गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, August 8, 2021

गझलगंधर्व - मयूर महाजन



    संगीताचा ध्यास बाळगणारे अनेक कलाकार संगीत जगताला लाभले आहेत.त्यापैकी एक उल्लेखनीय नाव म्हणजे मराठी गझल गायक व संगीतकार सुधाकर कदम होय.मराठीतील आद्य गझलकार म्हणून जसे सुरेश भटांचे नाव येते, तसेच मराठीतील आद्य गझल गायक म्हणून सुधाकरजींचे नाव येते. फक्त गझलच नाही तर शास्त्रीय गायन, सरोद वादन, मेंडोलिन वादन, सुगम संगीत गायन या सोबतच स्वररचनाकार व संगीतकार म्हणूनही त्यांनी अतिशय मोलाचे कार्य संगीत क्षेत्रात केले आहे. त्यांच्या स्वररचनांमधून ज्या वेगवेगळ्या सुरावटी रसिकांसमोर आल्या त्यावरून त्यांचे या क्षेत्रातील कौशल्य व शास्त्रीय संगीताचा गहिरा अभ्यास स्पष्टपणे दिसून येतो.
     शास्त्रीय संगीत हे मुख्यत्वे स्वरप्रधान संगीत आहे.भावगीत वा गझल  गाताना त्यातील शब्दप्रधानता प्रकर्षाने जाणवते.त्यातल्या त्यात गझलगायन प्रकारामध्ये संगीत, काव्य व लयकारी याचा समसमा आनंद घेता येतो. याबाबतीत पं. रामकृष्णबुवा वझे म्हणतात...'गझल गायकीला आपले असे स्वत:चे  एक आगळे वेगळे अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असले आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझलगायनातून ख्यालगायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभरीत्या रसिकांपर्यंत पोहचू शकते.'
     सुधाकर कदमांच्या  बाबतीत ज्येष्ठ भावगीत गायक स्व.गजानन वाटवे यांनी काढलेले 'मला भावलेला मराठी गझल गायक' (त्यांच्या रोजनिशीत नमूद करून ठेवलेले) उद्गार सार्थ ठरतात.याचे कारण त्यांच्या स्वर-रचनांना  असलेली शास्त्रीय संगीताची पक्की बैठक आणि काव्यानुरूप स्वररचना हे होय.खरे तर सुगम संगीत हे नावालाच सुगम असते, प्रत्यक्षात ते सुगम नसते.सुधाकर कदमांच्या मी ऐकलेल्या रचना या प्रकारातीलच आहेत.पं.शौनक अभिषेकी व अनुराधा मराठे यांनी गायिलेल्या 'अर्चना' या अल्बममधील रचनांचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला तेव्हा निवेदिकेने या दोघांना सुधाकरजींच्या स्वर-रचनांबद्दल विचारले असता ते म्हणाले, 'रचना ऐकायला सोप्या पण गायला कठीण .' यावरून त्यांची संगीतकार म्हणून एक वेगळी हुकमत दिसून येते.
     एकदा आम्ही सहज बसलो असता त्यांनी ११ मात्रेच्या (सवारी) तालात स्वरबद्ध केलेली मराठी गझल ऐकवली. माझ्या माहितीप्रमाणे मराठी व हिंदी सुगम संगीताच्या क्षेत्रातील ही पहिलीच रचना असावी.नेहमीप्रमाणे केरावा, दादरा, रूपक, व्यतिरिक्त चाचर-सवारीसारख्या तालाचा सुगम संगीताकरीता वापर करून मूळ बोलाव्यतिरिक्त तेवढ्याच मात्रात विविध बोल बसवून रचनेला उठाव देणे, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.
     संगीतकाराला काव्याचेही सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.सुरेश भटांच्या दीर्घ सहवासामुळे त्यांचा हा अभ्यासही मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शब्दातील भाव सुरावटीतून व्यक्त करण्याची हातोटी त्यांना साध्य झाली आहे. 

     'जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ' 

     ही गझल त्यांनी मारवा या रागात स्वरबद्ध केली आहे. पण 'एकदा तुटलो असा कि मग पुन्हा जुळलोच नाही' या दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दासाठी मारव्यात नसलेला कोमल मध्यम व 'जुळलोच' या शब्दाकरिता केलेला कोमल धैवताचा प्रयोग अतिशय समर्पक असल्यामुळे 'दाद लेवा बन गया !' गझलगायकीचे हेच वैशिष्ठ्य असावे.काव्य जसे आपला आशय घेऊन चालते तशीच स्वररचनाही  त्या आशयाला अधिक स्पष्ट करत चालते. 'साईन लाईन व क्रॉस लाईनचा संबंध प्रत्येक कडव्याशी सतत येत असतो. हा संबंध सांगीतिकदृष्ट्याही टिकविणे ही संगीतकाराची फार मोठी जबाबदारी असते.असा सुसंवाद त्यांच्या अनेक रचनातून जाणवतो.

      'दिवस हे जाती कसे अन ऋतू असे छळतात का ?'

