गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, August 28, 2023

राग-रंग...(लेखांक २१) भीमपलासी.

भीमपलासी म्हटलं की शिकत असतानाची अर्थ न कळणारी चीज आठवते. "जा s जा s रे s अ प ने s मं s दि र वा s सु न पा s वे s गी s सा s स न न दि या" जे संगीत शिकले नाही त्यांनी याचा अर्थ सांगावा. किंवा शिकले असतील तर ज्या वयात शिकले त्या वयात त्यांना या चिजेचा अर्थ कळला होता काय? हे सांगावे! खरे म्हणजे भीमपलासी हा अतिशय मधुर आणि कर्णप्रिय राग आहे.त्यात चीज पण तशीच सोपी आणि समजणारी असली तर शिकतांना सुद्धा विद्यार्थी एकरूप होऊन शिकू शकतात.शब्दार्थच कळला नाही तर त्यांचा फक्त 'पोपट' होतो.या पोपटपणातून निघायला त्याला बराच काळ लागतो.काही विद्यार्थी तर अशा रटाळपणाला कंटाळून पालकांची इच्छा असूनही संगीत शिकणे सोडून देत असलेले मी पाहिले.यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा.पण तो होत नाही.सदारंग (मूळ नाव नियामत खान) हे मुहम्मदशाह यांच्या दरबारात गायक होते.मुहम्मदशाह यांना खुश करण्यासाठी त्यांचे नाव टाकून ख्याल पण रचत होते.'मोहमदशा रंगीले रे' ही चीज बहुतेकांना माहीतच असेल.मुहम्मदशाहला खुश करण्यासाठी रचलेली वरील चीज माझ्या दृष्टीने छचोर आहे.थोडी समज आल्यावर या चिजेचा मला कळलेला अर्थ असा आहे. तू (म्हणजे जो कोणी असेल तो,भलत्या वेळी तिच्याकडे आल्यामुळे लग्न झालेली स्त्री म्हणते आहे) तुझ्या घरी निघून जा.तुझे येणे माझ्या सासू,सुनेला कळले तर? आणि अंतऱ्याचा तर धृवपदशी काहीच संबंध नाही.तो पण बघा:- "सुन हो सदारंग तुमको चाहत है क्या तुम हमको छगन दिया" काही गायक "छगन दिया" ऐवजी "छलन किया" असेही गाताना दिसतात.खरे म्हणजे नवाबाने रागावून सदारंगाला दरबारातून काढून टाकल्यावर त्याची मनधरणी करण्यासाठी शिष्यांकरवी अशा बंदिशी मुहम्मदशाह पर्यंत पोहवून त्यांनी पुनश्च कृपा करून दरबारात घ्यावे म्हणून रचलेल्या आहेत. त्याच पिढ्या न पिढ्या गाणे सुरू आहे.दुसरी ओळ "क्यों तुम हमको छोड दिया" अशी सरळ सरळ असायला हवी.किंवा असेलही.पण जिथे सदारंगचा उच्चार सदारौंग केल्या जातो तिथे शुद्ध स्वरूपातील काव्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.ते काहीही असले तरी राग मात्र गोड आहे.तसेच चिजेची बंदिश सुदधा.सदारंग मला संगीतकार म्हणून पटतो.असो! हा गोड असा राग काफी थाटातून उत्पन्न झाला असून,शास्त्रानुसार गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर आहे.पण 'भीमपलासी राग केव्हाही गायिल्या गेला तरी तो गोडच वाटतो' असे कुमार गंधर्व म्हणतात.यातील कोमल गांधार व कोमल निषाद स्वरांमुळे त्याचे सौंदर्य अधिक वाढते. आरोहात रिषभ,धैवत वर्ज आहे.अवरोहात सातही स्वर आहेत.पण त्यातील रिषभ आणि धैवतावर जोर देऊन विश्रांती (ठहराव) घेता येत नाही.धैवताला पंचमाचा कण व रिषभाला षड्जाचा कण लावल्याने रागाची शोभा वाढते.हा पूर्वांग प्रधान राग असून तीनही सप्तकात याचा विस्तार होतो.काहींच्या मते हा गंभीर प्रवृत्तीचा आहे तर काहींच्या मते यात शृंगार व भक्तिरस ठासून भरलेला आहे.पण माझ्या मते या परस्पर विधानांना काहीच अर्थ नाही. काव्यानुरूप बंदिश बांधण्याची कुशलता असेल तर सगळे रस याच नव्हे तर सगळ्याच रागात दाखविता येतात.याच्या अवरोहातील रिषभ,धैवत वर्ज केले तर धानी नावाचा राग होतो.काही गायक धानीमध्ये रिषभाचा प्रयोग करतात. त्यामुळे धानी गाताना सावधगिरी बाळगावी लागते. तसा तर धानी राग म्हणजे पहाडी, पिलू,मांड प्रमाणे क्षुद्र समजल्या जाणारी लोकधूनच आहे.त्यामुळे यात ख्याल वगैरे प्रकार दिसत नाही.'भीम' नावाचा पण एक राग होता असे म्हणतात.आजचा 'गावती' म्हणजेच भीम राग हा ही एक प्रवाद आहे.तसेच 'मगध आणि वऱ्हाड प्रांताचे प्राचीन नाव 'पलासी' होते त्यावरून पलासी नाव आले असावे' असे पं. भातखंडे म्हणतात.भीम व पलासी मिळून भीमपलासी राग तयार झाला असेही काहींचे मत आहे.ते काहीही असले तरी दिगग्ज गायकांपासून तर नवोदित गायकांना या रागाने भुरळ पाडली आहे.बहुतेक गायकाने हा राग मैफलीत सादर करून रंगविला आहे.उस्ताद अमीर खान आणि किशोरी अमोणकारांचा भीमपलासी आगळा वेगळा आहे.'रे बिरहा' आणि 'रंग सो रंग मिलाय' अप्रतिमच.भीमपलासी मधील 'बिरज में धूम मचाये शाम' ही चीज लोकप्रिय असूनअनेक गायकांनी गायिली आहे. ● भीमपलासी रागावर आधारित चित्रपट गीते... 'तुम्ही ने मुझको प्रेम सिखाया' सुरेंद्र बिब्बो. चित्रपट-मनमोहन.(१९३६). 'बीना मधुर मधुर कचछू बोल' सरस्वती राणे.चित्रपट-राम राज्य.(१९४३). तुम्हे याद करते करते' लता.चित्रपट-आम्रपाली.(१९४५) 'अफसाना लिख रही हूँ' उमा देवी (टुन टुन). चित्रपट-दर्द.(१९४७). 'मन मोर हुवा मतवाला' सुरेय्या.चित्रपट-अफसर.(१९४८). 'आज मेरे मन सखी बांसुरी बजाये कोई' लता. चित्रपट-आन.(१९५२). 'ए री मैं तो प्रेम दिवानी' लता.चित्रपट-नौबहार.(१९५२). 'दुनिया से जी घबरा गया' लता,तलत महमूद. चित्रपट-लैला मजनू.