गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, February 4, 2012

"अल्लाह करे हम ना कभी होश में आये"



         आपल्या महाराष्ट्रात कलाकारांच्य़ा अनेक खाणी आहेत.परंतू त्या खाणीतील काही हिरे सगळ्य़ांना माहीत होतात.ज्यांना ’गॉडफादरमिळत नाही,मिडिया जवळ करीत नाही किंवा स्वाभिमानी वृत्तीमुळे अलिप्त आहतात. असे हिरे मात्र खाणीतून बाहेर निघून,पै.लू पडूनही दुर्लक्षीत राहतात.          आज अशाच एका हिर्‍याची माहिती आपणास देत आहे.तो हिरा एक अपंग स्त्री आहे.
हसत-खेळत बालपण घालविताना अचानक नियतीने पायातील बळच काढून घेऊन तिच्या काखेत कुबड्या दिल्या.तिच्या बालमनावर काय परिणाम झाला असेल ? याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण ती हरली नाही.जसे जमेल तसे शालेय शिक्षण व गायनाचे धडे घॆत आपली संगीत कला विकसीत करून कोल्हापुर वासियांची करवीर कोकीळाबनली.
          कुबड्यांमध्ये देह सावरत आपल्या संगीताराधने सोबतच इतरांनाही गायन कला मिळावी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागात मानद कलाकार म्हणून मार्गदर्शनही केले.१९८२ मध्ये माझा कोल्हापुरातील पहिला कार्यक्रम रोटरी क्लबने तिकीट लावून राजर्षी शाहु महराज सभागृहात आयोजित केला होता.त्यातील रसिकांमध्ये तीसुद्धा होती.गझलची शौकीन,
स्वतः सुंदर गात असून दिलखुलास दाद देणारी...(असे चित्र आजकाल बघायला मिळत नाही.एका क्षेत्रातील आणि तेही संगीत क्षेत्रातील दोन व्यक्ती एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या पलिकडे काहीच करीत नाही.असो...’कालाय तस्मै नमः’) कार्यक्रमानंतर ती मला आवर्जून भेटली.त्यानंतर आमच्या भेटी,मैफली सुरू झाल्या.जुळून आलेले बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट झाले.ते आजही तसेच आहे.हळू-हळू तिने स्वतःला नसीमा हुरजुकसोबत अपंग संस्थेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.
         तिच्या ऐन भराच्या काळात चित्रपटात गायिली,प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे कार्यक्रमही करीत गेली.
श्रीकांत ठाकरेंसारख्या संगीतकाराच्या दिग्दर्शनाखाली गायिली.सुरेल,गोड आवाज,सुंदर गाणॆ,उत्कृष्ट मार्गदर्शन याचे भरवशावर बरेच काही करण्याचा प्रयत्न करीत गेली.या सुरेल प्रयत्नांची दखल मुंबई दूरदर्शनने घ्यावी यासाठी "शब्दांच्या पलिकडले" या तेव्हाच्या लोकप्रिय कार्यक्रमात वर्णी लागावी म्हणून खूप प्रयत्न केले.निर्मिती प्रमुखाला ऐकविण्याकरीता म्हणून खास स्टुडिओमध्य्रे ध्वनिमुद्रण करून गाणी पाठविली परंतू शासकीय पैशाने,ज्यांना प्रसिद्धीची गरज नाही अशा मोठ-मोठ्या कलाकारांना बोलावून आपली टिमकी मिरविणार्‍या दूरदर्शनने, अशा अनेक चांगल्या होतकरु कलाकारांना दूरदर्शनच्या पलिकडेच ठेवले.हा माझाही अनुभव आहे.
            "शब्दांच्या पलिकडे" सोबतच आता-आताचा ’M2G2’ चा अनुभव तसाच आहे.या कार्यक्रमात मला सहभागी करून घ्यावे म्हणून माझ्या मुलीने (भैरवी) मला न सांगता माझी संपुर्ण माहीती,पुस्तके,टी सिरिज ने काढलेला पं.शौनक अभिषेकी व अनुराधा मराठे यांच्या आवाजातील मी संगीतबद्ध केलेला अर्चनाहा भक्तिगीतांचा अल्बम वगैर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडे २००६ मध्ये पाठविला.मधुन-मधुन ती दूरध्वनीवरूनही चौकशी करीत होती.हे तिने मला २०१० मध्ये सांगितले.आजतागायत मला निमंत्रण मिळाले नाही.मधल्या काळात आमचे एक "हास्यसम्राट" मित्र येथे कार्यक्रमानिमित्त आले असता दूरदर्शनच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तिथल्या नंदीची’ (मध्यस्थाची) सर्वप्रथम पूजा करावी लागतेअसे वक्तव्य केले.हे मला जमणे नव्हते .....
          सांगायचे तात्पर्य असे, की तुमच्याकडील कलेपेक्षा तुमच्याकडील पदाचे,पैशाचे किंवा राजकीय बल किती आहे यावर आपली किम्मत ठरते.अर्थात यालाही काही अपवाद निश्चितच आहेत.या अपवादांमुळेच आज हयात नसलेल्या अनेक कलाकारांना आपण दूरदर्शनवर बघू शकतो.पण ही फक्त चंदेरी किनार आहे,बाकी सारा काळाकुट्ट अंधार असल्याचे खालील गझल ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल.
          तर ही अशी गुणी गायिका कोण ? हा प्रश्न आपणास पडला असेल...तर ती आहे करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे...! तिच्या आवाजात ऐका नूहनाज़िर यांची दिनकर पोवार यांनी स्वरबद्ध केलेली उर्दू गझल...
"अल्लाह करे हम ना कभी होश में आये"
         या गझलच्या बंदिशीत बागेश्री आणि गोरखकल्याण या रागांचा सुंदर उपयोग संगीतकाराने केला आहे.मुळात गोरखकल्याण म्हणजे एक गोरखधंदाच आहे. यात कल्याण कुठेच दिसत नाही.तरी पण नाव गोरख कल्याण ! असो...या गझलमध्ये कोठे गोरख ,तर कोठे बागेश्री असा आभास निर्माण करत ही गझल आपल्या समोर येते.त्यात कोमल धैवतासारख्या विवादी स्वरांचाही अतिशय सुंदर
उपयोग दिनकर पोवारांनी बंदिश करताना केला आहे.ही गझल ऐकतांना मला सतत आशबाईंचा भास होत होता.त्या काळात जर मला संगीतकार म्हणून काम मिळाले असते तर मी रजनीकडून निश्चितच गाऊन घेतले असते...

