरी

आसवांचे सूर झाले पापणीची बासरी
भाविकांचे भाव गाती श्रीहरी रे श्रीहरी

गीत गुंजित प्राण झाले शब्द केवळ श्रीहरी
श्वास विरती शब्द वरती श्रीहरी रे श्रीहरी

गायिका - अनुराधा मराठे
गीत - आशा पांडे
संगीत - सुधाकर कदम
संगीत संयोजन - मिलिंद गुणे
प्रास्ताविक - रेणुका देशकर

●क्षणचित्रे - यशवंतराव नाट्यगृह,पुणे.

#भक्तीगीत #संगीत #music #composition #गायन


 

मज कळले तू माझी...उ.रा.गिरी

.     स्व.उ.रा.गिरींचे खालील गीत मी अनेक कार्यक्रमातून गायिलो आहे.१९७५ ला ऑर्केस्ट्रा सोडल्यानंतर काही काळ गीत-गझला,सरोद वादन असे सोलो कार्यक्रम करायचो. त्यावेळी साउंड सिस्टीमवाल्याने कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले तर ते मिळायचे.पण बहुतेक एम्प्लिफायर व माईक अशीच साउंड सिस्टीम असायची.समोर मॉनिटर पण नसायचे.रसिकांची दाद मिळाली की,कार्यक्रम व्यवस्थित चालला आहे असं समजायचं.
     सुरेश भट व मी महाराष्ट्रभर फिरलो तेव्हाही अशीच परिस्थिती होती.त्यावेळी जी जी गीते व गझला कार्यक्रमात ध्वनिमुद्रित झाल्या नाही त्या त्या गाऊन पुनश्च आपल्यासमोर ठेवण्यासाठी व्होकल कॉर्ड्सचा त्रास असूनही प्रयत्न करतो आहे.कृपया गोड करून घ्या!
        ह्या गीताची सुरावट त्यातील शब्दांप्रमाणे अनेक वळणे घेणारी आहे.कुठे भैरवी, कुठे तोडी तर कुठे बिलासखानी तोडी.हे गीत माझ्या कार्यक्रमात हमखास दाद घेत असे.आता नरडं चालत नसल्यामुळे 'त्या' प्रकारचे सादरीकरण जमत नाही.पण एका संगीतकाराची बंदिश म्हणून तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता.धन्यवाद!

●Mobile REC.... headphone please

मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर
तू माझ्या गगनातुन उल्केपरी  ढळल्यावर

कळत न ही आज कुठे वनवासी वाट वळे ?
स्वप्नाच्या सरितेवर ही कुठली लाट जळे ?
हरवुन संदर्भ उभे जळ कुठल्या वळणावर

डोळ्याचे डोह दोन भरून आज आलेले
अश्रूंच्या पावसात चांद्रबिंब न्हालेले
क्रुसावर सनईच्या चंद्रकौंस खिळल्यावर

अजून कापऱ्या जळात प्रतिबिंबित आठवणी
अजून विराणी तळात गात कुणी जलराणी
एक कहाणी विझली मूक नदी काठावर
-----------------------------------------------------------------------
मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचा सुरेल कार्यक्रम गायक मयूर महाजन करतो..  
                      ● #सरगम_तुझ्याचसाठी ●



 

 

कोमल हृदयाचा रांगडा कवी...शिवा राऊत


     शिवबा रोडबाजी राउत म्हणजे आमचा शिवा राऊत होय.साधा, भोळा,निरागस शिवा, कसा जगला यापेक्षा त्याने साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा कसा उमटवला हे पाहणे महत्वाचे ठरते. सतत मुशाफिरी करणारा रांगडा शिवा स्वतःकडे जरी दुर्लक्ष करीत होता,तरी कवितेचा बाबतीत मात्र अतिशय हळवा होता. आर्णीला (जि.यवतमाळ) असताना प्रवासात जर कविता सुचली तर, सरळ आपल्या पायजाम्यावर लिहायचा.नंतर स्टँडवरून सरळ घरी माझ्याकडे येऊन त्याची एक वही होती,त्यात लिहून ठेवायचा.(ती वही मी जपून ठेवली आहे.)
      कविता सुचणे व पाडणे यात खूप फरक आहे.शिवाने कविता कधीच पाडली नाही.ती आपसूकच आलेली असायची.

अंगांगी कृष्णमिठीने
जन्माचे देऊळ सजले
गोपुरे रचावी त्याचा
हा अक्षर उत्सव चाले

मराठी कवितेला आपला वेगळा बाज देणारा शिवा सतत दुःख झेलत जगला.वेदनांच्या अंतरद्वंदात फसलेला हा विदेही कवी सध्याच्या चकचकीत जगात

मी तो या मातीची
उन्ह विराणी वो
अभंगाला टाहो
वादळाचा...

म्हणत उपेक्षित जीवन जगला.तरी शब्दकळा मात्र त्याची म्हणजे फक्त त्याचीच होती.

सायीच्या सुईने 
काढलास काटा
डोळे पाणवठा
पुनवेचा...

अशा आतडे सोलून काढणाऱ्या ओळी अभंग रूपाने इतक्या ताकदीने मांडणारा शिवा त्या काळातील एकमेव होता असे म्हटले तरी चालेल.
      यवतमाळ जिल्ह्यातील वेणी नावाच्या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या शिवा खेड्यातच वाढला.मोठा झाला व खेड्यातच संपला.त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी पाहिल्यावर त्याने हे सगळे कोठून मिळविले हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा.यावर त्याला छेडले असता तो ही समर्पक उत्तर देऊ शकत नसे.कारण अंतर्मनात उफाळलेल्या कल्पनांना शब्द कसे दिल्या जातात हे त्यालाही कळत नव्हते, नसावे. वृत्त्ताकरिता मात्रा मोजायची त्याला कधी गरजच पडत नव्हती. जे काही यायचे ते मुळातच रेखीव,बांधीव असायचे.

स्वप्न प्रहरी धुकाळ धूसर डोंगर पसरण
जशी दुरातुन दिठीत आली भिजली गवळण
अल्याड डोंगर पल्याड गंगा
मधि मारोती गावधुरंधर
उतार भांगातुन कौलाच्या
उन्हे सांडती मोत्याचा चुर
या पूनव पहाटे आला
पाऊस कशाला बाई
ओलेसे अंगण झाले
वाऱ्याला नाचण घाई

अशी अनेक उदाहरणे देता येतील.

      एकदा असेच शिवा म्हणाला "दादासाहेब (तो मला दादा म्हणायचा) तुम्ही आकाशवाणीवर माझ्या कविता गात नाही याचे कारण काय?"
मी म्हणालो, "तुझ्या कविता समजायला जरा कठीण असतात,त्यामुळे लोकांना त्या आवडतील की नाही या भीतीपोटी मी गात नाही."
त्यावेळी शिवा काहीच बोलला नाही. ४/५ दिवसांनी मात्र माहूरच्या रेणुकादेवीवरील एक अप्रतिम रचना  मला आणून दिली व काही न बोलता निघून गेला.मी बघतच राहिलो.ती रचना होती...

घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे गे रेणुके माऊली...