(१९५३). 'ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया' लता.चित्रपट-अनारकली.(१९५३). 'ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता' सुरेय्या. चित्रपट-मिर्झा गालिब.(१९५४). 'तेरे सदके बलमा' लता.चित्रपट-अमर.(१९५४). 'मेरे मन का बावरा पंछी' लता.चित्रपट-अमरदीप.(२९५८). 'मैं गरीबों का दिल' हेमंत कुमार.चित्रपट-आबे हयात.(१९५५). 'मैं ने चांद और सितारों की रफी' रफी.चित्रपट-चंद्रकांता.(१९५६). 'आ निले गगन तले प्यार' लता,हेमंत कुमार.चित्रपट-बादशाह (१९५६). 'निर्दई प्रीतम' लता.चित्रपट-स्त्री.(१९६१). 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.(१९६३) 'झनकार पायल की तो से बिनती करे' आशा भोसले. चित्रपट-नाग देवता.(१९६२). 'चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो' महेंद्र कपूर.चित्रपट-गुमराह.(१९६३) 'मासुम चेहरा' लता,रफी.चित्रपट-दिल तेरा दिवाना.(१९६३) 'ओ बेकरार दिल' लता,हेमंत कुमार.चित्रपट-कोहरा.(१९६४). 'नगमा ओ शेर की सौगात' लता.चित्रपट-गझल.(१९६४). 'कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं' लता मंगेशकर.चित्रपट-अनुपमा.(१९६६) 'नैनो में बदरा छाये बिजली सी चमके हाये' लता.चित्रपट-मेरा साया.( १९६६). 'खिलते हैं गुल यहां खिल के बिखरने को' किशोर कुमार.चित्रपट-शर्मिली.(१९७१) 'है फूल मेरे गुलशन का' माला.चित्रपट-है फूल मेरे गुलशन का.(पाकिस्तानी चित्रपट (१९७४) 'प्यार भरे दो शर्मिले नैन' मेहदी हसन.चित्रपट-चाहत.(पाकिस्तान १९७४) 'गोरी तेरा गांव बडा प्यारा' येसुदास. चित्रपट-चितचोर.(१९७६). 'दिल में तुझे बिठा के' लता.चित्रपट-फकीरा.(१९७६). 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.चित्रपट-दुल्हन वो ही जो पिया मन भाये.(१९७७) हमारी सांसों में आज तक वो हिना की खुशबू' नूरजहां.चित्रपट-मेरे हुजूर.(१९७७ पाकिस्तान). 'दिल के टुकडे टुकडे कर के मुस्कुराकर चल दिये' येसूदास.चित्रपट-दादा.(१९७९). 'तेरी खुशबू में बसे खत मै जलाता कैसे' जगजीत सिंग.चित्रपट-अर्थ.(१९८३) 'समय ओ धीरे चलो' आशा भोसले. चित्रपट-रूदाली.(१९९३) 'तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहीये' कुमार शानु,अलका याज्ञिक,चित्रा.चित्रपट-क्रिमिनल.(१९९४) 'तू चीज बडी है मस्त मस्त' कविता कृष्णमूर्ती,उदित नारायण. चित्रपट-मोहरा.(१९९४). 'तनहा तनहा यहां पे जीना' आशा भोसले.चित्रपट-रंगीला.(१९९५). 'शब्बा शब्बा हाये रब्बा' रानु मुखर्जी,सोनू निगम,नीरज व्होरा.चित्रपट-दौड.(१९९७). 'कहता है मेरा ये दिल' कविता कृष्णमूर्ती.चित्रपट-जीन्स.(१९९७). 'ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से' उदित नारायण.चित्रपट-दिल से.(१९९८). 'किस्मत से तुम हमको मिले हो' सोनू निगम,अनुराधा पौडवाल. चित्रपट-पुकार (२०००) 'मैं निकला गड्डी ले के' उदित नारायण.चित्रपट-गदर.(२००१). 'राधा कैसे ना जले' आशा भोसले,उदित नारायण.चित्रपट-लगान.(२००१) 'येली रे येली क्या है ये पहेली' अलका याज्ञिक,उदित नारायण,कविता कृष्णमूर्ती,हेमा सरदेसाई.चित्रपट-यादें.(२००१). 'खानाबदोश' मोहन.चित्रपट-लंडन ड्रीम्स.(२००९) ● नॉन फिल्मी...(उर्दू,हिंदी) 'कुछ दूर हमारे साथ चलो'-हरिहरन. 'हम तुम होंगे बादल होगा' -मसूद मलिक. 'दर्दे दिल दर्दे आशना जाने'-गुलाम अली. 'दम मस्त कलंदर मस्त मस्त' -नुसरत फतेह अली खान. 'पाणी दा रंग देख के' आयुषमान खुराणा,रोचक कोहली,अभिरुची सिंग. 'है चांद सितारों मे चमक तेरे बदन की' -अहमद हुसेन,महंमद हुसेन. 'ये आईने से अकेले में गुफ्तगू क्या है' -हरिहरन. 'जिंदगी में तो सभी प्यार किया करते है' गीत-मेहदी हसन. 'चुपके चुपके रात दिन आंसू बहाना' गझल-गुलाम अली. (भीमपलासीवर आधारित). 'तुम नहीं गम नहीं शराब नहीं' गझल-जगजीत सिंग. ● मराठी... 'दिलरुबा मधुर हा दिलाच' छोटा गंधर्व.नाटक-देवमाणूस.(१९४८). 'बालसागर तुम्ही वीर खरोखर' निलाक्षी जुवेकर. नाटक-सौभद्र. 'अवघाची संसार सुखाचा करीन'नाटक-कान्होपात्रा. 'स्वकुलतारक सुता' नाटक-स्वयंवर. 'प्रेमसेवा शरण' नाटक-मानापमान. 'दशरथा घे हे पायसदान' सुधीर फडके.गीत रामायण. 'इंद्रायणी काठी' पं. भीमसेन जोशी.चित्रपट-गुळाचा गणपती. 'सावधान होई वेड्या सावधान होई' पं.वसंतराव देशपांडे.चित्रपट-भोळी भाबडी. 'अमृताहुनी गोड नाम तुझे देव' .माणिक वर्मा.चित्रपट-संत नामदेव. 'तुला पाहते रे' आशा भोसले.चित्रपट-जगाच्या पाठीवर. 'तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे' सुधीर फडके. 'मधु मागशी माझ्या सख्या परी' लता. 'काटा रुते कुणाला' -पंडित जितेंद्र अभिषेकी. ● बिलियन व्ह्यूज असलेले shape of you हे ed shiron हिने गायिलेले पॉप गाणे भीमपलासी रागावर आधारित आहे. हे बहुतेकांना माहीत असणं शक्यच नाही. ------------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी,रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३. div class="separator" style="clear: both;">

