गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, September 9, 2025

रे मना, तुज काय झाले सांग ना!


  


   दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.

      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)

       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   

(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 

शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  

'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  

धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.

     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे! 

     बिलासखानी रागावर आधारित एक माझेच गीत २०१८ मध्ये स्वरबद्ध केले होते..स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे '#रे_मना!

https://youtu.be/kCYnWcTeP5o?si=6fFq1WZ2B0p86xTu


                 #मैफल 


रे मना, तुज काय झाले सांग ना!

का असा छळतो जीवाला सांग ना!


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवळतो तू सांग ना!


सूर लावून गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना!


गीत/संगीत - सुधाकर कदम

गायक - मयूर महाजन

तबला - किशोर कोरडे

सरोद -नितीश पुरोहित




Tuesday, August 19, 2025

गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र...डॉ.श्रीकृष्ण राऊत



मित्रहो,

गझलेच्या आकृतिबंधाची सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक सुरेश भटांना लिहायचे होते.या संदर्भात आमची अनेकदा चर्चा झाली होती.'#गझलनामा ' असे त्या पुस्तकाचे शीर्षकही त्यांनी निश्चित केले होते. पण पुस्तक लिहिण्याएवढी सवड आयुष्याने त्यांना दिली नाही. तो ड्रिमप्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम नियतीने मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत याचेकडून करवून घेतले. पुसदच्या संमेलनात दि.१७ ऑगस्ट २५ ला नुकताच प्रकाशित झालेला 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र ' हाच श्रीकृष्ण राऊत याचा तो ग्रंथ होय.

      श्रीकृष्णाचा गझललेखनाचा अनुभव प्रदीर्घ आहे. तेवढाच त्यांचा छंदःशास्त्राचा व्यासंगही दांडगा आहे.या ग्रंथात त्यांने संस्कृत छंद:शास्त्र आणि फारसी छंदःशास्त्राची केलेली तौलनिक चिकित्सा हे त्यांचे मौलिक योगदान आहे.गझललेखनातील अनेक बारकावे जसे की, वृत्त निवडताना घ्यावयाची दक्षता, वृत्तामधील यतिस्थान, वृत्तातील लवचिकता, वृत्तात उपयोजिलेल्या शब्दांच्या उच्चाराची ओढाताण ह्याबद्दल त्यांनी सोदाहरण केलेल्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. काफियांचे प्रकार, काफियांची पुनरावृत्ती,काफियांचे दोष या विषयी त्यांनी केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी गझलेला समृद्ध करणारे आहे. सुबोध भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. गझल ह्या सशक्त काव्यप्रकाराबाबत नवोदित आणि ज्येष्ठांच्या मनात अनेक शंका येतात, उदा. मात्रावृत्ते, स्वरकाफिया, दीवान इ. अशा शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ, गझलप्रेमी, गझलकार, गझल अभ्यासक या सर्वांसाठीच अत्यंत मौलिक ठरणार आहे. तसेच ज्यांना गझल लिहिण्याचं वेड असते आणि ज्यांचे खयालही दर्जेदार असतात परंतु कुठेतरी ज्यांच्यापुढे गझल-व्याकरणाच्या मापदंडावर गझल खरी उतरली आहे की नाही असा संभ्रम जेव्हा उपस्थित होतो,त्या सर्व गझल लिहिणाऱ्यांसाठी सुस्पष्ट दिशा दाखविणारा आहे.

     मराठीमध्ये छंद:शास्त्राच्या उपयोजनाच्या अंगाने सांगोपांग व सुस्पष्ट असे लेखन आजवर क्वचितच झाले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (सन १९२७) डॉ. माधवराव पटवर्धन (कविवर्य माधव जुलियन) यांनी प्रथमच “#छंदोरचना” हा ग्रंथ लिहून मराठीला छंद:शास्त्राची भक्कम परंपरा दिली.त्यामुळे गझल या प्रकाराचा परिचय मराठीत करून देण्याचे श्रेय डॉ. माधवराव पटवर्धन यांना जाते. नंतर कविवर्य सुरेश भट यांनी या प्रकाराला नवे व्याकरण, नवी अभिव्यक्ती आणि लोकमान्यता दिली. मात्र, त्यांनी अपेक्षित स्वरूपातील उपयोजित छंदशास्त्र प्रत्यक्षात उभे करू शकले नाहीत.त्याची कमी श्रीकृष्णाच्या या  ग्रंथाचे भरून काढली आहे.

     या ग्रंथात कुठेही अवघड किंवा किचकट शास्त्रीय मांडणी नाही. सोप्या, सरळ आणि सुस्पष्ट भाषेत गझलेच्या अंतरंगाबरोबरच बहिरंगाचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मूल्य अधिकच वाढते. पूर्वसूरींचा मान ठेवूनही श्रीकृष्ण राऊत याचा हा ग्रंथ समकालीन गझलकारांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.


-गझलगंधर्व सुधाकर कदम

सी१सी/१३,गिरीधर नगर

मुंबई बंगलोर महामार्ग

वारजे माळवाडी

पुणे ४११ ०५८

मोबाईल ८८८८८५८८५०

--------------------------------------------------------------------------

□ गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र 

( मराठी गझलेचे व्याकरण )

□ लेखक : श्रीकृष्ण राऊत

□ स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे 9890811567

□ मुखपृष्ठ : सतीश पिंपळे, अकोला 9850199323

□ प्रस्तावना : डॉ.अविनाश  सांगोलेकर

□ पाठराखण - सुरेशकुमार वैराळकर,

□ पृष्ठे : २७६

□ किंमत : ४००/-

□ पोस्टेज : ६५/-

□ गुगल पे / फोन पे :9284253805

□ व्हॉटसअप नं. 8668685288

Friday, August 15, 2025

श्रीकृष्ण राऊत यांना हार्दिक शुभेच्छा!

दि.१७ ऑगष्टला पुसद येथे संपन्न होत असलेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या एक दिवसीय विदर्भ स्तरीय गझलसंमेलनाचे अध्यक्षपद माझा जिवलग मित्र डॉ.श्रीकृष्ण राऊत भूषवत आहे.त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच याच संमेलनात श्रीकृष्णाने गेली २५ वर्षे अत्यन्त परिश्रम घेऊन लिहिलेल्या #गझलेचे_उपयोजित_छंदशास्त्र (मराठी गझलेचे व्याकरण) ह्या अत्यन्त महत्वाच्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.त्याबद्दल त्याला आणि गझल सम्मेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा! 
                                🌹💞🌹


 

तुझ्यासाठीच मी...राग यमनपर आधारित मराठी गझल

●अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल प्रकाशन,
'#संगीत_कला_विहार', अगस्त २०२५.#राग  #यमन

     यमन राग के नाम के बारे में कई सारी भिन्न भिन्न राय हैं। कुछ लोग इसे फारसी भाषा के 'इमन' का यमन में हुआ बदलाव मानते हैं। उसी तरह यह राग अमीर खुसरो नाम के अल्लाउद्दीन खिलजी के समय के विद्वान संगीतकार ने प्रचलित किया है ऐसा भी माना जाता है। यह बात निश्चित है कि खुसरो के समय में नये नये राग प्रचार में आ गये। इन में फारसी, इरानी सुरावटें और भारतीय रागों का मिलाप हो गया था। गोपाल नायक यह संगीत का एक बड़ा विद्वान खुसरो का समकालीन था। दक्षिण के पंडित यमन राग यह 'यमुना कल्याण' राग का एक प्रकार समझते है। इस नाम का उल्लेख दक्षिण के ग्रंथों में भी है लेकिन यमुना कल्याण और यमन इन दो रागों में नाम के सिवा और कोई भी समानता नहीं है। भातखंडे जी ने लिखे हुए उत्तर भारतीय संगीत शास्त्र इस ग्रंथ में यह राग कल्याण ठाटसे उत्पन्न हुआ है ऐसा लिखा है, लेकिन भातखंडे जी का पुरा आदर करके में यह कहना चाहता हूं कि इसका भी कुछ आधार नहीं है। (मेरी बात कई लोगों को पसंद नहीं आयेगी) लेकिन पुराने ग्रंथों में भी यमन नाम के राग का कहीं भी जिक्र किया हुआ नहीं दिखाई देता है। और किसी एक शब्द से इस राग का नाम आया है ऐसा भी लगता नहीं क्यूँ कि राग निर्मिती यह एक प्रक्रिया आहे. जो अचानक से होनेवाली नहीं है।

