गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, July 15, 2021

नवोदित मराठी गझल गायकांचें अभिनंदन व शुभेच्छा...

 २०१७ मध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या जागतिक मराठी गझल संमेलनाच्या एका सत्रात,मराठीमध्ये ज्या प्रमाणात गझल लिहिणारे तयार झाले त्या प्रमाणात गायक/गायिका तयार झाल्या नाहीत,अशी खंत मी व्यक्त केली होती.परंतू गेल्या चार वर्षात पुढे आलेल्या मराठी गझल गायकांची संख्या पाहून आनंदाने ऊर भरून आला.याचसाठी माझा अट्टाहास होता. मी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत चालला ही मराठी गझलसाठी व माझ्यासाठीही खूप आनंदाची बाब आहे.सर्व नवोदित मराठी गझल गायक/गायिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीकरिता  खूप खूप शुभेच्छा...

Tuesday, July 13, 2021


 

एक शम्मा जिगर में ही जलती रही...श्रद्धा पराते


     नागपुर के धनवटे रंगमंदिर में १५ जून की शाम मराठी ग़ज़ल के नाम संपन्न हो गयी। गायक थे,यवतमाल जिला आर्णी के श्री सुधाकर कदम। नगर के कलाप्रेमी रसिकों के लिए मराठी ग़ज़ल गायन का तीन घंटे का कार्यक्रम प्रथम प्रयोग था जिसे अपूर्व प्रतिसाद मिला।तालियों से हॉल निरंतर गुंजता रहा।वैसे अनुभव यह है कि मराठी श्रोता दाद देने में निहायत कंजूस है,किंतू इस प्रोग्राम में विदर्भ के मराठी कवियों की रचनाओं को और श्री सुधाकर कदम की गायकी के अंदाज को समय समर पर दाद मिली।उर्दू-हिंदी ग़ज़ल की महफिल आम बात है।शब्द चाहे ना समझे वह श्रोता के दिल में उतर ही जाते है और आप की वाह निकल पडती है।ग़ज़ल की मूल प्रकृति को दुसरी भाषाओं में ढालना बहुत कठीन काम है।
फिर भी अन्य भाषाओं में भी ग़ज़ल सफलतापूर्वक लिखी जा रही है।मराठी ग़ज़ल अभी भी ग़ज़ल की आत्मा को पकड नहीं पाई,किंतू मराठी कवि निरंतर प्रयासरत है।उनकी लेखनी से ग़ज़ल उतर रही है। गायक के गलेसे होकर जबतक ग़ज़ल लोगों के दिल में उतर नहीं जाती,तब तक के निर्माण का उद्देश सफल नहीं हो पाता।
     मराठी ग़ज़ल गाने के इस कठीन व्रत को चुनौती के साथ स्वीकारा है,श्री सुधाकर ने...उनका अपना अलग अंदाज़ है। मराठी रचना के मराठीपन को क्षति न पहुंचाते हुए,बडी ही सुहानी तर्जो में वे रचना को कुशलतापूर्वक बांधते है। कवि की कविता का मूल स्वर पकड पाना उनका अपना सामर्थ्य है।उनकी स्वरधारा रसिकों का मन मोहने का सामर्थ्य रखती है।धनवटे रंगमंदिर में यह उनका प्रथम कार्यक्रम जरूर है किंतु इससे पूर्व अनेक बार नागपुर के विविध भागों में महफिलें हो चुकी है। पश्चिम महाराष्ट्र के कलाप्रेमीयों ने इन्हे बेहद पसंद किया है।पुणे की मराठी साहित्य परिषद ने श्री सुधाकर को बडे सम्मन के साथ सराहा है। कोल्हापूर नगर के कलाप्रेमी रसिकों का सम्मान श्री सुधाकर अनेक बार पा चुके है। रसिकों का यह प्यार ही उन्हे गाने की अपनी मस्ती बरकरार रखने की ताकद बख्शता है।
    इसी संदर्भ में मराठी के विख्यात कवि श्री नारायण कुलकर्णी कवठेकर कहते है...
’मस्तीत गीत गा रे,
देतील साथ सारे’
रसिक साथ देंगे,भविष्य साथ देगा,इस विश्वास से श्री सुधाकर गाये जा रहे है। विदर्भ के एक लोकप्रिय मराठी कवि श्रीकृष्ण राऊत जीवन का अध्यात्म बडे सरल शब्दों मे बताते है...
’दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना,
आरती जी गात आहे तीच माझी वेदना’
   उन्होने जीवन में आनेवाले दुःखों को ईश्वर का दर्जा दे दिया और वेदना को आरती की संज्ञा...शब्द जो कवि की लेखनी और गायक के गले से उतरते हैं वेप्रार्थना हो गये।
    और शृंगार के क्या कहने,तरल मुलायम शृंगार को शब्दांकित करने की कला में कविवर्य श्री सुरेश भट की कोई सानी नहीं। वे कहते है... 
’ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची...’