आग़ाज़-ए-तरन्नुम...उर्दू ग़ज़ल महफिल.

Saturday, August 19, 2023

राग-रंग (लेखांक २०) 'हंसध्वनी'.

काही राग कानावर पडल्याबरोबर हृदयात घर करून जातात.त्यातीलच एक राग म्हणजे हंसध्वनी! हा मूळ दक्षिण भारतीय राग असून.याची निर्मिती मुथुस्वामी दिक्षितार यांचे वडील रामास्वामी दीक्षितार (१७३५-१८१७) यांनी केली असे म्हणतात.'वातापि गणपती भजे हम' ही तिकडील लोकप्रिय रचना आहे.या रागाला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये आणण्याचे श्रेय भेंडीबाजार घराण्याचे गायक उस्ताद अमान अली खान (१८८८-१९५३) यांना जाते.त्यांचे आभार मानायला हवे.कारण आज हा राग उत्तर भारतीय रसिकांचा आवडता राग बनला आहे.'लागी लगन पती सती सन' ही चीज आणि बंदिश त्यांचीच असल्याचेही सांगितले जाते.उस्ताद अमीर खान एकदा मुंबईला गेले असता, ते अमान अली खान यांना भेटले.या भेटीत त्यांनी अमान अली खान यांची वरील बंदिश ऐकली.त्यांना खूप आवडली आणि त्यांनी मोठमोठ्या सभांमधून ख्याल आणि तराण्यासह गायला सुरवात केली.त्यांच्यामुळे हंसध्वनी इतका लोकप्रिय झाला की,उस्ताद राशीद खान(रामपूर),
किशोरी आमोणकर (जयपूर-अत्रौली),पं. ए.टी. कानन (किराणा),पं. अजय चक्रवर्ती (पतियाळा),परवीन सुलताना (पतियाळा) असे उत्तर भारतीय संगीतामधील विविध घराण्याचे प्रसिद्ध गायक  राग मैफिलीत गायला लागले.
       हंसध्वनीशी माझी पहिली भेट नवरंग चित्रपटातील  'रंग दे दे' या गीताने झाली.त्यावेळी मी १० वर्षांचा होतो.या गाण्याने मला वेड लावले होते.रस्त्याने चालताना रेडिओवर लागले तर पूर्ण गाणे ऐकल्याशिवाय पुढे पाय निघत नव्हता.या गाण्यापायी मी घरच्यांच्या व शिक्षकांच्या अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत.त्यावेळी हा हंसध्वनी राग आहे हे माहीत पण नव्हते.संगीताचे शिक्षण विशारद पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जसे कान फुटले तसे नवनवीन रागांची झाडाझडती सुरू झाली.तेव्हा कळले की हा हंसध्वनी आहे...त्यानंतर वेड लावले ते पंडित जसराजजींच्या 'पवन पूत हनुमान' या हंसध्वनीच्या बंदीशीने.अचानक रेडिओवर ऐकली नि 'सुध-बुध खोना' काय असते ते अनुभवले. या चीजेसाठी मी पैसे जमवून ग्रामोफोन घेतला.एल.पी.रेकॉर्ड आणली आणि पारायण सुरू केले.माझ्या अनेक कार्यक्रमातून ही बंदिश मी गायिलो आहे. माहुरचे राजे मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख जसराजजींचे चाहते होते.तसेच माझ्यावरही खूप प्रेम करायचे.त्यांच्या वाड्यात झालेल्या बहुतेक मैफलीत ते मला ही चीज गायला लावायचे.यवतमाळच्या नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागासाठी १९७६ मध्ये एक वाद्यवृंद रचना केली होती.या वाद्यवृंदामध्ये सतार, सारंगी,बासरी,व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये होती. आणि आर्णी (जि. यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर अनेक सांगीतिक उपक्रम राबविले.त्यात 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना' आणि त्यातील विद्यार्थ्यांचा 'वाद्यवृंद', ह्या दोन्हीसाठी केलेल्या  दोन  वेगवेगळ्या धून (compositions) हंसध्वनी रागावर आधारित होत्या.यात/व्हायोलिन,बासरी, हार्मोनियम,
मेंडोलीन,स्वरमंडळ, जलतरंग आणि तबला अशी वाद्ये होती.(सरोद मी स्वतः वाजवायचो.) यात इयत्ता पाच ते सातचे शालेय विद्यार्थी असल्यामुळे या उपक्रमाचे खूप कौतुक झाले होते.