     कुछ लोग इसे यमन कल्याण भी बोलते हैं लेकिन इस में भी कुछ खास अर्थ नहीं है। यमन राग में विवादी सुरों की तरह कभी कभी कोमल मध्यम लगाने से वह यमन कल्याण हो जाता है। इसे भी किसी ग्रंथ का आधार नहीं है। इस प्रकार एक स्वर बदल कर या एक सूर जादा लगाकर या फिर विवादी के स्तर पर किसी अलग सूर का प्रयोग करके वह प्रचलित करना ऐसे कई उदाहरण हमें दिखाई देते हैं लेकिन वो सब छोड़ दिजीये। इसके बावजूद भी यमन राग बहुत लोकप्रिय है इसमें कोई संदेह नहीं। मैं तो इसे 'पैदाइशी अमीर' राग कहता हूं। इस पर अगर लिखा जाये तो सुरज, सागर, अवकाश या धूमकेतू पर लिखने जैसा है। इतना बड़ा विस्तार रखनेवाला दूसरा कोई राग मैंने कभी देखा नहीं। वैसे भी मेरी राय के मुताबिक 'कल्याण' नहीं, बल्कि यमन यही ठाट होना चाहिये और इसे ही शुद्ध ठाट की मान्यता मिलनी चाहिये थी। क्यूंकि इसमें सात ही स्वर शुद्ध याने तीव्र है। शुद्ध ठाट कहलाने जानेवाले बिलावल ठाटके कोमल मध्यम और कोमल निषाद का उपयोग विद्यार्थियों को सोचने पर मजबूर कर देता है।

(शास्त्र के नाम पर यही सिखाया जाने के कारण उस पर कोई बातें नहीं बनाता, यह बात अलग। वैसे भी बोलने से फायदा क्या? परीक्षा में वहीं लिखना पड़ेगा नहीं तो गुण कम हो जायेंगे।) लेकिन यमन के बारे में ऐसा संभ्रम नहीं होता।

◆ शास्त्रीय जानकारी

    पिछले 200 से लेकर 250 बरसों तक चलते आ रहे उत्तर भारतीय संगीत शास्त्र के अनुसार यमन राग कल्याण ठाटसे उत्पन्न हुआ है। वादी स्वर गांधार और संवादी स्वर निषाद है। जाती संपूर्ण है और गान समय रात का पहला प्रहर है। गान समय पर मैंने इससे पहले भी संक्षेप में लिखा हुआ है. लेकिन इस बार विस्तार से लिख रहा हूं। देखा जाये तो राग का गानसमय कौन सा होना चाहिये यह तय करने के लिए कोई भी नियम प्राचीन ग्रंथों मे लिखे हुए नहीं है। फिर भी राग का गानसमय निश्चित कर दिया गया है। इसका कारण क्या है. पता नहीं। जहां प्राचीन ग्रंथों में रागों के नाम और आज के रागों के नाम में समानता नहीं है. सुरो ने समानता नहीं है. वहां गान समय किस प्रकार से और कौन निश्चित करेंगे? कुछ तो शास्त्रीय नियम होने चाहिए, इसलिये उन्हें जारी करना इससे ज्यादा इसमें कोई अर्थ नहीं दिखाई देता। किसी भी मनुष्य ने गाना कब गुनगुनाना है और क्या गुनगुनाना है यह बात किसी और ने निश्चित करने से क्या हासिल होगा? अभी जो ठाट पद्धती चल रही है, उसके बारे में सोचा जाये तो मधुवंती जैसा राग ठाट पद्धती में गाना असंभव है। फिर दस से बढ़कर ग्यारह ठाट करके उस ग्यारहवे ठाटको अगर मधुवंती नाम दिया जाये तो क्या बिगडेगा? लेकिन नहीं, दस ठाटों में ही किसी भी तरह से तोड़ मरोड़ के सभी रागों को उसमें ही बांधना... यह थोडा निसर्ग नियमोंसे हटकर लग रहा है। हिंडोल, गौडसारंग, तोडी, मुलतानी इन रागोंमें तीव्र मध्यम है और इन्हें दिन में गाये जानेवाले रागों की मान्यता दी गई है। नियम के अनुसार देखा जाये तो तीव्र मध्यम होनेवाले राग केवल रात के समय ही गाये जाने चाहिये। एक और ऐसा भी नियम है कि 'ग' 'नी' कोमल होनेवाले रागों में तीव्र मध्यम होता ही नहीं। फिर कोमल ग और नि के साथ तीव्र म होने वाले सुरावटके राग को मधुकंस कैसे कहा जाता है? सच में देखा जाये तो राग के गाने के नियमों को बहुत पहिलेसे ही बाजूमेही रखा है, यह हमें 'दर्पण' इस ग्रंथ के-

"यथोत्काल एवैते गेया पूर्विधानतः ।
राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् ।।

और 'तरंगिनी' इस ग्रंथ के

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानभीरीतम्। 
रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते ।।

साथ साथ श्रीमान बॅनर्जी के 'गीत सूत्रसार' (Grammer of vocal music) ग्रंथ के 58 पच्चे पर उन्होंने लिखा है...

"हमारे यहाँ राग रागिनीयों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है, वह केवल काल्पनिक है।"

      इससे भी गान समय प्रथा में जो खोखलापन है वह साफ साफ दिखाई देता है। देखा जाये तो स्वरसमुदाय में ऐसी कोई विशेषता नहीं है कि जिसके लिए उन्हें कुछ खास समय के लिये न गाने से सुयोग्य परिणाम नहीं मिल जाता। संगीत का उद्देश सुरों के द्वारा भावना व्यक्त करके श्रोताओं का मन प्रसन्न करना केवल इतना ही है। इसका अर्थ यही है कि इसके लिये किसी विशिष्ट समय की कोई आवश्यकता नहीं है। जो भाव सुबह के समय व्यक्त हो सकते हैं या व्यक्त कर सकते हैं, वे शाम या रात के समय क्यूँ नहीं कर सकते? बिलकुल कर सकते हैं, सकना ही तो चाहिये। 'पारिजात' इस ग्रंथ में भूपाली राग सुबह के समय गाया जाता है ऐसा जिक्र है लेकिन आजके समय में वह रात्र कालीन माना जाता है।

(घनश्याम सुंदरा... यह भूपाली राग की धुन सुबह बहुत मधुर लगती है ना? सुबह के अहिर भैरव राग का 'पूछो ना कैसे मैने रैन बिताई'... यह चित्रपट का गाना रात को मन मोह लेता है ना?)

दक्षिण भारत में यमन राग सुबह के समय और भैरवी रात के समय गायी जाती है। लेकिन कुछ लोगों की राय ऐसी है कि ललित, रामकली, तोडी ऐसे राग शाम के समय गाने से गानसिद्धी बहुत अच्छे तरीके से हो जाती है। इसका मतलब यह है कि गान समय यह प्रकार याने लोगों पर बिना वजह डाला हुआ बोड़ा है। स्वर आखिर स्वर ही होता है, राग आखिर राग ही होता है, किसी श्री समय गा लेने से उसका परिणाम उतनाही असरदार होता है।

     ये बाकी चीजें छोड दिजीये, क्योंकि सच्चाई यह है कि यमन राग किसी भी हाल में सभी का पसंदीदा राग है। इसकी विशेषता यह है कि प्रतिभाशाली गायक, वादक और संगीतकारों पे यह बहुत कम समय में प्रसन्न हो जाता है और उन्हें मनचाहा वर भी दे जाता है। लेकिन अगर कोई इसमें यहाँ वहाँ भटक गया तो उसका मजाक उड़ाया जाएगा यह बात तो तय है। आपको अगर यमन गाना आ गया तो बाकी सब राग आप गा सकते हैं ऐसा बुजुर्ग लोक कहते हैं। इस राग को गाया नहीं ऐसा एक भी गायक या बजानेवाला ढूंढना केवल ना मुमकिन है. इतना यह मधुर है। भारत में सभी भाषाओंमें मिला कर जितने गाने इस राग में बने हैं, उतने गाने किसी अन्य राग में अब तक नहीं तय्यार हुए। सुगम संगीतकारों के लिए तो यह राग एक वरदान की तरह है। मन की किसी भी भावनाको इस राग के द्वारे हम पुरी ताकत से व्यक्त कर सकते हैं, इतनी क्षमता राग यमन में है। यह एक संगीतकार के नाते में विश्वास के साथ कह सकता हूं।

     मैंने की हुई यमन रागकी विविध मूड़ की रचनाओं पर कोल्हापूर के संगीत समीक्षक एडवोकेट राम जोशीजी (जो आज इस दुनिया में नहीं हैं) के एक लेखांक का छोटासा हिसा यहाँ प्रस्तुत करने का मोह में नहीं टाल सकता।

जोशी जी कहते हैं.....

