गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, January 27, 2012

’वो जो हममे तुममे करार था...’



         गझलसह कोणत्याही काव्याचे माध्यम शब्द,छंद,वृत्त,अलंकार वगैरे वगैरे आहे असे मानल्या जाते.या माध्यमांची विशेषता ही आहे,की यांना कोणताही बाह्याआधार नाही.हे सगळे आपल्या आतउसळत असतात.दुसरी विशेषता ही आहे,की या द्वारे उत्तम भावाभिव्यक्ती होऊ शकते.भाव हा एक शब्द असा आहे की जो विचार,वेदना (Feeiling) आणि अभिवृत्ती (Attitude) याचा द्योतक आहे.तिसरी विशेषता म्हणजे यातून सुक्ष्म भाव सुद्धा व्यक्त करता येतात.चौथी विशेषता ही आहे, की यात संदिग्धता आणि अस्पष्टता फारच कमी असते.तरी पण अंतर्मनातील भाव या माध्यमातून पूर्ण रुपाने व्यक्त होत नाही,असे माझे मत आहे.
           आता आपण संगीताचा विचार करु...संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे काकु’.काकु हा शब्द केधातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात.
           एवढी मोठी प्रस्तावना करण्याचं कारण आजची आपली मोमिन खाँ मोमिन यांची वो जो हममे तुममे करार था...’ ही गझल आहे.ही गझल बेगम अख्तर,मेहदी हसन,फ़रीदा खानम,ग़ुलामली,मधुरानी,चित्रासिंग,पंकज उधास,अहमद-महमद हुसैन,पिनाज़ मसानी,शफ़ाक़तअली खान,आबेदा परवीन पासून तर आताच्या जोजो मुखर्जी पर्यंत सगळ्यांनी ही गझल गायिली आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर गायिल्या जाण्याचं भाग्य दुसर्‌या कोणत्या गझलला मिळालं असेल असं मला वाटत नाही.(या गझलचे पॉप’ (की पाप ?) ही शज़ाद रॉयने केले आहे.)वरील सर्व गायक-गायिका आपापल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहेत.त्यांचे विचार,सादरीकरण,सुरावट वगैरे वगैरे त्यांच्या परीने उत्कृष्टच आहे,यात काहीच वाद नाही.तरी पण काकुचा विचार केला असता मला मधुरानीने गायिलेली ही गझल जास्ती भावली आहे. ही बंदिश तोडीरागात आहे.या अगोदर आपण मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम...’ ही जगजित-चित्रासिंग यांनी गायिलेली गझल ऐकलेली आहे.ती सुद्धा तोडी रागातच होती,त्यामुळे मी रागाच्या तपशिलात शिरत नाही.
           मधुरानीच्या आवाजात,गायनात आणि सादरीकरणात एक वेगळेपणा आहे.तो ऐकणार्‌यालासहजपणे आपलंसं करून घेतो.शब्द-स्वरांशी लडीवाळ खेळ करण्याची त्यांची पद्धत किंवा शैली म्हणा,आपल्यालाही तोलडीवाळपणा जाणवेल अशा प्रकाररे लाडावतनेतो.असे शब्द-स्वरांचे लाड करत-करत कुरवाळत गाणे फार कमी गायकांना जमते.खालील गझल ऐकतांना आपणास हे निश्चितच जाणवेल.गझलची सुरवातच अतिशय आर्जवपूर्वक लाडिकपणे होते.त्यातील मंद्र सप्तकातील निषादस्पष्टपणे दाखवून,दुसरी ओळ अलवारपणे आपल्या समोर येते...तेव्हा ऐकतच राहावेसे वाटते...तसेच प्रत्येक शेरातील पंचमस्वर सुद्धा आपण कोणीतरी खास पाहुणे असल्याच्या थाटात येऊन,आपले अस्तित्व प्रकर्षाने दाखवून देतो. संगीतकार आणि गायिका म्हणून मधुरानीला खरोखरच महान मानावे लागेल,असे मला वाटते...
           या गझलचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे सर्व गायकांनी तिला ’रूपकया सात मात्राच्या तालामध्ये बांधले आहे.याचा अर्थ असा की दुसर्‌या तालात तिची बांधणीच होऊ शकत नाही,असे यातून सूचित होते.आणि कोणी बांधण्याचा प्रयत्न केला तर रसभंग होण्याची शक्यता जास्ती आहे.इतर अनेक गझला प्रत्येक गायकाने आपापल्या वकूबाप्रमाणे वेगवेगळ्या तालात बांधून सादर केल्या,परंतू ही गझल सगळ्यांना अपवाद ठरली आहे.
मधुरानी नंतर मला आवडलेली गायिका आहे ’नैय्यरा नूर’....तिचे सादगीभरेसादरीकरण काळजाला भिडतेच ! याचा अर्थ इतरांनी चांगले गायिले नाही असा आपण घेवू नये.आवडण्याचे स्वातंत्र्य नेहमीच ऐकणार्‌याला असते.....इथे मी मधुरानीने गायिलेली वरील गझल टाकली आहे.


वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो के याद हो
वही यानी वादा निबाह का तुम्हें याद हो के याद हो

 
वोन ये गिले वो शिकायतें वो मज़े-मज़े की हिकायतें
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो के याद हो

 
कोई बात ऐसी अगर हुई जो तुम्हारे जी को बुरी लगी
तो बयाँ से पहले ही भूलना तुम्हें याद हो के याद हो

 
सुनो ज़िक्र है कई साल का, कोई वादा मुझ से था आप का
वो निबाहने का तो ज़िक्र क्या, तुम्हें याद हो के याद हो

 
कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो के याद हो

 
हुए इत्तेफ़ाक़ से गर बहम, वो वफ़ा जताने को दम--दम
गिला--मलामत--अर्क़बा, तुम्हें याद हो के याद हो

 
वो जो लुत्फ़ मुझ पे थे पेश्तर, वो करम के था मेरे हाल पर
मुझे सब है याद ज़रा-ज़रा, तुम्हें याद हो के याद हो

 


कभी बैठे सब में जो रू--रू तो इशारतों ही से गुफ़्तगू
वो बयान शौक़ का बरमला तुम्हें याद हो के याद हो

 
किया बात मैं ने वो कोठे की, मेरे दिल से साफ़ उतर गई
तो कहा के जाने मेरी बाला, तुम्हें याद हो के याद हो



 वो बिगड़ना वस्ल की रात का, वो मानना किसी बात का

 वो नहीं-नहीं की हर आन अदा, तुम्हें याद हो के याद हो
 
जिसे आप गिनते थे आशना जिसे आप कहते थे बावफ़ा
मैं वही हूँ "मोमिन"--मुब्तला तुम्हें याद हो के याद हो



मोमिन खाँ मोमिन




नैय्यरा नूर...

आबेदा परवीन...

चित्रासिंग...

ग़ुलामअली...

हरिहरन...

Monday, January 23, 2012

गझलगंधर्व सुधाकर कदमांची काट्यांची मखमल : श्रीकृष्ण राऊत




          तारीख    १६ जानेवारी २०१२.मुंबईचे रविन्द्र नाट्य मंदिर,प्रभादेवी.(पु..देशपांडे सभागृह.) एका मराठी गझल अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या.सर्वजण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.‘काट्यांची मखमल’असे काव्यात्म शीर्षक असलेला हा अल्बम म्हणजे मराठी गझलविश्वातला अनोखा आविष्कार.एक सुरमयी माईलस्टोन.गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाविण्यपूर्ण कल्पना मांडणार्‍या शब्दांनी ह्या गझला अभिव्यक्त झाल्या आहेत. आणि ह्या गझलांना त्या शब्दांना लाभलेल्या गझलगंधर्व सुधाकर यांच्या दीर्घकाळच्या चिंतनातून तयार झालेल्या स्वररचना म्हणजे सोन्याला सुगंध.एरवी चकाकतं ते सर्व सोनं नसतं हा आपला नेहमीचा अनुभव.त्याची एक झलक-

"तू हासलीस की ,सगळ्या काट्यांची मखमल होते!
तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते!"
         
