Saturday, October 28, 2023
राग_रंग (लेखांक ३०) बिलासखानी तोडी (
Tuesday, October 24, 2023
हिंदी चित्रपटातील गझला...
गझल (ग़ज़ल) हा अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द आहे.ज्याचा अर्थ 'प्रेयसीशी केलेला वार्तालाप' असा आहे.उर्दू आणि फारसी मधील कवितेच्या एका प्रकारास गझल म्हणतात. एका गझलेत कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त अकरा शेर असतात.सर्व शेर एकाच 'रदीफ़, आणि 'काफ़िया'त असतात.प्रत्येक शेरात स्वतंत्र भाव असून ते एक पूर्ण 'स्टेटमेंट' असते.गझलच्या पहिला शेराला 'मतला' व शेवटच्या शेराला 'मक्ता' म्हणतात.मक्त्यामध्ये शायर स्वतःचे नाव/उपनाव टाकतो.गझल संग्रहास 'दिवान' म्हणतात.
गझल ही शृंगारपूरक असल्यामुळे काव्य रसिक आणि संगीत प्रेमींच्या व सुफींच्या आवडीची होती.काझी हमीदुद्दीन नागौरीचे कव्वाल महमूदने सुलतान शमसुद्दीन अल्तमश (१२१०-१२३५) याला गझल गाऊन खुश केल्याचा उल्लेख (मुसलमान और भारतीय संगीत) आहे.ग्यासुद्दीन बलबनच्या (१२६५-१२८७) मुलाने शेख बहाउद्दीन जकरियाचा मुलगा शेख कदवा याला निमंत्रित करून त्याच्याकडून अरबी गझला गाऊन घेतल्याचा उल्लेख पण आहे.कैकुबादच्या (१२८७-१२९०) काळात गल्लो-गल्ली गझल गायक उत्पन्न झाले होते.जलालुद्दीन खिलजीच्या काळात अमीर खुसरोने त्याच्या गझलातून सुंदर गायिका व सुंदर तरुणींच्या सौंदर्याचे वर्णन करीत होते.अल्लाउद्दीन खिलजीच्या (१२९६-१३१६) काळात महमूद,मुहम्मद आणि खुदादी हे गझल गायक प्रसिद्ध होते.कुतुबुद्दीन खिलजी (१३१६-१३२०),ग्यासुद्दीन तुगलक (१३२०-१३२५), आणि मुहम्मद तुगलक (१३२५-१३५१) या काळात गझल लोकप्रिय होती.फिरोज तुगलकच्या (१३५१-१३८८) काळात गझलेकडे सन्मानपूर्वक पहिल्या जात होते.
बहमनी सुलतान मुहम्मद शाह प्रथम याच्या दरबारात खुसरोच्या गझला गाणारे तीनशे गायक होते.ई.स. १५३५ मध्ये बैजू ने हुमायूनला फारसी गझल गाऊन रिझविले होते.अकबराचा अंगरक्षक बैराम खान रामदास या गवैय्याच्या गझल गायन शैलीवर फिदा होता.बैजू व रामदास या शास्त्रीय गायकांचे गझल गायनावरही तेवढेच प्रभुत्व होते.जहांगीरने गझल गायक शौकीला 'आनंद खां' ही उपाधी दिली होती.
तात्पर्य हे की आज सांगीतिक दृष्टीने गझलकडे तुच्छ रीतीने पहिल्या जात असेल,पण वास्तविक रुपात गझल गाणे एवढेही सरळ नाही.संगीताच्या जाणकार बादशहांनी आणि सुफींनी गझलेचा सदैव सन्मानच केला आहे.गझलांसाठी वापरले जाणारे सर्व छंद भारतीय छंद शास्त्रांतर्गत मान्यता प्राप्त आहेत.तसेच भारतीय रागांची शुद्धता राखून गाणारे गझल गायक विशिष्ट परंपरेत होत आले आहेत. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांचे सभा पंडित लक्ष्मीनारायण यांनी आपल्या 'संगीत सूर्योदय' या ग्रंथात 'कौल' (कव्वाली) आणि 'गझल'ची चर्चा केली आहे.'कौल'चा अर्थ कथन,कौल गाणार कव्वाल.आणि कव्वालांची गानशैली 'कव्वाली'.कव्वालांच्या गानशैलीत गायिल्या जाणाऱ्या गेय रूपातील गझला म्हणजे कव्वाली.कव्वालीमध्ये तान, पलटा, जमजमा,बोलबांट, सरगम सगळे काही असायचे.प्रसिद्ध ख्यालगायक उस्ताद तानरसखान चांगले कव्वाल होते.म्हणजेच गझल आणि कव्वालीचे आदर्श रूप नेहमीच सन्मानित राहिले आहे.ज्यांची नक्कल हस्सू खान आणि हद्दू खान यांनी केली, ते प्रसिद्ध उस्ताद बडे मुहम्मद खान 'कव्वाल बच्चे' होते. म्हणजेच ग्वाल्हेरची ख्याल गायकी कव्वाल बच्चांच्या गायनाने प्रभावित होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.तरी पण जितका प्राचीन इतिहास शास्त्रीय संगीताच्या विविध शैलींचा आहे तितका गझलचा नाही.स्वातंत्र्य मिळण्या अगोदर गझल लोकप्रिय झाली होती.बराच काळ रसिकांच्या मनोरंजनासाठी कोठयांवर तवायफ गझला गात होत्या.असे जरी असले तरी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या कालखंडात मोठ मोठे गायक गझला गात असल्यामुळे जो मान त्यांना मिळायचा तो मान पुनः मिळावा म्हणून
आज भारतीय (शास्त्रीय) संगीतकारांनी गझल गायनावर पुनः गंभीर चिंतन करणे आवश्यक आहे,असे मला वाटते.