यमन यह ऐसा राग है कि हर कोई संगीतकार उससे मोहब्बत कर बैठता है। कदमजी भी उससे कैसे परे होंगे? उन्होंने यमन राग में बहुत ज्यादा रचनाएं प्रस्तुत की है लेकिन फिर भी हर एक रचना स्वतंत्र है. अलग है, वो किसी एक छप्पे में से निकली हुई भगवान की मुर्तियां नहीं है। हर एक धून को उसका अलग चेहरा है, रंग है, रूप है, व्यक्तित्व है। किसी भी कार्यक्रम की शुरुआत वे खुद के लिखे इस काव्य से करते हैं।

'सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी 
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी'

दादरा की इस बंदिशकी यमन राग में यह रचना एकदम सिधीसाधी। सुगम संगीत में, शास्त्रीय संगीत के व्याकरण और नियमों को कोई भी स्थान नहीं। यहाँ केवल अपेक्षा है कि जो कुछ भी कानों पर पड़ता है उसमें सुंदरता, मधुरता और मोहकता होनी चाहिये। इसलिये यह बात सरल है कि यहाँ शुद्ध यमन खोजने का प्रयास मत कीजिये। क्यूंकि वह यमन, कल्याण के साथ पलभर में दोस्ती कर लेता है और जब इन दोनों ही माध्यमों के हलके से मिलाप की नजाकत जब समझ में आती है, तो बिना झिझक़ उसे दाद दिए बगैर और कुछ श्रोताओंके हाथों में नहीं रहता। यह अनुभूती मैंने उनके हर एक यमन में ले ली है और हमेशा लेता रहूंगा।

मी असा ह्या बासरीचा सूर होतो, 
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो'

इस गजल की धुन भी उसी तरह की है। धृपद की दुसरी पंक्ती जिसे क्रॉस लाईन कहा जाता है, उसकी रचना और स्वर समूह की रचना बहुत ही मधुर है। उस में 'सूर होतो' यहाँ पर तीव्र सप्तक के षड्‌ज सूरका इस शब्द के लिए इतनी नजाकत से उपयोग किया ही है, साथ ही वह पंक्ती गाते समय 'सूर' यह शब्द और तीव्र षड्‌ज का हलका लेकिन फिर भी ठोस लगाव और रूपक ताल का एक पुरा ज्यादा आवर्तन पूर्ण होने तक जो लंबे रामय तक ठहर जाता है वह अतिसुंदर लगता है। संगीत रचनाकार के पास केवल सांगीतिक अलंकारोंका खजाना होने से काम नहीं चलता बल्की सूर के पोशाख को अच्छा लगे ऐसा केवल एकही अलंकार संगीत का श्रवण सौंदर्य बढ़ाता है। संगीतकार सही मायने में खुद की रचना खुद के पुरे सामर्थ्य के साथ और अपेक्षित परिणाम के साथ गा सकता है। यह अनुभव मास्टर कृष्णराव से लेकर सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम यशवंत देव इन सभी के साथ महसूस होता है। सुधाकर कदम खुद गायक होने के कारण वे भी इस बात को अपवाद नहीं है। 'सूर होतो' यहाँ पर शब्दकला और स्वर मधुरता इन दोनों के एक अनोखे, सुंदर मिलाप का अनुभव आता है।

'सांज घनाच्या मिटल्या ओळी'

यह भी एक बहुत ही कोमल भावनाओंको खोलकर दिखानेवाली सुंदर काव्यरचना है। कदमजी ने बंदिश भी यमन में ही बांधी है। इसकी क्रॉस लाईन के आखिर में 'क्षितिजावरती' यहाँ पर उन्होंने नि और कोमल ऋषभ का बहुत ही कुशलतापूर्ण उपयोग करके यमन की पुरी व्यक्तिरेखा बदल डाली है। इतना ही नहीं, उस ऋषभ की योजना के कारण 'क्षितिज' इस शब्द का अर्थ प्रतीत करने के लिए कोमल रिषभ को अन्य कोई पर्याय नहीं है यह तुरंत ही समझ में आता है। पुरीया रागका इसमें होनेवाला दर्शन और साथ ही अंतरे के बाद आनेवाली सुरावट यह सब बहुत अच्छे तरीके से मेलजोल खाती है। सुप्रसिद्ध कवी अनिल कांबलेजी के-

'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐनवेळी अशी काय करतेस तू'

सुनाई। लेकिन खासियत यह है कि उससे वही धून इस गीत की तर्जभी यमन में ही बांधी है। यमन की बहुत ही चुलबुली स्वररचना खेमटा के अंग से लगनेवाला दादरा का ठेका, लय थोड़ी उड़ती उड़ती और इसलिये उसे विशिष्ट अर्थ देनेवाली, इस गीत को बहुत सही न्याय देती है। सौंदर्य स्थलोंका निर्देश करने की इच्छा हो तो 'ऐनवेळी अशी काय' इस पंक्ती की अधीरता दर्शाने के लिये बहुत ही सुयोग्य ऐसी स्वर समूह रचना करना बिलकुल ठीक होगा। 'सामग, सामगधप आदी का आनंद अपने आप ही अनुभव करने योग्य है। 'तुझ्या नभाला गडे किनारे' यह भी यमन की एक श्रवणीय रचना है। यमन इस एकही राग की चारों रचनायें उन्होंने मुझे एक के बाद एक सुनाई।लेकिन खासियत यह है कि उसमे वही धुन 
बार बार नहीं दोहराई है। स्वर रचना एक जैसी बिलकुल भी नहीं है, उसमें एक अलगपन है, जो किसी भी श्रेष्ठ संगीत रचनाकार की विशेषता मानी जाती है। सुगम संगीत में आकर्षक मुखड़े को याने धृपद को विशेष महत्व है। कदम जी की स्वररचनाओं के मुखड़े बहुतही आकर्षक होते हैं। उससे भी ज्यादा कुशलता और महत्व होता है, वह मुखड़े के बाद आनेवाले क्रॉसको। क्यूंकि संगीत रचना की आकर्षकता का वह प्रमुख स्थान है। मुखड़े की धुन को अनुरूप या फिर उससे भी आगे जाकर उसका सौंदर्य बढानेवाली आरोही पुरी करके अवरोही और षड्ज पर विराम होनेवाली स्वररचना, यह काम बहुत कठीन होता है। अगर ऐसा नहीं होता तो पुरी धून फंस जाती है। कई संगीत रचनाओं में ये दोष दिखाई देते है। संगीतकार को अपनी पुरी बुद्धी यहाँ पर खर्च करनी पडती है। सुधाकर कदम जी की रचनायें इस कसौटी पर पुरी उतरती है और इसीलिए वे मन को मोह लेती है। अंतरे के बाद आनेवाली धुन पहली धुनके हाथ में हाथ डालकर आगे बढ़ती है। किसी अन्य राग को जाते जाते धीरेसे स्पर्श करना याने शहद की अंगुली चखने जैसा बड़ा ही मधुर होता है। अर्थ यही है कि अंतिम पंक्तियां पुरी तरह से हायलाईट का उजाला कर देती है। बिलकुल उसी तरह की स्वररचना भी कदम जी बड़े सामर्थ्य से कर दिखा देते हैं। यमन एक ही, लेकिन उसके रूप हजार, उसके रंग हजार और उसके ढंग भी हजारों और उसकी यह अनोखी अदाकारी जिसे हम मोहजाल या मायाजाल कह सकते हैं, जब हम पर डाला जाता है तब खुद माहीर रसिक होकर भी हम फंस जाते हैं। बाद में समझ आता है कि यह यमनने किया हुआ कपट था लेकिन फिर भी वह कपट बहुत ही मधुर था और मासूम भी था।

     यमन राग अभंग से लेकर लावणी तक के सभी प्रकारों में रंग जाता है या दुसरों को रंगाता है। मराठी भाषा में करीब करीब सभी संगीतकारोंने इसमें स्वररचना की हुई है। अगर उनकीं एक लिस्ट बनाई जाये तो फिर वह एक बडा लेख होगा। फिर भी कुछ रचनाओं का जिक्र किये बिना यह लेख पुरा नहीं होगा।

'घूंदी कळ्यांना...

'का रे दुरावा...'

'पराधीन आहे जगती....

'तोच चंद्रमा...'

'पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा..."

'कबीराचे शेले विणतो...'

'सुखकर्ता दुखहर्ता... (आरती)'

'जिये सागरा धरणी मिळते...'

'जीवनात ही घडी...'

'शुक तारा...'

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या...'

