पंडित जसराजजींनी गायिलेल्या राग 'बागेश्री कानडा'
रागावर आधारित गझल...
वेदनेचा सूर देउन काळजाला
लाविले आयुष्य मी माझे पणाला
गात जातो गोडवे जो तो स्वतःचे
झेलले ज्याने कधी ना वादळाला
न्याय,नीती,रीत आता वेगळी रे
नेमका अंदाज ना ये आपणाला
का दुरावा आपल्या दोघात आला
काय द्यावी करणे या कारणाला
माझिया ओठास जेव्हा स्पर्श केला
पौर्णिमेचे चांदणे आले उशाला
गायक - मयूर महाजन
शब्द आणि संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम
संगीत संयोजन - मिलिंद गुणे
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.

No comments:
Post a Comment