हा झाला गझलचा प्राचीन इतिहास.उर्दू गझल गायकीचा आधुनिक शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातून गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांनी केली.
उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...
१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर
२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज
३. टप्पा अंगाने - बरकत अली खान
गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.
गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.
सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.
●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.
●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.
(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)
उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.
मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.
फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.
गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले..
जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.
भारतीय चित्रपट संगीताच्या सुरवातीच्या काळापासून तर एकोणविसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत चित्रपटांच्या गाण्यात गझलांची भरमार दिसते.अगदी सुरवातीच्या काळात तर बहुतेक चित्रपटांची पटकथा उर्दूमधेच लिहिल्या गेलेली दिसते.१९५० ते १९८० पर्यंत अतिशय सुंदर गझला चित्रपटांनी दिल्या.नंतरही येत राहिल्या पण एकट-दुकट. त्यातही काही गझला एकदम सुगम संगीताप्रमाणे स्वरसाज चढवून आल्यामुळे अपल्याला ते चित्रपटातील गीत वाटले.जसे:-'संसार से भागे फिरते हो' (चित्रलेखा),'ये हवा ये रात ये चांदनी' (संगदिल),'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' (हम दोनो) वगैरे वगैरे...आणि या उलट काही गीते गझलच्या अंगाने स्वरबद्ध झाल्यामुळे त्या गझला वाटतात.उदा:- 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' (चित्रपट-गझल),'गुजरे हैं आज इश्क में हम उस मकाम से' (दिल दिया दर्द लिया).
चित्रपटांच्या निर्मितीचा वेग वाढल्यावर चित्रपटतील संगीत निर्मितीचाही जोर वाढला.त्यात पारंपरिक शास्त्रीय व सुगम संगीत (उप शास्त्रीय) शैलींचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग सुरू झाले.त्यात गझल शैलीची परंपरा प्रकर्षाने दिसून येते.सुरवातीच्या काळात हलक्या फुलक्या स्वरूपात गझला समोर आल्या.कुंदनलाल सहगल, तलत महमूद,मोहम्मद रफी यांच्या सारख्या अनेक गायकांद्वारा चित्रपटात गायिलेल्या गझला लोकप्रिय झाल्या.सांगीतिक दृष्टीने सुद्धा ह्या श्रीमंत रचना होत्या.चित्रपट गीतांमुळे संगीत घरोघरी पोहोचले व लोकप्रिय झाले हे मान्य करावेच लागेल. खोलात जाऊन विचार केला तर शास्त्रीय संगीतापेक्षा चित्रपट गीते व गझल आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे असे दिसते.याला अनेक घटक कारणीभूत आहेत.ठुमरी-दादऱ्याप्रमाणे व एक रागात गझल गाणे असे न राहता गझलच्या अर्थानुसार,स्वभावानुसार बंदिश तयार करणे, विवादी स्वरांनी सजवणे, विविध रागांचे मिश्रण करणे,तसेच काही विशिष्ठ शब्दांना वेगवेगळ्या सुरावटींनी सजवणे,ताल आणि आलापांचा योग्य स्थानावर योग्य प्रयोग अशा विविध बाबींमुळे गझल गायन अधिक प्रगल्भ होत गेले.सध्या तर ऑर्केस्ट्रेशन,ध्वनिमुद्रण याकडे विशेष करून बारकाईने पाहून वेगवेगळे प्रयोग केल्या जात आहे.
● चित्रपटातील गझला...