साथही कई नाट्यगीत भी इसमें शामील है। उसने अभिषेकी बुआ का मत्स्वगंधा नाटक के लिये रचा हुआ स्वरशिल्प 'देवाघरचे ज्ञात कुणाला...' हुये बहुत पसंद है। गाया है रामदास कामतजी ने। हिंदी चित्रपट सृष्टी में भी यमन ने धूम मचायी है। सैगल के 'मैं क्या जानू क्या जादू है..." से लेकर आज के 'तुम दिल की धड़कन हो... तक.... इसमें सुंदर सुंदर गीत है।

... 'मन रे तू काहे न धीर धरे.....

'जिया ले गयो...'.

'जा रे बदरा बैरी जा.....

'वो हँसके मिले हमको.....

'पान खाये सैयाँ.....

'इस मोडपर आते है.....

'चंदन सा बदन...'.

'आँसू भरी है.....

जब दीप जले आना....
ऐसे कितने गानोंकी बात करेंगे...?

उर्दू ग़ज़ल में 'रंजिश ही सही....' यह ग़ज़ल याने मिलोंका पत्थर है। साथ में 'वो मुझसे हुये..... 'शाम-ए-फ़िराक...' ये गजलें और 'आज जाने की ज़िद ना करो...' यह फ़रीदा खानम की गायी हुई रचना याने कमाल की उंचाई।
'मरीज़े मुहब्बत...', 'दिलवालों क्या देख रहे हो...' ये गुलाम अली की गजलें अपना अनोखा रंग दिखाती है।
'क्यूँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...' (शोभा गुर्टू), 'तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...' (इकबाल बानो), 'आपका इंतज़ार कौन करे...' (शुमोना राय) ये गजलें भी बहुत श्रवणीय है। उर्दू गझल गायक मेहदी हसन साहबने गायी हुई अहमद फ़राज़ की 'रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...' इस गजल ने लोकप्रियता के सारे झंडे उखाड दिए। (देखा जाये तो यह गीत (गझल) 1972 की 'मोहब्बत' इस पाकिस्तानी फिल्म का है और इसके संगीतकार निसार बज्मी हैं। लेकिन खां साहब ने महफिल में गाकर इस रचना का सोना किया) इस गजल के साथ साथ यमन राग की लोकप्रियता (गजल गायन के संदर्भ में) आसमां को छू गई। पहले से ही मधुर होनेवाले इस राग में फराज साहब के शब्द, खौँ साहब की भरीपुरी मिठी आवाज और उन शब्दोंको जचनेवाली, बिनती करनेवाली बंदिश इस प्रकार का बहुतही उंचे दर्जे का संगम इसमें दिखाई देता है।

     ऐसी ही बिनती मैंने स्वरबद्ध की हुई तुझ्यासाठीच भी इस अलबम के 'तुझ्यासाठीच मी....... इस गजल में आपको दिखाई देगी। (अर्थात सच्चे परीक्षक आपही हैं) ऐसा यह यमन.... तो फिर सुनिए... केवल मध्य और मंद्र सप्तक की यह बंदिश, वैशाली माडे की आवाज में..

तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते
तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

-सुधाकर कदम

हिंदी अनुवादः डॉ. आरती मोने


 

Tuesday, July 22, 2025

 .                  #साठवणीतील_आठवण


१९८० मध्ये जेव्हा सुरेश भट आणि मी मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार,प्रसारासाठी महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघालो होतो, तेव्हाच्या अगदी सुरवातीच्या काळात सुरेश भटांच्या उपस्थितीत गायिलेली ही गझल आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवून गात असल्यामुळे त्या काळी तबला वादक तालमणी प्रल्हाद माहुलकर आणि मी,असे दोघे मिळून कार्यक्रम करायचो.त्यावेळच्या ध्वनिव्यवस्थापकाने कॅसेटवर  हे ध्वनिमुद्रण केले होते. कॅसेटवरून कसेबसे कॉम्प्युटरवर उतरवले.ते आपणासमोर सादर आहे.आवडण्या न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे.चांगली असो वा वाईट,आपली प्रतिक्रिया मात्र आवश्यक.


सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो


हे नवे फक्त आले पहारेकरी

कैदखाना नवा कोठला यार हो


जे न बोलायचे तेच मी बोलतो

मीच माणूस नाही भला यार हो


ओळखीचा निघे रोज मारेकरी

ओळखीचाच धोका मला यार हो


आज घालू नका हार माझ्या गळा

मी कुणाचा गळा कापला यार हो


-#सुरेश_भट


●heasphone please...

 .                            #अर्चना 

                #साठवणीतील_आठवण 


१९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे,

म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,

मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेश भट आणि मी,आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर,  पुण्यात माझे महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.

      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला 'गझलकट्टा' आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंडीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाळ गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अलबम करण्याची कल्पना आली.आणि मग 'खूप मजा करू' हा बालगीतांचा अलबम आकाराला आला.फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.

      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायच्या.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी आशा पांडेंची ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अलबम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला होता.वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे.हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

Monday, May 26, 2025


 .              #उर्दू_ग़ज़ल #मेहफ़िल


मैं के तनहाई की चादर तानकर लेटा रहा

और ज़माना जाने क्या क्या दासतां कहता रहा


क्या मिला है चाँद को एक बेजुबानी के सिवा

ज़िंदगी भर जो पराई आग मे जलता रहा


ज़िंदगी मेरी है उस बेआब मोती की तरह

जो समंदर की तहो में रह के भी प्यासा रहा


शायर - हनीफ़ साग़र 

गुलुकारा - प्राजक्ता सावरकर शिंदे

मोसिकार - 'शान-ए-ग़ज़ल' सुधाकर कदम

तबला - पं. किशोर कोरडे


●mobile REC...Headphone please.

Tuesday, May 13, 2025

मैं म्मिलुंगा मिलाने से पहले...नई धून.


 

घर आहे पण दारच नाही...



               दै. हिंदुस्थान (अमरावती) मधून साभार...


      मराठी गझल हा काव्यप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे महान कार्य करणाऱ्या ज्या दोन व्यक्तींची आदराने नावे घेतली जातात, त्यातील एक म्हणजे कविश्रेष्ठ #सुरेश_भट व दुसरे म्हणजे कवी, गझलकार, गीतकार, संगीतकार व स्फुट लेखक 72 वर्षांचे चिरतरुण श्री. #सुधाकर_कदम. दोघेही वैदर्भीय. भट अमरावतीचे तर कदम यवतमाळ जिल्ह्याचे.
दै. हिंदुस्थानच्या "#रंग_गझलेचे" या लोकप्रिय सदरात आज कदम सर प्रथम प्रवेश करीत आहे याचा मला आनंद आहे.
       गझल सम्राट स्व.सुरेश भट ज्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन "म्हणून करतात त्या सुधाकर कदम  यांनी मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात  रूजविण्यासाठी,व लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. "सुरेश भट स्मृती  पुरस्कार तसेच" #गझलगंधर्व " हा किताब प्राप्त कदम सरांचा १९८३ साली "भरारी " हा,पहिला मराठी गझल गीतांचा अल्बम प्रसिद्ध झाला.  "#खूप_मज्जा_करू "हा तेरा बालगीतांचा अल्बमही प्रसिद्ध  झाला आहे. गुलशन कुमार प्रस्तुत सीडी मध्ये " #अर्चना " या भक्तिगीतांची सीडीही प्रकाशित झाली आहे.गायक सुरेश  वाडकर व गायीका वैशाली माडे यांनी स्वरसाज चढवलेल्या "#काट्यांची_मखमल" या मराठी गझल अल्बमला , "#तुझ्यासाठीच_मी "या गीतकार दिलीप पांढरपट्टे यांच्या अल्बमला तसेच बालभारती ,पहिली ते चौथीच्या कविता" #झुला " व कुमार भारती आठवी ते दहावीच्या "झुला"ला सुधाकर कदम यांनी संगीत दिले आहे.वृत्तपत्रातून त्यानी "#फडे_मधुर_खावया "या सदराखाली स्फूट लेखन ही केलेले आहे.
अनेक वाद्य  वाजविण्यात पारंगत असलेल्या सुधाकर कदम यानी नागपूर आकाशवाणीचे #गायक व #वादक म्हणूनही काम केले आहे.
त्यांना   ' आऊट स्टॅडिंग यंग पर्सन', 'कलादूत', 'समाजभूषण', 'कलावंत', 'शान-ए-ग़ज़ल', 'महाकवी संतश्री विष्णुदास','गझल गंगेच्या तटावर' या व अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अर्चना या त्यांच्या अल्बम मधील भक्तिगीते पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे यांनी गायिलेली आहेत.
     आज त्यांची "घर आहे पण दारच नाही" ही गझल सादर करतो आहे. आस्वाद घ्यावा. प्रतिसाद द्यावा.