’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’
और कहते है...
’पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली’
इसी शृंगार का निर्वाह करते हुये पुणे के श्री अनिल कांबले कहते है...
’जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐन वेळी अशी काय करतेस तू’
   मराठी के एक बुजुर्ग कवि श्री उ.रा.गिरी ने एकाकीपन के तीव्र एहसास  को बडी संजीदगी से शब्दों में ढाला है...
’या एकलेपणाचा छेडीत मी पियानो
ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरांनो
तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
माझ्यासवे तुम्ही ही कां जागता कळ्यांनो’
    निद्रा अनाथ कहने का कवि का यह अंदाज निराला है। इस रचना को श्री सुधाकर ने बडी गंभीर,गहन और दिल छू लेनेवाली तर्ज में ढाला है।’हरवलेली’ शब्द पर स्वरलहरी की जो करामात वे दिखाते है,वह खॊ जाने के भाव को मूर्त रूप समक्ष खडा करती है।रसिक स्वर की इस अदाकारी में खो जाता है।
    संगीत का क्षेत्र ही ऐसा है,जहां गायक निरंतर विद्यार्थी बना रहता है।श्री सुधाकर कदम स्वयं को हमेशा के लिये विद्यार्थी मानते है।संगीत के क्षेत्र में श्री सुधाकर की साधना करीबन बीस वर्ष से कम नहीं है। वे स्वयं संगीतकार है स्वयं गायक है।उनकी दमदार आवाज किसी भी प्रभाव व नाटकीयता आवेश से मुक्त है।सच्चे कलाकार को जीवन में कितनी भी सफलता मिले,कितना भी वैभव प्राप्त हो जाये,उसके हृदय में एक चिरंतन उदासी का,एक चिरंतन सी अनबूझ प्यास का साम्राज्य होता है,इसी को उद्देशकर वो कहते है...
”सभी कुछ मिला ज़िंदगी से मगर
एक शम्मा जिगर में ही जलती रही’
हां !!! वे उर्दू-हिंदी ग़ज़ल गाने के भी अभ्यास में व्यस्त है।इसी प्यास के दर्द की शमा के प्रकाश में वे अपना मार्गक्रमण करते चले जायेंगे,ऐसा उनका विश्वास है।कलाकार की प्रकृति में निर्मोहीपन होना उसके वह होने का प्रमाण होता है।इसी से वे कहते है...
’अपनी तबीयत ही फकीराना है
वैसे जीने को हर बहाना है
पत्ते पत्ते पे है कफस का गुमान
कौन सी शाख आशियाना है’
   सुधाकर की तबियत का फकीरानापन और सतत की खॊज ही उन्हे प्रगति के मार्ग पर निरंतर प्रेरणादायी होगी।विदर्भ के एक कोने में आर्णी जैसे गांव में जहां साधनो का अभाव हो सकता है,ऐसे स्थान में वे निरंतर साधनारत हैं यही इसका प्रमाण है।

दै.नवभारत,दि.६ जुलै १९८४

●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित,#अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ  #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...



 

 

Wednesday, May 19, 2021

गझल सुधाकर कदमची...श्रीकृष्ण राऊत.


