मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)
मराठी गझल हा काव्यप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे महान कार्य करणाऱ्या ज्या दोन व्यक्तींची आदराने नावे घेतली जातात, त्यातील एक म्हणजे कविश्रेष्ठ #सुरेश_भट व दुसरे म्हणजे कवी, गझलकार, गीतकार, संगीतकार व स्फुट लेखक 72 वर्षांचे चिरतरुण श्री. #सुधाकर_कदम. दोघेही वैदर्भीय. भट अमरावतीचे तर कदम यवतमाळ जिल्ह्याचे.
दै. हिंदुस्थानच्या "#रंग_गझलेचे" या लोकप्रिय सदरात आज कदम सर प्रथम प्रवेश करीत आहे याचा मला आनंद आहे.
गझल सम्राट स्व.सुरेश भट ज्यांचा उल्लेख 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन "म्हणून करतात त्या सुधाकर कदम यांनी मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रूजविण्यासाठी,व लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. "सुरेश भट स्मृती पुरस्कार तसेच" #गझलगंधर्व " हा किताब प्राप्त कदम सरांचा १९८३ साली "भरारी " हा,पहिला मराठी गझल गीतांचा अल्बम प्रसिद्ध झाला. "#खूप_मज्जा_करू "हा तेरा बालगीतांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे. गुलशन कुमार प्रस्तुत सीडी मध्ये " #अर्चना " या भक्तिगीतांची सीडीही प्रकाशित झाली आहे.गायक सुरेश वाडकर व गायीका वैशाली माडे यांनी स्वरसाज चढवलेल्या "#काट्यांची_मखमल" या मराठी गझल अल्बमला , "#तुझ्यासाठीच_मी "या गीतकार दिलीप पांढरपट्टे यांच्या अल्बमला तसेच बालभारती ,पहिली ते चौथीच्या कविता" #झुला " व कुमार भारती आठवी ते दहावीच्या "झुला"ला सुधाकर कदम यांनी संगीत दिले आहे.वृत्तपत्रातून त्यानी "#फडे_मधुर_खावया "या सदराखाली स्फूट लेखन ही केलेले आहे.
अनेक वाद्य वाजविण्यात पारंगत असलेल्या सुधाकर कदम यानी नागपूर आकाशवाणीचे #गायक व #वादक म्हणूनही काम केले आहे.
त्यांना ' आऊट स्टॅडिंग यंग पर्सन', 'कलादूत', 'समाजभूषण', 'कलावंत', 'शान-ए-ग़ज़ल', 'महाकवी संतश्री विष्णुदास','गझल गंगेच्या तटावर' या व अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अर्चना या त्यांच्या अल्बम मधील भक्तिगीते पंडित शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे यांनी गायिलेली आहेत.
आज त्यांची "घर आहे पण दारच नाही" ही गझल सादर करतो आहे. आस्वाद घ्यावा. प्रतिसाद द्यावा.
दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवा निमित्त झालेल्या मैफलीत गायिलेली
"#हा_असा_चंद्र_अशी_रात_फिरायासाठी" ही सुरेश भटांची गझल, ते १९८१ मध्ये आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना झाली आहे.(त्यांच्या हस्ताक्षरातील ही गझल तारखेसह माझ्याकडे आहे.) बंदिश सुद्धा त्याच काळातील आहे.किरवाणी राग ''बेस' आहे.पण सुरवातीलाच किरवाणीत नसलेला कोमल निषाद आला आहे.पहिल्या शेरातील 'फुलांची वस्ती', दुसऱ्या शेरातील 'रंग', तिसऱ्या शेरातील 'घाव' इत्यादी शब्दांवरील वेगवेगळ्या सुरावटी त्या त्या शब्दांचा अर्थ अधोरेखित करतात.आमच्या चर्चेतून अशा अनेक गझलांना योग्य बंदिशी झाल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" हा उपक्रम आम्ही दोघांनी महाराष्ट्रात राबविणे सुरू केले.असो!
तर प्रत्येक शेर शब्दानुरूप नव-नव्या सुरावटींनी रंग भरत कसा सजविल्या जातो ते ऐका. गायकी माझी,आवाज मयूर महाजनचा आणि बंदीशीची पसंती खुद्द सुरेश भटांची.
नंतरच्या काळात अनेक गझल गायकांनी आपापल्या परीने स्वरबद्ध करून ही गझल गायिली आहे.
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी...
चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती
राहिले कोण अता सांग झुरायासाठी
कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी
नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू
ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी
गायक - मयूर महाजन
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे
●मराठी गझल गायनाच्या सुरवातीच्या काळात हेटाळणी,कुत्सितपणे मारलेले टोमणे वगैरे ऐकत गेलो.मीच नाही तर सुरेश भटांना सुध्दा हेटाळणीला सामोरे जावे लागले.सर्व गान प्रकार शास्त्रीय संगीतामधूनच निर्माण होतात .पण ते 'फेअर' होऊन येतात.शास्त्रीय संगीतामधील सर्व चांगल्या बाबी घेऊन 'सुगम' म्हटल्या जाणारे 'दुर्गम' संगीत तयार होत असते.ते रसिकांना आवडते,कारण ते 'फाईन' होऊन येते.
खरे म्हणजे गझल गायकाला शास्त्रीय संगीत गणाऱ्यापेक्षा जास्ती अवधानं सांभाळावी लागतात.माझे हे वक्तव्य शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांना पटणार नाही.पण ही वस्तुस्थिती आहे.गझल गायकाला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.त्याला साहित्याची जाण म्हणण्यापेक्षा अभ्यास असायला हवा.तो चांगला गायक असणे आवश्यकच आहे.आणि तो चांगला संगीत दिग्दर्शक पण असायला हवा.तरच तो गझल गायक बनू शकतो.माझे हे म्हणणे सुरेश भटांना तंतोतंत पटले होते.म्हणूनच आमची नाळ जुळली.व पुढील इतिहास घडला तो...
रसिकांच्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवणाऱ्या या रचनेची निर्मिती आर्णी गावी म्हणजे माझ्या जिल्ह्यात व्हावी ही किती अभिमानाची गोष्ट आहे.कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांच्या या अजरामर रचनेला त्यांच्या समक्ष दिल्या गेलेली ही लाजवाब चाल आणि नव्या पिढीच्या नवोदित गायकाने चालीचे केलेले सोने या सर्वांचा जुळून आलेला हा योग एका कालातीत सांगीतिक अविष्कारच्या जन्माला कारणीभूत ठरणारा आहे .
दि.१९ एप्रिलला माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी...' या मराठी गीत-गझलच्या मैफलीतील अत्यंत सुंदर अशी गझल...
संपली अजुनी कुठे ही रात सजणा
का असा जातोस तू इतक्यात सजणा
बोलते आहे नव्या स्वप्नासवे मी
हात घे हलकेच तू हातात सजणा
पाहण्यासाठी मला झंकारताना
चांदणे खोळंबले दारात सजणा
मोहराया लागले तारुण्य माझे
दरवळाया लागला एकांत सजणा
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
संगीत - सुधाकर कदम
तबला - डॉ.देवेन्द्र यादव
व्हायोलिन - प्रभंजन पाठक
हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे
की बोर्ड - आशिष कदम
सूत्र संचालन - प्रशांत पेंडसे
● जोग रागाची सुरावट घेऊन आलेली अनिल कांबळे यांनी ही गझल जवळ-जवळ चाळीस वर्षांअगोदर स्वरबद्ध झाली होती.#सरगम_तुझ्याचसाठी या मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझल कार्यक्रमात माझी ज्येष्ठ कन्या भैरवी गायची. या गझलचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोग रागासोबतच दुसऱ्या शेरात सारंग राग आणि पुढे मुर्छनाद्वारे विविध रागांची उधळण केलेली दिसून येते. मूळ रचनेला स्वरांद्वारे विविध प्रकारे सजवणे म्हणजे गझल गायकी...याचा प्रत्यय ही गझल ऐकताना येते.यातील आर्जव गायकीतून दाखविणे ही प्राजक्ताची हातोटी म्हणावी लागेल.
●ही गझल माझ्या आयुष्याची 'टॅग लाईन' आहे,असे मित्रवर्य प्रशांत पेंडसे यांचे म्हणणे आहे.आणि एकार्थाने ते सत्यही आहे.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रा,१९७२ पासून संगीत शिक्षक म्हणून नोकरी,१९८० ते १९८२ सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भ्रमंती.१९८२ नंतर सोलो कार्यक्रम.यात पगार सोडला तर आर्थिक लाभ नगण्य.पण शारीरिक त्रास मात्र भरपूर होत गेला.कदाचित हा त्रास सोसण्यातूनच ही कविता प्रसवली असावी.येताना सुरावट पण घेऊन आली.त्यातही प्रत्येक कडव्यात तीन-तीन यमक जुळवत आली.
मी तर ही कविता गायचोच.पण माझा कनिष्ठ सहोदर प्रशांत कदम अतिशय सुंदर रीतीने गायचा.यातील "प्रिये तुझ्याचसाठी" या ओळीवरून 'ही प्रिया कोण?' अशी विचारणा व्हायची.तर, मित्रहो ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नसून माझी '#मराठी' आहे.
