गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, July 27, 2026

गझलेचं गाणं होताना....

           एखादी साहित्यकृती एखाद्या रचनाकाराने निर्मिलेली जरी असली तरी ती रचना त्याची रहात नाही. त्या रचनेवर  रसिक श्रोते, प्रेक्षकांचा हक्क व्हायला लागतो. त्या साहित्यकृतीत रसिक श्रोते, प्रेक्षक इतके समरसून जातात, की त्यांना स्वतःचंही भान रहात नाही. ते त्या रचनेमध्ये गुंतून जातात, ती रचना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. 

            आता गझलेचंच बघा ना! कित्येक रसिकांना काही गझला जणूकाही आपल्यासाठीच बनल्यात अस वाटत. प्रत्येक श्रोत्याला ह्या गझला आपल्याशा वाटतात.

निदा फाजलींची "होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है" जावेद अख्तरांची "तुमको देखा तो ये ख्याल आया"सुरेश भटांची "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे""भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले"इलाही जमादारांची "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा" अशी बरीच उदाहरणे देता येतील. 

            अगदी तशीच दिलीप पांढरपट्टेनी शब्दबद्ध केलेली, सुधाकर कदम यांनी संगीत स्वरबद्ध केलेली आणि सुरेश वाडकर, वैशाली भैसने माडे यांनी गायिलेली  अप्रतिम गझल 

"#तू_हासलीस_की_सगळ्या_काट्यांची_मखमल_होते". 

     ही गझल रसिक श्रोत्यांची झाली, या गझलेने कित्येकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. मला ह्या गझलेचं वेड लागलं ते माझा मित्र विद्यासागर कोळीमुळे.  अभ्यासाच्या मधल्या break मध्ये आमच्या शेती, छंद, गाणं, आरोग्य, मित्रमैत्रिणीबाबत चर्चा व्हायच्या. त्यावेळी तो, सुधाकर कदम काका, भैरवी कदम, रेणू चव्हाण यांच्या आठवणी नेहमी सांगायचा. ही गझल त्यानेच मला ऐकवली. आणि मी सहजच गझलकार पाहिले तर ते होते दिलीप पांढरपट्टे. पांढरपट्टे साहेब आमच्या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी होते. परंतु त्यावेळी गझलेची जाण नसल्यामुळे त्याना फारस ऐकता आल नाही पण ज्यावेळी ही गझल ऐकली आणि या गझलेच्या प्रेमात पडलो. नव्हे, ह्या गझलेच वैशिष्ट्यच अस की ती प्रत्येकाला नक्कीच प्रेमात पडायला भाग पाडते. तुम्ही नक्की ऐका....

दिलीप पांढरपट्टे सरांची गझल "तू हासलीस की सगळ्या #काट्यांची_मखमल होते"

-राजेश देवरुखकर

---------------------------------------------------------------------

● मराठी गझलच्या इतिहासातील पहिली #युगल_गझल  

#सुरेश_वाडकर  आणि #वैशाली_माडे  यांच्या आवाजात...


तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते

तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते


एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते

ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते


तू येत रहा रे दुःखा आता न दुष्मनी माझी

तू भेटलास की माझे गुणगुणणे अवखळ होते


येताच तुझा सांगावा येतात फुले अन गाणी

येतेस एकटी तरीही ही वर्दळ वर्दळ होते


मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करते

प्रत्येक वेदना माझाही अलबेली मैफल होते


समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा

जी झुळुक वाटली छोटी ते मोठे वादळ होते


-गझलगंधर्व सुधाकर कदम





संगीत आणि साहित्य :