गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, June 16, 2023

सुधाकर कदमांनी शब्द/स्वरसंपदा... शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


       आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’#फडे_मधुर_खावया…’ (स्फूट लेख), ’#सरगम’ (स्वरलिपी), ’#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' 

व '#काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’#भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), '#अर्चना’ भक्तिगीते (टी सिरीज)', '#खूप_मजा_करू’ बालगीते (फाऊंटॆन म्युझिक कं), ’#काट्यांची_मखमल’ मराठी गझल (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’#तुझ्यासाठीच_मी...’ मराठी गझल ( युनिव्हर्सल म्युझिक कं), ह्या कॅसेट,सीडीज सोबतच '#रे_मना' (गीत-गझल) हा अल्बम spotify, gana. com, youtube ह्या ऑडिओ चॅनल्सवर आहे.आणि #गझल_गुलाबो व #वेदनेचा सूर हे दोन अलबम  लवकरच येत आहे.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, कल्पिता उपासनी,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,ज्योती बालिगा,किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी, संदीप गावंडे व दस्तुरखुद्द सुधाकर कदम हे आहेत.

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे....

आयुष्याच्या अत्यंत समृद्ध टप्प्यावर माझा हा कलंदर मित्र उभा आहे.त्याला आरोग्यपूर्ण,समृद्ध दीर्घ आयुष्य लाभॊ यासाठी माझ्या शुभेच्छा...!

-शाहीर सुरेशकुमार वैराळकर 

संस्थापक अध्यक्ष

सुरेश भट गझल मंच

पुणे 

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना

#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.भास आभासावरी मन-रविप्रकाश चापके

५३.जळलो धुपापरी मी-             "      

५४.जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे-     "

५५.मला आठवे ना तुला भेटल्याचे-        "

५६.प्रतिक्षा प्रार्थना झाली-             "

५७.माझी गझल गुलाबो-              "

५८.असे पत्र आता तुला मी लिहावे-            "

५९काट्यास फूल आले-रविप्रकाश चापके

६०.जीवना सांभाळतो मी-सुधाकर कदम

६१.आसवांनी मी मला-सुरेश भट

६२.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

६३. शेवटी हे दुःख माझे-ज्योती बालिगा

६५. मज सांग आज तुझ्याकडे-ज्योती बालिगा

६६. जेव्हा मला कळे ना-संदीप गावंडे

६७. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

६७. शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे-चंदना सोमाणी

६८. वेदनेचा सूर देउन काळजाला-सुधाकर कदम


#मराठी_गीते

१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.क्षेत्र डहेगाव-         "

४३.सकल जीवांचा करी जो सांभाळ-       "

४४.वेडे वाकुडे गायन-               "

४५.भाव गंगा वाहे पूर-                "

४६.देव माझा मी देवाचा-            "

४७.पाहीन मी देवा चरणी राहीन-  "

४८.तुझिये पाहता चरण-            "

४९.टाळ मृदंगाचा ध्वनी-             "

५०.आम्हा योगियाचा छंद-           "

५१.गुरू मायबाप-                      "

५२.गुरुकृपे मज समाधी लागली-   "

५३.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

५४.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

५५.आर्त गाण्यातून फुलता-सुधाकर कदम

५६.हा भाव भावनांचा-                 "

५७.इंद्रियात न्हाता सारी इंद्रायणी-   "

५८.जीवनाची एकतारी-                "

५९.काकडारतीच्या वेळी-              "

६०.कशी वेदना विसरायाची-          "

६१.स्पर्शून एकदा तू-                    "

६२.रे मना तुज काय झाले-            "

७३. आभाळाचे गर्द निळेपण या डोळ्यांना यावे-गजेश तोंडरे


#उर्दू_ग़ज़ल

१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील 'नग़्म-ए-ग़ज़ल' आणि 'प्रसार गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...


#उर्दू_ग़ज़ल

१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

 ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

 गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६


-निषाद कदम

--------------------------------------------------------------------------

#रे_मना या अल्बम मधील माझ्या स्वरबद्ध कविता आता खालील ऑडिओ चॅनल्सवर ऐकू शकता...

1. https://open.spotify.com/album/4tYdLiPmpUNaCnHCNl7iPD?si=mrNcn-wxTReSE2KEbyBt-A&utm_source=native-share-menu

2. https://gaana.com/album/re-mana-marathi

3. https://music.youtube.com/playlist?list=OLAK5uy_lGoVuVZaWLb4CvQ1Qd4NvrYdJYAFGeVEs&feature=share

Wednesday, June 14, 2023

उर्दू गझल गायकीचा शहेनशहा मेहदी हसन...