     या गझलमध्ये मुखडा षड्ज व त्याभोवती ठेवलाय तर पुढची ओळ मध्यम व त्याच्या आसपासच्या स्वरांभोवती फिरते.त्यामुळे या दोन्ही ओळी संपतात तेव्हा या दोन्ही ओळींना सांगीतिक पूर्णत्व आलेले असते. या गझलेकरिता त्यांनी भीमपलासी , मधुकौंस या रागांचे मिश्रण केले आहे, पण आशयाशी सुसंगतच. काव्यातील भावार्थानुसार बदलत जाणारी स्वररचना हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य...

     'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही.'

     'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा.'

     'घाव ओला जरासा होता.'

      'शक्ती दे तू आज मजला .'

      'हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही.'

     अशा अनेक रचना भूपाली, बिहाग, भीमपलासी, यमन, कौशीकानडा, मालकौंस, भूपेश्वरी, मारवा, भैरवी, पहाडी, (त्यांचा स्वत:चा) 'मध्यमी' वगैरे रागांचा उपयोग करून त्यांनी स्वरसाज चढविला आहे.
     मराठी भाषेचे व साहित्याचे सखोल ज्ञान त्यांना आहेच, पण त्याचबरोबर उर्दूचाही अभ्यास करून उर्दू गझलाही त्यांनी तेवढ्याच ताकदीने स्वरबद्ध केल्या आहेत.हे त्यांनी हाथरसच्या (उत्तर प्रदेश)  'संगीत' मासिकामधील 'नग़्म-ए-ग़ज़ल' या सदराकरीता केलेल्या स्वरलिपीवरून व वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतल्याने कळून येते.
     त्यांनी स्वरबद्ध केलेले व सुरेश वाडकर,अनुराधा मराठे, पं.शौनक अभिषेकी, वैशाली माडे अशा अनेक गायक-गायिकांनी गायिलेले 'भरारी', 'खूप मजा करू', 'अर्चना', 'काट्यांची मखमल', 'तुझ्यासाठीच मी...' इत्यादी अल्बम रसिकप्रिय झाले आहेत.ते स्वत: कवी, लेखक आहेत. अशा बहुआयामी कलावंताला दीर्घआयुरारोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून संपवतो.

*डॉ.#श्रीकृष्ण_राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' २०१८ मधून ...


 

 

Thursday, July 15, 2021

नवोदित मराठी गझल गायकांचें अभिनंदन व शुभेच्छा...

 २०१७ मध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालेल्या जागतिक मराठी गझल संमेलनाच्या एका सत्रात,मराठीमध्ये ज्या प्रमाणात गझल लिहिणारे तयार झाले त्या प्रमाणात गायक/गायिका तयार झाल्या नाहीत,अशी खंत मी व्यक्त केली होती.परंतू गेल्या चार वर्षात पुढे आलेल्या मराठी गझल गायकांची संख्या पाहून आनंदाने ऊर भरून आला.याचसाठी माझा अट्टाहास होता. मी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत चालला ही मराठी गझलसाठी व माझ्यासाठीही खूप आनंदाची बाब आहे.सर्व नवोदित मराठी गझल गायक/गायिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीकरिता  खूप खूप शुभेच्छा...

Tuesday, July 13, 2021


 