-अनिल जाधव Anil Jadhav 

Monday, May 12, 2025

हा असा चंद्र...गायक-मयूर महाजन...


 .                  #हा_असा_चंद्र 

     दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवा निमित्त झालेल्या मैफलीत गायिलेली

"#हा_असा_चंद्र_अशी_रात_फिरायासाठी" ही सुरेश भटांची  गझल, ते १९८१ मध्ये आर्णीला  माझ्याकडे मुक्कामी  असताना झाली आहे.(त्यांच्या हस्ताक्षरातील ही  गझल तारखेसह माझ्याकडे आहे.) बंदिश सुद्धा त्याच काळातील आहे.किरवाणी राग ''बेस' आहे.पण सुरवातीलाच किरवाणीत नसलेला कोमल निषाद आला आहे.पहिल्या शेरातील 'फुलांची वस्ती', दुसऱ्या शेरातील 'रंग', तिसऱ्या शेरातील 'घाव' इत्यादी शब्दांवरील वेगवेगळ्या सुरावटी त्या त्या शब्दांचा अर्थ अधोरेखित करतात.आमच्या चर्चेतून अशा अनेक गझलांना योग्य बंदिशी झाल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" हा उपक्रम आम्ही दोघांनी महाराष्ट्रात  राबविणे सुरू केले.असो! 

     तर प्रत्येक शेर शब्दानुरूप नव-नव्या सुरावटींनी  रंग भरत कसा सजविल्या जातो ते ऐका. गायकी माझी,आवाज मयूर महाजनचा आणि बंदीशीची पसंती खुद्द सुरेश भटांची.

     नंतरच्या काळात अनेक गझल गायकांनी आपापल्या परीने स्वरबद्ध करून ही गझल गायिली आहे.


हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी

तूच नाहीस इथे हात धरायासाठी...


चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती

राहिले कोण अता सांग झुरायासाठी


कालचे तेच फिके रंग नकोसे झाले

दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी


नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू

ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी


गायक - मयूर महाजन

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे


    ●मराठी गझल गायनाच्या सुरवातीच्या काळात हेटाळणी,कुत्सितपणे मारलेले टोमणे वगैरे ऐकत गेलो.मीच नाही तर सुरेश भटांना सुध्दा हेटाळणीला सामोरे जावे लागले.सर्व गान प्रकार शास्त्रीय संगीतामधूनच निर्माण होतात .पण ते 'फेअर' होऊन येतात.शास्त्रीय संगीतामधील सर्व चांगल्या बाबी घेऊन 'सुगम' म्हटल्या जाणारे 'दुर्गम' संगीत तयार होत असते.ते रसिकांना आवडते,कारण ते 'फाईन' होऊन येते.

     खरे म्हणजे गझल गायकाला शास्त्रीय संगीत गणाऱ्यापेक्षा जास्ती अवधानं सांभाळावी लागतात.माझे हे वक्तव्य  शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना पटणार नाही.पण ही वस्तुस्थिती आहे.गझल गायकाला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.त्याला साहित्याची जाण म्हणण्यापेक्षा अभ्यास असायला हवा.तो चांगला गायक असणे आवश्यकच आहे.आणि तो चांगला संगीत दिग्दर्शक पण असायला हवा.तरच तो गझल गायक बनू शकतो.माझे हे म्हणणे सुरेश भटांना तंतोतंत पटले होते.म्हणूनच आमची नाळ जुळली.व पुढील इतिहास घडला तो...

#अशी_गावी_मराठी_गझल​... इति सुरेश भट.

------------------------------------------------------

●गझलकार मसूद पटेल यांची प्रतिक्रिया...

    रसिकांच्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या या रचनेची निर्मिती आर्णी गावी म्हणजे माझ्या जिल्ह्यात व्हावी ही किती अभिमानाची गोष्ट आहे.कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांच्या या अजरामर रचनेला त्यांच्या समक्ष दिल्या गेलेली ही लाजवाब चाल आणि नव्या पिढीच्या नवोदित गायकाने चालीचे केलेले सोने या सर्वांचा जुळून आलेला हा योग  एका कालातीत सांगीतिक अविष्कारच्या जन्माला कारणीभूत ठरणारा आहे .

मनःपूर्वक अभिनंदन सर!

🌸🙏🌸

अमृतमहोत्सव प्रसंगी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर...


 

Sunday, May 4, 2025

संपली अजूनी कुठे ही रात सजणा...


 दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी...' या मराठी गीत-गझलच्या मैफलीतील अत्यंत सुंदर अशी गझल...


संपली अजुनी कुठे ही रात सजणा

का असा जातोस तू इतक्यात सजणा


बोलते आहे नव्या स्वप्नासवे मी

हात घे हलकेच तू हातात सजणा


पाहण्यासाठी मला झंकारताना

चांदणे खोळंबले दारात सजणा


मोहराया लागले तारुण्य माझे

दरवळाया लागला एकांत सजणा


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे

● जोग रागाची सुरावट घेऊन आलेली अनिल कांबळे यांनी ही गझल जवळ-जवळ चाळीस वर्षांअगोदर स्वरबद्ध झाली होती.#सरगम_तुझ्याचसाठी या मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल कार्यक्रमात माझी ज्येष्ठ कन्या भैरवी गायची. या गझलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोग रागासोबतच दुसऱ्या शेरात सारंग राग  आणि पुढे मुर्छनाद्वारे विविध रागांची उधळण केलेली दिसून येते. मूळ रचनेला स्वरांद्वारे विविध प्रकारे सजवणे म्हणजे गझल गायकी...याचा प्रत्यय ही गझल ऐकताना येते.यातील आर्जव गायकीतून दाखविणे ही प्राजक्ताची हातोटी म्हणावी लागेल.

Live - pune.19/4/2025

सरगम तुझ्याचसाठी ...


 

सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी


व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी

शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी


घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो

बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी


सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी

आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी


गायक - मयूर महाजन

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

व्हायोलिन - प्रभंजन पाठक

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

की बोर्ड - आशिष कदम

     ●ही गझल माझ्या आयुष्याची 'टॅग लाईन' आहे,असे मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांचे म्हणणे आहे.आणि एकार्थाने ते सत्यही आहे.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रा,१९७२ पासून संगीत शिक्षक म्हणून नोकरी,१९८० ते १९८२ सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भ्रमंती.१९८२ नंतर सोलो कार्यक्रम.यात पगार सोडला तर आर्थिक लाभ नगण्य.पण  शारीरिक त्रास मात्र भरपूर होत गेला.कदाचित हा त्रास सोसण्यातूनच ही कविता प्रसवली असावी.येताना सुरावट पण घेऊन आली.त्यातही प्रत्येक कडव्यात तीन-तीन यमक जुळवत आली.

      मी तर ही कविता गायचोच.पण माझा कनिष्ठ सहोदर प्रशांत कदम अतिशय सुंदर रीतीने गायचा.यातील "प्रिये तुझ्याचसाठी" या ओळीवरून 'ही प्रिया कोण?' अशी विचारणा व्हायची.तर, मित्रहो ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी '#मराठी' आहे.

      या गझलच्या सादरीकरणा अगोदर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपल्या मनोगतामधून काही महत्वाचे मुद्दे मांडले.तसेच नेटके सूत्र संचालन प्रशांत पेंडसे यांनी केले.

Live -  Amrutmahotsav ceremony, pune 19/4/2025

Wednesday, April 16, 2025

#मैफल...ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,अमरावती. दि.२६ डिसेंबर २०२४.


 

#गझलमित्र पुरस्कार...






 

मी जसा जगलोच नाही...सुरेश भट.


     सुरेश भटांच्या हयातीत मी त्यांची जवळ जवळ चाळीस गीते व गझला स्वरबद्ध केल्या होत्या."मी जसा जगलोच नाही" शब्दानुरूप बंदिश झाल्यामुळे त्यांची अत्यंत आवडती व हृदयस्पर्शी शब्दांमुळे माझी आवडती होती/आहे. या गझलची बंदिश मारवा रागात आहे."जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही" या पहिल्या ओळीत षड्जाचा नगण्य वापर केल्यामुळे मारवा रागाची उदासीनता, वरील ओळीचा अधिक अर्थ एकदम रसिकांच्या हृदयापर्यत पोहोचवते.दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दाकरिता आलेला मारव्यात नसलेला 'कोमल मध्यम' आणि त्यासोबत आलेल्या तत्सम सुरावटी तुटलेपणाचा आभास निर्माण करते.त्याचप्रमाणे 'जुळलोच नाही' या शब्दांकरिता तीव्र मध्यमा सोबत आलेला कोमल धैवत 'ती' हतबलता म्हणा,दुःख म्हणा अतिशय प्रखरपणे आपल्यापर्यंत पोहोचवते."वाटले मज गुण गुणावे" या ओळीकरिता यमन रागाचा चपखल वापर करून पुन्हा मूळ रागावर म्हणजे मारव्यावर येणे ही प्रक्रियासुद्धा त्यांना खूप भावली होती.म्हणूनच ही त्यांची अत्यंत आवडती स्वररचना होती.