      माझ्या डोळ्यात खळकन पाणी आलं! ताबडतोब त्याच मूडमध्ये हार्मोनियम घेऊन बसलो पण योग्य अशी चाल काही सुचेना.असाच एक महिना निघून गेला.या एक महिन्यात शिवाने अवाक्षराने सुद्धा मला याबद्दल छेडले नाही.एक दिवस अचानक शिवरंजनीच्या स्वरांनी स्वतःहून या कवितेला सजवलं व मी आकाशवाणीवर (नागपूर) गायिलो.प्रसारणानंतरचा शिवाचा आनंद पाहून मला गहिवरून आले.अशा लहान सहान बाबींनी हरखून जाणारा शिवा एखाद्या निरागस बालकासारखा दिसायचा.
     लग्न झाल्यावरही कौटुंबिक पाश त्याला बांधून ठेवू शकले नाही.या मोहमयी दुनियेत त्याला फक्त एकाच गोष्टीचा मोह होता...तो कवितेचा.त्यांचेकडे बघताना मला का कोण जाणे गाडगे बाबांची आठवण व्हायची.तसे दोघांमध्ये काहीच साम्य नाही.पण मला मात्र वाटायचे...
कदाचित निरागसता व चेहरेपट्टीमुळे असू शकते.गाडगे बाबांनी कशाचाही मोह न करता समाजातील अंधश्रद्धेची जळमटं दूर करण्याचा प्रयत्न करून जनता जनार्दनची सेवा केली.तर शिवाने मोह मायेच्या पल्याड जाऊन साहित्य सेवेत स्वतः ला समर्पित केले.

किती आवर्तने एका समर्पणासाठी
आक्रंदने अधांतरी अंधार हाकाटी
भुकेमुळे ओठ ऊर अपंग पाचोळा
उभा जीव मायपाश देह लोळा गोळा

       अभंग लिहिणारा शिवा आतल्या आत दुभंगत राहिला.हा दुभंग सांध होणे   त्याला शेवटपर्यंत जमले नाही.सध्याच्या जगातील व्यवहार वाद त्याला कळला नाही.प्रसिद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी खटपटी त्याला जमल्या नाही.तो त्याचा पिंड ही नव्हता.खरे म्हणजे त्याच्या कविताच इतक्या जबरदस्त होत्या की,प्रसिद्धी त्याला शोधत यायची.नागपूरच्या तरुण भारत या वर्तमानपत्रातून वामन तेलंग यांनी शिवाला अक्षरशः उचलले व लोकांपर्यंत पोहचवले.आपल्या कविता,कथा छापून याव्या म्हणून नाना प्रकार करणाऱ्या साहित्यिकांच्या जगात शिवासारख्या सरळसोट माणसाच्या कविता कोणत्याही लाग्या बांध्या शिवाय छापून यायला लागल्या यातच शिवाच्या कवितांचे वेगळेपण दडले आहे.या हिऱ्याचे पैलू रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम दै. तरुण भारत ने त्याच्या हयातभर केले.तसेच नागपूर आकाशवाणीच्या बबन नाखले यांनीही शिवाला जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्भेळ प्रयत्न केला. दै.मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनीही त्याला व त्याच्यातील कवीला जगवले. 
'सो कोल्ड सोफ़ॅस्टीकेटेड ' लोकांनी त्याचे मद्यपान बंद असेपर्यंतच त्याला थारा दिला.पण मित्र मंडळींनी मात्र त्याला गुण दोषांसह स्वीकारला होता.

नसे आकाशात 
दहा पाच सूर्य
रत्न शिरोधार्य
एखादेच...

      शिवाच्या कवितांवर ग्रेसांप्रमाणे दुर्बोधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला.पण रसिकांनी मात्र त्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीचा आणि देखण्या शब्दकळेचा भरपूर आनंद घेतला. यवतमाळ चा कवी गजेश तोंडरे म्हणतो,"शिवाचा अभंग वाचकाला प्रथम मोहवतो,नंतर काळीज सोलून काढतो."

मांडता न आला
दुःखाचा हिशेब
वारंवार नभ
साकळे वो...

नाचो येते मन
हळू गळे पिस
मयुर उदास
आनंदाचा...

     अशा ग्रेसांच्या तोडीच्या या कवीच्या कवितांवर धूळ बसत चालली आहे,ही दुःखाची गोष्ट आहे.आपापला त वा गरम करणाऱ्यांच्या या युगात शिवाचा तवा थंड व्हायला लागला आहे. जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या शिवाला मृत्यूनंतरही न्याय मिळाला नाही.यात नुकसान कोणाचे? शिवाचे की मराठी भाषेचे?
शिवाच्याच शब्दात म्हणावेसे वाटते...

नका करू कधी
मने उकिरडा
अश्वमेध काढा
मानव्याचा...

शिवाने फक्त अभंगच लिहिले असे नाही.

देठ दुखरा हात झाला,चढत गेली बांगडी
काय पुसशी मैत्रिणीला ,गोष्ट थोडी वाकडी
.
बरड भुकेल्या मुखात आचळ पिळून आला पाऊस पान्हा
पुलकित झाले डोंगर काळीज निळा सावळा झेलुन कान्हा
.
नाच पोरी नाच,तुझ्या चा लाला काच
डोळ्यात तिढा पाण्याचा पाढा
गरत्या फिरत्या तालात नाच...
.
विरहात कोंदलेले काळीज मुक्त झाले
आणि मुक्या स्वरांना बिलगून शब्द आले
.
आसवांचे मूळ कोठे ना कळे
आतल्या आतून सारे उन्मळे
.
डोळा घालून घोटाळा केला
उभ्या गावाच्या कानात गेला
पाडपिकल्या देहाची बाई
चव हा सव हुस व होई
कशी सांगू मी चारचौघी ला
.
तू करूणाकर, तूच चराचर, व्यापुनि उरला दशांगुळे
तू अविनाशी, विघ्न विनाशी, तू तेजाची सूर्यकुळे 

      एकाच आवर्तनात न फिरता अशा विविध भाव - भावनांच्या कविता शिवाने लिहिल्या.त्या महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचाव्या तसेच शिवाचा अल्पसा का होईना परिचय व्हावा यासाठी हा अल्पसा प्रयत्न....
कारण

त्यांनी आतड्याचे
सोहळे मांडले
दिले अजिर्णाला
आवतन...

- सुधाकर कदम
--------------------------------------------------------------------------
३०/३२ वर्षांअगोदर स्वरबद्ध केलेली शिवाची 

'घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली
उदे उदे जगदंबे हे रेणुके माऊली...'

गाण्याचा प्रयत्न गोड करून घ्यावा,ही नम्र विनंती...
  • ●Mobile REC...headphone please


 

जो भी तेरी गली मे आता... हनीफ़ साग़र

 


Monday, September 19, 2022

शेतकरी गीत...

 महाराष्ट्रातील संगीत शिक्षक आणि रसिकहो,

१९८५ ते १९९६ या दहा वर्षाच्या कालावधीत संगीतकार (संगीत शिक्षक) म्हणून महाराष्ट्र शासनाच्या 'गीतमंच' (पुणे) विभागासाठी 'हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली' हे महाराष्ट्रगीत (कुसुमाग्रज), 'हे प्रभो जगदीश्वरा (वंदना विटणकर), 'ऊठ ऊठ सह्याद्रे' (विंदा करंदीकर), 'गे मायभू' (सुरेश भट), 'आनंदाने गाऊ या' (राजा मंगळवेढेकर), 'सकाळ' (उ.रा. गिरी), 'बाभळी' (इंदिरा संत) वगैरे कवी/कवयित्रींच्या पाठ्यपुस्तकातील अनेक कविता स्वरबद्ध करून दिल्या होत्या. त्यातील काहींचे ध्वनिमुद्रण शासनाच्याच 'बालचित्रवाणी' या संस्थेमध्ये करण्यात आले.आज त्यापैकीच एक #शेतकरी_गीत 'पीक खुशीत डोलतया भारी,भरला आनंद समद्या शिवारी' हे गीत सादर करीत आहे....(या गीतावर अनेक शाळांमधून नृत्य बसविण्यात आल्याचे अनेक शिक्षकांनी मला कळविले.) येथे फक्त मुखडाच दिला आहे.पूर्ण गीत ऐकण्यासाठी खाली युट्युब लिंक दिली आहे.आवडल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या.

https://youtu.be/a-wBYxab_0A



Wednesday, August 24, 2022

साठवणीतील आठवण....