    आज जगप्रसिद्ध गझल गायक मेहदी हसन खान साहेबांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) आहे. त्यांचा  जन्म १८ जुलै १९२७ ला भारतातील झुंझुनू जिल्ह्यातील लुना या राजस्थातील एका गावात व मृत्यू १३ जून २०१२ ला पाकिस्तानातील कराचीमध्ये झाला.विभाजनाचे वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.खान साहेबांच्या पंधरा पिढ्या संगीताशी जोडलेल्या होत्या.म्हणजेच खान साहेब सोळाव्या पिढीतील गायक होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.

शास्त्रीय,उपशास्त्रीय व गझल गायनात त्यांचा हातखंडा होता.त्यांचा पाकिस्तान टीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.

     तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.

    लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'

दोन्ही गाण्यांची लिंक...

१. https://youtu.be/ad6Scios6zc

नैनो में बदरा...

२. https://youtu.be/Do9Q7TwHoCA

तेरा मिलना बहुत अच्छा...

         जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.आपल्या संपूर्ण आयुष्यात ठुमरी/गीत/गझल अश्या ५४ हजार रचना ते गायिले.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.

      त्यांच्या या सांगीतिक कार्याबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांना 'तमगा-ए-इम्तियाज','प्राईड ऑफ परफॉर्मेन्स',

'हिलाल-ए-इम्तियाज' तसेच भारत सरकारने 'सहगल अवार्ड' देऊन सन्मानित केले आहे.

     खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.

           त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!

    मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन  केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...

         अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.

    रईस खान साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.

      "कभी मेरी मुहब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.

      मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).

● गुलों में रंग भरे... झिंझोटी.

● शोला था जल बुझा हूँ...किरवाणी.

● एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार.

● ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते है...भीमपलासी.

● दिल की बात लबों पर लाकर... बागेश्री.

● दिल में अब तेरे भुले हुए गम याद आते है...भूपाल तोडी

● मैं होश मे था...,   

    फिर उस जुल्फ की बात    चली...चारुकेशी.

● आपको भूल जाये हम इतने तो बेवफा नहीं...,

    इन कदर मस्तम् (फारसी)... सिंधभैरवी.

● ताजा हवा बहार की दिलका मलाल ले गयी... जैजवंती.

● जीना पडा है मौत की सूरत न पूछिए...बसंत मुखारी.

● दिल-ए-नादां तुझे हुवा क्या है...शुद्ध सारंग.

● रौशन जमाले यार से है अंजुमन तमाम...पटदीप.

● दुनिया किसी के प्यार में जन्नत से कमी नहीं... भूप.

● कोंपले फिर फूट आए...सारंग.

● कू ब कू फैल गई बात... दरबारी.

● मै खयाल हूँ किसी और का...भैरवी.

● रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामां हो गये...काफी थाट.

● जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी.

● बात करनी मुझे मुश्किल...पहाडी.

● ये मौजज़ा भी मोहब्बत कभी दिखाए मुझे...मधकौंस

   (जोग)

● रंग पैराहन का खुशबू जुल्फ लहराने का नाम...

   सा ग तीव्र म प कोमल नि सां

   सां कोमल नि प तीव्र म ग रे सा

● जो चाहते हो वो कहते हो...नट भैरव

● फूल ही फूल खिल उठे है मेरे पैमाने मे...गौडमल्हार.

● इक खलिश को हासिले उम्रे रवां...दहा थाटात न बसणारी सुरावट.

● मेरी तरहा सरे महफिल उदास था वो भी...कल्याण     थाटावर आधारित.

● मेरी आहों में असर है के नहीं देख तो लू...जनसंमोहिनी.

● तेरी खुशी से अगर गम मे भी खुशी न हुयी...मधुवंती.

● मोहब्बत करने वाले कम न होंगे...खमाज.

● बहुत बुरा है मगर...ललित.

● यूँ न मिल मुझसे खफा हो जैसे...बिलावल आणि     लखनवी भैरवी.

● तेरी महफिल से ये दिवाना चला जायेगा...शिवरंजनी

● देखे भाले दोस्त हमारे ये जाने पहचाने लोग... रागेश्री.

● रंजिश ही सही... यमन.

● गो जरासी बात पर बरसों के याराने गये...दहा थाटात न बसणारी सुरावट.

● अबके हम बिछडे....भुपेश्वरी.

●  जब तेरे नैन मुस्कुराते है... भारतीय संगीत पद्धतीच्या दहा थाटात न बसणारी सुरावट.


पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...

मुलाखतीची लिंक

https://youtu.be/KBscPu-iXt4

--------------------------------------------------------------------------

    दैनिक उद्याचा मराठवाडा,मंगळावर दि.१३ जून २०२३



 


 

Sunday, June 11, 2023

मल्हार...