आज दि.१५ एप्रिल, सुरेश भटांची जयंती... त्या निमित्त  ही माझी सांगीतिक श्रद्धांजली!

                        🌹🙏🌹


जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही


जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही


वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाईत

सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही


कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो

पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही


कवी - सुरेश भट #sureshbhat 

गायकब - सुरेश वाडकर #sureshwadkar 

संगीत - सुधाकर कदम #sudhakarkadam 

संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milindgune

ध्वनिमुद्रण - आजीवासन, मुंबई आणि पंचम स्टुडिओ,पुणे.

मिक्सिंग, मास्टरिंग - अजय अत्रे,#ajayatre पंचम स्टुडिओ, पुणे.

Monday, March 31, 2025

Urdu ghazal mehfil ...Amaravati 26/12?3024



 रफ़्तार से बिजली की चली है उर्दू

अंदाज़ में लश्कर के पली है उर्दू
मंगोल इसे लाये न तुर्की लाये
दिलवालों की दिल्ली में पली है उर्दू

जोगी आवारा मुसाफ़िर बन गए 
जो बने हम तेरे ख़ातिर बन गए 

नाम को जिन में न थी बू-ए-वफ़ा
कागज़ी फुलों के ताज़िर बन गए

हम तो अपनी सादगी में मस्त है
आप तो हर फन में माहिर बन गए

गुलुकार - मयूर महाजन और प्राजक्ता सावरकर शिंदे
शायर - हनीफ़ साग़र
मोसिकार - 'शान-ए-ग़ज़ल' सुधाकर कदम
तबला - देवेन्द्र यादव
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
व्हायोलिन - हरीश लांडगे
की बोर्ड - आशिष कदम
निज़ामत  - रफ़िक़ क़ाज़ी

■संत ज्ञानेश्वर सभागृह अमरावती,दि.२६ डिसेंबर २०२४.

मला भावलेला संगीतकार...गझलगंधर्व सुधाकर कदम.

            
           श्री सुधाकर कदम यांचे चिरंजीव श्री निषाद कदम माझ्या निकटतम शिष्यांपैकी एक आहेत.त्यामुळे माझा आणि सुधाकरजी यांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा स्नेह आहे.मी सुधाकरजींचे काम फार जवळून ऐकले आहे.अनेकदा त्यांनी केलेल्या रचनांचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
          प्रत्येक कलाकार त्याच्या कामामध्ये आपल्यामधील कल्पकतेनुसार वैविध्यता आणायचा आटोकाट प्रयत्न करत असतो.सुधाकरजी यांच्या रचना ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, त्यांच्या संगीत रचनांमध्ये विविधता आहे.प्रत्येक रचनेला स्वतंत्र अशी एक ओळख आहे.एका रचनेसारखी दुसरी रचना नाही.ही विविधता आणत असताना,ते ती रचना यांत्रिक किंवा कोरडेपणाकडे झुकू देत नाहीत.सुधाकरजी त्यांच्या रचनांमध्ये एक प्रकारचा हळवेपणा,ओलेपणा जपल्याची जाणीव देतात.गझल या प्रकारामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असणे गरजेचे असते.अशी रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयाला भिडते,याची जाणीव सुधाकरजींना आहे.त्यांना असलेली ही जाणीव ते त्यांच्या रचनांमधून श्रोत्यांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवतात.त्यांच्या रचनांमधील ’संवेदनशीलता’ मनाला भिडते.संगीत रचनेमध्ये भावनिकता ही फार महत्वाची आहे,जी सुधाकरजींच्या रचनांमध्ये जाणवते.
     गझल काव्यातून आलेला भावार्थ,त्या काव्याला असलेली लयीची नादमयता,ही सुधाकरजींना अगोदरच जाणवलेली असल्यामुळे ते त्यास संगीत देत नाहीत तर ते त्यांच्याकडून घडले जाते.सुधाकरजींच्या गझल रचनांमध्ये एकाचवेळी खुलेपणा आहे आणि तितकाच हळूवारपणाही आहे.असे फार कमी वेळा ऐकायला मिळ्ते.संगीताच्या दृष्टीकोनातून खुलेपणा आणि हळूवारपणा ही एकमेकांविरोधी तत्वे आहेत.पण सुधाकरजींच्या रचनांमध्ये खुलेपणा व हळूवारपणा या दोन्हीही गोष्टींचा सुरेल संगम ऐकायला मिळतो.
              सुधाकरजींनी त्यांच्या रचनांसाठी वेगवेगळ्या तालांचा चपखल वापर केला आहे.कधी रुपक तर कधी दादरा-केरवा तर कधी अप्रचलित ११ मात्रांचा ताल अशा वेगवेगळ्या तालांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत.अशा अवघड आणि अप्रचलित असलेल्या बौद्धिक तालांचा वापर करताना गझलचे मर्म समजल्या जाणार्‍या भावनिक तरलतेवर ते कोठेही विपरीत परिणाम होऊ देत नाहीत.
     सुधाकरजींच्या रचनांचा शास्त्रीय संगीताशी घनिष्ट संबंध आहे.गझल गायनाच्या परंपरेमध्ये गझल गायकाला सादरीकरण करताना रचनेपेक्षा वेगळा सांगीतिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य असते.सुधाकरजींच्या गझल रचना पूर्णपणे स्वतंत्र असूनसुद्धा त्यांच्या रचनांमध्ये गझल गायकाला मुक्तपणे गाण्यासाठी वाव असतो.तो त्याच्या मनाने गाऊ शकतो.
           संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये मग ते शास्त्रीय असो,उपशास्त्रीय असो किंवा सुगम संगीत असो,’अस्थाई’ अतिशय महत्वपूर्ण असते.अस्थाईला सुगम संगीतामध्ये धृवपद असेही म्हणतात.संगीत रचनेमध्ये अस्थाई परत परत गायली जावी असे वाटणे हे ती सांगीतिक रचना उत्कृष्ट असल्याचे द्योतक आहे.सुधाकरजींच्या सर्व रचना या प्रकारामध्येच समाविष्ट असतात. अस्थाई जितकी सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असेल तितका तिचा विस्तार करणे सोपे जाते.अस्थाई परत परत गावी असे वाटणे म्हणजेच त्याची धून होणे असे मला वाटते.आणि अशा प्रकारे धून झालेली कोणतीही रचना श्रोत्यांच्या ओठांवर तरळत राहते.सुधाकरजींच्या अनेक सांगीतिक रचना मी ऐकल्या आहेत.त्याचा आनंद घेतला आहे.
          जेवढी अस्थाई सांगीतिक दृष्ट्या परिपूर्ण तेवढी ती रचना विस्तार करायला गायकाला जास्त वाव मिळ्तो.अशा प्रकारची सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली अस्थाई ही त्या रचनेची ताकद बनते.अस्थाईतील शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन त्या शब्दांना यथायोग्य सांगीतिक वृत्तामध्ये (मीटर) बसवणे हे फार बौद्धिक काम आहे.
सुधाकरजींनी हे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलले असून अशा प्रकारची बौद्धिक चमक त्यांच्या अनेक रचनांमध्ये ऐकायला मिळ्ते.त्यांच्या रचनांमध्ये स्वरवैचित्र्यही पहायला मिळ्ते.(ज्या प्रमाणे शास्त्रीय संगीतामध्ये जोड रागांची संकल्पना आहे त्याप्रमाणे) अशी सांगीतिक रचना करणे ही एक बौद्धिक क्रिया आहे.पण या बौद्धिक क्रियेमध्ये सुद्धा गझलमधील भावनिक तरलतेवर विपरित परिणाम होणार नाही याचे अतिशय योग्य भान त्यांनी ठेवलॆ आहे.सुधाकरजींना त्यांच्या रचनांमध्ये शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक संतुलन अतिशय उत्कृष्टपणे आणि कलात्मकतेने जमलेले आहे.
     गझल हा प्रकार प्रामुख्याने काव्य प्रकार असूनसुद्धा त्याचे संगीतमय सादरीकरण हे शास्त्रीय संगीताच्या खूप जवळ जाणारे असते.शिवाय गझलच्या संगीतमय सादरीकरणाच्या रिवाजामध्ये तबला वादकाला त्याचे काम करण्याची संधी उपलब्ध असते.त्यामुळे गझल गायकाबरोबर तबला वादक कोण आहे,त्याची पात्रता काय आहे याची पण गझल गायन ऐकणार्‍या श्रोत्यांना उत्सुकता असते.गझलच्या सांगीतिक रचनेची जी अस्थाई (धृवपद) असते ती जरी,बरोबर वाजणार्‍या तालाशी गणिती किंवा ठॊस संबंध दाखविणारी नसली तरी त्यामध्ये त्या तालाच्या आवर्तनाची आकृती सक्षमपणे उभी अहात असते.अशा अस्थाईचे वारंवार सादरीकरण लेहेर्‍या इतके सक्षम असल्यामुळे तबला वादकाला त्याचे काम सादर करण्याची संधी मिळते.सुधाकरजींच्या रचनांमध्ये सुद्धा ही खासियत दिसून येते.
           मी गेले तीन-चार वर्ष त्यांनी केलेल्या अनेक संगीत रचना ऐकल्या आहेत.त्या मला मनापासून भावल्या आहेत.सुधाकरजींच्या गझला या शास्त्रीय संगीतातील बंदिशींसारख्याच विस्तारक्षम असून,अशा संगीत रचना ताकदीने उभा करणारा कंपोझर म्हणून सुधाकरजींकडे आदराने पाहिले जाते.त्यांचा बराच मोठा काळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेला.विदर्भ,
यवतमाळ या परिसराला कवी,साहित्यिक,
कलाकार अशा मंडळींचा वारसा लाभला आहे.सुधाकरजींनी बर्‍याच काळापर्यंत प्रसिद्ध कवी,गझलकार कै.सुरेश भट यांच्या समवेत व्यतीत केला.कै.भट हे एक प्रभावी आणि आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.
त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहवासातून सुधाकरजींनी मराठी गझल ही सर्वमान्य श्रोत्यांपर्यंत पोहचवली.

