महाराष्ट्रात विविध बोली भाषा बोलल्या जातत.या विविध बोलीभाषेतूनच प्रमाण भाषा निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रमाण भाषेच्या अत्याभिमानी (दुराभिमानी) लोकांनी बोली भाषेचे आभार मानायला हवे.'पानी' या शब्दावरून हिणवणाऱ्या विद्वानांना विदर्भ हा मध्यप्रदेशात होता.त्यामुळे तेथील बोलीभाषेत पाण्याला हिंदी प्रमाणे पानी उच्चारल्या गेले.अजूनही बरेच ग्रामीण लोक असाच उच्चार करतात.ही त्यांची चूक नाही.विदर्भातीलच झाडीपट्टीच्या भागात अजूनही'ज' चा उच्चार 'ज्य' असाच करतात.अकोल्याकडे 'ळ' चा उच्चार 'ड' सदृश्य होतो.बहिणाबाईंचे काव्य प्रमाण भाषेत नाही म्हणून ते टाकावू ठरते काय?महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्यांच्या भक्तीगीतांमधून बोलीभाषेतील अनेक शब्द वापरले आहेत.लीळाचरित्र,ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वऱ्हाडी शब्द आले आहेत.मग लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीकडे पण तुच्छतेने बघाल काय?महाराष्ट्रातील बोली भाषेची अशी शेकडो उदाहरणे देता येईल.असो!
"अति शहाणा त्याचा बैल रिकामा" ही म्हण उगाच पडली नसावी.



No comments:
Post a Comment