बहुत प्रकार अपुल्या देशी मल्हाराचे

मज वेड असे पण आंनद मल्हाराचे

 -सुधाकर कदम

     मल्हार प्रकार वर्षाकालीनआहे असे मानतात.पण का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.या राग प्रकाराचा पाऊस किंवा पावसाळ्याशी तसा काहीच संबंध नसावा असे मला वाटते.'दीप' रागाच्या संदर्भात जशी मिथके पेरली तशीच मल्हार प्रकारामध्ये सुद्धा पेरल्या गेली आहेत.जर 'मल्हार' प्रकारातील गायनामुळे पाऊस पडत असेल तर अवर्षणग्रस्त भागात जाऊन कुणी मल्हार गाऊन पाऊस का पाडत नाही?आणि हा प्रकार पावसाळ्यातच का गातात? इतर ऋतूमध्ये तो गायिल्या जात नाही काय?असे अनेक प्रश्न मला पडले आहे.(दीप राग गायिल्याने दिवे पेटतात, अंगाचा दाह होतो आणि मेघमल्हार  गायीला की दाह शांत होतो.तसेच ताना-रिरी नावाच्या दोन भगिनी नदीवर घागर भरताना झालेल्या डुबुक डुबुक आवाजातून मेघ मल्हाराचे स्वर मिळणे', हे वैज्ञानिक कसोटीवर कसे तोलायचे? रागांना काळ-वेळात बांधणे मला अनैसर्गिक वाटते.तानसेन 'संगीत सम्राट' होते हे मान्य! (मी ग्वाल्हेरला जाऊन त्यांच्या मजारी समोर नतमस्तक झालो होतो.) पण त्यांचा मोठेपणा अधिक गडद करण्यासाठी असली मिथके तयार करणे मला तरी योग्य वाटत नाही.बरे, तानसेनाच्या अगोदर किंवा नंतर हा चमत्कार घडल्याचा कुठेच उल्लेख नाही.) मुळात कोणताही राग व सुरावटी भक्कम तयारीनिशी केव्हाही चखलपणे गायिल्या/वाजविल्या गेल्या तर त्या गोड वाटणारच! तसे नसते तर सुगम संगीतात झालेल्या अनेक रचना बारमाही गोड वाटल्याच नसत्या.यावर शास्त्रीय संगीतातील शास्त्री सहमत होणार नाही.पण त्यांनीही यावर जरा डोळसपणे विचार करायला हरकत नाही.यात मी शास्त्रीय गायकांना किंवा अभ्यासकांना कमी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण इतर गायनशैली सुद्धा शास्त्रीय संगीताचाच आधार घेते हे खरे आहे. पण शास्त्रीय संगीताची निर्मिती लोकसंगीतामधूनच झाली हे पण तेवढेच सत्य आहे.आणि ते केव्हाही गोडच वाटते.

     मल्हाराचे अनेक प्रकार आहेत.शुद्ध मल्हार,पट मल्हार,मेघ मल्हार,सूर मल्हार,गौड मल्हार,नायकी मल्हार,कानडा मल्हार,मीराबाई की मल्हार,धुलिया मल्हार,चरजू की मल्हार वगैरे वगैरे. 'मियाँ की मल्हार' त्यातीलच एक पण लोकप्रिय राग आहे.मल्हार 'देस अंग','कानडा अंग','गौड अंग' अशा तीन अंगाने गातात.दक्षिण भारतीय मल्हारचा उत्तर भारतीय मल्हारशी स्वरांच्या दृष्टीने तिळमात्रही संबंध नाही.मल्हार प्रकारावर अनेक प्रबंध लिहिल्या गेले. संशोधन झाले.या संदर्भात संशोधकांनी आपापली मते मांडली.'मेघ' रागासोबत 'मल्हारी' हे नाव पण समोर आलेले दिसते.तसेच महाराष्ट्रात 'मल्हारी मार्तंड' नावही प्रचलित आहे.पण या दोन्हीचा मल्हार राग प्रकाराशी तसा काहीही संबंध नाही.

     मल्हार प्रकारातील अनेक मल्हार लोकप्रिय आहेत.पण मला अतिशय भावला तो किशोरी आमोणकरांचा 'आनंद मल्हार.' आणि तो त्याच गाऊ जाणे.पंडित भीमसेन जोशींचा मियामल्हार ऐकणीयच... मोठा ख्याल झाल्यावर छोट्या ख्यालामधील विजेच्या गडगडासारख्या कडकडणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.सुगम संगीत वा गझल गायन ऐकताना ही वाट बघण्याची प्रक्रिया म्हणा किंवा अंतराय म्हणा कमी लागतो.अर्थात सुगम संगीत वा गझल गायकी आणि शास्त्रीय गाणे बजावणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.पण गझल गायकी म्हणजे 'गागर मे सागर' असे मोठमोठे गायक सुद्धा म्हणायचे.

    

     आता हेच बघा ना ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केलेली गझल असो वा जगजीत सिंग यांची 'फिर पानी दे मौला' असो...दोघांचाही बाज वेगवेगळा आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ इथे मात्र एकदम बरसातच!असो...

