गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, July 29, 2026

इतना मुझे चाहा करो ना...उर्दू ग़ज़ल

जनसंमोहिनी  राग पर आधारित यह उर्दू ग़ज़ल आपको ज़रूर पसंद आएगी। इस बंदिशी की विशेषता है छंदों में उच्च स्वरों का प्रयोग। इसे सुनिए...


इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही

मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही


अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ

शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही


चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो

मंज़िल सबब रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही


मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'

दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही

                              ●●●

कलावती और जनसंमोहिनी रागों के बारे में संक्षिप्त जानकारी।

कलावती और जनसंमोहिनी राग इतने मिलते-जुलते हैं कि आम आदमी के लिए इनमें अंतर करना मुश्किल है! दोनों राग बहुत मधुर हैं। ये दोनों राग दक्षिण भारतीय संगीत प्रणाली (कर्नाटक संगीत) से हैं। अपनी मधुरता के कारण ही ये उत्तर भारतीय संगीत प्रणाली में भी लोकप्रिय हुए। इनका थाट खमाज है और निषाद को छोड़कर बाकी सभी स्वर शुद्ध हैं। कलावती राग में ऋषभ नहीं होता। कलावती राग में ऋषभ का प्रयोग करने पर जनसंमोहिनी राग बनता है। इसमें ऋषभ का प्रयोग कल्याण अंग के साथ किया जाता है। जनसंमोहिनी राग का मूल नाम 'शिव कल्याण' भी कहा जाता है।

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' - यह गाना फिल्म 'दिल दिया दर्द लिया' से है, जिसने मेरे ऑर्केस्ट्रा में रहने के दौरान अपार लोकप्रियता हासिल की। ​​मैं इसे अपने घर के संगीत कार्यक्रमों में गाया करता था। अगर मेरे सामने युवा लड़कियां होतीं, तो मैं इसे बड़े जोश से गाता था। तभी मुझे बुनियादी जानकारी मिली कि यह गाना कलावती राग में है। मुझे बहुत बाद में पता चला कि इस में जनसंमोहिनी राग भी है। इसके बाद, फिल्म 'मुंबईचा जवाई' से रामदास कामत द्वारा गाया गया गाना 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' हम (उस समय के) युवाओं को दीवाना बना दिया था। कई वर्षों तक, मैं इन दोनों गानों को  घर के संगीत कार्यक्रमों में गाता रहा। लेकिन कलावती का असली अर्थ प्रभा अत्रे की 'तन मन धन तो पे वारू' इस बंदिश से। एकताल राग की यह रचना बारहवें छंद से शुरू होती है। सम के ऊपर का 'न' श्रोता को मंत्रमुग्ध कर देता है।उपरोक्त रचना श्रोता को मंत्रमुग्ध कर देती है। उनकी गायन शैली और गीतों से निकलने वाली मधुरता बेहद आकर्षक है। आज भी यह गीत युवा लगता है। इसके अलावा, डॉ. वसंतराव देशपांडे द्वारा गायी गई झपतालकी बंदिश 'ये हो कहे' भी मेरी पसंदीदा थी, क्योंकि यह बहुत ही सुरीली थी।

Monday, July 27, 2026

वेदनेचा सूर...

 


पंडित जसराजजींनी गायिलेल्या राग 'बागेश्री कानडा'

 रागावर आधारित गझल...

वेदनेचा सूर देउन काळजाला

लाविले आयुष्य मी माझे पणाला


गात जातो गोडवे जो तो स्वतःचे

झेलले ज्याने कधी ना वादळाला


न्याय,नीती,रीत आता वेगळी रे

नेमका अंदाज ना ये आपणाला


का दुरावा आपल्या दोघात आला

काय द्यावी करणे या कारणाला


माझिया ओठास जेव्हा स्पर्श केला

पौर्णिमेचे चांदणे आले उशाला


गायक - मयूर महाजन

शब्द आणि संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम

संगीत संयोजन - मिलिंद गुणे

ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.



गझलेचं गाणं होताना....

           एखादी साहित्यकृती एखाद्या रचनाकाराने निर्मिलेली जरी असली तरी ती रचना त्याची रहात नाही. त्या रचनेवर  रसिक श्रोते, प्रेक्षकांचा हक्क व्हायला लागतो. त्या साहित्यकृतीत रसिक श्रोते, प्रेक्षक इतके समरसून जातात, की त्यांना स्वतःचंही भान रहात नाही. ते त्या रचनेमध्ये गुंतून जातात, ती रचना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. 