  •       सुरेश भट आर्णीला माझेकडे आले की 'रिलॅक्स' व्हायचे.छान मूड लागायचा व गझला लिहायचे... 
२७/१२/१९८० च्या त्यांच्या खालील पत्रावरून कळेलच...
------------------------------------------------------------------
प्रिय सुधाकरराव,
दि.१६ रोजी सायंकाळी साडेचारला सुखरूप पोहोचलो.घरी पोचताच मुलगा परत आल्याचे कळले.फार मोठे दडपण नाहीसे झाले.
मी दि.२१ ला नागपूर सोडत असून चंद्रपूर व मूल 
आटोपून दि.२९ ला परत येईन.
     तुमच्या घरी तुम्ही सर्वांनी  मला फारच आराम दिला.सौ.सुलभाने माझी फारच सेवा केली.असह्य मानसिक दडपण असताना मी कसातरी दिवस काढत होतो.हे दडपण काही अंशी तुमच्या घरी हलके झाले.
जानेवारी महिनाही दौऱ्याचा आहे.२९ व ३० डिसेंबरला नागपूरमध्ये आहे.
     खूप तयारी करा.मुलांना आशीर्वाद.शेखरला (त्या वेळचा तबला वादक) नमस्कार.

तुमचा 
सुरेश भट
---------------
*मानसिक दडपणातून मुक्त झाल्याबरोबर मूल येथे झालेली 'हूल' ही गझल स्वरबद्ध करण्यासाठी पोस्टाने आर्णीला पाठवली होती. ती पण खाली  दिली आहे.




 

Sunday, August 7, 2022

मला आठवेना तुला भेटल्याचे...

 .        लवकरच सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध होत असलेल्या #गझल_गुलाबो  या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील दुसरी गझल 'मला आठवेना तुला भेटल्याचे'. ही गझल  दहा मात्राच्या #झपताल या तालात आहे. झपताल या तालाचा डौल काही वेगळाच असतो, हा डौल गायत्रीने या गझलमध्ये अतिशय समर्थपणे सांभाळल्याचे आपणास ऐकताना नक्कीच जाणवेल. ऐका तर.....                      

      

गायिका - गायत्री गायकवाड गुल्हाने

सारंगी - उस्ताद लियाकतअली खान

तबला - पांडुरंग पवार

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

संगीत - सुधाकर कदम

संगीत संयोजन - मिलिंद गुणे


●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!


●headphone please

#gazal #composition #मराठीगझल  #गझल  #music


सुधाकरी तोडी...'गझल गुलाबो'...

.        लवकरच सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध होत असलेल्या #गझल_गुलाबो  या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील 'माझी गझल गुलाबो' ही गझल मी नव्याने संशोधित केलेल्या सुरावटीत कंपोज केली असून या सुरावटीचे नामकरण बिलासखानी तोडीच्या धर्तीवर '#सुधाकरी_तोडी' असे केले आहे.अशी सुरावट भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अजूनपर्यंत तरी कुठेच उल्लेखलेली नाही.उत्तर प्रदेशातील 'हाथरस' येथून प्रकाशित झालेल्या 'राग-कोष' या ग्रंथात  ५०० रागांची माहिती दिली आहे.पण या सुरावटीचा कुठलाही राग त्यात नाही.एवढेच नव्हे तर पंडित भातखंडे यांच्याही सर्व ग्रंथात असली सुरावट मला आढळली नाही. सुरावट अशी आहे...षड्ज, कोमल रिषभ, कोमल गांधार, पंचम, कोमल निषाद... मध्यम व धैवत वर्ज...
    •       तर,अशा या सुरावटीतील ही गझल संपूर्ण गायकी अंगाने गायक मयूर महाजन यांनी गायिली आहे.तरी आनंद घ्यावा, ही विनंती. (चांगले तुमचे,वांगले आमचे.)

सारंगी - उस्ताद लियाकतअली खान
तबला - पांडुरंग पवार
संगीत संयोजन - मिलिंद गुणे

●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!

●Headphone please


#gazal #composition #मराठीगझल  #गझल  #music

 

 

Tuesday, July 19, 2022

काळोखाच्या तपोवनातून...

  • .    सुधाकर कदम ह्यांची जीवननिष्ठा जपणारी कविता.

        मराठीचे आद्य गझलगायक  असलेले आणि 'गझल गंधर्व' या नावाने ओळखले जाणारे सुधाकर कदम  यांच्या कवितांची ओळख  महाराष्ट्रातील काव्य रसिकांना '#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' ह्या संग्रहा द्वारे झालेलीआहे. मुळात गायक-संगीतकार असलेले सुधाकर कदम गीतकार, गझलकार, अभंग रचनाकार, सशक्त विडंबनाकार अशा सर्व पातळीवर आपल्याला पुन्हा भेटतात ते त्यांच्या  काळोखाचा तपोवनातून ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहातून, या संग्रहात सुधाकर कदम यांनी मराठीतील जवळपास सर्व काव्यप्रकार हाताळले आहेत हे विशेष.  दीर्घ आणि व्यापक असा अनुभव, सकारात्मक विचारशैली,  उस्फुर्त सृजनशीलता, शब्द सौंदर्य ह्या सोबत नेमक्या सुरांची साथ त्यामुळे कवितेला लाभलेली लयबद्धता ह्या सर्व अनुषंगाने सुधाकर कदम यांची कविता काव्य रसिकांना आकर्षून घेणारी ठरते.  पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये राहत असले तरीही मूळ विदर्भातील रहिवासी असलेल्या सुधाकर कदम यांना ग्रामीण भागात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव आहे. आपल्या कवितेमधून शेतकऱ्यांचे दुःख मांडतांना कवी म्हणतात,

 चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात
 राबतो शेतात। सालोसाल...
 जीवापलीकडे। मेहनत करी
 तरीही भाकरी। मिळेचि ना...
  ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी
 लिही कादंबरी। मुंबईत...