ही गझलांची हिरवळ कानातून मनात उतरत जाते ती सुरेश वाडकरांच्या मखमली स्वरातून.खूप दिवसांनी एव्हढ्या गोड चाली ऐकल्या आणि कान तृप्त झाले. संगीत ही साधना आहे असं जे म्हटल्या जातं ते काही खोटं नाही.नाही तर प्रख्यात गझलकार दुष्यंतकुमार म्हणतातचना-
कैसे मंज़र सामने आने लगे हैं
गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं
          युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने सादर केलेल्या "काट्यांची मखमल" या मराठी गझलच्या अल्बमच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी असेच उद्गार काढले.ते म्हणतात-"काट्यांची मखमल..." ही जलेबी,चमेलीच्या जमान्यातील एक सुरेल स्वरयात्रा आहे.
         या अल्बममध्ये वेगवेगळ्यामूड्स"च्या गझला आहेत.सुरेश वाडकर आणि वैशाली माडेंच्या स्वरातल्या
"तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते...","येता येता गेला पाऊस..." आणि "जीवनाचा खेळ रंगाया हवा..." या गझलांमधून वेगवेगळे भावदर्शन घडते.वाडकरांच्या आवाजा "कळेना कसा हा जगावेगळा मी..." ही सुफियाना ढंगाची आणि "गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी..."ही खास गझलीयत दाखविणारी गझल आहे.दुसरीकडे वैशालीच्या आवाजातील "किती सावरावे,कसे सावरावे...",दूर गेल्या फुलांतल्या वाटा..." आणि हसू उमटले दुःख भोगता गंमत आहे..."या तीनमूड’च्या तीन गझला आहेत.याबद्दल बोलताना सारेगमपची ही महागायिका म्हणाली,"इतक्या सुरेल आणि आशयपुर्ण गझला मला सुरेशजींसोबत गायला मिळाल्या हे मी माझे भाग्य समजते आणि याचे सारे श्रेय गझलगंधर्वांना जाते".
          "धांगडधिंगा गाण्याकडे मी लक्ष देत नाही.मलासुरेल गाणी आवडतात.या अल्बममधील गाणी ऐकत राहावीत अशी आहेत.गझलांचे लिखाण ताकदवर आहेतच, त्याला पूरक स्वररचना असून सुरेशजींच्या आणि वैशालीच्या आवाजाची साथ लाभल्यामुळे हा अल्बम श्रवणीय झाला आहे."असे मनोगत अशोक पत्की यांनी केले.           ह्या      गझला गाताना मिळालेलं समाधान सुरेश वाडकरांनी पुढील शब्दात मांडले-.." हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे की जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील कारण या गझलांच्या बांदिशींमध्ये संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी आपला आत्मा ओतला असून,वैशाली माडे,दिलीप पांढरपट्टे यांचेसोबत काम करताना मला खूप आनंद मिळाला.याचे कारण असे की,फार मोठ्या कालावधीनंतर इतके सुरेल (मेलोडिअस) गाणे मला गायला मिळाले.मला खात्री आहे की हा अल्बम रसिकांना निश्चितच आवडेल".
          आपले     मनोगत व्यक्त करताना सुधाकर कदम म्हणाले,"संगीत म्हणजे केवळ तंत्र नसून ती अंतर्मनातून स्फुरीत होणारी एक शक्ती असून ते इश्वर प्राप्तीचे साधन आहे.मात्र त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक असते,तसेच गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकाराहून वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सुरावटी तयार कराव्या लागतात..."
          आता तुम्ही म्हणाल की हे गझलगंधर्व आहेत तरी कोण? तर तुमचं काही चुकलं नाही.हा मराठी गझलगायनाच्या इतिहासातील एक महत्वाची कारकीर्द गाजवणारा कलावंत होय. तो आहे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम.हा गझल गायक-संगीतका `आपल्याच मस्तीत मी जाई पुढे मात्र बाजारू कवाडे लागती’ अशा खास वैदर्भीय वाणा-गुणाचा आहे.
          विदर्भपुत्र सुरेश भटांच्यामुळे     जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझल गंधर्व कदम’ ह्या अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात,गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन महाराष्ट्राचे मेहंदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. --१९८१ ला ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२--१९८१ ला हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.
           सुधाकर      कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी अशी गावी मराठी गझल हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या .सा.. मध्ये झालेल्याअशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख गझलगझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ सालीभरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, . रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.
         सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.
          सुधाकर कदमांच्या ह्या योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणूनगझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्याइवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनीगगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.

प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत

शंकर नगर,जठारपेठ

अकोला (महाराष्ट्र)




09422176263




संगीत आणि साहित्य :