Friday, January 27, 2012

’वो जो हममे तुममे करार था...’



         गझलसह कोणत्याही काव्याचे माध्यम शब्द,छंद,वृत्त,अलंकार वगैरे वगैरे आहे असे मानल्या जाते.या माध्यमांची विशेषता ही आहे,की यांना कोणताही बाह्याआधार नाही.हे सगळे आपल्या आतउसळत असतात.दुसरी विशेषता ही आहे,की या द्वारे उत्तम भावाभिव्यक्ती होऊ शकते.भाव हा एक शब्द असा आहे की जो विचार,वेदना (Feeiling) आणि अभिवृत्ती (Attitude) याचा द्योतक आहे.तिसरी विशेषता म्हणजे यातून सुक्ष्म भाव सुद्धा व्यक्त करता येतात.चौथी विशेषता ही आहे, की यात संदिग्धता आणि अस्पष्टता फारच कमी असते.तरी पण अंतर्मनातील भाव या माध्यमातून पूर्ण रुपाने व्यक्त होत नाही,असे माझे मत आहे.
           आता आपण संगीताचा विचार करु...संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे काकु’.काकु हा शब्द केधातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात.
           एवढी मोठी प्रस्तावना करण्याचं कारण आजची आपली मोमिन खाँ मोमिन यांची वो जो हममे तुममे करार था...’ ही गझल आहे.ही गझल बेगम अख्तर,मेहदी हसन,फ़रीदा खानम,ग़ुलामली,मधुरानी,चित्रासिंग,पंकज उधास,अहमद-महमद हुसैन,पिनाज़ मसानी,शफ़ाक़तअली खान,आबेदा परवीन पासून तर आताच्या जोजो मुखर्जी पर्यंत सगळ्यांनी ही गझल गायिली आहे.इतक्या मोठ्या प्रमाणावर गायिल्या जाण्याचं भाग्य दुसर्‌या कोणत्या गझलला मिळालं असेल असं मला वाटत नाही.(या गझलचे पॉप’ (की पाप ?) ही शज़ाद रॉयने केले आहे.)वरील सर्व गायक-गायिका आपापल्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहेत.त्यांचे विचार,सादरीकरण,सुरावट वगैरे वगैरे त्यांच्या परीने उत्कृष्टच आहे,यात काहीच वाद नाही.तरी पण काकुचा विचार केला असता मला मधुरानीने गायिलेली ही गझल जास्ती भावली आहे. ही बंदिश तोडीरागात आहे.या अगोदर आपण मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम...’ ही जगजित-चित्रासिंग यांनी गायिलेली गझल ऐकलेली आहे.ती सुद्धा तोडी रागातच होती,त्यामुळे मी रागाच्या तपशिलात शिरत नाही.
           मधुरानीच्या आवाजात,गायनात आणि सादरीकरणात एक वेगळेपणा आहे.तो ऐकणार्‌यालासहजपणे आपलंसं करून घेतो.शब्द-स्वरांशी लडीवाळ खेळ करण्याची त्यांची पद्धत किंवा शैली म्हणा,आपल्यालाही तोलडीवाळपणा जाणवेल अशा प्रकाररे लाडावतनेतो.असे शब्द-स्वरांचे लाड करत-करत कुरवाळत गाणे फार कमी गायकांना जमते.खालील गझल ऐकतांना आपणास हे निश्चितच जाणवेल.गझलची सुरवातच अतिशय आर्जवपूर्वक लाडिकपणे होते.त्यातील मंद्र सप्तकातील निषादस्पष्टपणे दाखवून,दुसरी ओळ अलवारपणे आपल्या समोर येते...तेव्हा ऐकतच राहावेसे वाटते...तसेच प्रत्येक शेरातील पंचमस्वर सुद्धा आपण कोणीतरी खास पाहुणे असल्याच्या थाटात येऊन,आपले अस्तित्व प्रकर्षाने दाखवून देतो. संगीतकार आणि गायिका म्हणून मधुरानीला खरोखरच महान मानावे लागेल,असे मला वाटते...