      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा कादंबरी कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा विरोधाभास आपल्या कवितेतून व्यंगार्थ स्वरूपात सुधाकर कदम यांनी चपखलपणे व्यक्त केला आहे. सुधाकर कदम यांचे शेती जीवनाविषयीचे निरीक्षण फार उत्तम आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्यावेळी शेतकऱ्याची पत्नी  किंवा ग्रामीण शेती मातीतील स्त्री जे काम करत असते त्याबद्दल ते म्हणतात,

 घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल
 कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल

      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधने हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये  सुधाकर कदम यांनी पहिल्यांदा केले असावे. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती ह्या शब्दासोबत स्त्रीसाठी पहिल्यांदा 'कष्टवती' हा शब्द  वापरून मराठी भाषेत नव्या शब्दांची भर टाकत भाषेला समृद्ध करण्याचे कामही सुधाकर कदम करत आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरते.  कष्ट करून शेतकऱ्याला समर्थ साथ देणाऱ्या स्त्री बद्दल बोलताना म्हणतात,

 किती संकटे येऊ दे
 दूर ठेऊया दुःखाला
 तू  असता संगे माझ्या
 घरपण येई घरट्याला

       फक्त शेतकऱ्यासंदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अर्धांगिनीच्या कार्याचा गौरव  करत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी घरपण ही कविता आहे असे आपल्या लक्षात येते.सुधाकर कदम यांचे निसर्गभान खूप लाघवी आहे. आपल्या कवितेमध्ये आपल्या शब्दातून त्यांनी अतिशय विलोभनीय असा निसर्ग टिपला आहे. शेती आणि निसर्ग यांचा समन्वय आपल्या शब्दातून मांडताना कवी म्हणतात,

अवघं लाघव हिरवं तुडुंब
द्यावी वाटे येथे मनालाही डूब
भरल्या  शेताच दर्शन घडता
सृष्टीपुढे झुके आपसुक माथा

      बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गावरील अनिल कविता या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अनवट सूर सारख्या कवितेमधून वर्षा ऋतूचे वर्णन श्यामरंग सारख्या कवितेतून  निसर्ग, प्रेम, राधाकृष्ण अशा अलवार संदर्भातून कवी आपला मनोभाव उलगडतात.  पाऊस,चैत्रपालवी, निसर्ग किमया अशा रचनांमधून तर जिवंत निसर्ग आपल्या शब्दातून कवींनी रेखाटला आहे. आठवण सारख्या कवितेमधून संध्या समयीच्या कातर आठवणी असताना विविध ऋतूंचे रंग पृथ्वीचे अंगण सजवतात आणि आठवणीचा न्यारा श्रावण  व्याकूळ करतो अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गाचे हे अल्हाददायक रूप असे वाचकाला भुरळ घालते.  तसेच रणरणत्या उन्हात निसर्गाचे भयावह रूप सुद्धा कधी कधी दिसून येते. रखरखत्या उन्हात दिसणारा निसर्ग टिपताना सुधाकर कदम म्हणतात,

 वेदनेला येई। उदयास्ती रंग
 रोजची दुपार। पेटवीते अंग
 देहा फुटे झरा। पाणी शोधताना
 कोस कोस धाव। वेगाने घेताना
 डोळ्यावर दाटे।  कारूण्याचे धुके
 जनावरांचेही। हंबरणे मुके

      उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी तगमग, जीवाची होणारी लाहीलाही, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणारी जनता, पाण्यावाचून जनावराचे हंबरणे हे सर्व अंगावर येणारे दाहक वर्णन निसर्गाचाच एक भाग आहे. तोही तितक्याच प्रभावीपणे चितारण्याचे काम कवींनी केलेले दिसून येते. अर्थात  जिथे पाण्याचे दुर्भिक्ष  आपल्या कवितेमधून दाहकतेने कवी मांडत असतात त्याच वेळी,

डोईवर एक। दुजी कटीवर
घेउनी घागर। सुंदरी ही...

      अशा शब्दात पाणी भरायला निघालेल्या रमणीचे वर्णन सुद्धा कवी तितके स्थापनेने करत असतात. सुधाकर कदम यांनी नजाकत भरल्या अश्या प्रणय रचना काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहातून काव्यरसिकांच्या समोर ठेवल्या आहेत. कल्लोळ सारखी  प्रणयरम्य कविता गणितीय भाषेत जाते. पूर्णत्वा, वर्तुळ, लांब त्रिज्येला जोडता  अशा शब्दात  प्रणयाचे पूर्णत्व कवींनी अधोरेखित केले आहे. प्रणयरम्य कवितेमध्ये गणितीय भाषा हा एक वेगळाच प्रयोग सुधाकर कदम यांनी या कवितेत केलेला दिसून येतो. ताळेबंद, प्रेमामध्ये, अत्तराचा फाया, रेशीम रात, भुलवा अशा अनेक कविता या संग्रहात प्रणयाच्या नवीन, अल्लड आणि आल्हाददायक भावभावनासह आलेल्या आहेत.

 नसे तू राधिका। नसे मीही कृष्ण
 बासरीची तान। नसे तेथे...
 (भुलवा)

 किंवा

 ना मी कृष्णा ना तू राधा
 का व्हावी गे सावळ बाधा ?

      असे प्रश्न विचारत कवींनी राधा-कृष्णाची प्रीत शब्दांकित केली आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेत फार सहजतेने केलेला दिसून येतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ह्याबाबत बोलत असताना कवी म्हणतात,

 ना महाभारत, न रामायण तरीही
 जानकी अन् द्रोपदी लागे पणाला

      असे सांगून मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असेल तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते असे ते निक्षून सांगतात. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू असल्याचे कवी आपल्या कवितेचे सांगताना म्हणतात,

सासुरवासिनी 
चाहूल घेऊन 
सडासंमार्जन 
करो लागे...

      या कडव्यामध्ये एक स्त्री आपले घर-अंगण सारवते आहे सजवते आहे. असे वर्णन दिसत असले तरी सासुरवाशीण ह्या एकाच शब्दात सासूच्या दडपणाखाली, धाकाखाली काम करणारी स्त्री आपल्या समोर उभी राहते. स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार  याप्रमाणेच आपल्या समाजातील जातिभेद अजूनही कायम आहेत. त्यालासुद्धा सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.

 किती प्रबोधन केले तरीही
 जात नसे त्या असती जाती

       या ओळी मधून संत काळापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विभूतींनी  जात हे संबोधन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तरीही या समाजातील जातीभेद संपला नाही. 'नाठाळाचे माथी लाठी' अशी भूमिका घेतली तरी  तुकारामाचे कुणी ऐकले नाही. आणि जीवनभर विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या चोखामेळ्याला जिवंतपणी तर गाभाऱ्यात प्रवेश मिळालाच नाही. आणि  मरणोत्तर  पायरीवर जागा मिळाली म्हणून धन्यता मानावी लागली. ही सर्व शोकांतिका सुधाकर  कदम यांनी आपल्या रचनेत कधी व्यंगात्मक रीतीने तर कधी सरळसोट हल्ला चढवत मांडली आहे. देवाधर्माच्या नावाने जो व्यवहार या जगात चालू आहे त्याच्यावर अनेक ठिकाणे कवींनी  शाब्दिक हल्ला चढविला आहे.

 विश्वात्मकतेला
 चौकटीत कोणी
 बांधतो अज्ञानी
 न्यूनगंडे...

