गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, December 29, 2025

काळोखाच्या तपोवनातून

 


.                                -आस्वाद-

         #काळोखाच्या_तपोवनातही_प्रकाशाची_वाट...


           मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळण करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ #काळोखाच्या_तपोवनातून ” हा 

काव्य संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे  संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,

विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास  केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.माणसं माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाती सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत  असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.

त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते  लिहितात...


 'कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना

 अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना...'


      खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...


 'मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची

 काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा...'


      गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या  गंधीत आठवणी  असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून  कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना  कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..


मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे

फुलासारखी प्रसन्नताही तशीच आहे..


    माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात...


 'भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.

 पण गाळ अंतरीचा तो राहिला बिचारा...'


      माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात...


'आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.

नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते...'


      जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात...


 'हासुनी हसवायचा हा मंत्र घे

 दुःख का कुरवाळतो तू सांग ना!'


      आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात...


'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे...


      जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात


 'दीन दुःखितांना / मदत जे करी

 तेणे मुक्ती चारी / साधलिया...'


      माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून  एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..


 'कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना

 मिटवाया तृष्णा / निरागस...'


       जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.


 'सरणावरती चढतो जेव्हा

 कोणी नसते त्याच्या पाठी'


      आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात


'ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी

 लिही कांदबरी / मुंबईत...'


      माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे  ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..


 'ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी

 तयासी पाखंडी / म्हणावे गा...'


      व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी  निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.


◆ काव्य संग्रह : काळोखाच्या तपोवनातून

◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम #sudhakarkadam 

◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित #rampandit 

◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे #avinashwankhade 

◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659

◆पाने : ९६

◆मूल्य : १५० ₹


-संदीप वाकचौरे #sandipwakchaure 


संग्रह मिळवण्यासाठी तपशील -

किंमत रु. १५० + टपालखर्च ५० 

● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.

A/c no : 053312100004140

IFSE Code : BKID0000533



बँक ऑफ इंडिया,पुणे.

google pay - 8888858850

Friday, December 26, 2025

माझी शब्द स्वरसंपदा

                       


आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी/संगीतकार म्हणून 

#फडे_मधुर_खावया…  (नागपूरच्या दै.तरुण भारत वर्तमानपत्रामधील 'विषयांयर' या सदरातील खुसखुशीत स्फूट लेख).

#सरगम  (शालेय गीतांची स्वरलिपी).

#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा  व 

#काळोखाच्या_तपोवनातून  (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच 

#भरारी  (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट). 

#अर्चना  (भक्तिगीते), गायक-पं. शौनक अभिषेकी, अनुराधा मराठे.(टी सिरीज).

#खूप_मजा_करू  (बालगीते),(फाऊंटॆन म्युझिक कं), #काट्यांची_मखमल पहिला युगल गझलांचा अल्बम. गायक-पद्मश्री सुरेश वाडकर,वैशाली माडे.(युनिव्हर्सल म्युझिक कं). 

#तुझ्यासाठीच_मी...(मराठी गझल),गायिका-वैशाली माडे, ( युनिव्हर्सल म्युझिक कं).

#काट्यास_फूल_आले ....(मराठी गझल),गायक-मयूर महाजन, प्राजक्ता सावरकर शिंदे,गायत्री गायकवाड गुल्हाने.

#रे_मना...(मराठी गीत/गझल),गायक-मयूर महाजन,

प्राजक्ता सावरकर शिंदे.

 ह्या कॅसेट्स सीडीज (अल्बम) सोबतच #सुरेश_वाडकर, #मयूर_महाजन,#प्राजक्ता_सावरकर_शिंदे,#गायत्री_गायकवाड_गुल्हाने,#सावनी_सावरकर,#कल्पिता_उपासनी यांच्या आवाजात नव्याने स्वरबद्ध केलेली मराठी व उर्दू गीते/गझला युट्युब,स्पॉटिफाय या सारख्या विविध ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

वाडकरांच्या सौभाग्यवती #पद्मा_सुरेश_वाडकर व मुलगी #अनन्या_सुरेश_वाडकर यांच्या आवाजात हनीफ़ साग़रांच्या दोन उर्दू गझला नुकत्याच ध्वनिमुद्रित केल्या आहेत.येत्या महिनाभरात आपणास ऐकायला मिळतील.


        मी स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, प्राजक्ता सावरकर शिंदे,गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,

रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहे,गात आहेत.


       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,

वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही 

जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप 

पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.

रमण रणदिवे,सदानंद डबीर,ज्योती बालिगा राव,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,

मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,

बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,

प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल 

राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,

मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,राज यावलीकर,

किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी,डॉ.रामदास चवरे,

धुमाळ पिता-पुत्र,संदीप गावंडे व दस्तुरखुद्द अस्मादिकही आहेत.


        उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, हनीफ़ साग़र ,इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज़,मौलाना तारिक जमील,डॉ.दिलीप पांढरपट्टे, कलीम खान,प्रथम गिरीधारी,अनंत नांदूरकर या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत....

-----------------------------------------------

.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना


#मराठी_गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४.रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७.गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.माझी गझल गुलबो-रविप्रकाश चापके

५३.मला सोसवेना दुरावा तुझा-         "

५४.जळलो धुपापरी मी-                  "

५५.प्रतीक्षा पार्थना झाली-                "

५६.काट्यास फूलआले -                  "

५७.जो तो दिसावयाला दिसतो सुखात "

५७.असे पत्र आता तुला मी लिहावे-    "

५८.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

५९. राखून रीत आले-ज्योती बालिगा राव

६०. तुझे तुला जगायचे-सुधाकर कदम

६१. मज गायचेच आहे-          "

६२. संपली अजुनी कुठे ही रात सजणा-म.भा.चव्हाण

६४. ये न ये टिपूरसे चांदणे-ज्योती बालिगा राव

६५.वेदनेचा सूर-सुधाकर कदम

६६. एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-

६७.डोळे-बबन धुमाळ

६८. या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट

६९. रात गेली निघून पाऱ्याची-            "

७०.हा असा चंद्र अशी रात-                 "

७१. उमलून मी येऊ कशी-ज्योती बालिगा राव

७२. जे जे घडवयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम

७३. जीव जडला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ

७४. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

७५. उदंड ओसंडुनी कधी वावरता आले-शिवाजी जवरे

७६. एक भक्तिभाव आहे-मीनाक्षी गोरंटीवर

७७. शेवटी हे दुःख माझे -ज्योती बालिगा राव

७८. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

७९. चंद्र ताऱ्यात चर्चा अशी रातभर-घनश्याम धेंडे

८०. किती रुंजी तरी तिथल्या तिथे-समीर चव्हाण

८१. तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले-दिलीप पांढरपट्टे

८२. आसवांना टाळणे आता नको-                  "

८३.असेच जगलो झुगारले या जगास-              "

८४. प्रेम अपुले नवे नवे होते-                           "

८५. नुसत्याच तुझ्या हसण्याने-                         "

८६. आसवांना टाळणे आता नको-                    "

८७. कवटाळलेस तेव्हा अन् टाळतेस आता-        "

८८. कळे ना मला हा कसा नेमका तू-                 "

८९. दुपट्टा घसरणे-गंगाधर मुटे

९०.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

९१.शब्दांनाही सूर भेटता... चंदना सोमाणी


#मराठी_गीते


१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट

२.पहाटे पहाटे-                "

३.मी असा आहे कलंदर-    "

