गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 10, 2011

’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’




            मिर्झा गालिब यांची ही गझल म्हणजे म्हणजे दर्दी रसिकांच्या काळजातील जीवघेणी कळ आहे,असे मला वाटते.प्रत्येक माणसाच्या मनात दिल--नादाँ तुझे हुआ क्या है...’ ही भावना कधी ना कधी उद्भवतेच.अशा वेळी आखिर इस दर्द की दवा क्या है...’ हा ही प्रश्न उभा राहतोच.उदासलेल्या मनाला ही गझल त्यामुळेच अतिशय जवळची वाटते.या गझलच्या लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर,हिच्या इतकी लोकप्रियता दुसर्‌या कोणत्या गझलच्या वाट्याला आली असेल असे मला वाटत नाही.चित्रपटांमध्येही या गझलचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.१९४३ मध्ये हंटरवालीकी बेटी’,१९४९ मध्ये अपना देश’,१९५४ मध्ये मिर्झा गालिब’,आणि पाकिस्थानातील मिर्झा गालिबया चित्रपटांमध्ये ही गझल चित्रपट गीतांच्या स्वरुपात अनुक्रमे पुष्पा हंस’,’तलत-सुरैय्याआणि मल्लिका--तरन्नुम नुरजहान यांनी ही गझल गायिली आहे.या व्यतिरिक्त शाहिदा परविन,सुमन कल्याणपुर,परवेज़ मेहदी,जगजित-चित्रा,शुमोना राय बिस्वास,पिनाज मसानी आबेदा परविन आणि मेहदी हसन यांनी या गझलला आपापल्या परीने गायकीचा रंग देवून सजविली आहे.या मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मला विशेष करून आवडली.शुमोनाची गझल गायकी इतकी सुंदर असतांनाही तिचे नाव रसिकांना पाहिजे त्या प्रमाणात माहित नाही याचे नवल वाटते.तिचा ’dagha-sung by Shumona Roy Biswas' हा अल्बम म्हणजे रसिकांना खरोखरच मेजवानी आहे.ही गायिका इतकी सुंदर गाते की ऐकत राहावे असे वाटते.
          खालील VDO मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली संपुर्ण गझल आहे.शुमोनाची बंदिश पटदीप रागावर आधारित असल्यासारखी वाटते,पण लगेच त्यात इतरही रागांचा उपयोग केल्यामुळे एका रागाचे नाव सांगता येणार नाही.मेहदी हसन यांची बंदिश शुद्ध सारंगया रागात बांधलेली आहे.हा माझा आवडता राग आहे.सारंगाच्या इतर प्रकारापेक्षा हा वेगळाच आहे.याला शुद्ध सारंग का म्हणतात हे ही एक कोडेच आहे.कारण कोणत्याच सारंग प्रकारात न लागणारा तीव्र मध्यमया मध्ये लागतो.या रागाचा गानसमय शास्त्रीय व्याख्येनुसार दुपारचा आहे.पं.जसराजजींनी गायिलेला शुद्ध सारंग मनभावन असून,छोटा ख्याल तर लाजवाबच.संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी आशा भोसलेच्या आवाजातील छोटासा बालमा...’या गाण्यात केलेला या रागाचा वापर अवर्णनीय आहे.तसा उपयोग चित्रपट संगीतात अभावानेच आढळतो.या नंतर तसे स्वरशिल्प मेहदी हसन यांनीच उभे केले आहे.त्यातील दोन्ही मध्यमांचा उपयोग तरक्या बात है....!’(याच रागातील हरिहरन यांनी गायिलेली ज़ब्ते ग़म का सिला न दे जाना...’ही गझल रसिकांनी जरूर ऐकावी.म्हणजे शुद्ध सारंगशी आपली मैत्री पटकन होते.)चला तर ऐकू या...दिल--नादाँ......


दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है

हम है मुश्ताक और वो बेज़ार
या इलाही ये माजरा क्या है

मैं भी मुह मे ज़ुबान रखता हूँ
काश पुछो  की मुद्दा क्या है

जबकी तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा अय खुदा क्या है

ये परी   चेहरा   लोग कैसे है
गमज़ा-ओ-इश-आ-ओ अदा क्या है

सब्ज़ा-ओ-गुल कहाँ से आये है
अब्र क्या चीज़ है,हवा क्या है

हमको उनसे वफ़ा की है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है

जान तुमपर निसार करता हूँ
मैं नही जानता वफ़ा क्या है

मैने माना की कुछ नहीं ग़ालिब
मुफ़्त हात आये तो बुरा क्या है

ग़ालिब / शुमोना राय बिस्वास, मेहदी हसन
,


’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’

Saturday, December 3, 2011

"रंज की जब गुफ़्तगू होने लगी..."


           जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. ) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. ) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.

           एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की  , हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर लेलेल्या वक्तव्यात आहे.

           आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पुर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वैगरे वैगरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या सहेलामुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल आँफ दी व्हँली"तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...

           भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी हरे रामा हरे कृष्णाया चित्रपटातील कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले भाभी की चुडियाया चित्रपटातील ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच लव्ह इन टोकियोया चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे रिषभावरमुर्छना केली की मधमाद सांरग’, ’गांधारावरमुर्छना केली की मालकौंस’, ’पंचमावरमुर्छना केली की दुर्गाराग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.

           या वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात रंज की जब गुफ़्तगू होने लगी,आपसे तुम तुमसे तू होने लगीही दाग़ यांची गझल गुलामअली गायले आहेत. मतला पूर्णपणे भूपात बांधला आहे. अंत-यातील...काही शेर भूपाला कल्याणाची जोड देऊन इतक्या सुंदर रीतीने सादर केले की तोंडून आपोआपच वाहव्वा निघून जाते. तानांच्या छोट्या छोट्या लडया,वरच्या पंचमापर्यंतची रुपक तालाशी खेळत खेळत केलेली स्वरांची कलाकुसर आपल्याला थक्क करते. सोबतच सुरेल नोटेशनसह विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण तिहाया,विवादी स्वर घेऊन विविध रागाच्या छटा दाखवून वाढवलेली रंजकता,मक्त्यामध्ये केलेले जयजयवंती रागाचे लोभस मिश्रण गुलामलीच्या परिपूर्ण गायकीची ग्वाही देते.या गझल सोबतचा तारिक हुसैन यांचा तबला म्हणजे सोने पे सुहागा...’! असा तबला भारतातील गझलच्या साथीदारांकडून ऐकायला मिळत नाही.यात त्यांनी टाकलेल्या तबल्याच्या विविध विधा,तुकडे,मुखडे आणि वेगवेगळ्या तिहाया हे दुसरे फार मोठे आकर्षण यात आहे.(मी स्वतः १९५८ ते १९६३ मध्ये यवतमाळला पं.दादासहेब पांडे यांचेकडून तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले असल्यामुळे तबल्या विषयी लिहू शकलो.) त्यामुळे राग जरी एकच असला तरी पण त्याची विविध रुपे आपल्यासमोर उभी राहतात.मला जर गझल गायन ऐकायला का आवडते ? असा कोणी प्रश्न केला तर, गझलमध्ये काव्य,संगीत आणि ताल या तिन्हीची मजा घेता येतेहे माझे उत्तर राहील....
   
                                                                                
          या गझलचा मतला इतका सुंदर आहे. की उर्दू न जाणणाराही या काव्याच्या मोहात पडेल. पंरतू पुढील शेर कु--कू, दु--दू अशा शब्दांनी भरल्यामुळे आमच्यासारख्या गावरान माणसाच्या टाळक्यात दाग़ शिरत नाही.फ़क्त गुलामअलीच लक्षात राहतो आणि भावतो. तरी पण आपसे तुम, तुमसे तू, होने लगी..." हे मात्र अंतर्मनात कायम रुंजी घालत राहाते. ऐका तर ... रंज की जब गुफ़्तगू होने लगी ......

रंज की जब गुफ़्तगू होने लगी
आपसे तुम,तुम से तू होने लगी

चाहिए पैगामबर दोनो तरफ
लुत्फ़ क्या जब दु--दू होने लगी

मेरी रुसवाई की नौबत आ गयी
उनकी शोहरत कु--कू होने लगी

ना उम्मीदी बढ गयी है इस क़दर
आरज़ू की आरजू होने लगी

अब के मिलकर देखिए क्या रंग है
फिर हमारी जुस्तजू होने लगी

दाग़ इतराते हुए फिरते है आज
शायद उनकी आबरू होने लगी
दाग़




Monday, November 28, 2011

क्या भला मुझको परखने का नतीजा निकला...