'हमें तो शाम-ए-ग़म में काटनी है ज़िंदगी' नूरजहां. चित्रपट-जुगनू.(१९४७)
'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज़.(१९४९)
'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल' तलत महमूद.चित्रपट-आरज़ू . (१९५०)
'दुनिया बदल गयी' शमशाद बेग़म.चित्रपट-बाबुल.(१९५०)
'हम दर्द के मारों का इतना ही फ़साना है' तलत महमूद.चित्रपट-दाग़.(१९५२)
'दिल में छुपाके प्यार का तुफान ले चले' रफी.चित्रपट-आन.(१९५२)
'ये हवा ये रात ये चांदनी तेरी इक अदा पे निसार है' तलत महमूद.चित्रपट-संगदिल.(१९५२)
'हैं सब से मधुर वो गीत' तलत महमूद.चित्रपट-पतिता.(१९५३)
'बहारें हम को ढुंढेंगी न जाने हम कहा होंगे' लता.चित्रपट-बाग़ी.(१९५३)
'इश्क़ मुझको नहीं वहशत ही सही' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब..(१९५४)
'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)
'दिले नादां तुझे हुवा क्या है' तलत महमूद.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)
'नुक्ता ची है ग़मे दिल' सुरैय्या.चित्रपट-मिर्झा ग़ालिब.(१९५४)
'तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम' रफी.चित्रपट-प्यासा.(१९५७)
'जाना था हमसे दूर बहाने बना लिए' लता.चित्रपट-अदालत.(१९५८)
तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा' रफी.चित्रपट-आखरी दाव.(१९५८)
'युं हसरतों के दाग़' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)
'उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते' लता. चित्रपट-अदालत.(१९५८)
'ना हंसो हम पे ज़माने के है ठुकराए हूए' चित्रपट-गेट वे ऑफ इंडिया.
'चौदवी का चांद हो या आफ़ताब हो' रफी.चित्रपट-चौदवी का चांद.(१९६०)
'बेकसी हद से जब गुज़र जाये' आशा भोसले.चित्रपट-कल्पना.(१९६०)
'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.(१९६१)
'कभी खुद पे कभी हालात पे रोना आया' रफी.चित्रपट-हम दोनो.(१९६१)
''तेरी ज़ुल्फों से जुदाई तो नहीं मांगी थी' रफी.जब प्यार किसी से होता है.(१९६१)
'दिल ग़म से जल रहा है जले पर धुआं न हो' सुमन कल्याणपूर.चित्रपट-शमा.(१९६१)
'है इसी में प्यार की आबरु' लता.चित्रपट-अनपढ.(१९६२)
'मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया' रफी.चित्रपट-जब प्यार किसी से होता है.(१९६२)
'अब क्या मिसाल दूं मैं तुम्हारे शबाब की' रफी.चित्रपट-आरती.(१९६२)
'ज़िंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया.(१९६२)
'जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सजा देते हैं' लता.
चित्रपट-ताजमहल.(१९६३)
'जरा सुन हसीना ओ नाज़नी' रफी.चित्रपट-कौन अपना कौन पराया.(१९६३)
'ज़ुल्फ की छांव में चेहरे का उजाला लेकर' आशा,रफी. चित्रपट-फिर वो ही दिल लाया हूँ.(१९६३)
'हाले दिल यूं उन्हे सुनाया गया' लता.चित्रपट-जहांआरा.(१९६४)
'वो चुप रहे तो दिल के दाग़ जलते है' लता. जहांआरा.(१९६४)
'इश्क़ की गर्मी-ए-जज़बात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)
'दिल खुश है आज ऊनसे मुलाकात हो गयी' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)
'मुझे ये फुल ना दे तुझे दिलबरी की कसम' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)
'अदा क़ातिल नज़र बर्क़-ए-बला' आशा भोसले.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)
'नग़्मा ओ शेर की सौग़ात किसे पेश करूं' रफी.चित्रपट-ग़ज़ल.(१९६४)
'संसार से भागे फिरते हो' लता.चित्रपट-चित्रलेखा.(१९६४)
'मुझे दर्दे दिल का पता न था' रफी.चित्रपट-आकाशदीप.(१९६५)
'ये ज़ुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा' रफी.चित्रपट-काजल.(१९६५)
'छलके तेरी आंखों से शराब और जियादा' रफी.चित्रपट-आरज़ू.(१९६५)
'बहारों मेरा जीवन भी संवारों' लता.चित्रपट-आखरी खत.(१९६६)