      उस्ताद अमीर खान यांनी गायिलेली झपतालातील'जय माता विलंब तज दे','सुब्बूलक्ष्मी (वातापि गणपती भजे हम.कर्नाटक),'किशोरी आमोणकारांची 'गणपत विघन हरन', वगैरेंसह पं. रविशंकर (सतार),उस्ताद अमजद अली खान (सरोद),पं.हरिप्रसाद चौरसिया (बासरी),'रघुनाथ सेठ (बासरी(,पं. शिवकुमार शर्मा (संतूर),उस्ताद राशीद खान,उस्ताद दिलशाद खान,परवीन सुलताना,वीणा सहस्रबुद्धे,पं. छन्नुलाल मिश्रा (दुर्गा स्तुती),उस्ताद शाहिद परवेज (यांनी सितारवर वाजवलेली एकतालातील गत अप्रतिम आहे.),पं.अजय चक्रवर्ती,पं.विश्वमोहन भट (मोहन वीणा),पं. राजन साजन मिश्र,अश्विनी भिडे देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती,जयतीर्थ मेउंडी,राकेश चौरसिया (बासरी),एन.राजम आणि टी.इन.कृष्णन यांची व्हायोलिन जुगलबंदी,( ऐकण्यासारखी आहे.),ज्योत्स्ना श्रीकांत (कर्नाटक),अदनान खान (सतार),'हार्मनी' (वादक-राकेश चौरसिया,रूपक कुलकर्णी,सुनील दास,उल्हास बापट,मधु धुमाळ,संभाजी धुमाळ),परवीन गोडखिंडी (बासरी),तथागत मिश्रा (इसराज),संजीव अभ्यंकर,सिद्धार्थ मिश्रा हा सगळा अनमोल ऐवज अभ्यासकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे. या रागात हिंदी इतकीच मराठी गाणी आहेत हे विशेष.
●चित्रपट गीते...
'कजरारी मदभरी अखियां' राजकुमारी. संगीत-रोशन. चित्रपट-नौबहार (१९५२).
'जा तोंसे नहीं बोलू कन्हैया' लता,मन्ना डे.संगीत-सलील चौधरी.चित्रपट-परिवार (१९५६).
'सखी री सुन बोले पपिहा उस पार' लता,आशा.संगीत-हेमंत कुमार. चित्रपट-मिस मेरी (१९५७). 'ओ चांद जहां वो जाये' लता,आशा.संगीत-सी.रामचंद्र.चित्रपट-शारदा (१९५७).
'रंग दे दे' आशा,मन्ना डे. संगीत-सी.रामचंद्र.चित्रपट-नवरंग (१९५९). 'लागी लगन पती सखी सन' पं. ए.टी. कानन.बंगाली चित्रपट-मेघ ढाका तारा (१९६०) 'जा रे बदरा बैरी जा' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-बहाना (१९६०) 'लै जा रे बदरा' संजीव अभ्यंकर.चित्रपट-दिल पे मत ले यार (२०००) 'तेरे नैना हस दिये' शंकर महादेवन,श्रेया घोषाल.संगीत-शंकर महादेवन,एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा.चित्रपट-चांदनी चौक टू चायना (२००९)
● नॉन फिल्मी...
'करम की गत न्यारी' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.अल्बम-चाला वाही देस (मीरा भजन).
'जय जय गणपती देवा' भक्तीगीत.गायक-कार्तिक रमण.
काव्य आणि संगीत-रामाश्रय झा. 'होरी खेले महादेव' गायक-जयतीर्थ मेउंडी. शब्द/संगीत-राकेश त्रिपाठी.
'गणेश वंदना'(कर्नाटक पद्धती) गायक-विश्वेश भट.
●मराठी...
'अखेरचा हा तुला दंडवत' लता. संगीत-आनंदघन.
चित्रपट-मराठा तितुका मिळवावा. (१९६४). 'शूर अम्ही सरदार' हृदयनाथ मंगेशकर.संगीत-आनंदघन.चित्रपट
-मराठा तितुका मिळवावा (१९६४). 'अग नाच नाच नाच राधे उडवू या रंग' सुरेश वाडकर,उत्तरा केळकर.
संगीत-विश्वनाथ मोरे.चित्रपट-गोंधळात गोंधळ (१९६८).
'जागे व्हा मुनिराज' आशा भोसले.संगीत-प्रभाकर जोग.
चित्रपट-दाम करी काम (१९७१). 'आली हासत पहिली रात' लता.संगीत-वसंत प्रभू.चित्रपट-शिकलेली बायको (१९८१)
'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले' आशा भोसले. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.(१९६५) 'जयोस्तुते' गायक-
मंगेशकर भावंडं.संगीत-मधुकर गोळवलकर.अल्बम-जय जय महाराष्ट्र माझा. 'आस आहे अंतरी या' सुमन कल्याणपूर.अल्बम-जुळल्या सुरेल तारा (१९९०) हंसध्वनीवर आधारित.'युवती मना दारुण रण' नाटक-संगीत मानापमान.




 

पद्म श्री सुरेश वाडकरांचे मनोगत...

दि.१७ ऑगस्ट २०२३

 

गझल रेकॉर्डिंग,मुंबई.

दि.१७ ऑगस्ट २०२३
चंदना सोमाणी यांच्या गझलचे ध्वनिमुद्रण पद्म श्री सुरेश वाडकर यांचे आवाजात.आजीवासन स्टुडिओ, मुंबई.

         गायक-सुरेश वाडकर, संगीतकार-सुधाकर कदम

          चंदना सोमाणी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम

सोमनाथ सोमाणी,निषाद कदम,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,चंदना सोमाणी. 

Saturday, August 12, 2023

राग रंग (लेखांक १९) अहीर भैरव.