एक शम्मा जिगर में ही जलती रही...श्रद्धा पराते


     नागपुर के धनवटे रंगमंदिर में १५ जून की शाम मराठी ग़ज़ल के नाम संपन्न हो गयी। गायक थे,यवतमाल जिला आर्णी के श्री सुधाकर कदम। नगर के कलाप्रेमी रसिकों के लिए मराठी ग़ज़ल गायन का तीन घंटे का कार्यक्रम प्रथम प्रयोग था जिसे अपूर्व प्रतिसाद मिला।तालियों से हॉल निरंतर गुंजता रहा।वैसे अनुभव यह है कि मराठी श्रोता दाद देने में निहायत कंजूस है,किंतू इस प्रोग्राम में विदर्भ के मराठी कवियों की रचनाओं को और श्री सुधाकर कदम की गायकी के अंदाज को समय समर पर दाद मिली।उर्दू-हिंदी ग़ज़ल की महफिल आम बात है।शब्द चाहे ना समझे वह श्रोता के दिल में उतर ही जाते है और आप की वाह निकल पडती है।ग़ज़ल की मूल प्रकृति को दुसरी भाषाओं में ढालना बहुत कठीन काम है।
फिर भी अन्य भाषाओं में भी ग़ज़ल सफलतापूर्वक लिखी जा रही है।मराठी ग़ज़ल अभी भी ग़ज़ल की आत्मा को पकड नहीं पाई,किंतू मराठी कवि निरंतर प्रयासरत है।उनकी लेखनी से ग़ज़ल उतर रही है। गायक के गलेसे होकर जबतक ग़ज़ल लोगों के दिल में उतर नहीं जाती,तब तक के निर्माण का उद्देश सफल नहीं हो पाता।
     मराठी ग़ज़ल गाने के इस कठीन व्रत को चुनौती के साथ स्वीकारा है,श्री सुधाकर ने...उनका अपना अलग अंदाज़ है। मराठी रचना के मराठीपन को क्षति न पहुंचाते हुए,बडी ही सुहानी तर्जो में वे रचना को कुशलतापूर्वक बांधते है। कवि की कविता का मूल स्वर पकड पाना उनका अपना सामर्थ्य है।उनकी स्वरधारा रसिकों का मन मोहने का सामर्थ्य रखती है।धनवटे रंगमंदिर में यह उनका प्रथम कार्यक्रम जरूर है किंतु इससे पूर्व अनेक बार नागपुर के विविध भागों में महफिलें हो चुकी है। पश्चिम महाराष्ट्र के कलाप्रेमीयों ने इन्हे बेहद पसंद किया है।पुणे की मराठी साहित्य परिषद ने श्री सुधाकर को बडे सम्मन के साथ सराहा है। कोल्हापूर नगर के कलाप्रेमी रसिकों का सम्मान श्री सुधाकर अनेक बार पा चुके है। रसिकों का यह प्यार ही उन्हे गाने की अपनी मस्ती बरकरार रखने की ताकद बख्शता है।
    इसी संदर्भ में मराठी के विख्यात कवि श्री नारायण कुलकर्णी कवठेकर कहते है...
’मस्तीत गीत गा रे,
देतील साथ सारे’
रसिक साथ देंगे,भविष्य साथ देगा,इस विश्वास से श्री सुधाकर गाये जा रहे है। विदर्भ के एक लोकप्रिय मराठी कवि श्रीकृष्ण राऊत जीवन का अध्यात्म बडे सरल शब्दों मे बताते है...
’दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना,
आरती जी गात आहे तीच माझी वेदना’
   उन्होने जीवन में आनेवाले दुःखों को ईश्वर का दर्जा दे दिया और वेदना को आरती की संज्ञा...शब्द जो कवि की लेखनी और गायक के गले से उतरते हैं वेप्रार्थना हो गये।
    और शृंगार के क्या कहने,तरल मुलायम शृंगार को शब्दांकित करने की कला में कविवर्य श्री सुरेश भट की कोई सानी नहीं। वे कहते है... 
’ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची...’

’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’
और कहते है...
’पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली’
इसी शृंगार का निर्वाह करते हुये पुणे के श्री अनिल कांबले कहते है...
’जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐन वेळी अशी काय करतेस तू’
   मराठी के एक बुजुर्ग कवि श्री उ.रा.गिरी ने एकाकीपन के तीव्र एहसास  को बडी संजीदगी से शब्दों में ढाला है...
’या एकलेपणाचा छेडीत मी पियानो
ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरांनो
तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
माझ्यासवे तुम्ही ही कां जागता कळ्यांनो’
    निद्रा अनाथ कहने का कवि का यह अंदाज निराला है। इस रचना को श्री सुधाकर ने बडी गंभीर,गहन और दिल छू लेनेवाली तर्ज में ढाला है।’हरवलेली’ शब्द पर स्वरलहरी की जो करामात वे दिखाते है,वह खॊ जाने के भाव को मूर्त रूप समक्ष खडा करती है।रसिक स्वर की इस अदाकारी में खो जाता है।
    संगीत का क्षेत्र ही ऐसा है,जहां गायक निरंतर विद्यार्थी बना रहता है।श्री सुधाकर कदम स्वयं को हमेशा के लिये विद्यार्थी मानते है।संगीत के क्षेत्र में श्री सुधाकर की साधना करीबन बीस वर्ष से कम नहीं है। वे स्वयं संगीतकार है स्वयं गायक है।उनकी दमदार आवाज किसी भी प्रभाव व नाटकीयता आवेश से मुक्त है।सच्चे कलाकार को जीवन में कितनी भी सफलता मिले,कितना भी वैभव प्राप्त हो जाये,उसके हृदय में एक चिरंतन उदासी का,एक चिरंतन सी अनबूझ प्यास का साम्राज्य होता है,इसी को उद्देशकर वो कहते है...
”सभी कुछ मिला ज़िंदगी से मगर
एक शम्मा जिगर में ही जलती रही’
हां !!! वे उर्दू-हिंदी ग़ज़ल गाने के भी अभ्यास में व्यस्त है।इसी प्यास के दर्द की शमा के प्रकाश में वे अपना मार्गक्रमण करते चले जायेंगे,ऐसा उनका विश्वास है।कलाकार की प्रकृति में निर्मोहीपन होना उसके वह होने का प्रमाण होता है।इसी से वे कहते है...
’अपनी तबीयत ही फकीराना है
वैसे जीने को हर बहाना है
पत्ते पत्ते पे है कफस का गुमान
कौन सी शाख आशियाना है’
   सुधाकर की तबियत का फकीरानापन और सतत की खॊज ही उन्हे प्रगति के मार्ग पर निरंतर प्रेरणादायी होगी।विदर्भ के एक कोने में आर्णी जैसे गांव में जहां साधनो का अभाव हो सकता है,ऐसे स्थान में वे निरंतर साधनारत हैं यही इसका प्रमाण है।

दै.नवभारत,दि.६ जुलै १९८४

●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित,#अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ  #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...



 

 





संगीत आणि साहित्य :