'न किसी की आंख का नूर हूँ' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)
'लगता नहीं है दिल मेरा' रफी.चित्रपट-लाल किला.(१९६६)
'भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जायें' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)
'नसीब में जीसके जो लिखा था' रफी.चित्रपट-दो बदन.(१९६६)
'कोई सागर दिल को बहलाता नहीं' रफी. चित्रपट-दिल दिया दर्द लिया.(१९६६)
गुज़रे हैं आज इश्क़ में हम उस मक़ाम से' रफी.दिल दिया दर्द लिया.(१९६६)
'रहते थे कभी जिनके दिल में' लता.चित्रपट-ममता.(१९६६)
'दुनिया करे सवाल तो हम क्या जवाब देंगे' लता.चित्रपट-बहू बेगम.(१९६७)
'मेरी ज़िंदगी के चिराग़ को तेरी बेरुख़ी ने बुझा दिया' लता. चित्रपट-जाल.(१९६७)
'मिले न फूल तो कांटों से दोस्ती कर ली' रफी.चित्रपट-अनोखी रात.(१९६८)
'हर तरफ के जज़बात का एलान है आंखें' रफी.चित्रपट-आंखें.(१९६८)
'वो ज़िंदगी जो थी अब तक तेरी पनाहों में' आशा भोसले.चित्रपट-नील कमल.(१९६८)
'मिलती है ज़िंदगी में मोहब्बत कभी कभी' लता.चित्रपट-आंखें.(१९६८)
'आज सोचा ती आंसू भर आये' लता.चित्रपट-हंसते ज़ख़्म.(१९७०)
'हम है मता-ए-कूचा ओ बाज़ार की तरह' लता.चित्रपट-दस्तक.(१९७०)
उनके ख़याल आये तो आते चले गए' रफी.चित्रपट-लाल पत्थर.(१९७१)
'चलते चलते युं ही कोई मिल गया था' लता.चित्रपट-पाकिज़ा.(१९७२)
'रस्मे उल्फ़त को निभाए तो निभाए कैसे' लता.चित्रपट-दिल की राहें.(१९७३)
'अपनी खुशी से अपना ही दिल तोडना पडा' लता. चित्रपट-कुंवारा बदन.(१९७३)
'हाल क्या है दिलों का न पूछो सनम' किशोर कुमार. चित्रपट-अनोखी अदा.(१९७३)
'संसार की हर शै का इतना ही फ़साना है' महेंद्र कपूर.चित्रपट-धुंद.(१९७३)
'देखा है ज़िंदगी को कुछ इतने करीब से' किशोर कुमार.चित्रपट-एक महल हो सपनो का.(१९७५)
'रुके रुके से क़दम रुक के बार बार चले' लता.चित्रपट-मौसम.(१९७६)
'दूर रहकर न करो बात क़रीब आ जाओ' रफी.चित्रपट-अमानत.(१९७७)
'आंखों में दिल गया अपना' आनंद कुमार.चित्रपट-सांच को आंच नहीं.(१९७९)
'ज़िंदगी में जब तुम्हारे ग़म नहीं थे' अनुराधा पौडवाल, भुपेंद्र सिंग.चित्रपट-दूरीयां.(१९७९)
'पत्थर से शीशा टकरा के' आनंद कुमार.चित्रपट-सावन को आने दो.(१९७९)
'सरकती जाये है नक़ाब आहिस्ता आहिस्ता' लता,किशोर कुमार. चित्रपट-दीदार-ए-यार.(१९८०)
'ज़िंदगी जब भी तेरी बज़्म में लाती है हमें' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)
'इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)
'माना तेरी नजर में तेरा प्यार हम नहीं' सुलक्षणा पंडित.चित्रपट-आहिस्ता आहिस्ता.(१९८१)
'दिल चीज़ क्या है आप मेरी जान लिजीए' आशा भोसले. उमराव जान.(१९८१)
'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है' गुलाम अली.चित्रपट-निकाह.(१९८२)
'दिखाई दिये यूं के बेख़ुद किया' लता.चित्रपट-बाजार.(१९८२)
'दिल के अरमां आंसुओं में बह गए' सलमा आगा..चित्रपट-निकाह.(१९८२)
'तुमको देखा तो ये ख़याल आया' जगजीत सिंग.चित्रपट-साथ साथ.(१९८२)
'तू नहीं तो ज़िंदगी में और क्या रह जायेगा' जगजीत,चित्रा. चित्रपट-अर्थ.(१९८२)
'झुकी झुकी सी नज़र बेक़रार है के नहीं' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८२)
'दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है' लता.चित्रपट-आखिर क्यों.(१९८५)
'किसी नज़र को तेरा इंतजार आज भी है' आशा भोसले,भुपेंद्र सिंग.चित्रपट-ऐतबार.(१९८५)
'तेरे प्यार की तमन्ना, ग़म-ए-जिंदगी के साये' महेंद्र कपूर.चित्रपट-तवायफ.(१९८५)
'तुम्हारी नज़रों में हमने देखा अजब सी चाहत झलक रही है' आशा भोसले,कुमार शानू. चित्रपट-कल की आवाज.(१९९२)
'किसी ने भी तो ना देखा निगाह भर के मुझे' पंकज उधास.चित्रपट-दिल आशना है.(१९९२)
'होश वालों को खबर क्या' जगजीत सिंग.चित्रपट-सरफ़रोश.(१९९९)
-सुधाकर कदम
गझलकार ब्लॉगवरील 'सीमोल्लंघन' विशेषांकामधून साभार...