     संगीताचे शिक्षण सुरू असताना सकाळी सकाळी एखादेवेळी एखादा गवैय्या रेडिओवर'अहीर भैरव' गायचा.उद्घोषणात हे कानी पडायचे.अहीर भैरवशी आलेला संबंध हा तेव्हढ्यापुरताच, कारण विशारद पर्यंत हा राग अभ्यासक्रमात नव्हता.(आता असेल तर माहीत नाही.) अहीर भैरव या नावावरून अहीर आणि भैरव या दोन रागांचे मिश्रण असावे असे वाटते.पण अहीर नावाचा राग असण्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.होता व नव्हता असे. पूर्वांगात भैरव व उत्तरांगात काफी अशा दोन रागांच्या मिश्रणातून बनलेला अतिशय गोड राग म्हणजे अहीर भैरव.हा भैरव थाटोत्पन्न मानतात. पण भैरव थाटात तर कोमल धैवत आहे.मग हा भैरव थाटोत्पन्न कसा? हा किडा थोडे-फार संगीत कळायला लागल्यापासून वळवळतो आहे.संपूर्ण जातीचा हा राग सकाळी म्हणजे प्रातः काळी गातात.संपूर्ण जाती म्हणजे ज्यातील आरोहावरोहात सातही स्वर लागतात तो!
सात स्वरांबद्दल 'नारदीय शिक्षा' या प्राचीन ग्रंथात एक श्लोक आहे...

षड्जस्य ऋषभश्चैव गान्धारो मध्यमस्तथा |
पञ्चमो धैवतश्चैव निषाद: सप्तम: स्वर: ||

अहीर भैरव हा आनंद भैरव रागाला हा जवळचा आहे.तसेच कालिंगडा,रामकली हे सुध्दा समप्राकृतीक रागात मोडतात.कर्नाटकातील 'चक्रवाकम' सुद्धा अहीर भैरवशी मिळता जुळता आहे. मूळ भैरव रागाप्रमाणे हा प्राचीन राग नाही.त्यामुळे इतर प्राचीन रागांप्रमाणे यात बंदिशी पण कमीच दिसतात. शास्त्रानुसार हा राग गंभीर प्रकृतीचा आहे. पण 'ज्वेल थिफ' या चितत्रपटातील लताबाईंनी गायिलेले 'होटों मे ऐसी बात मै  छुपाके चली आयी' हे गाणे ऐकल्यावर तसे वाटत नाही.मी पुनः पुनः सांगतो की,रागाला प्रकृती नसते.प्रकृती काव्याची असते.त्याप्रमाणे स्वरसाज चढतो.आणि प्रकृती बदलते.याच रागातील 'मेरी सूरत तेरी आंखे' या चित्रपटातील 'पुछो ना कैसे मैं ने रैन बिताई' हे मन्ना दा ने गायिलेले गाणे गंभीर या सदरात मोडेल. पण ते त्यातील शब्दांमुळे.आणि शब्दानुरूप दिलेल्या सुरावटीमुळे.या रागात गुजराथी लोकगीतं सुद्धा स्वरबद्ध केलेली मला आढळली.काव्याबद्दल एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे...

न सा विद्या न सा रीतिर्न तच्छास्त्रं न सा कला |
जायते यन्न काव्यांगमहो  भारो महान् कवे: ||