-#तालयोगी #पद्मश्री  सुरेश तळवलकर,पुणे.

 

 

Friday, March 28, 2025

Star of Marathi Ghazals...Sudhakar Kadam

     The very word ghazal strikes a melodius note in the ear. Its soft, rich culture reminds you of such mastros as Ghulam Ali, Mehdi Hassan, Talat Mehmood, Jagjit Singh etc. but here is a ghazal singer with a difference !
      Sudhakar Kadam sings ghazal alright, but Marathi ghazals. Sudhakar Kadam is a little man going a long way and a day is not far when his name will become household..
 It must be said to Mr. Kadam’s credit that he has acquired an audience of his own and has achieved a good deal of popularity. He has created an impression. Mr. Kadam’s success is all the more glaring because Marathi ghazal is a novelty and is relatively new to many who are familiar with the traditional concept of a ghazal that it is a romantic Urdu poetry.
     But Mr. Kadam has a religious devotion to Marathi ghazals and is quite firm in his belief that it will get its due one day and he has proved it in a certain measure by his own success. Mr. Kadam’s success is not limited to this region alone, but he has wo hearts outside Maharashtra also. In fact, it would not be an exaggeration to state that Mr. Kadam has a rythmic equation with Marathi ghazals. It is this proud achievement that Mr. Kadam was selected one of the top ten youths by the Cotton City Jaycees. Of course, success has not come Mr. Kadam’s way easily. He had to strive hard for it - more so in the light of the fact that he developed this new art in a realitively small town like Yavatmal. He had faith in people’s ability to grasp the essentials of this art and appreciate it. result? Mr. Kadam is now a well known figure. He manages all this after doing his regular service. He has many programmes on the Akashwani to his credit..
      An admirable aspect of Mr. Kadam’s singing is that he promotes new poetry and poet by singing their compositions and lyrics. His casettes realeased by a Pune company have exceeded sale records.
 Mr. Kadam’s speciality is his throw of words coupled with exact modulations. His presentation is perfect and systematic which atonce impresses and touches. Mr. Kadam is accompained by Tabla player Vithhal Kshisagar and Sarangi player Hamid Khan, but more than anything else, it is his voice that has an enduring appeal.
 There can be least doubt that the tomorrow belongs to Mr. Kadam

 - Mr. S. R. Chaudhari
(The Hitwada, Nagpur,23/4/1984)    



 छायाचित्र - इचलकरंजी कार्यक्रम १९८१. तबला - शेखर सरोदे, सूत्र संचालन - डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी.

उर्दू ग़ज़ल महफ़िल...२६/१२/२०२४,अमरावती.


 

जीवनाचा रिकामाच प्याला...


 .           #मैफल

झिंगतो मी कळेना कशाला

जीवनाचा रिकामाच प्याला


दूर झाले फुले वेचणारे

वेचतो मी फुलांतील ज्वाला


काय झाले पुढे आसवांचे

हे विचारू नये सांत्वनाला


राहिलो दूर तू मी तरीही

एक स्पर्शाविना स्पर्श झाला


काढली रात्र जागून सारी

चंद्र माझा सकाळीच आला


गायक - मयूर महाजन

गझल - सुरेश भट

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

व्हायोलिन - हरीश लांडगे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर

●संत ज्ञानेश्वर सभागृह,अमरावती.दि.२६/१२/२०२४.


#sudhakarkadamscomposition 

#mayurmahajan #मराठी  #गझल  #मराठीगझल  #composition  #संगीतकार

उमलून मी येऊ कशी ? मराठी गझल.

   .                  #मैफल
      (भैरवी रागातील अनवट स्वररचना)

मज सांग आज तुझ्याकडे उमलून मी येऊ कशी
भवतालच्या नजरांस या चुकवून मी येऊ कशी

कुठल्या घराचा उंबरा खिळवून मजला ठेवतो
तुझिया करी उल्केपरी निखळून मी येऊ कशी

आली अचानक कोठुनी ही शीळ चंदेरी तुझी
माझ्या मनाच्या पायऱ्या उतरून मी येऊ कशी

माझ्याच श्वासांचा उभा आहे पहारा भोवती
आयुष्य हे की पिंजरा निसटून मी येऊ कशी

गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे #prajakta_savarkar_shinde

गझल - ज्योति बालिगा राव #jyotibaligarao

संगीत - #गझलगंधर्व सुधाकर कदम
#sudhakarkadam 

तबला - देवेन्द्र यादव

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

व्हायोलिन - हरीश लांडगे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर

संत ज्ञानेश्वर सभागृह,अमरावती. दि.२६/१२/२०२४

तुझे तुला जगायचे...


.                 #मैफल

हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन #mayurmahajan
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे #prajaktasavarkarshinde
शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व सुधाकर कदम
#sudhakarkadam

तबला - देवेन्द्र यादव
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
व्हायोलिन - हरीश लांडगे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर

●संत ज्ञानेश्वर सभागृह,अमरावती. दि.२६/१२/२०२४

Friday, March 14, 2025

रात गेली निघून पाऱ्याची...




                     रात गेली निघून पाऱ्याची
हाक आली पहाट ताऱ्याची

तू कहाणी सुनावलीस तुझी
ही कहाणी न त्या बिचाऱ्याची

शांत झाल्या जरी तुझ्या लाटा
लाट आली तुझ्या किनाऱ्याची

बोललो काय मैफलीत असे
झाडली राख मी निखाऱ्याची

आठवण सुरेश भटांची 
 🌹🙏🌹

Wednesday, March 12, 2025

मज गायचेच आहे...


 विसरून वेदनांना मज गायचेच आहे

घायाळ काळजाला रिझवायचेच आहे


काट्यात राहुनीया गंधीत होत गेले

हे गंधणे अता मज टाळायचेच आहे


वाटे हवाहवासा सहवास मोगऱ्याचा

गजरे तुझ्या करांनी माळायचेच आहे


दुनिये तुझ्यापुढे मी हरले कबूल आहे

जे जे मला दिले ते सोसायचेच आहे


गायिक - प्राजक्ता सावरकर शिंदे

शब्द आणि संगीत -सुधाकर कदम

संगीत - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

व्हायोलिन - हरीश लांडगे

की बोर्ड - आशिष कदम

सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर


                           मैफल 

संत ज्ञानेश्वर सभागृह,अमरावती.दि.२६/१२/२०२४.    