https://gazalakar23.blogspot.com/?m=0&fbclid=IwAR3JsO3WsFyOddiinFPUWA7V2WWnWmJeVNs0FFR4Eg3_C5oA_Pqr9i7gA9Y
Saturday, October 21, 2023
राग -रंग (लेखांक २९) राग तिलंग
अनहद शब्द उपज्यो मों घट में, ता को ध्यान करू अष्ट जाम।
खरज रिषभ गांधार मध्यम पंचम धैवत, निषाद पावै जौं अति अभिराम।।
-तानसेन
नादाचे दोन प्रकार मानतात.१.आहात नाद २.सनाहत नाद. आपणास ऐकू येतो तो आहत नाद आणि जो कानाने ऐकू येत नाही त्याला प्रचारात अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत नाद समस्त आहत नादाचे मूळ किंवा कारण आहे असे मानतात. अशी जरी मान्यता असली तरी आहत नादामध्ये मनाला एकाग्र करण्याची व आनंद देण्याची विलक्षण क्षमता आहे.त्यामुळे आहत नाद लोकरंजक आहे. अनाहत नाद कानाने ऐकू येत नसल्यामुळे तो लोकरंजक नाही. परंतू त्याची गोडी आणि आनंद देण्याची क्षमता आश्चर्यकारक रित्या जास्ती असल्याचे नानक,कबीर,मीरा,सूरदास यांचे मत आहे. कबीराच्या रचनांमध्ये अनेकदा अनहद नादाचा उल्लेख केल्याचे आपणास दिसून येते.इतकेच नव्हे तर पाश्चात्य साधकांमधील 'किट्स' चे खालील वाक्य सुद्धा नानक,कबीर,मीरा,सूरदास यांच्या म्हणण्याला पुष्टी देते. तो म्हणतो... "Heard melodies are sweet but those unheard are sweetest."
संगीतामध्ये नादाचे महत्व आहेच पण इतर बाबतीतही नाद तितकाच महत्वाचा आहे.एखादा कवी जेव्हा आतून काहीतरी येत असताना एकाग्र होतो तेव्हा नव-नवीन भाव शब्दरूप घेऊन छंदामध्ये स्वतःहून येत असतात. हे येणे कुठून असते हे कवी जाणत नाही.किंवा त्याला ते माहीत नसते,कळत नाही.हे जे येणे आहे ते अनाहत नादाचे देणे असावे असे मला वाटते.भौतिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी एकाग्र होणे आवश्यक असते.जे अनाहत नादाचा माध्यमातून शीघ्र प्राप्त होते. म्हणून कलाकार हा इतरांपेक्षा वेगळा असतो.
नास्ति नादात्परो मंत्रो न देव: स्वात्मन: पर:।
नानुसंधे: परा पूजा न हि तृप्ते: परं सुखम् ।।
असो!
आज आपण खमाज थाटोत्पन्न तिलंग रागावर चर्चा करणार आहोत. खमाज थाटातून उत्पन्न झालेल्या सर्वच रागांवर खमाजची छाया दिसून येते.त्याला तिलंग रागही अपवाद नाही. तसेच खमाज व खमाज थाटोत्पन्न रागाचा गोडवा तर अवर्णनीयच आहे.सा ग म प नि सां, सां (कोमल) नि प म ग सा या फक्त पाच स्वरांच्या तिलंग रागावर अनेकांनी स्वरमेळाच्या उतुंग इमारती बांधल्या आहेत.भक्ती,शृंगार, विरह अशा अनेक रसांची उधळण करणारा हा राग आहे. यात रिषभ स्वर वर्ज असला तरी विवादी स्वर म्हणून जेव्हा याचा वापर होतो तेव्हा रागाचा गोडवा अजूनच वाढतो. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमधील 'हंसश्री' हा राग तिलंगशी मिळता जुळता आहे.या रागाची प्रकृती चंचल आहे असे मानतात.त्यामुळे यात ठुमरी, दादरा भजन, गीत, पद इत्यादी प्रकारचं गायिले जातात असे विद्वानांचे मत आहे.याला छेद देणारे कलाकार पण आहेत. खमाज थाटातीलच झिंझोटी राग सुद्धा असाच चंचल,क्षुद्र प्रवृत्तीचा मानल्या गेला आहे.पण यवतमाळच्या एका संगीत संमेलनात कुमार गंधर्वांनी मैफलीची सुरवातच झिंझोटी रागातील मोठ्या ख्यालाने करून रसिकांना आश्चर्यात टाकले.अर्धा तास झिंझोटी आळवला.यावरून रागात क्षुद्र,उच्च, नीच असा काही प्रकार नसतो हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.याचे ध्वनिमुद्रण बराच काळ माझ्याकडे होते.यवतमाळच्या डॉ.उमरेडकरांकडे ते अजूनही असावे.
मी शिकत असताना तिलंग रागातील 'तवही मंजूळ रसना' हे मराठी गाणे शिकविले होते.'नेट'वर याचा बराच शोध घेतला पण मला सापडले नाही.
● हिंदी चित्रपट गीते...
'मेरी कहानी भूलने वाले तेरा जहां आबाद रहे' रफी. चित्रपट-दीदार, संगीत-नौशाद (१९५१).