म्हणजेच ज्यात काव्यांग नाही अशी कोणती न विद्या, न रीती, न शास्त्र, न कला! 
      एकोणविसाव्या शतकापर्यंत सहा राग व त्या रागांचा परिवार ही रागवर्गीकरणाची पद्धत होती.शिवमत,0कल्लीनाथ मत,भरत मत,हनुमान मत या सर्वांचे या बाबतीत एकमत होते.आणि या सगळ्यांच्या मतानुसार मुख्य सहा रागात भैरव हा राग हा होता.म्हणजेच भैरव हा प्राचीन व अहीर भैरव हा अर्वाचीन राग असल्याचे स्पष्ट होते.सोळाव्या शतकाच्या पुर्वार्धात दक्षिणेतील संत गायक पुरंदरदास भारत भ्रमण करत असताना त्यांचा परिचय भैरव थाटाशी झाला.उत्तर भारतात भैरव थाटाला राग शिक्षणाचा मूळ आधार मानत असल्याचे बघून ते भैरवाला उत्तर भारतातून दक्षिण भारतात घेऊन गेले.आणि त्यांनी कर्नाटक  संगीतातील राग शिक्षणाचा मूळ आधार थाट बनविला.त्या युगातील ग्रंथकार रामामात्य यांनी या थाटाला 'मालवगौड' असे म्हटले आहे.मालवगौडचा अर्थ 'मालवा आणि गौड प्रांतातील प्रचलित थाट'. कर्नाटक संगीतामधील 'मायामालवगौड' भैरव रागाशी मिळता जुळता आहे.(पण दक्षिण भारतीय संगीत पध्दतीमध्ये रागायनासाठी वेळेचे बंधन नसल्यामुळे तो आपल्याकडील भैरव व भैरव थाटीय राग सकाळीच गायला हवे असे त्यावर बंधन नाही.उत्तर भारतीय संगीतामधील ही बंधने शिथिल करायला काय हरकत? कोणताही राग केव्हाही गायीला तरी गोडच वाटणार ना!(तसेही आकाशवाणीवरुन सादर होणाऱ्या शास्त्रीय गायन/वादनात रागगायन संबंधीचे नियम पाळल्या जातातच असे नाही.) पुंडरिकाने आपल्या 'रागमाला' ग्रंथातही प्रथम राग भैरव असे म्हटले आहे.प्राचीन धृपद संग्रहात सुद्धा सर्वप्रथम भैरव रागाच्या चिजा संग्रहित केलेल्या दिसतात.
     शहाजहानच्या काळात बख्शूने केलेल्या 'सहसरस' नामक धृपद संग्रहात पहिली बंदिश भैरव रागात असल्याचा उल्लेख आहे.(मुसलमान और भारतीय संगीत,पान ६२). भैरव रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:- नट भैरव, आनंद भैरव,बंगाल-भैरव, सौराष्ट्र-भैरव,शिवमत-भैरव,आलम भैरव, बैरागी भैरव, मोहिनी भैरव, बीहड़ भैरव, प्रभात भैरव, भावमत भैरव, देवता भैरव, कबीर भैरव, गौरी भैरव, हिजाज़ भैरव आणि त्यातीलच एक अहीर-भैरव.सध्या प्रचारात मात्र काही प्रकारच आहेत.त्यातही नट भैरव, बैरागी भैरव जास्ती चलनात व लोकप्रिय आहेत.यातील बैरागी भैरव हा भैरव कुळातील असला तरी त्यातील कोमल निषादामुळे भैरवाहून वेगळा वाटतो.त्यामुळे त्याला फक्त बैरागी म्हणून संबोधतात. 'नेट'च्या युगात जुन्यांपासून नवीन गायक/वादकांनी गायिलेल्या व आपापल्या वाद्यावर वाजविलेल्या अहीर भैरवसह इतर भैरव प्रकार आपण युट्युबवर ऐकू शकता.
अहीर भैरव रागावर आधारित चित्रपट गीते :-
'अपने जीवन की उलझन को' लता.चित्रपट-उलझन.'चलो मन जाए घर अपने'येसुदास.चित्रपट-स्वामी विवेकानंद.'धीरे धीरे सुबह हुई'चित्रपट-हैसीयत.'माई री मैं कासे कहूं' लता.
चित्रपट-दस्तक.(अहीर भैरव आणि काही अन्य रंगांचे मिश्रण).'मैं तो कबसे तेरी शरण में' हरिहरन,नीलिमा सहानी.- राम नगरी'मन आनंद आनंद छाया' आशा भोसले,सत्यशील देशपांडे. चित्रपट-विजेता.'अपने जीवन की उलझन को' किशोर कुमार. चित्रपट-उलझन.
'मेरी वीणा तुम बिन रोये' लता.चित्रपट-देख कबीरा रोया.
'मेरी गलियों से लोगों की यारी' लता मंगेशकर,महेंद्र कपूर.चित्रपट-धर्मात्मा.'पूछो ना कैसे मैंने रेन बिताई' मन्ना डे.चित्रपट-मेरी सूरत तेरी आंखें.'वक्त करत जो वफा आप हमारे होते' मुकेश.चित्रपट-दिल ने पुकारा.'राम तेरी गंगा मैली हो गई' लता.चित्रपट-राम तेरी गंगा मैली.'प्यार तेरी पहली नज़र को सलाम' लता.चित्रपट-एक दूजे के लिए. 
'सोलह बरस की बाली उमर को सलाम' लता.चित्रपट-एक दूजे के लिए.'वंदना करो, अर्चना करो' लड़की सह्याद्री की पं. जसराज।'अलबेला साजन आयो रे' उस्ताद सुलतान खान,कविता कृष्णमूर्ती.चित्रपट-हम दिल दे चुके सनम.
'जिंदगी को संवरना होगा' येसुदास.चित्रपट–आलाप.
'अब तेरे बिन जी लेंगे हम' कुमार शानु.चित्रपट-आशिकी.
गैर फिल्मी...
'हमे कोई गम नहीं था' -मेहदी हसन.
'राम का गुणगान करिए' -लता,पंडित भीमसेन.
'जय शंकरा गंगाधरा' नाट्यगीत.गायक-पं. राम मराठे.
'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' संत नामदेव,पं. भीमसेन जोशी.
'फिर उसी रहगुजर पर शायद' -गुलाम अली.
'तेरे हिज्र में सजना कबसे जागी न सोई' -फरिहा परवेज. कवी/संगीतकार फहीम मजहर.

 ● बऱ्याच वर्षांपुर्वी सुरेश भटांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातील स्नेहसदनमध्ये मराठी गझल गायनाचा कार्यक्रम केला होता.त्यावेळी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांची खालील गझल मी स्वरबद्ध केली होती.ही अहीर भैरव रागावर आधारित असून यातील मतल्याच्या पहिल्या मिसऱ्यात मी दोन्ही रिषभांचा प्रयोग केला आहे.नंतर पुढे विविध स्वरांचा व मु्र्छनाचा प्रयोग यात केला आहे.पण यातील  'दोन्ही रिषभांचा' प्रयोग मला सगळ्यात जास्ती भावला.कारण कोणत्याही प्रकारे रसहानी न होता अशा प्रकारे गोडवा वाढणे किंवा वाढविणे हे कौशल्याचे काम आहे.अर्थात शेवटी रसिक हेच खरे न्यायाधीश असतात हेही तेवढेच खरे! प्रयोग आवडल्यास आपला.नावडल्यास माझा.युट्युब लिंक खाली दिली आहे...

outube link...

रानात पाखरांची नाही कुठे निशाणी
रोमांचल्या ऋतूंनी जावे कुण्या ठिकाणी

हासून बोलण्याचा तो काळ दूर गेला
आता न बोलताही झाली व्यथा शहाणी

पानातल्या कळीने लाजू नये असे की
डोळ्यामधे उन्हाच्या यावे फिरून पाणी

येथे न राहिलेले कोणीच सोबतीला
माझीच हिंडते ही छाया उदासवाणी

गायिका-भैरवी कदम (देव)
तबला-निषाद कदम
व्हायोलिन-प्रमोद जांभेकर
हार्मोनियम-भाविक राठोड
सूत्र संचालन-शाहीर सुरेशकुमार वैराळकर

 

 

 

Saturday, August 5, 2023

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


 

राग-रंग (लेखांक १८) #पहाडी.