४.गे मायभू-                     "

५.तसे किती काटे रुतले-     "

६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर

७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "

८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज

९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे

१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद

११.सकाळ-उ.रा.गिरी

१२.मराठी हजल-शिवजी जवरे

१३.मन-बहिणाबाई

१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर

१५.घोडा (बालगीत) शांता शेळके

१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे

१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत

१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे

१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे

२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे

२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "

२२.शक्ती दे तू आज मजला-   "

२३.दयासागरा-                      "

२४.तुझीच सुमने-                   "

२५.करुणा अपार आहे-           "

२६.वेद झाले वेदनांचे-              "

२७.तूच माझे गीत कोमल-         "

२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम

२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर

३०.बारीकराव-                    "

३१.रिमझिम पाऊस-            "

३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "

३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "

३४.रानातले पक्षी-                 "

३५.थेंब-                              "

३६.इवलसं बी-                     "

३७.खूप मजा करू-                "

३८.उठ उठ सह्याद्रे

३९.आभाळ वाजलं

४०.पीक खुशीत डोलतय सारं

४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी

४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे

४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

४४.रे मना तुज काय झाले सांग ना-सुधाकर कदम

४५.काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर- "

४६.हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा-    "

४७.स्पर्शून एकदा तू केले मला ययाती-       "

४८.कशी वेदना विसरायाची सांग मला तू-   "

४९.जीवनाची एकतारी-                           "

५०.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची कहाणी "

५१.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे-आशा पांडे

५३.काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम

५४. मज कळले तू माझी-उ.रा. गिरी

५५.तुझी सुवर्णाची आभा-डॉ.रामदास चवरे

५६. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा -राज यावलीकर

५७. ध्यास लागलासे मजला विठू माऊलीचा-       "

५८. जेव्हा मला कळेना तुझिया मनातले-संदीप गावंडे

५९- संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

६०. मन माझे-समीर चव्हाण

६१.  पाऊस असा घनघोर,नदीला पूर-अनिल कांबळे

६२. गुरू मायबाप,गुरू रूप संत-

६३. आभाळाचे गर्द निळेपण-गजेश तोंडरे


#उर्दू_ग़ज़ल


१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र

२.दिल लगाया है तो नफरत-     "

३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़

४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे

५.गयी लज्जत पिलाने की-         "

६.तू मेरी दुश्मन नहीं-कलीम खान

७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 

८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "

९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "

१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी

११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी

१२.ना सही लब न खोलिए साहब-हनीफ़ साग़र 

१३.उनकी गलियों से उठाई है ग़ज़ल-अशोक अंजुम

१४.जब मेरी नजर आपके चेहरे पे पडी है-हनीफ़ साग़र 

१५.इतना मुझे चाहा करो ना-समीर चव्हाण

१७. मै के तनहाई की चादर तानकर-हनीफ़ साग़र 

१८. ये कैसी शाम है-दिलीप पांढरपट्टे

१९.दिन लगे है रात सा-        "

२०.देखते ही देखते ये क्या नजारा हो गया-    "

२१. जोगी,आवारा,मुसफिर बन गये-हनीफ़ साग़र 

२२. उस के मुह से झूट सच्चाई लगे-अनंत नांदूरकर

२३. फिर तेरी याद लौट आयी है-दिलीप पांढरपट्टे

२४. मेरी उम्रभर का रियाज़ था-मौलाना तारिक जमील

२५.कैसे कैसे लोग-बशर नवाज़

----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील '#नग़्म_ए_ग़ज़ल' आणि '#प्रसार_गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...


#उर्दू_ग़ज़ल


१.

छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६

२.

पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६

३.

इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०

४.

किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 

५.

कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०

६.

मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०

७.

दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०

८.

वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१

९.

उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१

१०.

ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१

११.

आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२

१२.

जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२

१३.

आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२

१४.

हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३

१५.

हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३

१६.

करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३

१७.

ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४

१८.

बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५

१९.

चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५

२०.

चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५

२१.

तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६

२२.

आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६

२३.

वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७


#गीत


१.

अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६

२.

जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०

३.

गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१

४.

तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१

५.

दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१

६.

रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१

७.

उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१

८.

जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२

९.

परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२

१०.

ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२

११.

सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२

१२.

ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२

१३.

अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२

१४.

देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२

१५.

चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३

१६.

सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   

१७.

राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३

१८.

तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३

१९.

गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३

२०.

ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३

२१.

गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४

२२.

ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५

२३.

जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४

२४.

राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४

२५.

तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४

२६.

आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४

२७.

उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४

२८.

वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५

२९.

तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६

३०.

रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६

३१.

पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६

३२.

पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६

-------------------------------------------------------------------

●ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ मधील स्वररचना...(फेसबुक)