'यही अरमान लेकरं आज अपने घर से हम निकले' रफी. चित्रपट-शाबाद, संगीत-नौशाद (१९५४).
'मर गये हम जीते जी मालिक तेरे संसार में' लता. चित्रपट-शबाब, संगीत-नौशाद (१९५४).
'लगन तोसे लागी बलमा' लता. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७).
'सखी री सून बोले पपिहा उस पार' लता,आशा. चित्रपट-मिस मेरी, संगीत-हेमंत कुमार (१९५७).
'मुझे ऐ जिंदगी दिवाना कर दे' रफी. चित्रपट-बिंदीया, संगीत-इकबाल कुरेशी (१९६०).
'रहते थे कभी जिनके दिल में' लता. चित्रपट-ममता, संगीत-रोशन (१९६६).
'सजन संग काहे नेहा लगाये' लता. चित्रपट-मै नशे में हूँ, संगीत-शंकर जयकिशन (१९६९).
'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गयी' लता,रफी. चित्रपट-दो रास्ते, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६९).
'इतना तो याद है मुझे' लता,रफी. चित्रपट-मेहबूब की मेहंदी, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७१).
'मेरे दिवानेपन की भी दवा नहीं' किशोर कुमार. चित्रपट-मेहबूब की मेहंदी, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७१).
'कैसे कहें हम प्यार ने क्या क्या खेल दिखाये' किशोर कुमार. चित्रपट-शर्मिली, संगीत-एस.डी. बर्मन (१९७१).
'गोरी गोरी गांव की गोरी रे' लता,किशोर कुमार. चित्रपट-ये गुलिस्ता हमारा, संगीत-एस.डी. बर्मन (१९७२).
'क्या यूंही रुठ के जाने को मोहब्बत की थी'
● युट्युबवर उपलब्ध ठुमरी,दादरा,झुला,टप्पा,भजन,मा
'अब काहे को नेहा लगाये' इंदुबाला देवी.
'तोरे नैना जादू भरे' उस्ताद बरकत अली खान.
'सजन तुम काहे को नेहा लगाये' उस्ताद अब्दुल करीम खान.
'तोरे नैना जादू भरे' उस्ताद बडे गुलाम अली खान.
'सुरत मोरी काहे बिसराई' सिद्धेश्वरी देवी. (पुरब अंग गायकी व बनारस घराण्याची ठुमरी).
'काहे पिया दिन रैन' हिराबाई बडोदेकर.
'इतनी अरज मान ले' गिरीजा देवी.
'कते ना बिरहा की रात' बेगम अख्तर.
'रतन हिंडोरे झुले' झुला-अलका देव मारुरकर.
'अखियन निंद न आये'
'ननदीया कैसे नीर भरू' पंडित ओंकारनाथ ठाकूर.
'तेरे नैनो ने जादू डारा' उस्ताद सलामत अली खान, उस्ताद नजाकत अली खान.
'यार दा ओ' टप्पा-मालिनी राजूरकर.
'मोहे लिनो' त्रितालातील ठुमरी-श्रुती सडोलीकर.
'ले चलो गोकुल धाम' पं. बसवराज राजगुरू.
'तुम काहे को नेहा लगाय' पं. भीमसेन जोशी,उस्ताद राशीद खान.
'कुंजन में दधी बेचन गयी' शोभा गुर्टू.
'शाम बिन सजनी जियरा धरे नाही धीर' झपतालातील बोल-बांट ठुमरी.
'पिया न आये शाम' हुसैन बख्श.
'अब काहे को नेहा लगाये' बेगम अख्तर.
'अब ना सताओ मोहे शाम' पं. अजय चक्रवर्ती.
'मोहे तुम बिन कलन परे' केरवा तालातील दादरा-पंडित राजन,साजन मिश्र.
'मोरी एक हूँ न मानी' प्रभा अत्रे.
'थके नयन रघुपती' भजन-कुमार गंधर्व.
'धरकन जिया मोरा रे' पं. राजाभाऊ कोगजे.
'देखो जिया बेचैन' जयतीर्थ मेवूंडी.
'कहां गिरी रे माथे की बिडीया' दादरा-रघुनंदन पणशीकर.
'तोरे नैना जादु भरे' जत तालातील ठुमरी-कौशिकी चक्रवर्ती.
'देखो जिया बेचैन' दादरा-शुभा मुद्गल.
'एरी अंखीयां रसिली तोरी शाम' पिऊ मुखर्जी.
'एरी अंखीयां रसिली तोरी शाम' सोहिनी सिंग मुजुमदार.
'ले चलो गोकुल गांव' ओंकार दादरकर.
'तोरे नैना जादू भरे' मौमिता मित्रा.
'काहे मोसे नैना लगाये' अद्धा त्रितालातील ठुमरी-संदीप्ता मुखर्जी.