       अशा अभंगरचना मधून आज अज्ञानी लोक संपूर्ण  विश्व भावनेला चौकटीमध्ये बंदिस्त करत आहे. ही जाणीव कवींना अस्वस्थ करते. जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे कवीला आवर्जून वाटते. तशी ती जाणीव त्यांनी 'रे मना' या कवितेमध्ये व्यक्त सुद्धा केलेली दिसून येते. एकंदर समृद्ध काव्यानुभूती, विविध प्रतीके प्रतिमांचा वापर, समर्पक आणि चपलख उदाहरणे, सकारात्मक जीवननिष्ठा ह्या सर्वांचा एकत्रित दस्तावेज म्हणजे काळोखाच्या तपोवनातून  हा संग्रह आहे असे म्हणावे वाटते. स्वयं प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या ह्या सुंदर संग्रहाचे मुखपृष्ठ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रा.अविनाश वानखेडे यांनी तयार केलेले असून, ते अगदी समर्पक असे आहे. राम पंडित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाची श्रीमंती वाढवते. कवितेचे बहुतांश प्रकार सुधाकर कदम यांनी या संग्रहात हाताळले आहेत. मात्र मुक्तछंद हा काव्यप्रकार यात दिसून येत नाही. कवी मुळात गायक असल्यामुळे आपल्या कविता लयबद्ध कशा होतील याचा विचार त्यांच्या अंतर्मनात असल्याने  तसे घडले असावे असे वाटते. कवी शब्दाचे ऋण मानतात, शब्द आणि कविता त्यांच्यासाठी काय आहे ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

 आकळेल अर्थ
 घालता आवर्त
 एका एका आर्त
 शब्दाचा तो...
 शब्दाचा तो भाव
 समजून घेता
 संपेल आर्तता
 मनातील...

      शब्दांचा भाव म्हणजेच अर्थ समजून घेतला म्हणजे मनातील  सर्व जळमटे आणि दुःख नष्ट होतील अशी अपेक्षा कवी सुधाकर कदम यांनी व्यक्त केली असून ती यथार्थ पणे योग्य आणि रास्त आहे यात शंका नाही. सुधाकर कदम यांच्या काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

 -किरण शिवहर डोंगरदिवे
 वॉर्ड नंबर 7 समता नगर मेहकर
 ता मेहकर जि बुलढाणा 443301
मोबा 7588565576

 काळोखाच्या तपोवनातून ( कविता)
 सुधाकर कदम  मो.8888858850
 स्वयं प्रकाशन पुणे
 पृष्ठ 96, किंमत 150
---------------------------


 

 

Thursday, July 14, 2022

मैत्री...

  •  .           एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा, अडीअडचणीत कामी येण्याचा, वेळप्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याचा व संकटकाळी धावून जाण्याचा अलिखित करार म्हणजे 'मैत्री'! 

     संघटन करून राहण्याची वृत्ती जेव्हापासून माणसाने जोपासली तेव्हापासून, नात्यांसोबत मैत्री हा प्रकारही अस्तित्वात आला असावा.समविचारी, समआचारी व्यक्तीशीच मैत्री जुळते. कुठे ना कुठे तरी एखादा सूर जुळल्याशिवाय मैत्री होऊच शकत नाही. भिन्न भिन्न विचाराच्या व्यक्तींमधेही एखादा समान धागा मैत्री निर्माण करताना दिसतो.

      मैत्रीचे व मित्रांचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आपणास दिसून येतात. त्यातील राजकीय मैत्री हा फार गहन विषय आहे.हिंदी-चिनी भाई भाई म्हणत १९६२ मध्ये युद्ध पुकारून उत्तर पूर्व भागाचा लचका तोडणाऱ्या चीनची मैत्री साऱ्या जगाला माहीत आहे. (सध्याही युद्ध न करता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे.) पंडित नेहरू व लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मैत्रीची चर्चा आजही चवीने केली जाते. हिटलर मुसोलिनी मैत्री सुद्धा प्रसिद्ध आहे. महायुद्धाच्या काळात 'मित्रराष्ट्र' हा शब्द तर परवलीच्या शब्दाइतका महत्वाचा ठरला होता.

     कृष्ण सुदाम्याची मैत्री सर्वश्रुतच आहे. या मैत्रीला कोणते नाव द्यावे कळत नाही.धन्य तो कृष्ण व धन्य तो सुदामा! आज तर मोठ्या पदावर गेल्यावर आपल्या आईवडिलांना त्यांच्या गावरान पेहेरावामुळे ओळख न दाखवणारे महाभाग आपण बघतो.ते अशा सुदाम्याला काय ओळख दाखविणार?

     कृष्णाच्या मित्रप्रेमात गरिबी श्रीमंती आड आली नाही. तशीच कर्ण व दुर्योधनाच्या मैत्रीतही कोणत्याच बाबी आड आल्या नाहीत.पांडव आपले सख्खे भाऊ आहेत हे समजल्यावर जर कर्णाने जर दुर्योधनाचा पक्ष सोडला असता तर युद्धिष्ठिराऐवजी तोच हस्तिनापूरच्या गादीवर बसला असता. पण मृत्यू समोर दिसत असूनही त्याने मित्राशी इमान राखून मृत्यूला कवटाळले व मैत्रीची शान वाढविली.

     मित्र कसा असावा याबद्दल प्रत्येकाचे मत सारखेच असते.पण हे मत मित्राने आपल्याशी कसे वागावे याबद्दलचे असून,स्वतःवर पाळी आल्यावर मात्र यात बदलही होऊ शकतो. मैत्रीची जाण ठेवून मित्राचे उपकार स्मरून वागणाऱ्यांची अपवाद सोडून वानवाच आहे.मतलबापुरते मैत्रीचे ढोंग करणारेच बहुतकरून दिसून येतात.तुम्हाला वापरून फेकणारी मित्राची ही जात अतिशय घातक असून केसाने गळा कापण्यात वस्ताद असते.त्यामुळे मित्रासाठी जीव देणारे वा जीव लावणारे आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. असे जरी असले तरी पण प्रत्येकाला एका सच्च्या मित्राची सतत आवश्यकता भासत असते, हे ही तितकेच खरे!

     माणसाच्या आयुष्यात मित्राईतकेच महत्व मैत्रिणीलाही आहे. (हे बायकोला कसे समजावून सांगावे हा प्रश्नच आहे.) पण विवाहित पुरुषाला जर एखादी मैत्रीण असली तर बायको खपवून घेत नाही. (अर्थात, बायकोला जर मित्र असला तर नवराही खपवून घेत नाही.ही गोष्ट वेगळी.) मोठमोठे पुढारी,राजकारणी,

नेते,साहित्यिक ,गायक,संगीतकार,संशोधक यांना

 त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी (यांना ते 'प्रतिभा' असे म्हणतात.) त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेल्या दिसतात. (हे विधान सगळ्यांनाच लागू होते असे नाही.) ह्या 'प्रतिभां'च्या निकट सानिध्यामुळे बरीच मंडळी आपले ध्येय साध्य करतांना दिसून येते. (कुणाकुणाची पत्नी पण त्याची 'प्रतिभा' असू शकते.)

विवाहित पुरुषांच्या मैत्रिणीमुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाल्याच्याही अनेक घटना आहेत. ते काहीही असले तरी मैत्रीण असणे ही आयुष्यातील एक सुखद अनुभूती आहे असे अनेकजण मान्य करतांना दिसतात.कोणाच्या नशिबात असते,कोणाच्या नाही! त्यामुळे उगाच जळफळाट करून घेण्यात काहीच अर्थ नाही.

     राजकीय मैत्रीबद्दल तर न लिहिलेलेच बरे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात केव्हा गळा घालून 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा' हे गाणे आळवील हे सांगता येत नाही. या चुम्माचाटीमुळे पक्षांची शकलं झालेली आपण सर्वजण बघत आहोतच.राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो व कोणी कोणाचा मित्र नसतो. वेळ पाहून रंग बदलणारी ही जमात आहे. त्यामुळे यांच्यावर जास्ती लिहीण्यात काही मजा नाही.