 ●हिंदी

          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल गुड्डी चित्रपटातील ’बोल रे पपीहरा..’ हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडतं.'लपक झपक तू आ रे बदरवा' (मल्हार रागावर आधारित मन्ना डेंनी गायिलेले विनोदी गीत) चित्रपट-बुटपॉलिश.'ना ना ना बरसो बादल' (मियाँ मल्हार) चित्रपट-सम्राट पृथ्वीराज चौहान. 'भय भंजन वंदना सुनो हमारी' (मियाँ मल्हार) चित्रपट-बसंत बहार.'करो सब निछावर'(मियाँ मल्हार) चित्रपट-सह्याद्री की लडकी. 'नाच मेरे मोर जरा नाच' (मियाँ मल्हार) चित्रपट-तेरे द्वार खडा भगवान. 'बरसो रे बरसो रे' (मेघ मल्हार) चित्रपट-तानसेन.'दुख भरे दिन बिते रे भैय्या' (मेघ मल्हार) चित्रपट-मदर इंडिया.'तन रंग लो जी आज मन रंग लो' (मेघ मल्हार) चित्रपट-कोहिनूर.'हाले दिल युं उन्हें सुनाया गया' (मियाँ मल्हार) चित्रपट-जहांआरा. 'अंग लग जा बालमा' चित्रपट-मेरा नाम जोकर.'छायी बरखा बहार,पडे अंगना फुहार' (सूर मल्हार) चित्रपट-चिराग.'बोल रे पपिहरा' (मियाँ मल्हार) चित्रपट-गुड्डी. 'कहां से आये बदरा' (मेघ मल्हार)

'बिजुरी चमके बरसे मेहा' (मियाँ मल्हार)'बरसों रे मेघा मेघा (मेघ मल्हार) चित्रपट-गुरू. 'घिर घिर आये बदरिया' (मियाँ मल्हार) चित्रपट-सरदारी बेगम. 'बादल उमड बढ आये' (मियाँ मल्हार) चित्रपट-साज.'काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ'...लगान.'मल्हार' (अल्बम) मियाँ मल्हार,

गायक-मामे खान,मनीषा अग्रवाल.'मेरे ती गिरीधर गोपाल' लता मंगेशकर. (मियाँ मल्हार).'घन गरजत बादर आये'

(मियाँ मल्हार,कोक स्टुडिओ) आयेशा ओमर,फ़रिहा परवेज,झारा मदानी.

●मराठी

'आज कुणीतरी यावे' (मियाँ मल्हार) चित्रपट- मुंबईचा जावई. 'घन घन माला' (मियाँ मल्हार) चित्रपट-वरदक्षिणा. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' (मियाँ मल्हार) भावगीत.

'जिवलगा कधी रे येशील तू' चित्रपट-सुवासिनी.'सावन घन गरजे बजाये' नाटक पंडितराज जगन्नाथ,गायक-प्रसाद सावकार. 'माना मानव वा परमेश्वर' (मियाँ मल्हार) सुधीर फडके.(याचे गीतकार आणि संगीतकार विदर्भातील अमरावतीचे मनोहर कवीश्वर होते.) 'कुहू कुहू कुहू येईल साद' अनुराधा पौडवाल. 'मेघा नको बरसू अता' जयंत मल्हार रागावर आधारित अप्रतिम मराठी गीत.अल्बम-घन घुंघुरवाळा आला.गायिक-अपर्णा बिवलकर. वरील सर्व गाणी मल्हार प्रकारांवर आधारित आहेत.

      आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...

       याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल युट्युबवर जाऊन सर्च करावी व आनंद घ्यावा.

       

(शास्त्रीय गायक/वादकांची 'स्पेसिफिक' अशी नावे सांगण्याची गरज नाही.कारण नेटवर सहज सापडतात.पण सुगम संगीतातील नावे सांगावी

लागतात.)

-------------------------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.११ जून २०२३


Saturday, June 10, 2023

मराठी गझल...मज सांग...

  • ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा यांची खालील गझल भैरवी रागात स्वरबद्ध झाली असून, यात शुद्ध गांधार, शुद्ध धैवत आणि शुद्ध निषादाचा वापर करून बंदिश रंजक व शब्दांना न्याय देणारी करण्याचा प्रयत्न केला आहे.मतला दिपचंदी तालात व शेर रूपक तालात निबद्ध असलेल्या या गझलची सुरवातच कोमल धैवतासोबत शुद्ध गांधार घेऊन होते.दुसऱ्या मिसऱ्यात एकाच स्वरांची कोमल व तीव्र रूपे एकामागे एक आल्यामुळे (माझ्या मते) ऐकायला सोपी व गायला कठीण असलेली ही रचना प्राजक्ता सावरकर शिंदेंनी अतिशय समर्थपणे पेलून अगदी सुरेल आणि हळुवारपणे गायिली आहे.    
  •  सादर आहे ..
मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरास या चुकवून मी येऊ कशी

कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ क

आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून येऊ कशी

माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी


 

Saturday, June 3, 2023

राग मारवा...



