Wednesday, August 5, 2026
माझी शब्द-स्वरसंपदा (भाग १)
. #जगत_मी_आलो_असा
(लेखांक ४०)
. #माझी_शब्द_स्वरसंपदा
आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख), ’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा' व 'काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह)
अशी चार पुस्तके,तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), 'अर्चना’ भक्तिगीते (टी सिरीज)', 'खूप मजा करू’ बालगीते (फाऊंटॆन म्युझिक कं), ’ काट्यांची मखमल’ मराठी गझल (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’ तुझ्यासाठीच मी...’ मराठी गझल ( युनिव्हर्सल म्युझिक कं), काट्यास फूल आले','रे मना!' ह्या कॅसेट्स सीडीज सोबतच खाली दिलेली शेकडो गीते-गझला spotify, gana.com, youtube युट्युब,स्पॉटिफाय व इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.
मी स्वरबद्ध केलेला हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत असून. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,
अनुराधा मराठे, वैशाली माडे, वैशाली सामंत,पद्मा सुरेश वाडकर,नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन,अनन्या सुरेश वाडकर, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, कल्पिता उपासनी,डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.
यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा
बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,
जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,
रविप्रकाश चापके,ज्योती बालिगा,किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी, संदीप गावंडे,धुमाळ पिता-पुत्र,राज यावलीकर,
रामदास चवरे व दस्तुरखुद्द माझा समावेश आहे.
तसेच उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज,हनीफ सागर,कलीम खान,दिलीप पांढरपट्टे,समीर चव्हाण,सहदेव रामटेके या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत.
. ■ युट्यूबवरर उपलब्ध असलेल्या रचना
■ मराठी गझल
१.कुठलेच फूल आता -सुरेश भट
२.दिवस है जाती कसे - "
३.झिंगतो मी कळेना- "
४.जगत मी आलो असा की- "
५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"
६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "
७.हे तुझे अशा वेळी लाजणे- "
८.ही न मंजूर वाटचाल- "
९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"
१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत
११.दुःख माझे देव झाले- "
१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे
१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा- "
१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा- "
१५.गाऊ नये कुणीही- "
१६.घाव ओला जरासा होता- "
१७.हसू उमटले दुःख भोगता- "
१८.कळेना कसा हा जगावेगळा- "
१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो- "
२०.तराणे- "
२१.येता येता गेला पाऊस- "
२२.किती सावरावे- "
२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार
२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी
२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे
२६.मी करू सारखा विचार किती- "
२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने
२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर
२९.पियानो-उ.रा.गिरी
३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख
३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर
३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट
३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे
३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण
३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे
३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे
३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण
३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे
३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत
४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु
४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे
४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार
४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत
४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट
४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके
४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट
४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट
४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर
४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण
५०.जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे
५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट
५२.भास आभासावरी मन-रविप्रकाश चापके
५३.जळलो धुपापरी मी- "
५४.जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे- "
५५.मला आठवे ना तुला भेटल्याचे- "
५६.प्रतिक्षा प्रार्थना झाली- "
५७.माझी गझल गुलाबो- "
५८.असे पत्र आता तुला मी लिहावे- "
५९काट्यास फूल आले-रविप्रकाश चापके
६०.जीवना सांभाळतो मी-सुधाकर कदम
६१.आसवांनी मी मला-सुरेश भट
६२.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट
६३. शेवटी हे दुःख माझे-ज्योती बालिगा
६५. मज सांग आज तुझ्याकडे-ज्योती बालिगा
६६. जेव्हा मला कळे ना-संदीप गावंडे
६७. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे
६७. शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे-चंदना सोमाणी
६८. वेदनेचा सूर देउन काळजाला-सुधाकर कदम
६९. हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे- "
७०. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले- "
७१. विसरून वेदनांना मज गायचेच आहे- "
७२. ये न ये असे कधी चांदणे पुन्हा पुन्हा-ज्योती बालिगा
७३. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा-राज यावलीकर
७४. काही न बोलण्याची राखून रीत आले-ज्योती बालिगा
७५. जे जे घडावयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम
७६. काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम
७७. बावरे होउन कुणाला शोधती डोळे-बबन धुमाळ
७८. जसा हात हातात धरला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ
७९. स्मरायचे तुला किती-विजयालक्ष्मी वानखेडे
८०. इथेही तिथेही तुझा भास होतो- "
८१.भीमाच्या गजाली- "
८२. किती रुंजी तरी तिथल्या तिथे घालत रहावे-समीर चव्हाण
८३.अवखळ मन हे ऐकत नाही- सुधाकर कदम
८४. दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे
८५.या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट
८६. हा असा चंद्र अशी रात- "
८७.संपली अजुनी कुठे ही रात सजणा- अनिल कांबळे
८८.एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-
८९. मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती बालिग
९०.उदंड ओसंडुनी कधी वावरता आले- शिवाजी जवरे
९१.रात गेली निघून पाऱ्याची- सुरेश भट
क्रमशः
●मराठी गीते व उर्दू गझल पुढील अंकी...