-सुधाकर कदम

Thursday, June 16, 2022

आद्य मराठी गझलगायकाचा वाचनीय कवितासंग्रह...डॉ.अविनाश सांगोलेकर

  • आद्य मराठी गझलगायकाचा वाचनीय कवितासंग्रह

          कविवर्य  सुरेश भट ह्यांनी अनेकांना लिहिते केले , तर अनेकांना गातेही केले. आद्य मराठी गझलगायक , गझलगंधर्व सुधाकर कदम हे मात्र अधिक भाग्यवान आहेत.कारण त्यांना मराठी गझलविश्वात सुरेश भटांनी गाते तर  केलेच , शिवाय लिहितेही केले.कदम हे उत्तम गझलगायक आणि तितकेच उत्तम संगीतकार आहेत , हे सर्वश्रुतच आहे.मात्र कदमांच्या प्रसिद्धीपराड्गमुख वृत्तीमुळे ते कवी आहेत , हेच त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित होऊनही काव्यप्रेमींना फारसे माहीत होऊ शकलेले नाही.
             ' काळोखाच्या तपोवनातून ' हा कदमांचा दुसरा कवितासंग्रह असून तो सासवडच्या स्वयं प्रकाशनाने पुण्यात २१ डिसें. २०२१ रोजी समारंभपूर्वक प्रकाशित केला आहे. हा संग्रह वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की ,सुधाकर कदमांचे गझलगायन जसे श्रवणीय आहे,तसेच त्यांचा हा कवितासंग्रहही वाचनीय आहे.त्यात ८३ कवितांचा अंतर्भाव असून ह्या कविता गझल , हझल , गीत,अभंग , विडंबनकविता , तसेच अन्यही  कविताप्रकारांमधील आहेत.ह्या संग्रहाचे मर्म उलगडून दाखवणारी अभ्यासपूर्ण अशी सहा पृष्ठांची प्रस्तावना डॉ.राम पंडित ह्यांची लाभलेली आहे.
         कदमांच्या तत्त्वचिंतक आणि त्याच वेळी कलंदर असलेल्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे हृद्य दर्शन त्यांच्या बहुतांश कवितांमधून घडते. वानगीदाखल ' सध्यात्म ' ही कविता पहावी.अध्यात्माचे सध्याचे रूप हे सश्रद्ध माणसालाही कसे अश्रद्ध करते , हे ह्या कवितेतून कदम फार भेदकपणे चित्रित करतात. दुसरे असे की , ते वयोवृद्ध जरी असले , तरी त्यांच्या काही प्रेमकविता पाहिल्यानंतर मात्र ते ' अभी तो मैं जवान हुं ' असेच म्हणत आहेत , असे वाटत राहते. ह्या आणि अशा इतरही कारणांमुळे कदमांचा हा संग्रह वाचनीय तर झालेला आहेच.शिवाय तो संग्रहणीयही झालेला आहे.म्हणून तो काव्यप्रेमींनी आवर्जून विकत घेऊन वाचायला हवा , संग्रही ठेवायला हवा, असे सुचवावेसे वाटते.

प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर ,
डी - २०२ , विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा, 
बाणेर , पुणे - ४११०४५ 
( भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२ )


 

Wednesday, April 27, 2022

मराठी ग़ज़ल गायन में मील का पत्थर...राजेश माहेश्वरी.


     आर्णी जि . यवतमाल के विख्यात संगीतकार एवं ग़ज़ल गायक श्री . सुधाकर कदम जो सन १९७५ से संगीत से जुडे है अब महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे मे स्थित होकर अपनी आवाज एवं संगीत का जादू फैला रहे है . प्रख्यात कवि सुरेश भट के शब्द एवं सुधाकर कदम का सुर यानी ग़ज़ल गायकी में इंद्रधनुष समान प्रतीत होता है . सन १ ९ ७० से सुधाकर कदम ने ग़ज़ल गायन क्षेत्र में कदम रखा . मराठी ग़ज़ल गायन की तीन घंटे की महफिल सजाकर कार्यक्रम करनेवाला महाराष्ट्र मे एक भी ग़ज़ल गायक नहीं था यह बात खुद ग़ज़लकार सुरेश भट कहते थे . सुरेश भट एवं सुधाकर कदम इस जोडी ने मराठी गझल एवं ग़ज़ल गायकी जनता तक पहुंचाने हेतु सन १९८०-८२ से इन तीन वर्षों तक पूरे महाराष्ट्र का दौरा कर गझल के कार्यक्रम प्रस्तुत किए . तभी से महाराष्ट्र में मराठी ग़ज़ल क्या चीज है इसका पता चला , लोकप्रियता बढने लगी , तभी से कई गायकों न ग़ज़ल गायकी की ओर रुख किया . पर आज भी मराठी ग़ज़ल गायकी में सधाकर कदम का स्थान मिल का पत्थर है . इसलिए सुरेश भट जैसे महान कवि ग़ज़लकार उन्हें आदय मराठी ग़ज़ल गायक कहते थे . वह प्रमाणित होता नजर आ रहा है . 


     उर्दू , हिंदी , ग़ज़ल अलग बात है वहाँ मराठी गझल प्रस्तुत करना कठिन था . हिंदी , उर्दू , मराठी यह केवल भाषा नहीं है , भाषा के साथ उसकी संस्कृती के अनुसार भाषाओं का रुप बदलता है . भाषा की विशेषताओं के चलते ही संस्कृति का आंगन फलफूल है . ग़ज़ल के संदर्भ में यह अधिक सटिक बैठता है क्यों कि , उस प्रकार ढंग कोई मराठी का नही . अरबी , उर्दू भी उस प्रकार के काव्यों के गर्भ के भीतर की नाल . कहने का मतलब जो प्रकार अपनी भाषा में नहीं उसको आत्मसात करके सुधाकर कदम ने अपने कार्यक्रमों की प्रस्तुति कर सफलता के कदम चुमे है . उन्होंने हिंदी , उर्दू जैसी आसान राह न चुनते हुए मराठी ग़ज़ल गायन का कांटों से भरा सफर अपना कर मराठी ग़ज़ल गायन को नया 

आयाम देकर उसे लोकप्रियता के शिखर तक पहुंचाया जो कि एक ऐतिहासिक कार्य की पूर्तता करने जैसा है . तथा इनकी मराठी ग़ज़ले भी उर्दू की तरह मधुर एवं कर्ण प्रिय होती है . मराठी ग़ज़ल गाते हुए उसे शब्दों के अनुसार स्वर , साज , संगीत देना भी महत्वपूर्ण है . उसमे भी सुधाकर कदम ने अपने संगीत के बलबूते सफलता प्राप्त की . आज भी उनकी ' हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही , ' ' झिंगतो मी कळेना कशाला , ' ' मस्तीत गीत गा रे , ' लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा , ' ' या एकले पणाचा छेडीत मी पियानो , ' ऐसी गई मराठी ग़ज़ले श्रोता गुनगुनाते है यह उनके संगीतकार के तौर पर सफलता पाने का गौरव है . 