     आपले शास्त्रीय संगीत लोकसंगीमधून निर्माण झाले आहे.संगीत तज्ज्ञ आणि शास्त्रकारही ही बाब मान्य करतात.लोकसंगीत अविकसनशील आहे असे मानणे अत्यंत चूक आहे.आपल्या संगीताचे ते अभिन्न अंग आहे.प्रत्येक काळातील तत्कालीन परिस्थितीचे,प्राकृतिक प्रवृत्तीचे,विकासाचे ढोबळ रूप लोकसंगीताने जपले आहे.वास्तविक पाहता संगीताच्या दोन्ही रुपात (लोकसंगीत/शास्त्रीय संगीत) अप्रत्यक्षपणे देवाण-घेवाण सुरूच असते.त्यामुळेच अनेक राग आपल्याला लोकप्रिय सुरावटींचे स्मरण करून देत राहतत्.आणि म्हणूनच लोकसंगीतामध्ये अनेक प्राचीन राग जसेच्या तसे दिसतात.,टप्पा,ठुमरी सारखे अनेक प्रकार लोकसंगीतामधून आलेले आहेत.पूर्वीच्या काळी ख्याल गायन शास्त्रसम्मत नव्हते.पण आज मात्र ते लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.म्हणूनच शास्त्रीय संगीत रुपी वृक्षाची मुळे लोकसंगीत आहे असे म्हणावे लागते.
     पहाडी राग मूलतः काश्मिरी लोकसंगीताचा सरळ राग आहे.कोणी याला 'धून' म्हणतात.राजस्थानातील 'मांड' आणि हिंदी पट्टयातील 'पिलू' रागाप्रमाणेच हा ही क्षुद्र प्रवृत्तीचा मानल्या जातो.सुगम संगीतामध्ये हा विशेष करून लोकप्रिय आहे.याला विशिष्ठ आरोहावरोहत बांधणे कठीण आहे.तरी पण कुशल गायक वादक यात बाराही स्वरांचा प्रयोग करून उच्च कोटीला पोहोचवू शकतात. मंद्र ससप्तकातील धैवत हा पहाडीमध्ये म्हत्वाचा स्वर आहे.हा अतिशय मनमोहक राग आहे.याचे सौंदर्य त्याच्या नाजूकपणात आहे.पं. शिवकुमार शर्मा यांनी संतुरवर छेडलेला पहाडी 'माझ्या जिवीची आवडी' आहे. हा यमन,दरबारी,मल्हार, वगैरेसारख्या प्रमुख राग नाही.पण याचा गोडवा काही औरच आहे.
      पहाडी बिलावल थाटोत्पन्न मानतात.भूप,देशकार,शुद्ध कल्याणमध्ये जे स्वर लागतात तेच स्वर मध्यमाला षड्ज करून गायिले की पहाडी राग दिसतो.याला ठराविक असा गानसमय नाही.दिवस रात्रीच्या कुठल्याही प्रहरी हा गोडच वाटतो.काव्यातील वेगवेगळे भाव व्यक्त करण्यासाठी पहाडी अतिशय योग्य राग आहे. झिंझोटी प्रमाणेच या रागातही भरपूर गाणी आहेत.
      ● पहाडी रागावर आधारित चित्रपट गीते...
'जवां है मोहब्बत, हसीं है जमाना',नूरजहां
चित्रपट-अनमोल घड़ी.
'सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगे',रफी.चित्रपट-दुलारी.
'जो वादा किया वो निभाना पडेगा',रफी लता.
चित्रपट-ताज महल.
'ना मारो नजरिया के बान',लता.चित्रपट-पहली झलक.
' दिन हैं बहार के, तेरे मेरे इकरार के',   चित्रपट-वक्त
'कौन आया की निगाहों में चमक जाग उठी', आशा.चित्रपट-वक्त.
'दो दिल धडक रहे हैं और आवाज एक है',तलत महमूद,आशा.चित्रपट-इंसाफ.
'मेरी आंखों में बस गया कोई रे',लता.चित्रपट-बरसात.
चल उड जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना',मोहम्मद रफी. चित्रपट-भाभी.
'सखी री मेरा मन उलझे तन डोले',लता.चित्रपट-
'शाम ढले खिड़की तले तुम सीटी बजाना छोड़ दो',
चित्रपट-अलबेला
'लग जा गले फिर ऐसी हसीं रात हो ना हो',लता.
चित्रपट-वह कौन थी
 'ओ दरवाजे के मुसाफिर, हम को भी साथ ले ले',मोहम्मद चित्रपट-उड़न खटोला.
'दो सितारों का ज़मीन पर है मिलन आज की रात',रफी
लता.चित्रपट-कोहिनूर.
'तुम अपना रंज-ओ-ग़म, अपनी पशेमानी मुझे दे दो',जगजीत कौर.चित्रपट-शगुन.
'पर्बतों के पेड़ों पर, शाम का बसेरा है',रफी, सुमन कल्याणपूर.चित्रपट-शगुन.
'वृंदावन का कृष्ण कन्हैया',रफी लता.चित्रपट-मिस मैरी.
'इशारों इशारों में दिल लेने वाले',रफी आशा.
चित्रपट-कश्मीर की कली.
'सुन री सखी मोहे सजना बुलाएं',लता.चित्रपट-नागिन
'तस्वीर बनाता हूं, तस्वीर नहीं बनाती',तलत महमूद.
चित्रपट-बारादरी
कोई प्यार की देखे जादूगरी',लता,रफी.चित्रपट-कोहिनूर.
'चौदहवीं का चांद हो, या आफताब हो',रफी.चित्रपट-चौदहवीं का चांद.
'दिल तोड़ने वाले, तुझे दिल ढूंढ रहा है', लता,रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया.
'वो दिल कहां से लाऊं तेरी याद जो भूला दे',लता.
चित्रपट-भरोसा.
'आज की रात मेरे दिल की सलामी ले ले',मोहम्मद रफी.
चित्रपट-राम और श्याम.
'अरे जा रे हट नटखट ना छेर मेरा घूंघट', आशा,महेंद्र कपूर,रामचंद्र चितळकर.चित्रपट-नवरंग.
'निले गगन के तले धरती का प्यार पले',महेंद्र कपूर.चित्रपट हमराज
'चाहूँगा मैं तुझे सांझ सवेरे',मोहम्मद रफी.चित्रपट-दोस्ती
''ओ मोरा नादान बालमा ना जाने दिल की बात',लता.
चित्रपट-उजाला.
'तू इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है',रफी. चित्रपट-आप तो ऐसे न थे.
'जाने क्या ढूंढती रहती हैं',रफी. चित्रपट-शोला और शबनम.
 'आ जा रे, आ जे रे ओ मेरे दिलबर आजा',नितिन मुकेश.
चित्रपट-नूरी
'सावन का महीना, पवन करे सोर',मुकेश.चित्रपट-मिलन.
'दिल करादा, ओ यारा दिलदारा मेरा दिल करादा',महेंद्र कपूर, बलबिर,जोगिंदर सिंग लुथ्रा.
चित्रपट-आदमी और इंसान.
'दिल पुकारे आ रे आ रे आ रे', रफी लता.चित्रपट-ज्वेल थीफ.
'कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है',मुकेश.चित्रपट-कभी कभी.
'ये शाम मस्तानी',किशोर कुमार.चित्रपट-कटी पतंग.
'कोरा कागज था ये मन मेरा',किशोर कुमार.चित्रपट-आराधना.
'दिल पुकारे आ रे आ रे आरे',रफी,लता.चित्रपट-आराधना.
'ये दिल और उनकी निगाहों के साये',लता.चित्रपट-प्रेम पर्बत.
'चलो दिलदार चलो चांद के पार चलो',लता.लता.चित्रपट-पाकिजा.
'सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे',रफी.
चित्रपट-दुलारी.
'कैसे जिऊंगा मैं',अनुराधा पौडवाल,जॉली मुखर्जी.चित्रपट-साहिबां.
'आईना वो ही रहता है चेहरे बदल जाते है',लता.चित्रपट-शालिमार.
'पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है',लता,रफी.चित्रपट-एक नजर.
'आज मौसम बडा बेईमान है', रफी.चित्रपट-लोफर.
'बहारों मेरा जीवन भी संभालो',लता.चित्रपट-आखरी खत.
'पीतल की मोरी गागरी, दिल्ली से मोल मंगाई रे',परवीन सुल्ताना मीनू पुरषोत्तम.चित्रपट-दो बूंद पानी.
'तेरे मेरे होठों पे, मीठे मीठे गीत मिटावा',लता,बाबला मेहता.चित्रपट-चांदनी.
'देखा एक खव्वाब तो ये सिलसिले हुए',लता,किशोर.
चित्रपट-सिलसिला.
'करवटें बदलते रहे सारी रात हम',लता,किशोर कुमार.चित्रपट-आपकी कसम.
'हुस्न पहाडों का क्या कहना', लता,सुरेश वाडकर.राम तेरी गंगा मैली.
'तेरे बिन नहीं जीना ढोलना',लता.चित्रपट-कच्चे धागे.
'संदेसे आते है', रुपकुमार राठोड,सोनू निगम. चित्रपट-बॉर्डर.