१.तुझे माझ्याजवळ असणे सुखद होते-विद्या देशपांडे

२.प्रेम होते कसे स्वप्न पडते कसे-संजय गोरडे

३.एखाद्या दुपारवेळी मी खिन्न एकटा असतो-प्रियंका गिरी

४.जे जे मला मिळाले साभार देत आहे-आशा पांडे

५.डोळ्यात आसवांना मी आणणार नाही-डॉ.मनोज सोनोने

६.भेटून काय सांगू माझी व्यथा कुणाला-अनिल जाधव

७.तुझ्या माझ्यातला आता दुरावा वाढतो आहे-कविकुमार

८.केवढे झाले सहज जाणे तुझे-शरद काळे

९.नेहमी तुझ्याच आसपास मी-अश्विनी बोंडे

१०.ओठात नाव येता सांजावला शहारा-साईनाथ फुसे

११.अशा सांजवेळी दिवेलागणीला-सविता बन्सोड

१२.दिवस येतो दिवस जातो-डॉ.अविनाश सांगोलेकर

१३.वंचना जखमा जुन्या उसवून येते-अमिता गोसावी

१५.कुणीच नसले सोबतीस की घुसमट होते-सचिन साताळकर

१६.आपण सारे इथे बुडबुडे-अशोक कुलकर्णी

१७.दुःखात का जीवाला झुरवत बसायचे-गौरी शिरसाट 

१८.एकरूप व्हायचे, प्रेमगीत गायचे-दीपाली वझे

१९.पुन्हा थांबेन जर ती यायची आहे-स्मिता गोरंटीवार

२०.झिजल्याशिवाय दरवळ नाही-मीनाक्षी गोरंटीवार

२१.दिशा शृंगारल्या होत्या हवा गंधाळली होती-प्रशांत वैद्य

२२.झाल्या चुका असू दे रस्ता नवा धरू या-प्रतिभा सराफ

२३.दुःख माझे दूर करण्या धावते माझी गझल-प्रसन्नकुमार धुमाळ 

२४.सांग तुजला काय आता आठवाया लागले-सुधाकर इनामदार

२५.ऐक ना! बोलायचे राहून गेले-निर्मला सोनी

२६.कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला-अल्पना देशमुख नायक

२७.भकास झाले हसरे अंगण तू गेल्यावर-मसूद पटेल

२८.हळूच बोलणे तुझे तसे हळूच हासणे-हेमंत जाधव 

२९.तुला उगाच वाटते तुझ्याविना मरेन मी-दिवाकर जोशी

३०.मी तरी आता व्यथांचे पांघरू शेले किती-वंदना पाटील वैराळकर

३१.मिठीत तुझिया येउन झाला निवांत वारा-डॉ.संगीता म्हसकर

३२.दुःख माझे तुला पण कळू लागले-भैय्या पेठकर

३३.अचानक जीभ ही अडते-अनिल पाटील 

३४.सांजकोवळी क्षितिजावरती-संजय इंगळे तिगावकर

३५.उदास झाले हसरे अंगण-व्यंकटेश कुलकर्णी

३६.केलेत केवढे तू उपकार काय सांगू-श्रीराम गिरी

३७.पुन्हा का तेच ते होते-कीर्ती वैराळकर

३८.तुझ्यावर भाळलेल्या वेदनांचे काय मग?-अंजली पंडित दीक्षित

३९.ओठी जरी कधीचे स्वातंत्र्यगान आहे-म्.भा.चव्हाण

४०.संध्येच्या शामल डोही-श्रद्धा पराते

४१.दूर तिथे घन बरसे हलकासा-सदानंद डबीर

४२.दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

४३.रात गेली निघून पाऱ्याची-सुरेश भट

४४.मज कळले तू माझी पण सगळे घडल्यावर-उ.रा.गिरी

४५.आदिशक्ती तू,आई रेणुके-निलकृष्ण देशपांडे

४६.घाली अमृताचा पान्हा कृपेची साऊली-शिवा राऊत 

४७.भेटली तू मला वादळासारखी-श्रीकृष्ण राऊत 

४८.सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-सुधाकर कदम

४९.तुमने किया है प्यार-डॉ.प्यारेलाल श्रीमाल

५०.जो भी तेरी गली में आता है-हनीफ़ साग़र

५१.इल्म ऐसा वो सीखकर आया-अमित झा राही

५२.शाम होते ही सितारे भी चमक जाते है-सुधीर बल्लेवर 'मलंग'

५३.हो अगर दिल में उजाले तो ग़ज़ल होती है-एजाज़ शेख

५४.दिल तो टूटा है दिल लगाने से-उमाशंकर

Monday, December 15, 2025

माझेच गीत आले ...


     


या गझलच्या बंदिशचा बेस तसा #मधुवंती​ राग आहे.दादरा तालातील ही बंदिश शेवटच्या म्हणजे सहाव्या मात्रेपासून सुरू होते.सुरवातीच्याच 'काही' या शब्दातील 'का' या अक्षरावरील खटका ऐकणाऱ्यास आकर्षित करून घेतो.दुसरा मिसऱ्यातील 'माझेच गीत आले' यातील 'आले' या शब्दाला घेऊन तार रिषभावरून कोमल गांधारपर्यंत उतरतानाच्या सुरावटीत मधुवंतीमध्ये नसलेला कोमल (शुद्ध) 'मध्यम' आल्यामुळे शब्दासोबतच सुरावटही चमत्कृतीपूर्ण झाली आहे,तसेच 'पाळीत रीत आहे' या ओळीतील 'रीत' या शब्दावर कुठे कुठे कोमल मध्यम घेतल्यामुळे 'पटदीप' रागाचा पण भास होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या शेरात कोमल धैवतही अचानक हजेरी लावून गेल्यामुळे शेरांची रंगत वाढली आहे.दुसऱ्या शेरातील #मैफिलीचा​ शब्दावरील  वेगवेळ्या सुरावटी मूळ मधुवंती बाजूलाच ठेवतो.तरी पण पूर्ण बंदिश मधुवंतीच्या आसपास रुंजी घालताना दिसून येते.

【धून तयार झाल्यानंतरच हे विश्लेषण आहे.धून तयार होताना कोणत्या 'धुनकीत' असतो ते मलाही कळत नाही 😊.】

                   गझल

काहीं न बोलण्याची राखून रीत आले

माझ्या समोर आता माझेच गीत आले. 


एकेक घाव माझा आता भरून येई

हे कोण चांदण्याचे टाके भरीत आले


केलास का असा तू बेरंग मैफिलीचा

आता कुठे जराशी मीही लयीत आले


सांगू कशी तुला मी आले कुठून येथे

आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले


ज्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला

आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले

                         ■

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड).सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.


दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

कलंदर


 

Saturday, December 13, 2025

यवतमाळची शकुंतला

 .                        #जगत_मी_आलो_असा                                                           लेखांक ८                   

      शीर्षक वाचून तुम्हाला दुष्यंताची शकुंतला आठवली असेल.ती ही शकुंतला नाही.ही आमची यवतमाळची 'आगीनगाडी' होय.रंभेच्या मुलीचे रक्षण शकुन पक्षाने केले म्हणून दुष्यंताच्या शकुंतलेचे नाव शकुंतला पडले.काही काळ दुष्यंताला  शकुंतलेचा विसर पडला होता ही कथा सुद्धा आपणास माहीत असेलच.अशी ही शकुंतला  पुराणात वर्णन केल्याप्रमाणे सुस्वरूप,देखणी कण्व ऋषींच्या आश्रमात वाढलेली वगैरे वगैरे... पण जिला रंग ना रूप अशा यवतमाळच्या 'यवतमाळ ते मूर्तिजापूर' चालणाऱ्या छोट्या (नॅरो गेज) आगीनगाडीला (आगीनगाडी कसली ढक्कलगाडी म्हटले तरी चालेल.) शकुंतला हे सुंदर नाव देणाऱ्या यवतमाळकर रसिकास दाद द्यावी लागेल.ही गाडी इंग्रजांच्या काळात क्लिक निक्सन अँड कंपनीच्या माध्यमातून २५ डिसेंबर १९०३ मध्ये जिल्ह्यातील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरला पोहोचवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली होती. यवतमाळ रेल्वे स्टेशनचा कोड आहे ytl. येथे दोन प्लॅटफॉर्म आहेत.पण विना शेड! (सध्या नवीन रेल्वे स्टेशनचे काम सुरू असल्याचे  कळते.खरे खोटे सरकारला माहीत.)


     तर मित्रहो, ही गोष्ट आहे १९६५ ते १९७० च्या दरम्यानची.बोरी अरब जवळील लाडखेड येथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. लाडखेड हे यवतमाळ मूर्तिजापूर रेल्वे मार्गावर असल्यामुळे सर्व लवाजमा घेऊन 'शकुंतले'ने लाडखेडला गेलो.त्यावेळी शकुंतलेला वाफेचे इंजिन होते.कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी शकुंतलेनेच यवतमाळला निघालो. यवतमाळ जवळच्या लोहारा या गावापर्यंत आल्यावर गाडी आचके देत थांबली.ती सुरूच होईना.चौकशीअंती (ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार) बॉयलर थंड झाल्याचे कळले.बऱ्याच प्रयत्नानंतर अर्ध्या तासाने गाडी धकली, पण थोडे दूर जात नाही तो पुन्हा थांबली.पुनः चौकशी केली असता 'गाडीत बिघाड झाल्यामुळे केव्हा सुरू होईल होईल हे सांगता येत नाही' असे उत्तर आले.गाडी ना धड लोहारा गावत ना धड यवतमाळात.(या परिस्थितीमुळे 'ना घर के ना घाट के' म्हणजे काय ते कळून आले.) लोहारा ते यवतमाळ अंतर तसे तीन साडेतीन किलोमीटर.गाडी चालती असती तर दहा/पंधरा मिनिटात यवतमाळला पोहोचलो असतो.पण एवढ्या अंतरासाठी शकुंतलेने अख्खा एक तास घेऊनही मधेच मुक्काम ठोकला.सायंकाळ होत आली होती.रात्री पुनः यवतामाळातच कार्यक्रम होता.गाडी अशा ठिकाणी थांबली होती की, दुसरे कुठलेही वाहन मिळणे शक्य नव्हते.काय करावे कोणालाच सुचेना.बराच खल झाल्यावर सगळ्यांनी आपापली वाद्ये घेऊन रुळा रुळाने चालत रेल्वे स्टेशन गाठायचे व तेथून टांग्याने गावात आमच्या (ऑर्केस्ट्राच्या) रूमवर जायचे ठरले.गायक मंडळी आपापले गळे घेऊन निघाली.बाकी वादक मंडळी पण आपापले वाद्य घेऊन चालू लागली.या प्रकरणात बासरीवाला मजेत होता.सगळ्यात गोची माझी होती.कारण अकॉर्डियन...! तेही अवजड असे पियानो अकॉर्डियन.तबलेवाल्याने तबल्याची झोळी खांद्यावर घेतली.बॉंगोवाल्याने बॉंगो एका हातात घेतला.