     सन १९८७ में कक्षा १ ते १० तक मराठी शालेय किताबों की कविताओं को संगीतबध्द किया . हाल ही में कक्षा एक एवं पांच के शालेय मराठी के किताब की कुछ कविताओ को संगीत दिया . जिसका ध्यनिमुद्रण पुणे के बालचित्रवाणी में किया गया . जिस की सीडी , कैसेट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडल द्वारा निर्माण की है . सुधाकर कदम द्वारा संगीत बध्द किया गया ' हे शिव सुंदर समर शालिनी महाराष्ट्र माऊली ' यह ज्येष्ठ कवि कुसुमाग्रज व्दारा रचित महाराष्ट्र गीत महाराष्ट्र सरकार के गीत मंच विभाग द्वारा संपूर्ण महाराष्ट्र में छात्रों को पढाये जाने के बाद आज संपूर्ण राज्य में सभी छात्र एवं सुरताल के साथ यह गीत गाते नजर आते है . 


      उर्दू ग़ज़ल गायन संगीतबध्द करने में सुधाकर कदम कम नही . उनका उर्दू ग़ज़लों पर आधारित ' तसव्वूर ' नामक ग़ज़लों भरा नजराना पश्चिम महाराष्ट्र में धूम मचा रहा है . सुधाकर कदम का पूरा परिवार संगीत , सुरों का दीवाना है . भैरवी , रेणू यह दोनों पुत्रियां गायिका एवं पुत्र निषाद जो कि तबले का मास्टर है . तथा उन्होंने ' तसव्वूर ' उर्दू ग़ज़ल एवं ' सरगम तुझ्याच साठी ' यह मराठी गीत गझलो का कार्यक्रम लोकप्रिय हुआ है . सुधाकर कदम द्वारा मराठी ग़ज़लों को स्वर बध्द करने एवं गायकी के योगदान के चलते उन्हे अखिल भारतीय ग़ज़ल परिषद द्वारा ' शान - ए - ग़ज़ल ' पुरस्कार से गौरवान्वित किया गया है . जो कि उनके कार्यों की पहचान है . विख्यात कवि ग़ज़लकार सुरेश भट ने एक कार्यक्रम के दौरान सुधाकर कदम को ' मराठी का मेहदी हसन ' की उपाधि तक दे डाली थी . सुधाकर कदम जो की बडी तन्मयता से गाते है तब शब्दों का अस्तित्व जान पडता है . गुलाबी जख्मों पर धीरे - धीरे सुरुर चढता प्रतीत होता है . पहाडी आवाज , गझलों का चयन , शब्दों का ठोस उच्चार , उनकी विशेषता है . विदर्भ के आणी जैसे छोटे से नगर का अदनासा कलाकार महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी पुणे में विदर्भ एवं आर्णी शहर का नाम मराठी ग़ज़ल गायकी एवं स्वरबध्द गीतो से गौरवान्वित किया जा रहा है . 


( दैनिक भास्कर , यवतमाल जिला विशेष परिशिष्ट , २३ / ९ / २००६ )

Sunday, April 10, 2022

मराठी गझल व सुधाकर कदम...प्रा.अशोक राणा



   गझल हा फारसी प्रकार माधव ज्युलियनांनी मराठीत आणला.त्याला मराठमोळे रूप दिले ते सुरेश भटांनी आणि मराठी गझल कशी गावी हे शिकवले सुधाकर कदम यांनी. #अशी_गावी_मराठी_गझल या शीर्षकाखाली महाराष्ट्रभर गझलगायनाचे कार्यक्रम करून गझल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय त्यांना जाते.या कार्यक्रमात कविवर्य सुरेश भटांनी निवेदन करून त्यांच्या ऐतिहासिक कार्यावर शिक्कामोर्तब केले. 

     असा हा लोकविलक्षण गायक व संगीतकार . माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे . त्याची प्रारंभीची वाटचाल मी पाहिली आहे . त्याचबरोबर या क्षेत्रावर आपला ठसा उमटविण्याकरता त्याने केलेला संघर्ष व त्यात त्याची ससेहोलपटसुध्दा मी जवळून अनुभवली । 

     यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या सध्याच्या तालुक्याच्या गावी ( तालुका पण खूप नंतर झाला. ) संगीत शिक्षक म्हणून सुधाकर कदम यांनी आपल्या कामगिरीचा प्रारंभ केला .( त्याअगोदर यवतमाळच्या भाग्योदय कला मंडळात वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी गायक , वादक व संगीतकार म्हणून १० वर्षे काम केले होते . ) विदयार्थ्यांपर्यंत संगीत कलेतील सौंदर्य व लय पोचविण्यात त्यांनी आपले सारे कसब पणाला लावले . पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावून त्याचे गायन शाळा - शाळांमधून केले . पुढे त्याच्या कॅसेट्स महाराष्ट्रत लोकप्रिय झाल्यात . वडील वारकरी संप्रदायाचे गायक असल्यामुळे सुधाकरवर बालपणीच संगीताचे संस्कार झाले होते . वारकरी संप्रदायातील सर्वसमावेशकतेचा वारसाही त्याला लाभला . त्याचा खरा लाभ आर्णीच्या श्री महंत दत्तराम भारती विद्यालयाच्या विदयार्थ्यांना झाला . ते विदयार्थी धन्य होत , ज्यांना सुधाकर कदमांसारखा गुरू लाभला . 

     यवतमाळच्या समर्थवाडीत सुधाकरचे घर होते . मी यवतमाळ येथील हिंदी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून १९७९ मध्ये रुजू झालो . याच शाळेत संगीत शिक्षक पदावर विनायक भिसे कार्यरत होते . दोघेही कलाशिक्षक असल्यामुळे बहुतांश प्रसंगी दोघांवर सारख्याच जबाबदाऱ्या यायच्या . त्यामुळे आमची दोघांची गट्टी जमली . पदवी परीक्षेसाठी मी संगीत विषय घेतल्यामुळे मला अमोलचंद महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला . या महाविद्यालयात प्रा . पुरुषोत्तमराव कासलीकर हे विभाग प्रमुख होते . त्यांच्याकडे माझे संगीत शिक्षण सुरू झाले . तेथेच माझा परिचय सुधाकर कदमांशी झाला . 

     यवतमाळ हे कलारसिकांचे गाव आहे . तेथील काही संगीत प्रेमींकडे गाण्याच्या मैफिली नेहमीच होत . तेथे भिसेंसोबत तानपुरा संगत करायला मी जात असे . तेथे सुधाकर कदम यांचेही गायन हमखास होत असे . भिसे व सुधाकर हे दोघेही कासलीकर गुरुजींचे शिष्य होते.त्यामुळे कासलीकरांनी आयोजित केलेल्या समारंभामध्ये सुधाकरचीही हजेरी राही.वर्षातून एकदा संगीत महोत्सवाचे आयोजन कासलीकर गुरुजी अमोलकचंद महाविदयालयात करीत असत .त्यात विदर्भातील नामवंत कलाकार आपली कला सादर करीत असत.अशाच एका महोत्सवात सुधाकर कदम यांनी #संतूर_वादन केले. .त्याचे रेखाचित्र पेन्सिलने रेखाटले होते . त्यापूर्वी पं . शिवकुमार शर्मा यांचे हुबेहूब रेखाचित्र काढल्याबद्दल मला शाबासकी मिळाली होती.संतूर वादनात मार्गदर्शन न मिळाल्यामुळे पुढे सुधाकरने  फारशी मजल मारली नाही . त्याचा बराचसा काळ विविध कलांशी आपले नाते सांगण्यातच गेला. एक हरहुन्नरी कलावंत व मनमिळावू शिक्षक अशी ओळख करवून देण्यात भरपूर मेहनत केली . अनेक नव - नव्या कवींच्या रचना गाऊन त्याने कवींचा स्नेह संपादन केला . त्यात भर पडली ती एका प्रस्थापित कवीची व ते म्हणजे सुरेश भट . 