हुरहुरणारा सांज सावळा आर्त असा मारवा...
अंतरआत्मा ढवळुन काढी स्वर गहिरा कारवा'
-सुधाकर कदम

     शास्त्रीय संगीत गाणाऱ्या/वाजविणाऱ्या कलाकारांचा हा आवडता राग आहे.पण सुगम संगीत व चित्रपट संगीतामध्ये या रागाचा वापर फार कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते.गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना हुरहुर लावणार्‍या मारवा रागाची तोंड ओळख संगीत विद्यालयात झाली होती.पण खरा मारवा कळायला नंतर बराच काळ जावा लागला. मारव्याच्या स्वरातील हुरहुर ऐन तारुण्यात असताना हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या अरूण दाते यांच्या आवाजातील ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या शंकर वैद्य यांच्या भावगीताने करून दिली.स्वरगंगेमधील ’वचन दिले तू मला’ यातील ’मला’ या शब्दावर लागलेला तार सप्तकातील कोमल रिषभ,पुढे 'ओळखले का मला' यातील षड्ज सोडून इतर स्वरांशी खेळत षड्जावर स्थिरावणार 'मला', जन्म जन्मांतरीच्या ओढीची वेगळीच अनुभूती  देऊन गेला.सोबतच ’सुमन कल्याणपुर यांनी गायिलेले मंगेश पाडगावकरांचे ’शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ पण कानात रुंजी घालत होते.संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी अंतऱ्यामध्ये विविध सुरावटींचा वापर करून वेगळाच आयाम दिला.अमरावतीचे मित्र राजेंद्र सगणे यांचेकडे ही (78 ची तबकडी) रेकॉर्ड होती.त्यांच्या लग्नानिमित्त तीन दिवसांच्या मुक्कामात ती इतक्यांदा ऐकली की, खराब होऊ नये म्हणून घरच्यांनी आमच्यावर बंदी घातली.
     मग पुन्हा मारव्याची आळवणी नव्याने सुरू केली.या दरम्यान माझ्या गुरुजींचे गुरूजी आदरणीय छोटा गंधर्व यवतमाळला आलेत.झाडीपट्टीत त्यांचा कार्यक्रम होता.नागपुरवरून पुढे जायचे होते.जाता जाता गुरूजींकडे (यवतमाळ) मुक्कामी आलेत...(तसे ते नेहमीच यायचे) मला कळल्याबरोबर मी आर्णीहून यवतमाळला पोहोचलो.कारण मला माहित नाही पण ऋषीतुल्य छोटा गंधर्वांचा माझ्यावर खूप जीव होता.विदर्भातील बहुतेक कार्यक्रमात हार्मोनियमच्या साथीला ते मला न्यायचे.तसेच ते इकडेही मला सोबत घेऊन गेले.कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरा लावून त्यांचा स्वरांशी लडिवाळ खेळ सुरू होता.छोटा गंधर्व,तानपुरा,हार्मोनियम आणि मी....अशातच माझ्या डोक्यात मारव्याचा किडा वळवळायला लागला...आणि हिया करून विषय काढलाच.त्यांनी अतिशय बाळबोध प्रकाराने "स्वत:चे घर नसून मजेत राहणारा माणूस म्हणजे मारवा",असे सांगून षड्जाचा कमीत कमी प्रयोग करून मारवा कसा गावा हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.हे सांगत असताना मुर्छना पद्धतीने यात भूप,मालकौंस,दुर्गा या रागांच्या छटा पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखविल्या.तो सर्व सोहळा अजूनही माझ्या डोक्यात अगदी ताजा आहे.
       सूर्यास्ताचे वेळी गायिल्या जाणारा हा राग आपले अपुरेपण सतत दाखवित राहतो.तरी पण मारव्याची ओढ का लागते ते कळत नाही.यात पंचम स्वर नाही.षड्ज खूपच कमी.दोन्ही स्थीर स्वरांनी दुरावा ठेवल्यामुळे तर मारवा हळवा वाटत नसेल ना? तसा विचार केला तर हीच सुरावट असूनही पुरीया व सोहोनी वेगळे वाटतात.पण मारवा मात्र हळवाच वाटतो.याचे मुख्य कारण म्हणजे षड्ज जो येतो तो खंबीरपणे न येता कोमल रिषभाच्या संगतीने येतो.कदाचित त्यामुळेच हळवा वाटत असावा.हा राग  म्हणजे ऐकवत नाही व ऐकल्याशिवाय राहावत नाही असा आहे.
     कवी लोकांनाही 'मारवा' नावाचे फार आकर्षण आहे.कुणाच्या काव्यसंग्रहाचे शीर्षक तर कुणाच्या कवितेत वेगवेगळे संदर्भ घेऊन हा शब्द वापरल्याचे अनेकदा दिसून येते.तसेच मारवा हे एका सुगंधी वनस्पतीचे पण नाव आहे.अल मारवा शहरात मक्केजवळ ही वनस्पती सापडते.
      मारवा हा स्वतःचे घर नसलेल्या माणसा सारखा आहे.कोमल रिषभ व शुद्ध धैवतात खेळणारा मारवा षड्जावर लवकर विसावत नाही.याला मराठीने जेवढा आधार दिला तेवढा हिंदी चित्रपटसृष्टीने दिला नाही,असे आजवरच्या माझ्या ऐकण्यावरून वाटते.एक 'पायलिया बावरी' हे खुमार बाराबंकवी यांनी लिहिलेले 'साज और आवाज' या चित्रपटातील नौशाद यांनी स्वरबद्ध केलेले व लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे मारवा रागात आहे.बाकी मारवा रागावर आधारित असेच म्हणावे लागेल.'कान्हा रे कान्हा' चित्रपट -टॅक्सी ड्रायव्हर. 'सांज ढले गगन तले' चित्रपट-उत्सव. 'माई री मै का से कहूँ अपने जिया की' चित्रपट-दस्तक. 'मेरा परदेसी ना आया' चित्रपट-मेरे हमसफर. 'सगरे जगत का इक रखवाला' चित्रपट-नास्तिक.'सांझ भई घर आ जा रे पिया' गायिका-लता. 'साथी रे भूल न जाना मेरा प्यार' चित्रपट-कोतवाल साब. 'तुमने क्या क्या किया है हमारे लिए' चित्रपट-प्रेमगीत. '
'एरी सखी मैं अंग अंग आज रंग डार दू' वेबसिरीज 'बँडेड'च्या शेवटच्या इपिसोडमधील भजन.
उर्दू गझल...
'शाम के सांवले चेहरे को निखारा जाये' - हुसैन बक्श.
'गर्मिये हसरते नाकाम से जल जाते है' - मेहदी हसन.
'तमाम उम्र तेरा इंतजार हमने किया' -गुलाम अली.
'जब से उसने शहर को छोडा' - राजकुमार रिझवी.
'अक्सर दिल में दर्द उठा है रात के पिछले पहरों में' -हमीद अली खान
'मेरा मुझ में किछ नहीं जो कुछ है जो तेरा' -भाई बालविसिंग...(कीर्तन सेवा)
'गाईये गणपती जग वंदन' -रत्नेश दुबे
कव्वाली 'अल्ला मोहम्मद चार यार' नुसरत फतेह अली.