कोंगोवल्याची पंचाईत झाली.त्याने सरळ ते धूड डोक्यावर घेतले.ते पाहून मीही अकॉर्डियनचे धूड डोक्यावर घेतले.व सगळेजण 'हर हर महादेव' म्हणत रस्त्याने (रुळाने) लागलो. यवतमाळच्या चौकीजवळ (सध्याचे दर्डा नगर) आल्यावर आमची 'वरात' पाहून आंबटशौकीन रसिक जमा होऊन गंमत बघायला लागले.आम्हाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.पण इलाज नव्हता. कसे बसे स्टेशवर पोहोचलो व तेथून टांग्याने ऑर्केस्ट्राच्या खोलीवर! आयुष्यात पाहिल्यांदा या गाडीत बसलो.त्यानंतर बॉयलरचा धसका घेऊन पुनः प्रवास करण्याची हिंमत केली नाही.

--------------------------------------------------------------------

दि.१४ डिसेंबर २०२५ दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.



Thursday, December 11, 2025

अशी गावी मराठी गझल

● कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील #प्रख्यात_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी. प्रसिद्ध मराठी कवी #कलीम_खान  यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा "#अशी_गावी_मराठी_गझल" 
हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला. इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर कदम आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत. नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.

-डॉ.अजीम नवाज राही-
दै.सकाळ,नागपुर.दिं.११/११/२००९

------------------------------------------------------
         #मराठी_ग़ज़लें_भी_उर्दू_की_तरह_मधुर_होती_हैं
● इंदौर की इस अनोखी गजल निशा के दुसरे आकर्षण थे कलीम खान। सुधाकर कदमजी के संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ठ अंदाज मे कर उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया।

-प्रभाकर पुरंदरे
दै. चौथा संसार,इंदौर
डिसेंबर १९८९
------------------------------------------------------
 ● त्यांना (कलीम खान यांना) गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गझल मैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. 

-अमोल शिरसाट
दै.अजिंक्य भारत,गझलयात्रा स्तंभ
३ मार्च २०२१


 

माझी कविता...


 

काही भिकारड्यांना दिलदार मानले मी...


 

माझी मस्ती,माझे जगणे...


 

माझी कविता


 

गझल


 

Tuesday, December 9, 2025

तुझे तुला जगायचे...

 


हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे

गझल आणि संगीत गझलगंधर्व सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे

Sunday, December 7, 2025

सुरेश वाडकर,सुधाकर कदम ...ध्वनिमुद्रण,आजिवासन स्टुडिओ,

 



सुरेशजींसोबत काम करण्यात मजा येते. हा व्हिडीओ त्याची साक्ष आहे. #सुरेश_वाडकर  #सुधाकर_कदम

सांजवेळी


काय होते या मनाला सांजवेळी

ही उदासी दाटते का सांजवेळी


येत नाही गीत ओठी नेहमीचे

आसवेही मूक होती सांजवेळी


प्रेम केले हाच का माझा गुन्हा, 

एकटी मौनात जळते सांजवेळी


दूर कोठे सूर उठता बासरीचा

होत जातो दर्द गहिरा सांजवेळी


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.

तुझ्या रूपाचा गुलाब ताजा...

तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे
अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे...

उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची
क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे

कधीच नाही मला भेटली रूपगर्विता वसंतसेना
तरी कुणाची हिरवी सळसळ आयुष्याच्या बनात आहे

गायक - मयूर महाजन 
शब्द - म.भा.चव्हाण
संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,निगडी,पुणे.


 

The pioneer gazal singer in Marathi.

 वर्ष १९८१

     बॅ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे कॉटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या कॉटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाला मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.


     त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.


    त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.


     १९८१ मध्ये ’#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’#गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’#Out_Standing_Young_Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’#Pioneer_in_the_introduction_of_MARATHI_GAZALS' असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?


     मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी स्वतः सुरेश भट तर कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "#अशी_गावी_मराठी_गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष,महाराष्ट्र साहित्य परिषद) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह,म.सा.प.).


     यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले.या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ ऑक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.


"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...


१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......... ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-#मस्त_कलंदर

१४.१०.२०११




Friday, November 21, 2025

म.सा परिषद, पिंपरी चिंचवड तर्फे सत्कार...

महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष श्री राजन लाखेंच्या हस्ते सत्कार स्वीकारताना...१५/११/२०२५

 

म.सा.प.पिंपरी चिंचवड कार्यक्रम...



'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे '

'गाऊन सोसले मी, सोसून गायिले मी 
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी... '

ह्या गझला आहे गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या, तर

'लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला 
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला... '

ही गझल आहे गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची. अशा एकाहून एक सरस गझलांनी रंगलेल्या मैफलीत रसिक वृंद न्हाऊन निघाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी' हा संगीतमय कार्यक्रम निगडी येथील साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहात संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. सुनीता बोडस यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली.
आयुष्याच्या वाटचालीत येणारे अनुभव, सुख दुःखाच्या विविध भावना असलेल्या आशयपूर्ण रचना गायक मयुर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी सहकलाकार मुकुंद पेटकर (हार्मोनियम), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला), आशिष कदम (की बोर्ड) यांनी साथ दिली. सदर कार्यक्रमात ईला पवार यांचा त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.
राजन लाखे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि चोखंदळ रसिकांचे आभार मानले.


 

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा...

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा

का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ?
हे असे न व्हायचे  बोलणे पुन्हा पुन्हा

माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा

दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे  हासणे पुन्हा पुन्हा

सांग एकदा मला ही तुझी कशी  कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा

गायक - मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे.

शब्द - ज्योती राव ( बालिगा )

सहकलाकार - मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.



 

सरगम तुझ्याचसाठी...

                       सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
                       गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी

व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रीये तुझ्याचसाठी

घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रीये तुझ्याचसाठी

सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रीये तुझ्याचसाठी

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 

तुझे तुला जगायचे...



हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन 
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 .

Sunday, October 26, 2025

अक्षरवेध (सुरेश भट विशेषांक) दिवाळी अंकाचे प्रकाशन.महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.संपादक-राजन लाखे.●माझे_मनोगत.

 

  


   



                 आणि 'अक्षरवेध' मधील लेख

.                          ●सुरेश भट आणि मी●

 

          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७-७८ ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. (नंतर याच गझलच्या बंदीशीवरून मला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' ही उपाधी पण दिली.) त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. दहा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदिशी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा #अशी_गावी_मराठी_गझल सुरु झाला.

 

      या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 


       भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का?" या वेळेपर्यंत ८ वाजले होते. ९ वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे १० वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला व जेवण वाढायला सांगितले.आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.


- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.

         विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर

‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.

‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.

‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.

‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.

‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.

अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.

 मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हा शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा." यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू? तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. १९८२ पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘#गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदार्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.

       आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना १९८१-८२ च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी ६ वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.

       सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील ६५ च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.

         आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छा-अच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

 

-सुधाकर कदम

सी-१-सी/१३,गिरीधर नगर,

वारजे-माळवाडी,पुणे-५८.

 मोबा.8888858850


(● हा लेख माझा वैयक्तिक अनुभवाचा ठेवा आहे. यातील कुठल्याही घटनेचा उल्लेख कुणी स्वतःच्या लेखात करण्या अगोदर परवानगी घेणे आवश्यक.)


◆ ज्या गझलच्या बंदीशिवरून 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' ही उपाधी सुरेश भटांनी दिली,त्या गझलची युट्युब लिंक.

https://youtu.be/pnu2_4bjcPE?si=KlXN9J8e3d02sgUD

Tuesday, September 9, 2025

रे मना, तुज काय झाले सांग ना!


  


   दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.

      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)

       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   

(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 

शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  

'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  

धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.

     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे! 

     बिलासखानी रागावर आधारित एक माझेच गीत २०१८ मध्ये स्वरबद्ध केले होते..स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे '#रे_मना!

https://youtu.be/kCYnWcTeP5o?si=6fFq1WZ2B0p86xTu


                 #मैफल 


रे मना, तुज काय झाले सांग ना!

का असा छळतो जीवाला सांग ना!


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवळतो तू सांग ना!


सूर लावून गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना!


गीत/संगीत - सुधाकर कदम

गायक - मयूर महाजन

तबला - किशोर कोरडे

सरोद -नितीश पुरोहित




Tuesday, August 19, 2025

गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र...डॉ.श्रीकृष्ण राऊत



मित्रहो,

गझलेच्या आकृतिबंधाची सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक सुरेश भटांना लिहायचे होते.या संदर्भात आमची अनेकदा चर्चा झाली होती.'#गझलनामा ' असे त्या पुस्तकाचे शीर्षकही त्यांनी निश्चित केले होते. पण पुस्तक लिहिण्याएवढी सवड आयुष्याने त्यांना दिली नाही. तो ड्रिमप्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम नियतीने मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत याचेकडून करवून घेतले. पुसदच्या संमेलनात दि.१७ ऑगस्ट २५ ला नुकताच प्रकाशित झालेला 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र ' हाच श्रीकृष्ण राऊत याचा तो ग्रंथ होय.

      श्रीकृष्णाचा गझललेखनाचा अनुभव प्रदीर्घ आहे. तेवढाच त्यांचा छंदःशास्त्राचा व्यासंगही दांडगा आहे.या ग्रंथात त्यांने संस्कृत छंद:शास्त्र आणि फारसी छंदःशास्त्राची केलेली तौलनिक चिकित्सा हे त्यांचे मौलिक योगदान आहे.गझललेखनातील अनेक बारकावे जसे की, वृत्त निवडताना घ्यावयाची दक्षता, वृत्तामधील यतिस्थान, वृत्तातील लवचिकता, वृत्तात उपयोजिलेल्या शब्दांच्या उच्चाराची ओढाताण ह्याबद्दल त्यांनी सोदाहरण केलेल्या सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. काफियांचे प्रकार, काफियांची पुनरावृत्ती,काफियांचे दोष या विषयी त्यांनी केलेले वस्तुनिष्ठ विश्लेषण मराठी गझलेला समृद्ध करणारे आहे. सुबोध भाषा हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. गझल ह्या सशक्त काव्यप्रकाराबाबत नवोदित आणि ज्येष्ठांच्या मनात अनेक शंका येतात, उदा. मात्रावृत्ते, स्वरकाफिया, दीवान इ. अशा शंकांचे निरसन करणारा हा ग्रंथ, गझलप्रेमी, गझलकार, गझल अभ्यासक या सर्वांसाठीच अत्यंत मौलिक ठरणार आहे. तसेच ज्यांना गझल लिहिण्याचं वेड असते आणि ज्यांचे खयालही दर्जेदार असतात परंतु कुठेतरी ज्यांच्यापुढे गझल-व्याकरणाच्या मापदंडावर गझल खरी उतरली आहे की नाही असा संभ्रम जेव्हा उपस्थित होतो,त्या सर्व गझल लिहिणाऱ्यांसाठी सुस्पष्ट दिशा दाखविणारा आहे.

     मराठीमध्ये छंद:शास्त्राच्या उपयोजनाच्या अंगाने सांगोपांग व सुस्पष्ट असे लेखन आजवर क्वचितच झाले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (सन १९२७) डॉ. माधवराव पटवर्धन (कविवर्य माधव जुलियन) यांनी प्रथमच “#छंदोरचना” हा ग्रंथ लिहून मराठीला छंद:शास्त्राची भक्कम परंपरा दिली.त्यामुळे गझल या प्रकाराचा परिचय मराठीत करून देण्याचे श्रेय डॉ. माधवराव पटवर्धन यांना जाते. नंतर कविवर्य सुरेश भट यांनी या प्रकाराला नवे व्याकरण, नवी अभिव्यक्ती आणि लोकमान्यता दिली. मात्र, त्यांनी अपेक्षित स्वरूपातील उपयोजित छंदशास्त्र प्रत्यक्षात उभे करू शकले नाहीत.त्याची कमी श्रीकृष्णाच्या या  ग्रंथाचे भरून काढली आहे.

     या ग्रंथात कुठेही अवघड किंवा किचकट शास्त्रीय मांडणी नाही. सोप्या, सरळ आणि सुस्पष्ट भाषेत गझलेच्या अंतरंगाबरोबरच बहिरंगाचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मूल्य अधिकच वाढते. पूर्वसूरींचा मान ठेवूनही श्रीकृष्ण राऊत याचा हा ग्रंथ समकालीन गझलकारांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.


-गझलगंधर्व सुधाकर कदम

सी१सी/१३,गिरीधर नगर

मुंबई बंगलोर महामार्ग

वारजे माळवाडी

पुणे ४११ ०५८

मोबाईल ८८८८८५८८५०

--------------------------------------------------------------------------

□ गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र 

( मराठी गझलेचे व्याकरण )

□ लेखक : श्रीकृष्ण राऊत

□ स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे 9890811567

□ मुखपृष्ठ : सतीश पिंपळे, अकोला 9850199323

□ प्रस्तावना : डॉ.अविनाश  सांगोलेकर

□ पाठराखण - सुरेशकुमार वैराळकर,

□ पृष्ठे : २७६

□ किंमत : ४००/-

□ पोस्टेज : ६५/-

□ गुगल पे / फोन पे :9284253805

□ व्हॉटसअप नं. 8668685288

Friday, August 15, 2025

श्रीकृष्ण राऊत यांना हार्दिक शुभेच्छा!