      सुरेश भटांच्या कविता सुमन कल्याणपूर , लता मंगेशकर , आशा भोसले , सुरेश वाडकर , अरुण दाते , वगैरे गायकांनी गायिल्या होत्या . त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती . गझल हा फारसी काव्यप्रकार मराठमोळेपणात घोळवून त्यांनी मराठी गझलकार म्हणून ख्याती प्राप्त केली होती . त्यांचे हे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न तत्कालिन अनेक प्रस्थापित कवींनी करून पाहिला . पण त्यांना यात यश मिळाले नाही . या काव्यप्रकारावर आपली पकड कायम राहावी याकरीता सुरेश भट सतत सावधगिरी बाळगून खूप मेहनत घ्यायचे . त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये सदरे लिहून गझल कशी लिहावी याचे धडे नवकवींना दिलेत . ' गझलेची बाराखडी ' या नावाने त्यांनी अनेकांना दस्तावेज पाठविला . एक चळवळ म्हणून सुरेश भटांनी सातत्याने हा उपक्रम राबविला . मी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयामध्ये बी . ए . भाग २ मध्ये असताना सुरेश भटांचा ' रंग माझा वेगळा ' हा काव्यसंग्रह मराठी कला साहित्य या प्रश्नपत्रिकेसाठी नेमलेला होता . तो विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे एका वहीत त्यातील सर्व कविता मी लिहून काढल्या . त्यांच्या अनुकरणातून मीही गझला लिहिल्यात . त्या कुणी तरी गाव्यात म्हणून मी गायकाच्या शोधात होतो . सुधाकर कदम माझी गझल केव्हा तरी गायील अशी आशा मला होती . पण त्याला माझ्या गझला दाखविण्याचे धाडस मला झाले नाही . 

      पुढे सुरेश भटांचा व सुधाकर कदमांचा परिचय झाला . जवळीक वाढली . एकमेकांकडे येणेजाणे सुरू झाले . सुरेश भटांच्या गझला सुधाकरने स्वरबध्द करून कार्यक्रमांमधून व आकाशवाणीवरून गायला सुरुवात केली . अशा प्रकारे सुरेश भट व सुधाकर कदम हे समीकरणच बनले . यातूनच ' #अशी_गावी_मराठी_गझल ' या कार्यक्रमाची निर्मिती झाली . आपल्या आवाजात सुरेश भटांच्या गझला अल्बमच्या रूपाने रसिकांपुढे येतील अशी आशा सुधाकरला असावी व तसे ते स्वाभाविकही होते . कारण की सुरेश भटांनी तसे आश्वासन त्यांना दिल्याचे माझ्या ऐकिवात होते.

     सुरेश भटांचा ' एल्गार ' हा संग्रह त्याच्या सामाजिक आशयातील गझलांमुळे आगळावेगळा ठरला . त्यातील बहुतांश गझलांची निर्मिती सुधाकर कदमांच्या आर्णी येथील निवासस्थानी झाली होती . त्यावेळी ते वर्षातील अनेक दिवस , आठवडे आर्णीला राहत असल्याचे माझ्या काही मित्रांनी मला सांगितले . सुरेश भटांना एक दिवस सांभाळणे हे एक आव्हानच असायचे हे त्यांच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे . या पार्श्वभूमीवर सुधाकर कदम यांची किती दमछाक झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी . 

      सुधाकर कदम यांच्या तपश्चर्येला जे अपेक्षित फळ यायला हवे होते तसे मात्र आले नाही . अर्थात सुरेश भटांच्या गझला कॅसेटच्या रूपात रसिकांपर्यंत पोचल्या नाहीत . कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक , प्रत्यक्ष गझल रेकॉर्ड झाल्या त्या अरुण दाते , सुरेश वाडकर ,
इ . पुरुषांच्या आवाजात . एक स्वप्न भंगले . या अनुभवातून सुधाकर जाताना मी पाहिला . म्हणून काही अप्रिय अनुभवाची नोंद मला करावी लागत आहे . त्याबद्दल सुरेश भरांचे भक्त मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे . मी तसे केले नाही तर मात्र मी करणे कठीण जाईल असे वाटते . 

     काही कारणांनी भटांनी काही कालावधीनंतर सुधाकर कदमांना जाहीर कार्यक्रमातर आपल्या गझला गाण्यास मज्जाव केला . एका खाजगी कार्यक्रमात तर त्यांनी कहरच केला नागपूरच्या आमदार निवासात आमदार हरिश माणधना यांनी आमदारांसाठी सुधाकर का यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . हे जेव्हा सुरेश भटांना कळले तेव्हा ते ताडताड पाय आपटत व काठी हवेत उडवीत तेथे गेले . असा कसा सुधाकर कदम माझ्या गझल गातो ते मी पाहतोच असे म्हणून त्यांनी तेथे धिंगाणा घातला . त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि हे सगळे कशासाठी तर मानधनासाठी . ' माझ्या गझला गाऊन पैसे कमवतो , तर मला मानधन शून्य !' अनेक वर्षांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सहवासानंतर व अनेक कार्यक्रम सोबतीने केल्यानंतरचा हा भटांचा अवतार न पाहवता आलेला सुधाकर थोडा खचला होता . 

     आर्णीसारख्या खेड्यातून बाहेर पडण्यासाठी सुधाकरने जे जे आधार शोधलेत ते सो कुचकामी ठरले . शेवटी सेवानिवृत्तीची वाट न पाहता स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने घेतला . पुण्यात जाऊन नशीब आजमावण्याचा त्याचा निर्णय खरोखरच शहाणपणाच होता . पण तो त्याने उशिरा घेतला . उशिरा का होईना सुधाकरने संगीत दिलेल्या मराठी गझलच्या अल्बमला सुरेश वाडकर यांच्यासारख्या विख्यात गायकाचा आवाज लाभला हे मात्र आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे . मराठी गझलगायकीचे प्रात्यक्षिक पहिल्यांदा महाराष्ट्राला देणारा सुधाकर कदम मात्र सोईस्कर रीतीने विस्मरणाच्या गर्तेत टाकण्याचा प्रयत्न झाला. नुकत्याच झालेल्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्याच्या ऐतिहासिक कामगिरीची जाणीवपूर्वक नोंद घेतली गेली, तेव्हा मात्र हायसे वाटले. 

     आज ' #गझलगंधर्व  ' या सन्मानाने गौरविला गेल्यानंतर त्याची दखल घेणे भाग पडले . त्याच्या या ओळखीसाठी त्याला किती खस्ता खाव्या लागल्या हे मात्र फार कमी लोकांना माहीत आहे . त्याने स्वत : या आठवणी लिहन काढल्या तरच या विषयीची माहिती आपणास मिळू शकेल . पत्रकार म्हणून कार्य करणारा , सडेतोड लिहुन अनेकांची नाराजी ओढवून घेणारा सुधाकर केव्हा तरी या दिशेने आपली लेखणी वळवील अशी आशा करायला हरकत नाही . तसे झाले तर अनेक नव्या दमाच्या गझलगायकांना दिशा मिळेल.आज सुधाकर समाधानी आहे . कारण त्याची स्वप्ने पूर्ण व्हायला लागली आहेत.मराठी गझलगायकीमध्ये आणखी खूप काही करता यावे यासाठी त्याला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा !



 

 





संगीत आणि साहित्य :