'मावळत्या दिनकरा' -लता मंगेशक. 'हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे' - रामदास कामत.'रसिका मी कैसे गाऊ गीत' - अनुराधा पौडवाल.
     १९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन व मेंडोलिन वादन, नंतर गझल गायनाचे कार्यक्रम,सततचा प्रवास,जागरण, वेळी-अवेळी खाणे,अतिरिक्त रियाज यामुळे १९९५ नंतर 'व्होकल कॉर्ड्स'चा त्रास सुरू झाल्यामुळे डॉक्टरांनी माझे गझल गायनाचे जाहीर कार्यक्रम बंद करण्यास सांगितले.१९९५ नंतर मी फक्त संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले.ते आजतागायत सुरू आहे.सध्या माझ्या स्वररचनांवर आधारित मराठी गीत-गझलांचा कार्यक्रम 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत पंडित जितेंद्र अभिषेकीचे शागिर्द पंडित मोहनजी दरेकर यांचा शिष्य मयूर महाजन करतो आहे.माझ्या संगीत दिगदर्शनाखाली सुरेश वाडकर,पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे,वैशाली माडे,दिनेश अर्जुना,संगीतकार यशवंत देवांची शिष्या रसिका जानोरकर,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,भैरवी-रेणू कदम,भाविक राठोड,उत्कर्षा शहाणे,आदित्य फडके,प्रशांत कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे,कल्पिता उपासनी वगैरे प्रतिथयश व नवोदित गायक/गायिका गायिले आहेत,गात आहेत.
       सुरेश भटांच्या हयातीतच त्यांची 'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही' ही गझल मारवा रागात स्वरबद्ध झाली होती.'शब्दानुरूप बंदिश कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही गझल होय' असे ते म्हणायचे.दुसरी गझल ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा राव यांची 'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला' ही काही महिन्यांपूर्वी कल्पिता उपासनी या नवोदित गायिकेच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केली.कल्पिता खूप छान गायिली.या दोन्ही गझलात छोटा गंधर्वांनी सांगितल्या प्रमाणे वरील रागांच्या थोड्या फार छटा आपणास दिसतील.ही त्यांची देण आहे.'जगत मी' मधील  दुसर्‍या ओळीतील ’तुटलो’ या शब्दासाठी वापरलेला कोमल मध्यम आणि त्यासोबत येणारी भूपेश्वरी व भिन्नषड्ज रागाची सुरावट आपणास ’तुटण्याची’ अनुभूती निश्चित देईल.इतकेच नव्हे तर ’जुळलोच नाही’ यासाठी वापरलेल्या कोमल धैवता सोबतची सुरावट ’न जुळण्याचा’ आभास निर्माण करते...ह्या दोन्ही गझला माझ्या 'गीत-गझलरंग' या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.
     https://youtu.be/sVWmZQ1hNIM
     'शेवटी हे दुःख माझे लागले उमलायला'
    