दि.१७ ऑगष्टला पुसद येथे संपन्न होत असलेल्या गझल मंथन साहित्य संस्थेच्या एक दिवसीय विदर्भ स्तरीय गझलसंमेलनाचे अध्यक्षपद माझा जिवलग मित्र डॉ.श्रीकृष्ण राऊत भूषवत आहे.त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच याच संमेलनात श्रीकृष्णाने गेली २५ वर्षे अत्यन्त परिश्रम घेऊन लिहिलेल्या #गझलेचे_उपयोजित_छंदशास्त्र (मराठी गझलेचे व्याकरण) ह्या अत्यन्त महत्वाच्या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे.त्याबद्दल त्याला आणि गझल सम्मेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा! 
                                🌹💞🌹


 

तुझ्यासाठीच मी...राग यमनपर आधारित मराठी गझल

●अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल प्रकाशन,
'#संगीत_कला_विहार', अगस्त २०२५.#राग  #यमन

     यमन राग के नाम के बारे में कई सारी भिन्न भिन्न राय हैं। कुछ लोग इसे फारसी भाषा के 'इमन' का यमन में हुआ बदलाव मानते हैं। उसी तरह यह राग अमीर खुसरो नाम के अल्लाउद्दीन खिलजी के समय के विद्वान संगीतकार ने प्रचलित किया है ऐसा भी माना जाता है। यह बात निश्चित है कि खुसरो के समय में नये नये राग प्रचार में आ गये। इन में फारसी, इरानी सुरावटें और भारतीय रागों का मिलाप हो गया था। गोपाल नायक यह संगीत का एक बड़ा विद्वान खुसरो का समकालीन था। दक्षिण के पंडित यमन राग यह 'यमुना कल्याण' राग का एक प्रकार समझते है। इस नाम का उल्लेख दक्षिण के ग्रंथों में भी है लेकिन यमुना कल्याण और यमन इन दो रागों में नाम के सिवा और कोई भी समानता नहीं है। भातखंडे जी ने लिखे हुए उत्तर भारतीय संगीत शास्त्र इस ग्रंथ में यह राग कल्याण ठाटसे उत्पन्न हुआ है ऐसा लिखा है, लेकिन भातखंडे जी का पुरा आदर करके में यह कहना चाहता हूं कि इसका भी कुछ आधार नहीं है। (मेरी बात कई लोगों को पसंद नहीं आयेगी) लेकिन पुराने ग्रंथों में भी यमन नाम के राग का कहीं भी जिक्र किया हुआ नहीं दिखाई देता है। और किसी एक शब्द से इस राग का नाम आया है ऐसा भी लगता नहीं क्यूँ कि राग निर्मिती यह एक प्रक्रिया आहे. जो अचानक से होनेवाली नहीं है।

     कुछ लोग इसे यमन कल्याण भी बोलते हैं लेकिन इस में भी कुछ खास अर्थ नहीं है। यमन राग में विवादी सुरों की तरह कभी कभी कोमल मध्यम लगाने से वह यमन कल्याण हो जाता है। इसे भी किसी ग्रंथ का आधार नहीं है। इस प्रकार एक स्वर बदल कर या एक सूर जादा लगाकर या फिर विवादी के स्तर पर किसी अलग सूर का प्रयोग करके वह प्रचलित करना ऐसे कई उदाहरण हमें दिखाई देते हैं लेकिन वो सब छोड़ दिजीये। इसके बावजूद भी यमन राग बहुत लोकप्रिय है इसमें कोई संदेह नहीं। मैं तो इसे 'पैदाइशी अमीर' राग कहता हूं। इस पर अगर लिखा जाये तो सुरज, सागर, अवकाश या धूमकेतू पर लिखने जैसा है। इतना बड़ा विस्तार रखनेवाला दूसरा कोई राग मैंने कभी देखा नहीं। वैसे भी मेरी राय के मुताबिक 'कल्याण' नहीं, बल्कि यमन यही ठाट होना चाहिये और इसे ही शुद्ध ठाट की मान्यता मिलनी चाहिये थी। क्यूंकि इसमें सात ही स्वर शुद्ध याने तीव्र है। शुद्ध ठाट कहलाने जानेवाले बिलावल ठाटके कोमल मध्यम और कोमल निषाद का उपयोग विद्यार्थियों को सोचने पर मजबूर कर देता है।

(शास्त्र के नाम पर यही सिखाया जाने के कारण उस पर कोई बातें नहीं बनाता, यह बात अलग। वैसे भी बोलने से फायदा क्या? परीक्षा में वहीं लिखना पड़ेगा नहीं तो गुण कम हो जायेंगे।) लेकिन यमन के बारे में ऐसा संभ्रम नहीं होता।

◆ शास्त्रीय जानकारी

    पिछले 200 से लेकर 250 बरसों तक चलते आ रहे उत्तर भारतीय संगीत शास्त्र के अनुसार यमन राग कल्याण ठाटसे उत्पन्न हुआ है। वादी स्वर गांधार और संवादी स्वर निषाद है। जाती संपूर्ण है और गान समय रात का पहला प्रहर है। गान समय पर मैंने इससे पहले भी संक्षेप में लिखा हुआ है. लेकिन इस बार विस्तार से लिख रहा हूं। देखा जाये तो राग का गानसमय कौन सा होना चाहिये यह तय करने के लिए कोई भी नियम प्राचीन ग्रंथों मे लिखे हुए नहीं है। फिर भी राग का गानसमय निश्चित कर दिया गया है। इसका कारण क्या है. पता नहीं। जहां प्राचीन ग्रंथों में रागों के नाम और आज के रागों के नाम में समानता नहीं है. सुरो ने समानता नहीं है. वहां गान समय किस प्रकार से और कौन निश्चित करेंगे? कुछ तो शास्त्रीय नियम होने चाहिए, इसलिये उन्हें जारी करना इससे ज्यादा इसमें कोई अर्थ नहीं दिखाई देता। किसी भी मनुष्य ने गाना कब गुनगुनाना है और क्या गुनगुनाना है यह बात किसी और ने निश्चित करने से क्या हासिल होगा? अभी जो ठाट पद्धती चल रही है, उसके बारे में सोचा जाये तो मधुवंती जैसा राग ठाट पद्धती में गाना असंभव है। फिर दस से बढ़कर ग्यारह ठाट करके उस ग्यारहवे ठाटको अगर मधुवंती नाम दिया जाये तो क्या बिगडेगा? लेकिन नहीं, दस ठाटों में ही किसी भी तरह से तोड़ मरोड़ के सभी रागों को उसमें ही बांधना... यह थोडा निसर्ग नियमोंसे हटकर लग रहा है। हिंडोल, गौडसारंग, तोडी, मुलतानी इन रागोंमें तीव्र मध्यम है और इन्हें दिन में गाये जानेवाले रागों की मान्यता दी गई है। नियम के अनुसार देखा जाये तो तीव्र मध्यम होनेवाले राग केवल रात के समय ही गाये जाने चाहिये। एक और ऐसा भी नियम है कि 'ग' 'नी' कोमल होनेवाले रागों में तीव्र मध्यम होता ही नहीं। फिर कोमल ग और नि के साथ तीव्र म होने वाले सुरावटके राग को मधुकंस कैसे कहा जाता है? सच में देखा जाये तो राग के गाने के नियमों को बहुत पहिलेसे ही बाजूमेही रखा है, यह हमें 'दर्पण' इस ग्रंथ के-

"यथोत्काल एवैते गेया पूर्विधानतः ।
राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् ।।

और 'तरंगिनी' इस ग्रंथ के

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानभीरीतम्। 
रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते ।।

साथ साथ श्रीमान बॅनर्जी के 'गीत सूत्रसार' (Grammer of vocal music) ग्रंथ के 58 पच्चे पर उन्होंने लिखा है...