---------------------------------------------------------------------
दैनिक विदर्भ मतदार,अमरावयी.रविवार दि.१ ऑगष्ट २०२६
सुधाकरी तोडी
तर,अशा या सुरावटीतील ही गझल संपूर्ण गायकी अंगाने गायक मयूर महाजन यांनी गायिली आहे.तरी आनंद घ्यावा, ही विनंती. (चांगले तुमचे,वांगले आमचे.)
सारंगी - उस्ताद लियाकतअली खान
#ustad_liyakat_ali_khan
तबला - पांडुरंग पवार #pandurang_pawar
बासरी - संदीप कुलकर्णी #sandip_kulkarni
संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milind_gune
ध्वनीमुद्रण - 'डॉट वेव्ह' स्टुडिओ,पुणे.
मास्टरिंग - मुकुंद फडकुले,एल्कॉम स्टुडिओ,पुणे.
#mukund_phadkule
●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!
●Headphone please
Thursday, July 30, 2026
रे मना !
रे मना! तुज काय झाले सांग ना
का असा छळतो जिवाला सांग ना
हारण्याचीही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना
हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवाळतो तू सांग ना
सूर लावुन गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना
●●●
मुंबईच्या डॉ.राम पंडितांसारख्या अनेक विद्वान व रसिक मित्रांनी माझ्या कविता स्वतः स्वरबद्ध करण्याविषयी आग्रह केल्यामुळे अनेक वर्षांनंतर #रे_मना! हा अल्बम तयार झाला.यातील गीत-गझलांना विविध वाद्यांच्या सहाय्याने साजेसे संगीत नियोजन मिलिंद गुणे यांनी केले.यातच मिलिंदच्या आग्रहावरून ग्रूप व्हायोलिन्सचा प्रथमच प्रयोग केला.हा अल्बम युट्युब, स्पॉटिफाय सारख्या जगातील सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून, त्याला हजारो रसिकांनी आपली पसंती दिली आहे. .त्यातीलच मयुर महाजनने गायिलेले 'रे मना!' हे अतिशय सुंदर असे शीर्षक गीत सादर करीत आहे.या रचनेचा बेस तसा 'बिलासखानी तोडी' हा राग आहे.पण सुगम संगीतामध्ये गीताला अधिक आकर्षक करण्या करीता वेगवेगळ्या सुरावटींचा प्रयोग करून त्याचा गोडवा वाढविल्या जातो.तसेच काहीसे यात केल्या गेले आहे.मुळात ही बंदिश अनेक वर्षांच्या चिंतनानंतर आलेली असल्यामुळे 'दिल को सुकून देनेवाली है' असे मला वाटते..यातील अभिषेक बोरकर यांचे सरोद तर अफलातूनच आहे.आपण ऐका व आनंद घ्या! आवडल्यास प्रतिक्रिया द्या!