सुधाकर कदम, ये किस चीजका नाम है?
 हे आता जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे़ पुन्हा सांगण्याची काही गरज नाही, वाट आहे फक्त आता एकच की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कॅसेट रेकॉर्डरवर हा आवाज दर्दी गझल प्रेमींना कधी मोहिनी घालायला सुरवात करतो आणि तो नुसताच मोहिनी घालणार नाही तर त्यापुढे जाऊन थेट हृदयात त्याचे स्वतःचे घर ही करेल, आणि तुम्ही-आम्ही नुसतेच बघत राहू-ऐकत राहू़ इतकं स्वर, सौंदर्य व काळजात सरळ उतरवण्याची देखणी अदा सुधाकरच्या गळ्यात आहे़ मागेपुढे एखाद्या मैफिलीत सर्वांच्या समक्ष एखाद्या दर्दी गझल ने त्यांच्या गळ्याचे चुंबन घेतले नाही तर नवल नाही़.
 कवीला काय म्हणायचे आहे? काय सांगायचे आहे? काय सुचवायचे आहे? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो़ तरी आशयाचा एखादा पैलू, अर्थाचा एखादा पदर रसिकाला गझल वाचून पूर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ‘समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्याशिवाय राहत नाही़ तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुखवटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो़. आणि मला वाटते गझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे़ नुसत्याच गायकीचं कसब दाखवायचं असेल तर इतर गायन प्रकार काय थोडे आहेत?
 ही जाण सुधाकर कदमांना आहे़ याचा मनापासून आनंद झाला़. ती जसजशी विकसित झाली; तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
शब्दातील आशयाचा सुगंध कधी दरवळू लागला,स्वरांच्या सौंदर्यलहरींनी कधी काळजात भरू लागला ह्याचे भान श्रोत्यांनाही राहू नये व गझल गायकालाही. इतका गझल गायकाने महफिलचा अंशनअंश गझलमय करून टाकला पाहिजे. म्हणजेच शब्दांतील आशयाचा सुगंध व स्वरातील सौंदर्य हळुवार आंजारत- गोंजारत एकाच वेळी शब्दातील कवी व स्वरातला गायक एकमेकांशी खेळीमेळीने वागत असल्यासारखे पेश केले पाहिजे. सुधाकर कदमांना हे साधलं आहे हे विशेष ! ते शब्दातल्या कवीला कुठे दुखावत नाहीत तर स्वरातल्या गायकाला कुठे मुरड घालत नाहीत; हे त्यांना जितके अधिक आत्मसात होईल तितकी त्यांच्यावर जान देणार्‍यांची संख्या वाढत-वाढत जाऊन चांदण्यांसारखी मोजता येणार नाही़.
 गझल पेश करण्यापूर्वी गझलच्या एकंदर रुपाची झलक एखाद्या शेरमध्ये दाखविण्याची त्यांची शैली गुलाम अलीची आठवण करून देणारी असली तरी काही आठवण फार सुखद असतात, त्या तर्‍हेची ही आठवण आहे़. त्यामुळे होणार्‍या वातावरण निर्मितीने श्रोत्यांना विश्वासात घेतल्या जाते; नंतर स्वतःच्या आयुष्यातील एखादा अनुभव ज्या तन्मयतेने आपण हळुवार सांगतो तितक्या आत्मियतेनं कवीच्या शब्दातला अनुभव फुलविल्या जातो - खुलविल्या जातो - श्रोत्यांपर्यंत पोचविल्या जातो व त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद होतो़.तो एक प्रकारचा सूचक असा गोड इशारा असतो़. वाट कोणत्या स्वर्गाकडे जाते हे दिग्दर्शीत करणारा फलक असतो़. आणि मला वाटते ही शैली गझल गायनाचा एक शृंगार आहे़.
 मी सुखद आठवण म्हणतो ते या अर्थाने. रसिकांना ही सुखद आठवण चालेल कारण त्यानंतरची स्वर्गनिर्मिती ही आपल्या साधनेच्या ऐपतीप्रमाणे करणे हे प्रत्येक गझल-गायकाचे स्वतःचे योगदान असते आणि ते योगदान सुधाकर कदम आपल्या स्वरांच्या आरोह-अवरोहातून, रागांच्या माध्यमातून आणि हार्मोनियमवरील आपल्या बोटातून ‘दिल खोलके’ देतात तेव्हा ऐकणारा तृप्त होतो़.आणि गुणगुणत राहतो-

‘झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला.’

लोकमत साहित्य जत्रा
१० जुलै १९८३

https://youtu.be/RlJBMllyJFg

#लेख #गझल #गझल_गायक ##singer #music


 





संगीत आणि साहित्य :