#मराठी  #गझल  #गीतकार  #संगीतकार  #कवी 

#sudhakarkadamscomposition 

#prajaktasavarkarshinde

Friday, March 7, 2025

"तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते"


#मैफल

 संत ज्ञानेश्वर सभागृह,अमरावती.दि.२६/१२/२०२४.

गायक - मयूर महाजन
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
गझल - दिलीप पांढरपट्टे
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
व्हायोलिन - हरीश लांडगे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर

Friday, February 28, 2025

अष्टाक्षरी


 

मुझे ये हुनर न आया...

 झुकाऊ सर कही भी, मुझे ये हुनर न आया

ये है खेल शोबदोंका, मुझे उम्रभर ना आया ।

मेरा दिल अजीब दिल है, कभी झांककर जो देखा
कभी मैं नजर न आया, कभी वो नजर न आया ।

जहाँ बैठकर करुंगा, मैं हिसाब इस सफर का
मेरे रास्ते में सागर, अभी वो शजर न आया ।

इसी वास्ते किसीको मैं बना सका ना अपना
कोई दिल के रास्ते से, कभी मेरे घर आया।

शोबदोंका- धोखेबाज,कपटी,झुटा
shobado.n
शोबदोंشعبدوں - magic tricks,fraudulent, deceitful,juggler, conjurer



Thursday, February 27, 2025

कदमबाजी...


 


 


 

जोगी, आवारा, मुसाफ़िर बन गये...


 

मैफल,...पुणे.८ फेब्रुवारी २०२५.


 

ना सही लब न खोलिए साहब...


 

उसके मुह से झूठ सच्चाई लगे...

उसके मुह से झूठ सच्चाई लगे

शख़्स वो मुझको तिलिस्माई लगे 


चारों मौसम करवटें ले एकसाथ

ऐसी मुझको उसकी अंगड़ाई लगे      


आइने के हक़ में अब मैं क्या कहूँ

हर सुख़नवर उसका शैदाई लगे

        -

मीर भी ग़ालिब भी इसमे दाग़ भी

(और वो) ये ग़ज़ल तुलसी की चौपाई लगे


गुलुकार - मयूर महाजन

शायर - अनंत नांदुरकर 'ख़लिश'

मोसिकार - सुधाकर कदम

तबला - डॉ.देवेन्द्र यादव

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

व्हायोलिन - हरीश लांडगे

की बोर्ड - आशिष कदम


●headphone or earphone please...



दिन लगे है रात सा...


   प्राजक्ता असो की मयूर असो, कोणतेही गीत वा गझल द्या, अगदी अंतर्मनातून आणि झोकून देत आपल्या गायकीतून एक एक शब्द रसिकांपर्यंत ताकदीने पोहोचवतात.

दोघेही संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले रियाजी असल्यामुळे त्यांच्या आवाजाला एक वेगळीच धार आहे.हा वेगळेपणा नेहमी जाणवतोच मग ती घरगुती मैफल असो व जाहीर कार्यक्रम.संगीतकाराच्या मूळ सुरावटीला धक्का न लावता स्वतःच्या कल्पनेने शब्दानुरूप नव-नवे स्वरगुच्छ टाकून गझल रंगविणे ही दोघांची खासियत आहे. दि.२६ डिसेंबर २०२४ ला अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात ही बाब प्रकर्षाने जाणवली. प्रेक्षकांमध्ये अमरावती शहरातील व बाहेर गावाहून आलेले रसिक, गायक,वादक,कवी-गझलकार मंडळी उपस्थित होती. त्यांची मिळणारी उत्स्फूर्त दाद हीच त्यांच्या गायकीची पावती होती.संपूर्ण मैफलीचा संगीतकार म्हणून ही मनःपूर्वक आलेली दाद   माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होती.

         खालील उर्दू गझल वेळेअभावी दोन शेर घेऊनच संपवावी लागली.नेमका यावेळी प्राजक्ताचा आवाज मस्त तापला होता.गझल मित्रवर्य दिलीप पांढरपट्टे यांची 'दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा' ही होती.गझलची सुरवात एका शेराने करून प्राजक्ताने समा बांधला व पुढे गझलच्या शब्दर्थाला साजेशा मुरक्या,बेहेलावे,अचूक शब्दफेक,निखालस शब्दोच्चार अवर्णनीयच...आपण ऐका, आपणासही अनोख्या गझल गायकीची प्रचिती येईल.

      रूपक तालातील या बंदिशीला पूरक अशी तबला संगत डॉ.देवेन्द्र यादव,

हार्मोनियम संगत रामेश्वर ताकतोडे,

व्हायोलिन संगत हरीश लांडगे,की बोर्डवर अतिशय संयत व अनुरूप अशी संगत आशिष कदम यांनी केली.सूत्र संचालन रफ़िक़ काज़ी यांचे होते.


दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा

ए मोहब्बत का असर है ए नहीं कोई हादसा


हम पयंबर है मुहब्बत के वफ़ा के प्यार के

जान का दुश्मन भी लगता है हमे दिलदार सा


'रिंद' की जादूगरी का ये भी पहलू देखिए

हाथ में पानी भी ले वो तो लगे है जाम सा




पुणे तेथे काय उणे...


 

Tuesday, February 11, 2025

मज कळले तू माझी...


 

यवतमाळ जिल्हा साहित्य सम्मेलन,अध्यक्षीय भाषण.१८ ऑगष्ट २०२४


 

उर्दू ग़़ज़ल

 इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही

मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही


अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ

शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही


चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो

मंज़िल सबक रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही


मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'

दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही


●headphone please...


मैफल ८/२/२०२५


 

गझल साधना पुरस्कार २०२५


 

Hugday


 

promiseday

.म्हातारे इतुके न...

 

Sunday, January 19, 2025

"मैफल" क्षणचिते...अमरावती.दि.२६ डिसेंबर २०२४.


 

"भक्तीगीत" ध्यास लागलासे मजला विठू माऊलीचा...


      काही काही गाण्यांचे योग अप्रतिम असतात.त्यातीलच राज यावलीकरांनी लिहिलेले हे भक्तीगीत. आज पंडित शौनक अभिषेकीच्या हस्ते युट्युबवर प्रकाशित करण्यात आले.बुवांपासून अभिषेकी घराण्याशी संबंध आहेत.आज तिसऱ्या पिढीतील गायक चि.अभेद अभिषेकी याचीही या निमित्ताने भेट झाली.पुण्यात आल्यानंतर मी संगीत दिलेला पहिला अल्बम #अर्चना  हा अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वाद घेऊन शौनक आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात केला.( टी सिरीज).पुण्यात आल्यानंतर या अल्बमद्वारे २००६ मध्ये संगीतकार म्हणून सुरू झालेली वाटचाल आजतागायत सुरू आहे.याचे पूर्ण श्रेय बुवांना जाते.माझे अहोभाग्य की संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी माझ्यावर प्रेम करतात.एका फोनवर शौनक अभिषेकी यांनी माझ्यासाठी वेळ काढला.पूर्ण गीत ऐकून छानशी प्रतिक्रिया पण दिली.त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
गायक - सुरेश वाडकर 
संगीत - अस्मादिक
संगीत संयोजक - मिलिंद गुणे
ध्वनिमुद्रण,मिक्सिंग, मास्टरिंग - पंचम स्टुडिओ,पुणे.
व्हाईस डबिंग - आजीवासन स्टुडिओ,मुंबई
      खाली युट्युब लिंक दिली आहे.एकूणच काम अप्रतिम झाले आहे.आपण जरूर जरूर ऐका आणि प्रतिक्रिया देऊन चॅनल सबस्क्राईब करा.आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत.
धन्यवाद!


 

गझल साधना पुरस्कार...२०२५


 

कुमार गंधर्व पुरस्कार प्रसंगीच्या भेटी....

कालच्या (१८/१/२०२५)  #कुमारगंधर्व पुरस्कार प्रसंगी फेसबुक मित्र, प्रसिद्ध चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांची भेट झाली.सोबत ज्यांचे हस्ते पुरस्कार वितरण झाले ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन'चे सल्लागार व 'ऑस्कर' अकादमीच्या निवड समितीतील 'ज्युरी' उज्वल निरगुडकर...

 

पं. कुमार गंधर्व स्मृती पुरस्कार १८/१/२०२५

एकता कल्चरल अकादमी,मुंबई
#पंडित_कुमार_गंधर्व_स्मृती_पुरस्कार स्वीकारताना...मराठी साहित्य संघ, गिरगांव.
दि.१८जानेवारी २०२५


 





संगीत आणि साहित्य :