           या गझलचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे सर्व गायकांनी तिला ’रूपकया सात मात्राच्या तालामध्ये बांधले आहे.याचा अर्थ असा की दुसर्‌या तालात तिची बांधणीच होऊ शकत नाही,असे यातून सूचित होते.आणि कोणी बांधण्याचा प्रयत्न केला तर रसभंग होण्याची शक्यता जास्ती आहे.इतर अनेक गझला प्रत्येक गायकाने आपापल्या वकूबाप्रमाणे वेगवेगळ्या तालात बांधून सादर केल्या,परंतू ही गझल सगळ्यांना अपवाद ठरली आहे.
मधुरानी नंतर मला आवडलेली गायिका आहे ’नैय्यरा नूर’....तिचे सादगीभरेसादरीकरण काळजाला भिडतेच ! याचा अर्थ इतरांनी चांगले गायिले नाही असा आपण घेवू नये.आवडण्याचे स्वातंत्र्य नेहमीच ऐकणार्‌याला असते.....इथे मी मधुरानीने गायिलेली वरील गझल टाकली आहे.


वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो के याद हो
वही यानी वादा निबाह का तुम्हें याद हो के याद हो

 
वोन ये गिले वो शिकायतें वो मज़े-मज़े की हिकायतें
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो के याद हो

 
कोई बात ऐसी अगर हुई जो तुम्हारे जी को बुरी लगी
तो बयाँ से पहले ही भूलना तुम्हें याद हो के याद हो

 
सुनो ज़िक्र है कई साल का, कोई वादा मुझ से था आप का
वो निबाहने का तो ज़िक्र क्या, तुम्हें याद हो के याद हो

 
कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो के याद हो

 
हुए इत्तेफ़ाक़ से गर बहम, वो वफ़ा जताने को दम--दम
गिला--मलामत--अर्क़बा, तुम्हें याद हो के याद हो

 
वो जो लुत्फ़ मुझ पे थे पेश्तर, वो करम के था मेरे हाल पर
मुझे सब है याद ज़रा-ज़रा, तुम्हें याद हो के याद हो

 


कभी बैठे सब में जो रू--रू तो इशारतों ही से गुफ़्तगू
वो बयान शौक़ का बरमला तुम्हें याद हो के याद हो

 
किया बात मैं ने वो कोठे की, मेरे दिल से साफ़ उतर गई
तो कहा के जाने मेरी बाला, तुम्हें याद हो के याद हो



 वो बिगड़ना वस्ल की रात का, वो मानना किसी बात का

 वो नहीं-नहीं की हर आन अदा, तुम्हें याद हो के याद हो
 
जिसे आप गिनते थे आशना जिसे आप कहते थे बावफ़ा
मैं वही हूँ "मोमिन"--मुब्तला तुम्हें याद हो के याद हो



मोमिन खाँ मोमिन




नैय्यरा नूर...

आबेदा परवीन...

चित्रासिंग...





संगीत आणि साहित्य :