Wednesday, July 29, 2026
इतना मुझे चाहा करो ना...उर्दू ग़ज़ल
जनसंमोहिनी राग पर आधारित यह उर्दू ग़ज़ल आपको ज़रूर पसंद आएगी। इस बंदिशी की विशेषता है छंदों में उच्च स्वरों का प्रयोग। इसे सुनिए...
इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही
मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही
अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ
शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही
चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो
मंज़िल सबब रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही
मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'
दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही
●●●
कलावती और जनसंमोहिनी रागों के बारे में संक्षिप्त जानकारी।
कलावती और जनसंमोहिनी राग इतने मिलते-जुलते हैं कि आम आदमी के लिए इनमें अंतर करना मुश्किल है! दोनों राग बहुत मधुर हैं। ये दोनों राग दक्षिण भारतीय संगीत प्रणाली (कर्नाटक संगीत) से हैं। अपनी मधुरता के कारण ही ये उत्तर भारतीय संगीत प्रणाली में भी लोकप्रिय हुए। इनका थाट खमाज है और निषाद को छोड़कर बाकी सभी स्वर शुद्ध हैं। कलावती राग में ऋषभ नहीं होता। कलावती राग में ऋषभ का प्रयोग करने पर जनसंमोहिनी राग बनता है। इसमें ऋषभ का प्रयोग कल्याण अंग के साथ किया जाता है। जनसंमोहिनी राग का मूल नाम 'शिव कल्याण' भी कहा जाता है।
'कोई सागर दिल को बहलाता नहीं' - यह गाना फिल्म 'दिल दिया दर्द लिया' से है, जिसने मेरे ऑर्केस्ट्रा में रहने के दौरान अपार लोकप्रियता हासिल की। मैं इसे अपने घर के संगीत कार्यक्रमों में गाया करता था। अगर मेरे सामने युवा लड़कियां होतीं, तो मैं इसे बड़े जोश से गाता था। तभी मुझे बुनियादी जानकारी मिली कि यह गाना कलावती राग में है। मुझे बहुत बाद में पता चला कि इस में जनसंमोहिनी राग भी है। इसके बाद, फिल्म 'मुंबईचा जवाई' से रामदास कामत द्वारा गाया गया गाना 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' हम (उस समय के) युवाओं को दीवाना बना दिया था। कई वर्षों तक, मैं इन दोनों गानों को घर के संगीत कार्यक्रमों में गाता रहा। लेकिन कलावती का असली अर्थ प्रभा अत्रे की 'तन मन धन तो पे वारू' इस बंदिश से। एकताल राग की यह रचना बारहवें छंद से शुरू होती है। सम के ऊपर का 'न' श्रोता को मंत्रमुग्ध कर देता है।उपरोक्त रचना श्रोता को मंत्रमुग्ध कर देती है। उनकी गायन शैली और गीतों से निकलने वाली मधुरता बेहद आकर्षक है। आज भी यह गीत युवा लगता है। इसके अलावा, डॉ. वसंतराव देशपांडे द्वारा गायी गई झपतालकी बंदिश 'ये हो कहे' भी मेरी पसंदीदा थी, क्योंकि यह बहुत ही सुरीली थी।
Monday, July 27, 2026
वेदनेचा सूर...
पंडित जसराजजींनी गायिलेल्या राग 'बागेश्री कानडा'
रागावर आधारित गझल...
वेदनेचा सूर देउन काळजाला
लाविले आयुष्य मी माझे पणाला
गात जातो गोडवे जो तो स्वतःचे
झेलले ज्याने कधी ना वादळाला
न्याय,नीती,रीत आता वेगळी रे
नेमका अंदाज ना ये आपणाला
का दुरावा आपल्या दोघात आला
काय द्यावी करणे या कारणाला
माझिया ओठास जेव्हा स्पर्श केला
पौर्णिमेचे चांदणे आले उशाला
गायक - मयूर महाजन
शब्द आणि संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम
संगीत संयोजन - मिलिंद गुणे
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.