            आता गझलेचंच बघा ना! कित्येक रसिकांना काही गझला जणूकाही आपल्यासाठीच बनल्यात अस वाटत. प्रत्येक श्रोत्याला ह्या गझला आपल्याशा वाटतात.

निदा फाजलींची "होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है" जावेद अख्तरांची "तुमको देखा तो ये ख्याल आया"सुरेश भटांची "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे""भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले"इलाही जमादारांची "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा" अशी बरीच उदाहरणे देता येतील. 

            अगदी तशीच दिलीप पांढरपट्टेनी शब्दबद्ध केलेली, सुधाकर कदम यांनी संगीत स्वरबद्ध केलेली आणि सुरेश वाडकर, वैशाली भैसने माडे यांनी गायिलेली  अप्रतिम गझल 

"#तू_हासलीस_की_सगळ्या_काट्यांची_मखमल_होते". 

     ही गझल रसिक श्रोत्यांची झाली, या गझलेने कित्येकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. मला ह्या गझलेचं वेड लागलं ते माझा मित्र विद्यासागर कोळीमुळे.  अभ्यासाच्या मधल्या break मध्ये आमच्या शेती, छंद, गाणं, आरोग्य, मित्रमैत्रिणीबाबत चर्चा व्हायच्या. त्यावेळी तो, सुधाकर कदम काका, भैरवी कदम, रेणू चव्हाण यांच्या आठवणी नेहमी सांगायचा. ही गझल त्यानेच मला ऐकवली. आणि मी सहजच गझलकार पाहिले तर ते होते दिलीप पांढरपट्टे. पांढरपट्टे साहेब आमच्या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी होते. परंतु त्यावेळी गझलेची जाण नसल्यामुळे त्याना फारस ऐकता आल नाही पण ज्यावेळी ही गझल ऐकली आणि या गझलेच्या प्रेमात पडलो. नव्हे, ह्या गझलेच वैशिष्ट्यच अस की ती प्रत्येकाला नक्कीच प्रेमात पडायला भाग पाडते. तुम्ही नक्की ऐका....

दिलीप पांढरपट्टे सरांची गझल "तू हासलीस की सगळ्या #काट्यांची_मखमल होते"

-राजेश देवरुखकर

---------------------------------------------------------------------

● मराठी गझलच्या इतिहासातील पहिली #युगल_गझल  

#सुरेश_वाडकर  आणि #वैशाली_माडे  यांच्या आवाजात...


तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते

तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते


एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते

ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते


तू येत रहा रे दुःखा आता न दुष्मनी माझी

तू भेटलास की माझे गुणगुणणे अवखळ होते


येताच तुझा सांगावा येतात फुले अन गाणी

येतेस एकटी तरीही ही वर्दळ वर्दळ होते


मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करते

प्रत्येक वेदना माझाही अलबेली मैफल होते


समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा

जी झुळुक वाटली छोटी ते मोठे वादळ होते


-गझलगंधर्व सुधाकर कदम

Saturday, July 25, 2026

जीवनाची एकतारी,पंढरीच्या महाद्वारी...


 

मन होतसे चकोर...



 काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर

व्याकुळले गात्र गात्र होई थेंबास आतूर


करो लागता गजर टाळ वाजतो मृदंग 

पान्हारते चंद्रभागा चोरुनिया अंग अंग


असे सावळे मंथर न्याहाळता इंद्रधनू

मातीतून फुटाळतो शकुनाचा अणू-रेणू


घरघरुनी उठता जात्यामधून विठ्ठल

कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परिमल


शाश्वतच्या ललाटाला सटवाईच गोंदते

उतरणीवरतीच अंगा अंगाला शेंदते


शब्द आणि संगीत- गझलगंधर्व सुधाकर कदम

गायक-मयूर महाजन



Thursday, July 23, 2026


 

कविता जगणारी माणसं (भाग ३)

                संवादक-डॉ. स्वप्नील घाटगे, गायक-मयूर

                     महाजन-तबला-किशोर कोरडे.





संगीत आणि साहित्य :