"हमारे यहाँ राग रागिनीयों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है, वह केवल काल्पनिक है।"

      इससे भी गान समय प्रथा में जो खोखलापन है वह साफ साफ दिखाई देता है। देखा जाये तो स्वरसमुदाय में ऐसी कोई विशेषता नहीं है कि जिसके लिए उन्हें कुछ खास समय के लिये न गाने से सुयोग्य परिणाम नहीं मिल जाता। संगीत का उद्देश सुरों के द्वारा भावना व्यक्त करके श्रोताओं का मन प्रसन्न करना केवल इतना ही है। इसका अर्थ यही है कि इसके लिये किसी विशिष्ट समय की कोई आवश्यकता नहीं है। जो भाव सुबह के समय व्यक्त हो सकते हैं या व्यक्त कर सकते हैं, वे शाम या रात के समय क्यूँ नहीं कर सकते? बिलकुल कर सकते हैं, सकना ही तो चाहिये। 'पारिजात' इस ग्रंथ में भूपाली राग सुबह के समय गाया जाता है ऐसा जिक्र है लेकिन आजके समय में वह रात्र कालीन माना जाता है।

(घनश्याम सुंदरा... यह भूपाली राग की धुन सुबह बहुत मधुर लगती है ना? सुबह के अहिर भैरव राग का 'पूछो ना कैसे मैने रैन बिताई'... यह चित्रपट का गाना रात को मन मोह लेता है ना?)

दक्षिण भारत में यमन राग सुबह के समय और भैरवी रात के समय गायी जाती है। लेकिन कुछ लोगों की राय ऐसी है कि ललित, रामकली, तोडी ऐसे राग शाम के समय गाने से गानसिद्धी बहुत अच्छे तरीके से हो जाती है। इसका मतलब यह है कि गान समय यह प्रकार याने लोगों पर बिना वजह डाला हुआ बोड़ा है। स्वर आखिर स्वर ही होता है, राग आखिर राग ही होता है, किसी श्री समय गा लेने से उसका परिणाम उतनाही असरदार होता है।

     ये बाकी चीजें छोड दिजीये, क्योंकि सच्चाई यह है कि यमन राग किसी भी हाल में सभी का पसंदीदा राग है। इसकी विशेषता यह है कि प्रतिभाशाली गायक, वादक और संगीतकारों पे यह बहुत कम समय में प्रसन्न हो जाता है और उन्हें मनचाहा वर भी दे जाता है। लेकिन अगर कोई इसमें यहाँ वहाँ भटक गया तो उसका मजाक उड़ाया जाएगा यह बात तो तय है। आपको अगर यमन गाना आ गया तो बाकी सब राग आप गा सकते हैं ऐसा बुजुर्ग लोक कहते हैं। इस राग को गाया नहीं ऐसा एक भी गायक या बजानेवाला ढूंढना केवल ना मुमकिन है. इतना यह मधुर है। भारत में सभी भाषाओंमें मिला कर जितने गाने इस राग में बने हैं, उतने गाने किसी अन्य राग में अब तक नहीं तय्यार हुए। सुगम संगीतकारों के लिए तो यह राग एक वरदान की तरह है। मन की किसी भी भावनाको इस राग के द्वारे हम पुरी ताकत से व्यक्त कर सकते हैं, इतनी क्षमता राग यमन में है। यह एक संगीतकार के नाते में विश्वास के साथ कह सकता हूं।

     मैंने की हुई यमन रागकी विविध मूड़ की रचनाओं पर कोल्हापूर के संगीत समीक्षक एडवोकेट राम जोशीजी (जो आज इस दुनिया में नहीं हैं) के एक लेखांक का छोटासा हिसा यहाँ प्रस्तुत करने का मोह में नहीं टाल सकता।

जोशी जी कहते हैं.....

यमन यह ऐसा राग है कि हर कोई संगीतकार उससे मोहब्बत कर बैठता है। कदमजी भी उससे कैसे परे होंगे? उन्होंने यमन राग में बहुत ज्यादा रचनाएं प्रस्तुत की है लेकिन फिर भी हर एक रचना स्वतंत्र है. अलग है, वो किसी एक छप्पे में से निकली हुई भगवान की मुर्तियां नहीं है। हर एक धून को उसका अलग चेहरा है, रंग है, रूप है, व्यक्तित्व है। किसी भी कार्यक्रम की शुरुआत वे खुद के लिखे इस काव्य से करते हैं।

'सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी 
गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी'

दादरा की इस बंदिशकी यमन राग में यह रचना एकदम सिधीसाधी। सुगम संगीत में, शास्त्रीय संगीत के व्याकरण और नियमों को कोई भी स्थान नहीं। यहाँ केवल अपेक्षा है कि जो कुछ भी कानों पर पड़ता है उसमें सुंदरता, मधुरता और मोहकता होनी चाहिये। इसलिये यह बात सरल है कि यहाँ शुद्ध यमन खोजने का प्रयास मत कीजिये। क्यूंकि वह यमन, कल्याण के साथ पलभर में दोस्ती कर लेता है और जब इन दोनों ही माध्यमों के हलके से मिलाप की नजाकत जब समझ में आती है, तो बिना झिझक़ उसे दाद दिए बगैर और कुछ श्रोताओंके हाथों में नहीं रहता। यह अनुभूती मैंने उनके हर एक यमन में ले ली है और हमेशा लेता रहूंगा।

मी असा ह्या बासरीचा सूर होतो, 
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो'

इस गजल की धुन भी उसी तरह की है। धृपद की दुसरी पंक्ती जिसे क्रॉस लाईन कहा जाता है, उसकी रचना और स्वर समूह की रचना बहुत ही मधुर है। उस में 'सूर होतो' यहाँ पर तीव्र सप्तक के षड्‌ज सूरका इस शब्द के लिए इतनी नजाकत से उपयोग किया ही है, साथ ही वह पंक्ती गाते समय 'सूर' यह शब्द और तीव्र षड्‌ज का हलका लेकिन फिर भी ठोस लगाव और रूपक ताल का एक पुरा ज्यादा आवर्तन पूर्ण होने तक जो लंबे रामय तक ठहर जाता है वह अतिसुंदर लगता है। संगीत रचनाकार के पास केवल सांगीतिक अलंकारोंका खजाना होने से काम नहीं चलता बल्की सूर के पोशाख को अच्छा लगे ऐसा केवल एकही अलंकार संगीत का श्रवण सौंदर्य बढ़ाता है। संगीतकार सही मायने में खुद की रचना खुद के पुरे सामर्थ्य के साथ और अपेक्षित परिणाम के साथ गा सकता है। यह अनुभव मास्टर कृष्णराव से लेकर सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम यशवंत देव इन सभी के साथ महसूस होता है। सुधाकर कदम खुद गायक होने के कारण वे भी इस बात को अपवाद नहीं है। 'सूर होतो' यहाँ पर शब्दकला और स्वर मधुरता इन दोनों के एक अनोखे, सुंदर मिलाप का अनुभव आता है।

'सांज घनाच्या मिटल्या ओळी'

यह भी एक बहुत ही कोमल भावनाओंको खोलकर दिखानेवाली सुंदर काव्यरचना है। कदमजी ने बंदिश भी यमन में ही बांधी है। इसकी क्रॉस लाईन के आखिर में 'क्षितिजावरती' यहाँ पर उन्होंने नि और कोमल ऋषभ का बहुत ही कुशलतापूर्ण उपयोग करके यमन की पुरी व्यक्तिरेखा बदल डाली है। इतना ही नहीं, उस ऋषभ की योजना के कारण 'क्षितिज' इस शब्द का अर्थ प्रतीत करने के लिए कोमल रिषभ को अन्य कोई पर्याय नहीं है यह तुरंत ही समझ में आता है। पुरीया रागका इसमें होनेवाला दर्शन और साथ ही अंतरे के बाद आनेवाली सुरावट यह सब बहुत अच्छे तरीके से मेलजोल खाती है। सुप्रसिद्ध कवी अनिल कांबलेजी के-

'जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू
ऐनवेळी अशी काय करतेस तू'

सुनाई। लेकिन खासियत यह है कि उससे वही धून इस गीत की तर्जभी यमन में ही बांधी है। यमन की बहुत ही चुलबुली स्वररचना खेमटा के अंग से लगनेवाला दादरा का ठेका, लय थोड़ी उड़ती उड़ती और इसलिये उसे विशिष्ट अर्थ देनेवाली, इस गीत को बहुत सही न्याय देती है। सौंदर्य स्थलोंका निर्देश करने की इच्छा हो तो 'ऐनवेळी अशी काय' इस पंक्ती की अधीरता दर्शाने के लिये बहुत ही सुयोग्य ऐसी स्वर समूह रचना करना बिलकुल ठीक होगा। 'सामग, सामगधप आदी का आनंद अपने आप ही अनुभव करने योग्य है। 'तुझ्या नभाला गडे किनारे' यह भी यमन की एक श्रवणीय रचना है। यमन इस एकही राग की चारों रचनायें उन्होंने मुझे एक के बाद एक सुनाई।लेकिन खासियत यह है कि उसमे वही धुन 
बार बार नहीं दोहराई है। स्वर रचना एक जैसी बिलकुल भी नहीं है, उसमें एक अलगपन है, जो किसी भी श्रेष्ठ संगीत रचनाकार की विशेषता मानी जाती है। सुगम संगीत में आकर्षक मुखड़े को याने धृपद को विशेष महत्व है। कदम जी की स्वररचनाओं के मुखड़े बहुतही आकर्षक होते हैं। उससे भी ज्यादा कुशलता और महत्व होता है, वह मुखड़े के बाद आनेवाले क्रॉसको। क्यूंकि संगीत रचना की आकर्षकता का वह प्रमुख स्थान है। मुखड़े की धुन को अनुरूप या फिर उससे भी आगे जाकर उसका सौंदर्य बढानेवाली आरोही पुरी करके अवरोही और षड्ज पर विराम होनेवाली स्वररचना, यह काम बहुत कठीन होता है। अगर ऐसा नहीं होता तो पुरी धून फंस जाती है। कई संगीत रचनाओं में ये दोष दिखाई देते है। संगीतकार को अपनी पुरी बुद्धी यहाँ पर खर्च करनी पडती है। सुधाकर कदम जी की रचनायें इस कसौटी पर पुरी उतरती है और इसीलिए वे मन को मोह लेती है। अंतरे के बाद आनेवाली धुन पहली धुनके हाथ में हाथ डालकर आगे बढ़ती है। किसी अन्य राग को जाते जाते धीरेसे स्पर्श करना याने शहद की अंगुली चखने जैसा बड़ा ही मधुर होता है। अर्थ यही है कि अंतिम पंक्तियां पुरी तरह से हायलाईट का उजाला कर देती है। बिलकुल उसी तरह की स्वररचना भी कदम जी बड़े सामर्थ्य से कर दिखा देते हैं। यमन एक ही, लेकिन उसके रूप हजार, उसके रंग हजार और उसके ढंग भी हजारों और उसकी यह अनोखी अदाकारी जिसे हम मोहजाल या मायाजाल कह सकते हैं, जब हम पर डाला जाता है तब खुद माहीर रसिक होकर भी हम फंस जाते हैं। बाद में समझ आता है कि यह यमनने किया हुआ कपट था लेकिन फिर भी वह कपट बहुत ही मधुर था और मासूम भी था।

     यमन राग अभंग से लेकर लावणी तक के सभी प्रकारों में रंग जाता है या दुसरों को रंगाता है। मराठी भाषा में करीब करीब सभी संगीतकारोंने इसमें स्वररचना की हुई है। अगर उनकीं एक लिस्ट बनाई जाये तो फिर वह एक बडा लेख होगा। फिर भी कुछ रचनाओं का जिक्र किये बिना यह लेख पुरा नहीं होगा।

'घूंदी कळ्यांना...

'का रे दुरावा...'

'पराधीन आहे जगती....

'तोच चंद्रमा...'

'पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा..."

'कबीराचे शेले विणतो...'

'सुखकर्ता दुखहर्ता... (आरती)'

'जिये सागरा धरणी मिळते...'

'जीवनात ही घडी...'

'शुक तारा...'

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या...'

साथही कई नाट्यगीत भी इसमें शामील है। उसने अभिषेकी बुआ का मत्स्वगंधा नाटक के लिये रचा हुआ स्वरशिल्प 'देवाघरचे ज्ञात कुणाला...' हुये बहुत पसंद है। गाया है रामदास कामतजी ने। हिंदी चित्रपट सृष्टी में भी यमन ने धूम मचायी है। सैगल के 'मैं क्या जानू क्या जादू है..." से लेकर आज के 'तुम दिल की धड़कन हो... तक.... इसमें सुंदर सुंदर गीत है।

... 'मन रे तू काहे न धीर धरे.....

'जिया ले गयो...'.

'जा रे बदरा बैरी जा.....

'वो हँसके मिले हमको.....

'पान खाये सैयाँ.....

'इस मोडपर आते है.....

'चंदन सा बदन...'.

'आँसू भरी है.....

जब दीप जले आना....
ऐसे कितने गानोंकी बात करेंगे...?

उर्दू ग़ज़ल में 'रंजिश ही सही....' यह ग़ज़ल याने मिलोंका पत्थर है। साथ में 'वो मुझसे हुये..... 'शाम-ए-फ़िराक...' ये गजलें और 'आज जाने की ज़िद ना करो...' यह फ़रीदा खानम की गायी हुई रचना याने कमाल की उंचाई।
'मरीज़े मुहब्बत...', 'दिलवालों क्या देख रहे हो...' ये गुलाम अली की गजलें अपना अनोखा रंग दिखाती है।
'क्यूँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...' (शोभा गुर्टू), 'तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...' (इकबाल बानो), 'आपका इंतज़ार कौन करे...' (शुमोना राय) ये गजलें भी बहुत श्रवणीय है। उर्दू गझल गायक मेहदी हसन साहबने गायी हुई अहमद फ़राज़ की 'रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...' इस गजल ने लोकप्रियता के सारे झंडे उखाड दिए। (देखा जाये तो यह गीत (गझल) 1972 की 'मोहब्बत' इस पाकिस्तानी फिल्म का है और इसके संगीतकार निसार बज्मी हैं। लेकिन खां साहब ने महफिल में गाकर इस रचना का सोना किया) इस गजल के साथ साथ यमन राग की लोकप्रियता (गजल गायन के संदर्भ में) आसमां को छू गई। पहले से ही मधुर होनेवाले इस राग में फराज साहब के शब्द, खौँ साहब की भरीपुरी मिठी आवाज और उन शब्दोंको जचनेवाली, बिनती करनेवाली बंदिश इस प्रकार का बहुतही उंचे दर्जे का संगम इसमें दिखाई देता है।

     ऐसी ही बिनती मैंने स्वरबद्ध की हुई तुझ्यासाठीच भी इस अलबम के 'तुझ्यासाठीच मी....... इस गजल में आपको दिखाई देगी। (अर्थात सच्चे परीक्षक आपही हैं) ऐसा यह यमन.... तो फिर सुनिए... केवल मध्य और मंद्र सप्तक की यह बंदिश, वैशाली माडे की आवाज में..

तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते
तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

-सुधाकर कदम

हिंदी अनुवादः डॉ. आरती मोने


 





संगीत आणि साहित्य :