● उर्दू गझल...
'बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो न थी', -मेहदी हसन.
'दिल मैं इक लहर सी उठी है अभी', 'बहारों को चमन याद आ गया है' -गुलाम अली.
'ऐ मेरे हमनशीं चल कहीं और चल' -मुन्नी बेगम.
'सात सुरों का बहता दरिया तेरे नाम' -परवेज मेहदी.
'हम तो है परदेस मे देस मे निकला होगा चांद' -जगजीत सिंग.

● भजन,ठुमऱ्या,अभंग,गीत...
'घनश्याम हृदय के आंगन में कब आओगे' (भजन) -सी.एच. आत्मा.
'तेरे भरोसे हे नंदलाला' (भजन) -मोहम्मद रफी.
'आख नाल आख खैन दे' (गीत)- मेहदी हसन.
'पायो जी मैंने राम रतन धन पायो'(भजन)-डी.वी.पलुस्कर.
'सैंय्या बिना घर सूना' (ठुमरी) -नजाकत-सलामत अली.
'बागों में पडे झुले'-बरकत अली,गुलाम अली.
'मोरी छोडो गगरिया शाम'(ठुमरी) -लक्ष्मीशंकर.
'रंगी सारी गुलाबी चुनरिया'(ठुमरी) -शोभा गुर्टू.
'लागी रे मनवा मे चोट'
'माये नि मेरिये' (गीत) -मोहित चौहान.
●नाट्यगीते...
'खरा तो प्रेमा'
'नाचत ना गगनात नाथा' 
'विराट ज्ञानी' 
'रुणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' 
'मजवरी तयाचे प्रेम' 
●मराठी गीते...
'दिसते मजला सुखस्वप्न नवे' -अनुराधा पौडवाल.
'जाग रे यादवा', सुमन कल्याणपूर. चित्रपट-प्रेम आंधळे असते.
'त्या तिथे पलीकडे',मालती पांडे. चित्रपट-लाखाची गोष्ट.
'ऐसा महिमा प्रेमाचा' -रतीलाल भावसार.
'कशी रे तुला भेटू मला वाटे लाज' -मालती पांडे.
'थंडगार ही हवा त्यात तू जवळ हवा',आशा भोसले.
'बगळ्यांची माळ फुले' -वसंतराव देशपांडे.
'कृष्णा पुरे न थट्टा' -माणिक वर्मा.
'घन नीळा लडिवाळा' -माणिक वर्मा.
'असा मी काय गुन्हा केला' -आशा भोसले.चित्रपट-एक धागा सुखाचा.
'सहज सख्या एकटाच येशी सांजवेळी' -आशा भोसले.
'सखी शेजारीणी तू हसत रहा' -अरुण दाते.
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' -शोभा गुर्टू.
'असा मी काय गुन्हा केला' -आशा भोसले.
'राम रंगी रंगले मन' -भीमसेन जोशी.
'चल उठ रे मुकुंदा झाली पहाट झाली' -सुमन कल्याणपूर.
'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' -सुमन कल्याणपूर.
'फुलले रे क्षण माझे', -आशा भोसले.
------------------------------------------------------------------------
'नक्षत्र' पुरवणी.दैनिक उद्याचा मराठवाडा.रविवार दि.६ ऑगष्ट २०२३.


 





संगीत आणि साहित्य :