'सजन तुम काहे को नेहा लगाये' मिता पंडित.
'तोरे नैना जादू भरे' अंजना नाथ.
'सांवरे सलोने मोरे शाम' उस्ताद लछमनदास संधू.
'सजिया अकेली दुःख दे' उस्ताद बद्रुज्जमा.
या व्यतिरिक्त पं. बाळासाहेब पूछवाले,अनोल चटर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, बेगम शिप्रा खान, नीला सिन्हा रॉय, राजोश्री भट्टाचार्य, अवंतिका चक्रवर्ती, धनंजय कौल, प्रबीर बॅनर्जी, संगीता लाहिरी. आशिम कुमार बिस्वास, रमाकांत गायकवाड,गायत्री गायकवाड, अलंक्रीता रॉय. मीनल दातार, डॉ.रागिनी सरना, अर्धेन्दू शेखर बंडोपाध्याय, सुकृत गोंधळेकर, पं. कृष्णा भट, सुश्मिता दास, राजश्री पाठक, पं. मानस चक्रवर्ती, उस्ताद देवेंदर बस्सी,
'हम कुरबाने जाऊं' मोठा ख्याल-भाई
नरींदर सिंग बनारस.
'किथे टकरें' पंजाबी माहिया-मेहदी हसन.
'मैं नजर दे पी रहा हूँ ये समा बदल न जाये' गझल-जसविंदर सिंग.
● मराठी...
'तारिणी नव वसन धारिणी' नाट्यगीत.माणिक वर्मा.नाटक-संगीत पट वर्धन, संगीत-गोविंदराव पटवर्धन.
'प्रिया तुज काय दिसे स्वप्नात' आशा भोसले.चित्रपट-जिव्हाळा, संगीत-श्रीनिवास खळे (१९६८).
'रसिका तुझ्याचसाठी' परवीन सुलताना. अलबम (१९६९).
'लपविला लाल गगन मणी' संगीत नाटक-स्वयंवर, संगीत-भास्करबुवा बखले.
'यह राम की प्रेमिका है' गायक/संगीतकार-सुधीर फडके. कवी-ग.दि.माडगूळकर. (गीत
रामायण).
__________________________________
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.रविवार दि.२२/१०/२०२३.
Wednesday, October 18, 2023
आठवणीतील शब्द-स्वर (लेखांक ९)
Saturday, October 14, 2023
राग-रंग (लेखांक २८) जैजवंती.
खमाज थाटोत्पन्न जैजवंती राग नावाप्रमाणेच अतिशय गोड, चित्ताकर्षक व मर्मस्पर्शी आहे.कुणी याला जैजैवंती तर कुणी जयजयवंतीअसेही म्हणतात. थोडा कठीण असल्यामुळे फार कमी गायक हा राग गाताना दिसतात.याला संपूर्ण-संपूर्ण जातीचा वक्र राग असे म्हटले तरी हरकत नाही.यात अल्हैया,छाया आणि देस अंग एकमेकांत मिसळलेले दिसून येतात.अनेक गायक याला बागेश्री अंगाने पण गाताना दिसतात.परंतू देस अंगाचे (रेमपनिसां) रूप जास्ती प्रचलित आहे.या रागाचा विस्तार तीनही सप्तकात मुक्तपणे केल्या जातो.याचा गायन वादन समय रात्रीचा दुसरा प्रहर असून.वादी स्वर रिषभ व संवादी स्वर पंचम आहे.यात दोन्ही गांधार व दोन्ही निषाद स्वरांचा प्रयोग केल्या जातो.हा गारा नावाच्या रागाला जवळचा आहे.
गुरु ग्रंथ साहेबानुसार हा राग बिलावल व सोरठ या दोन रागांमिळून बनला आहे.हा राग गुरुबानी नंतरच्या खंडात दिसून येतो.या रागात शिखांचे नववे गुरू तेगबहाद्दूर द्वारा फक्त चार भजनांची रचना केल्या गेली आहे.या भजनांना त्यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी गुरू गोविंद साहेब सिंग यांनी १७०५ मध्ये यात जोडले होते.या रागाचा उल्लेख भारतीय शास्त्रीय संगीताच्या कुठल्याच ग्रंथात केलेला नसल्याचा उल्लेख केला आहे. रागमालामध्ये हा राग मिळत नाही. परंतु १४ व्या शताब्दीच्या सुरवातीला याला 'जावंता' नावाने ओळखल्या जात होते. सध्या खमाज थाटातील एक महत्वपूर्ण राग म्हणून याला मान्यता आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार जैजैवंती (ਜੈਜਾਵੰਤੀ) राग साधन साध्य झाल्याचा आनंद व तृप्तीची भावना व्यक्त करतो.सोबतच काही तरी गमावल्याचे दुःखही व्यक्त करतो.आनंद आणि दुःख ह्या दोन्ही भावनांचा अतिरेक होऊ देत नाही.
उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद फतेह अली खान, पं. भीमसेन जोशी, पं. कृष्णराव, पं. जसराज, पं. राजन साजन मिश्र, पं. विनायकराव पटवर्धन, पं. जगदीश प्रसाद, पं.व्यंकटेश कुमार गुरव,पं. अजय चक्रवर्ती, पं. दिनकर कैकिणी,पं.अजय पोहनकर, उस्ताद राशीद खान, पं.उल्हास कशाळकर, शुभदा मराठे,फरीद हसन, उस्ताद शराफत हुसेन खान, कौशिकी चक्रवर्ती, डॉ.निवेदिता कौर, जयश्री पाटणकर, पं. विजय कोपरकर, पं. विजय देशमुख व इतर वादकांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.
मी शिकत असताना 'मोरे मंदर अब क्यों नहीं आये' ही चीज शिकविल्या गेली.पुन्हा तेच, काव्याचा भावार्थ न कळता फक्त रागरूप कळणे! मला जैजवंती राग खऱ्या अर्थाने आवडला तो पंडित जसराजजींची 'चंद्रवदन राधिका' ही झपलातील चीज ऐकल्यानंतर.व्यक्तिमत्व दरबारी होतेच पण त्यांची गाण्याची पद्धतही अतिशय आकर्षक होती.पुढे सुरेश भटांसोबत मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करताना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९८२ मध्ये आयोजित केलेल्या 'अशी गावी मराठी गझल' या फक्त मराठी गझल गायकीच्या,महाराष्ट्रातील तीन तासाच्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात सुरेश भटांचीच
'दिशा गातात गीते श्रावणाची
कुणाला याद तान्हेल्या तृणाची
ही जैजवंती रागात स्वरबद्ध केली गझल गायिलो होतो.यातील 'तान्हेल्या' या शब्दाकरिता मी जैजवंती रागात नसलेल्या कोमल धैवताचा प्रयोग करून प्रचंड दाद घेतली होती.त्याबद्दल पुण्याच्या केसरी या दैनिकाने दि.२५/७/१९८२ च्या अंकात याबद्दल "या बंदिशीतील कोमल धैवताचा रागबाह्य प्रयोग (तिरोभाव) लक्षणीय वाटला. विशेषतः 'तान्हेल्या' शब्दाच्या स्वरा-सहीत उच्चारणात तो मनावर ठसला." असा उल्लेख केला होता.गझल गायकीमध्ये असा एखाद्या शब्दाचा अर्थ अधिक सक्षमपणे रसिकांपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयोग केला तर तो आवडतोच.हा माझा गझल गायक व संगीतकार म्हणून इतक्या वर्षाचा अनुभव आहे.असो!
या रागात खूप कमी गाणी आहेत.पण जी आहेत ती अगदी अफलातून...
● हिंदी चित्रपट गीते...
'हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे' लता. चित्रपट-बागी, संगीत-मदन मोहन (१९५३).
'मनमोहना बडे झुठे' लता. चित्रपट-सीमा, संगीत-शंकर जयकिशन (१९५५).
'बैरन हो गई रैन' मन्ना डे. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७).
'मौसम सुहाना दिल है दिवाना' लता. चित्रपट-सुवर्ण सुंदरी, संगीत-आदि नारायण राव (१९५७).
'जाईए हम से खफा हो जाईए' लता. चित्रपट-चालबाज, संगीत-मदन मोहन (यात चारुकेशी पण दिसतो.) १९५८.
'दिल का दिया जलाया' नूर जहां. चित्रपट-कोयल, संगीत-खुर्शीद अन्वर (१९५९).
'ये दिल की लगी कम क्या होगी' लता. चित्रपट-मुगले आझम, संगीत- नौशाद (१९६०).
'जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया, संगीत-नौशाद (१९६२)
'वो जो मिलते थे कभी हम से दिवानो की तरह' चित्रपट-अकेली मत जइयो, संगीत-मदन मोहन (१९६३). या गाण्यात तीव्र माध्यमाचा सुंदर प्रयोग केल्या गेला आहे.
'बालमवा बोलो ना बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत-एस.मोहिंदर (१९६६).
'सुनी सुनी साज की सतार पर' किशोर कुमार. चित्रपट-लाल पत्थर, संगीत शंकर जयकिशन (१९७१).
'मोरे नैना बहाये नीर' लता. चित्रपट-बावर्ची, संगीत-मदन मोहन (१९७२).
'मैं राधा तू शाम' शंकर एहसान लॉय, कमल हसन, शंकर महादेवन. चित्रपट-विश्वरूप, संगीत एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा.
गांधीजींचे आवडते भजन 'रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम' जैजवंती रागावर आधारित आहे.
दक्षिण भारतातील अनेक चित्रपटात जैजवंतीचा मुक्तहस्ताने वापर केला आहे.
● नॉन फिल्मी...
'दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला' -गुलाम अली.