          
          मेहदी     हसन खाँ साहेबांनी गायीलेली मुज़फ्फर वारसी यांची ही गझल मी अंदाजे ३५/३६ वर्षांपुर्वी मनसोक्त ऐकली ती सुरेश भटांमुळे.या गझलची बंदिश मालकौंस या सुंदर आणि लोकप्रिय रागात आहे.गायक,वादक,संगीतकार यांचाही हा अत्यंत आवडता राग आहे.बिसमिल्ला खाँ साहेबांनी शहनाईवर वाजविलेल्या मालकौंसाची ध्वनिमुद्रिका आजही सीडी च्या रुपात मंगल कार्यात वाजत असते.बैजू बावरा या चित्रपटातील रफी साहेबांनी गायीलेले "मन तरपत हरि दरशन को आज" हे गाणे आजही टवटवीत आहे.नवरंग चित्रपटातील "आधा है चंद्रमा रात आधी,रह जाए तेरी मेरी बात आधी" आणि "तू छुपी है कहाँ मै तडपता यहाँ" ही गाणीही मालकौंस रागातीलच आहे.संगीत नाटकांमध्येही या रागाचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो.रणदुंदुभी नाट्कातील "दिव्य स्वातंत्र्य रवी",मृच्छकटीक मधील "तेचि पुरूष दैवाचे" वगैरे-वगैरे."अणुरणिया थोकडा,तुका आकाशाएवढा"हा भीमसेनांच्या आवाजातला अभंग ही त्याची उदाहरणे...असा हा श्रीमंत राग मालकौंस...या रागात सा नि असे फक्त पाचच स्वर लागतात.गांधार,निषाद,धैवत हे स्वर कोमल आहेत.बस्स...पण या पाच स्वरांमधील जादू वरील उदाहरणांवरून आपल्या लक्षात आलीच असेल....

         
वरील सर्व गाणी अतिशय कर्णमधुर आहेत यात काही वादच नाही.प्रत्येक संगीतकार,गायक,वादकांनी आपापल्या प्रतिभेनुसार हा राग लोकांसमोर ठेवला.परंतू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अंगाने जाणारी बंदिश हे या गझलचे वैशिष्ठ्य आहे.त्यातही अंतर्‍यात केलेली कलाकुसर हृदयाला भिडणारी आहे.या गझलची माझ्या आयुष्यात वेगळी अशी जागा आणि आठवण आहे.सुरेश भटांशी मैत्री झाल्यानंतर त्यांनी मला सर्वप्रथम "हा ठोकरुन गेला" आणि "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही" या दोन गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या.यावेळी मी आँर्केस्ट्रा सोडून नुकताच आर्णी (जि.यवतमाळ) या खेड्यात संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो होतो.भरज्वानीचा की काय म्हणतात असा तो काळ होता.१५/२० दिवसानंतर नागपुरला धनतोलीच्या त्यांच्या निवासस्थानी या दोन्ही गझलांना बसविलेल्या चाली ऐकविल्या."ठोकरुन"ची चाल त्यांना आवडली.परंतु "कुठलेच फूल" ला बसवलेली किरवाणी रागातील उडती चाल त्यांना बिलकुल आवडली नाही.त्यांचा स्वभाव तसा अतिशय फटकळ आणि मिश्किल असल्यामुळे ते मला म्हणाले" सुधाकरराव तुमची ही चाल म्हणजे एखाद्या घरंदाज बाईला तमाशात नाचवण्याचा प्रकार झाला आहे!"...त्यांना काय म्हणायचे आहे हे मला क्षणभर समजले नाही.पण काही तरी चुकल्याचे लक्षात आले.माझा गोंधळलेला चेहराबघून त्यांनी एक भली मोठी लोखंडी ट्रंक उघडली,त्यात खच्चून कँसेट्स भरलेल्या होत्या. त्यातल्या / कँसेट्स मला दिल्या.(सुरेश भट त्यांच्या संग्रहातील कँसेट्स आणि पुस्तके कोणालाही देत नसत.या बाबतीतले त्यांचे विचार अतिशय परखड ठाम होते.) परंतू कँसेट ऐकण्याकरीता माझ्याकडे टेपरेकाँर्डर नव्हते.म्हणून त्यांना कोणीतरी भेट दिलेले त्यांच्याजवळचे एकमेव टेपरेकाँर्डर मला दिले आणि गझल गायकीचा अभ्यास करायला सांगितले.ते सगळे घेऊन मी आर्णीला आलो.माझ्यासाठी हा फार मोठा आणि मोलाचा खजिना होता.कारण रेडिओवर त्याच्या मर्जीने लागलेल्या गझला कधी-मधी ऐकणे आणि कँसेटवरून सतत ऐकणे यात खूप फरक आहे.आज इंटरनेटमुळे एका क्लिक वर हवे ते सापडते.तेव्हा मात्र एखादे आवडीचे गाणे ऐकायचे असेल तर दिवसभर रेडिओ कानाला लावून बसावे लागायचे.नशीब की त्या काळात छोटेखानी ट्रांझिस्टर रेडिओ उपलब्ध होते.हे सगळे सांगायचे कारण असे की,यातील मेहदी हसनच्या कँसेटमध्ये कधीकाळी पाकिस्थान रेडिओवरून ऐकलेली काळीज कापणारी आणि सुरावटीचा खूप विचार करायला लावणारी वरील गझल त्यात होती.आम्ही शिकलेलो मालकौंस वेगळा होता आणि हा मालकौंस काही वेगळाच भासत होता.मालकौंस मधील बहुतेक रचना षड्जापासून सुरू होतात.याला काही अपवाद असतीलही पण ठोकळमानाने हा परिपाठ आहे. परंतू या गझलची सुरवात मध्य सप्तकातील लोमल निषादापासून झाली आहे.पुढेपरखनेका या शब्दांसोबतचा स्वरगुच्छ आणिने या अक्षरावरील मध्यमाला घासून जाणारी सम....अरारारारा....................काळजाची चाळणच.....लाजवाब ! पुढेनतीजा निकलावरील तार षड्जापर्यंत जाऊन वापस षड्जावर येणारी सुरावट...माशाल्ला ! आपण ऐका....एक वेगळे स्वरशिल्प आपल्यासमोर येईल.