     ऐका तर सुरेश भटांची आवडती स्वररचना व माझी आवडती गझल...जगत मी आलो.
https://youtu.be/OFc4d99SCyY

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

गायक - मयूर महाजन
गझल - सुरेश भट
संगीत - सुधाकर कदम
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,रविवार दि.४ जून २०२३


 

Saturday, May 20, 2023

राग बागेश्री...



    सखी मन लागे ना'...एकदम संगीत विद्यालयातील विद्यार्थी दशेतील 'ते' दिवस आठवले.हा बागेश्रीतील मोठा ख्याल व 'कौन गत भई' छोटा ख्याल इतकेच...त्या वेळी ख्यालातील शब्दांचा अर्थ कळण्याचे दिवस नव्हते.अर्थ समजावून सांगण्याची गरज वाटणारे शिक्षकही नव्हते.आणि समजा समजावून सांगितला तरी तो कळण्याचे वय पण नव्हते. दुसऱ्या परीक्षेला बसणाऱ्या कुमार वयातील मुलाला 'सखी मन लागे ना' कसे कळणार?
    जेव्हा संगीतकार म्हणून मी काम करायला लागलो तेव्हा मला बागेश्री रागाचा आवाका कळला. मला बागेश्री राग एखाद्या एकत्र कुटुंबातील आबालवृद्धांचे लाड पुरविणाऱ्या कुटुंब प्रमुखासारखा वाटतो.पाण्याचे जसे आहे ना? 'जिस मे मिलाओ वैसा',तसे बागेश्री रागाचे आहे.कोणत्याही 'रसा'तील गाणे असो वा शास्त्रीय संगीतातील गायक/वादक असो. तो त्यांच्याशी एकरूप होणारच.ज्यांचा जसा वकूब असेल तसा बागेश्री आपल्या समोर येतो.किशोरी आमोणकरांचा बागेश्री व्याकुळ करतो.अमीर खां साहेबांचा बागेश्री गंभीर वाटतो.बडे गुलाम अली खां साहेबांचा बागेश्रीमधील तराणा खासच आहे.मध्य/द्रुत लयीतील सरगम ऐकणीय आहे.पंडित जसराजांचा बागेश्री सरगमसह केलेल्या स्वरांच्या भरावामुळे अगदी वेगळा भासतो.कौशिकीने गायिलेला बागेश्री लडिवाळ वाटतो.उस्ताद राशीद खान यांचा बागेश्री घरंदाज वाटतो. पंडित व्यंकटेश कुमारांच्या बागेश्रीत आळवणी दिसून येते.जावेद बशीरने गायिलेल्या बागेश्रीत विनवणी दिसते. कुमार गंधर्वांचा बागेश्री श्रोत्यांना झुलवत ठेवतो.अश्विनी भिडे,वीणा सहस्रबुद्धे,ऋजुल पाठक,गणपती भट,मंजुषा पाटील,पंडित राजन-साजन मिश्र,ओंकार दादरकर,विलियम डे,फरीद हसन-मोहम्मद अमन (जुगलबंदी), विघ्नेश ईश्वर (कर्नाटक),एम.डी. राजनाथन (कर्नाटक) या प्रत्येकाने गायिलेला बागेश्री वेगवेगळी अनुभूती देतो.
    
    पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीतून निघणारे बागेश्रीचे स्वर आर्त वाटतात.पंडित रविशंकर आणि उस्ताद अल्लारखां यांची धमार तालातील बागेश्रीची जुगलबंदी,उस्ताद राशीद खान (सितार), डॉ.एम.राजन (व्हायोलिन),एम.कार्तिकेयन (नागस्वरम) ,रामन बालचंद्रन (वीणा), राकेश चौरसिया (बासरी),  उस्ताद विलायत खान (सितार),अभिषेक बोरकर (सरोद),पुर्बयान चॅटर्जी (सितार) अत्यंत श्रवणीय आहे.मला वाटते बहुतेक गायक/वादकांनी कधी ना कधी बागेश्री राग गायीला/वाजविला असेलच.
    हा राग काफी थाटातून उत्पन्न झाला असून यात गांधार व निषाद स्वर कोमल व बाकी स्वर शुद्ध आहेत.वादी मध्यम,संवादी षड्ज.आरोहात रिषभ पंचम वर्ज असल्यामुळे जाती औडव-संपूर्ण आहे.रात्री गायिल्या जाणाऱ्या भावपूर्ण रागात याची गणना होते.
    ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीत गायक/वादकात हा राग प्रिय आहे.त्यापेक्षाही चित्रपट व सुगम संगीतामध्ये संगीतकारांचा आवडता आहे हे खालील उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.पण ज्या प्रकारे नियमानुसार राग शुद्धता शास्त्रीय संगीतामधील गायक/वादक पाळतात तशी शुद्धता काही अपवाद वगळल्यास इतर गायन शैलीत पाळल्या जात नाही.
    ●हिंदी ...
    'कैसे कटे रजनी',बंगाली चित्रपट 'शुदिस्ता पाशन' गायक अमीर खान.'चाह बरबाद करेगा' चित्रपट-शाहजहान.'जाग दर्दे इश्क जाग' चित्रपट-अनारकली.'फिर वोही शाम' चित्रपट-जहाँआरा.'हम से आया न गया' चित्रपट-देख कबीर रोया. 'आजा रे परदेसी',घडी घडी मोरा दिल धडके' चित्रपट-मधुमती.'राधा ना बोले ना बोले ना बोले रे' चित्रपट-आझाद.'दूर रहकर न करो बात करीब आ जाओ' चित्रपट-अमानत.'आओ आओ नंद के लाला' चित्रपट-रंगोली.'बेदर्दी दगाबाज' चित्रपट-ब्लफ मास्टर.'माई री मैं का से कहूँ'(बागेश्री/मालगुंजी)चित्रपट-दस्तक.'सांवली सलोनी तेरी झील सी आंखे' चित्रपट-हम सब चोर है.'अब घर आ जा' चित्रपट-हासिल.'मेरा चांद मुझे आया है नजर' चित्रपट-ये है मुंबई मेरी जान.'ऐसा क्यूँ होता है' चित्रपट-इश्क विश्क.'कहना ही क्या' चित्रपट-बॉंबे.'चाहतों का सिलसिला' चित्रपट-शब्द.'भरे नैन' चित्रपट-रा.वन.'फिर छिडी रात बात फूलों की' चित्रपट-बरसात १९८२.'सीने मे जलन' चित्रपट-गमन.
    ●उर्दू गझल...
    'कैसे कैसे लोग हमारे दिल को जलाने आ जाते है','दिल की बात लबों पर लाकर अब तक हम दुख सहते है','एक नये मोड पे ले आये है हालात मुझे'-मेहदी हसन.'चमन में रंगे बहार उतरा','दर्दे दिल दर्दे आशना जने'-गुलाम अली,'तुम नहीं गम नहीं शराब नहीं','अब कोई बात भी मेरी'-जगजीत सिंह.
    ●मराठी...
    'केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर','रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले'-सुमन कल्याणपूर.'ओळखिले मी तुला','कंठातच रुतल्या ताना','जय शारदे वागेश्वरी','नाम घेता तुझे गोविंद',वनवास हा सुखाचा','तरुण आहे रात्र अजुनी'-आशा भोसले.'घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा'-लता मंगेशकर.'पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी'-पं. जितेंद्र अभिषेकी.'माझा भाव तुझे चरणी'-पं. भीमसेन जोशी.
    ●नाट्यगीते...
    'प्रेम नच जाई','आता रंग देई मना','प्रियकर वश मजला'-बाल गंधर्व.'बहुत दिन नच भेटलो सुंदरीला'-छोटा गंधर्व.'धवल लौकिका'-प्रभाकर कारेकर.'घुमत ध्वनी का हा'-शरद जांभेकर.

     मी नुकतेच माझे एक गीत बागेश्रीमध्ये स्वरबद्ध केले.माझा एक जिवलग मित्र कोविड काळात निघून गेला तेव्हा सुचलेली ही रचना मयूर महाजन या युवा गायकाने गायिली आहे. युट्युबच्या 'गीत-गझलरंग' या चॅनलवर आपण ही रचना ऐकू शकता.शब्द आहेत...

कशी वेदना विसरायची...सांग मला तू
कशा सावरू अश्रू धारा...सांग मला तू

आनंदाचे सोंग करावे लागत नाही
या दुःखाचे काय करावे...सांग मला तू

गुन्हा असा की अजाणता मन गुंतत गेले
कसे सोडवू या गुंत्याला...सांग मला तू

काळोखाच्या दरीत मन हे घुसमटलेले
कसा दूर अंधार करावा...सांग मला तू
   
किती अनोखे असे बंध हे शतजन्माचे
का सलतो हा रोज दुरावा...सांग मला तू
  
 "कशी वेदना..." युट्युब लिंक...
https://youtu.be/IF-nDzQssEg


 





संगीत आणि साहित्य :