         
मुज़फ़्फ़र वारसी यांच्या या गझलमधील एक एक शेर जसा दमदार आहे.तसेच खाँ साहेबांचे सादरीकरणही कलदार आहे.अंतर्‍यामध्ये त्यांनी मुर्छना पद्धतीचा अतिशय सुंदर प्रयोग करून सोहनी या रागाचा आभास निर्माण केला आहे.त्या वेळीक्या बात है................’ असे आपसुकच तोंडातून निघुन जाते.वास्तविक पाहता मालकौंस आणि सोहनी या हे दोन्ही राग सगळ्याच बाबतीत परस्पर विरोधी आहेत.दोन्ही रागात एकही साम्यस्थळ नाही.तरी पण हे त्यांनी केले...अगदी बेमालुमपणे.तुम्ही कधी आम्रखंड खाल्ले आहे का ? बस...नेमके तसेच...आम्रखंड खातांना श्रीखंड खाण्याचा आनंद मिळतो.त्यात आमरसाची जी थोडी-थोडी वेगळी चव जिभेला जाणवत राहाते पण नकळत...तसलच काहीतरी हेप्रकरण आहे.ऐकल्यावर त्याची लज्जत आपणास कळेललच......ऐका तर..."क्या भला
..."


क्या भला मुझको परखने का नतीजा निकला
ज़ख्म--दिल आपकी नज़रों से भी गहरा निकला

तोडकर देख लिया आइना--दिल तूने
तेरी सूरत के सिवा और बत क्या निकला

जब कभी तुझ को पुकारा मेरी तनहाई ने
बू उडी फूलसे,तस्वीर से साया निकला

कोइ मिलता है तो अब अपना पता पूछता हूं
मैं तेरी खोज में तुझ से भी परे जा निकला

तिश्नगी जम गयी पत्थर की तरहा होटोपर
डूबकर भी तेरी दरिया से मैं प्यासा निकला


शायर - मुज़फ़्फ़र वारसी
आवाज़ - मेहदी हसन





संगीत आणि साहित्य :