या गझलच्या सादरीकरणा अगोदर शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी आपल्या मनोगतामधून काही महत्वाचे मुद्दे मांडले.तसेच नेटके सूत्र संचालन प्रशांत पेंडसे यांनी केले.
सुरेश भटांच्या हयातीत मी त्यांची जवळ जवळ चाळीस गीते व गझला स्वरबद्ध केल्या होत्या."मी जसा जगलोच नाही" शब्दानुरूप बंदिश झाल्यामुळे त्यांची अत्यंत आवडती व हृदयस्पर्शी शब्दांमुळे माझी आवडती होती/आहे. या गझलची बंदिश मारवा रागात आहे."जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही" या पहिल्या ओळीत षड्जाचा नगण्य वापर केल्यामुळे मारवा रागाची उदासीनता, वरील ओळीचा अधिक अर्थ एकदम रसिकांच्या हृदयापर्यत पोहोचवते.दुसऱ्या ओळीतील 'तुटलो' या शब्दाकरिता आलेला मारव्यात नसलेला 'कोमल मध्यम' आणि त्यासोबत आलेल्या तत्सम सुरावटी तुटलेपणाचा आभास निर्माण करते.त्याचप्रमाणे 'जुळलोच नाही' या शब्दांकरिता तीव्र मध्यमा सोबत आलेला कोमल धैवत 'ती' हतबलता म्हणा,दुःख म्हणा अतिशय प्रखरपणे आपल्यापर्यंत पोहोचवते."वाटले मज गुण गुणावे" या ओळीकरिता यमन रागाचा चपखल वापर करून पुन्हा मूळ रागावर म्हणजे मारव्यावर येणे ही प्रक्रियासुद्धा त्यांना खूप भावली होती.म्हणूनच ही त्यांची अत्यंत आवडती स्वररचना होती.
आज दि.१५ एप्रिल, सुरेश भटांची जयंती... त्या निमित्त ही माझी सांगीतिक श्रद्धांजली!
🌹🙏🌹
जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिऱ्हाईत
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही
कवी - सुरेश भट #sureshbhat
गायकब - सुरेश वाडकर #sureshwadkar
संगीत - सुधाकर कदम #sudhakarkadam
संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milindgune
ध्वनिमुद्रण - आजीवासन, मुंबई आणि पंचम स्टुडिओ,पुणे.
श्री सुधाकर कदम यांचे चिरंजीव श्री निषाद कदम माझ्या निकटतम शिष्यांपैकी एक आहेत.त्यामुळे माझा आणि सुधाकरजी यांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा स्नेह आहे.मी सुधाकरजींचे काम फार जवळून ऐकले आहे.अनेकदा त्यांनी केलेल्या रचनांचा मनसोक्त आनंद घेतला आहे.
प्रत्येक कलाकार त्याच्या कामामध्ये आपल्यामधील कल्पकतेनुसार वैविध्यता आणायचा आटोकाट प्रयत्न करत असतो.सुधाकरजी यांच्या रचना ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, त्यांच्या संगीत रचनांमध्ये विविधता आहे.प्रत्येक रचनेला स्वतंत्र अशी एक ओळख आहे.एका रचनेसारखी दुसरी रचना नाही.ही विविधता आणत असताना,ते ती रचना यांत्रिक किंवा कोरडेपणाकडे झुकू देत नाहीत.सुधाकरजी त्यांच्या रचनांमध्ये एक प्रकारचा हळवेपणा,ओलेपणा जपल्याची जाणीव देतात.गझल या प्रकारामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असणे गरजेचे असते.अशी रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयाला भिडते,याची जाणीव सुधाकरजींना आहे.त्यांना असलेली ही जाणीव ते त्यांच्या रचनांमधून श्रोत्यांच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचवतात.त्यांच्या रचनांमधील ’संवेदनशीलता’ मनाला भिडते.संगीत रचनेमध्ये भावनिकता ही फार महत्वाची आहे,जी सुधाकरजींच्या रचनांमध्ये जाणवते.
गझल काव्यातून आलेला भावार्थ,त्या काव्याला असलेली लयीची नादमयता,ही सुधाकरजींना अगोदरच जाणवलेली असल्यामुळे ते त्यास संगीत देत नाहीत तर ते त्यांच्याकडून घडले जाते.सुधाकरजींच्या गझल रचनांमध्ये एकाचवेळी खुलेपणा आहे आणि तितकाच हळूवारपणाही आहे.असे फार कमी वेळा ऐकायला मिळ्ते.संगीताच्या दृष्टीकोनातून खुलेपणा आणि हळूवारपणा ही एकमेकांविरोधी तत्वे आहेत.पण सुधाकरजींच्या रचनांमध्ये खुलेपणा व हळूवारपणा या दोन्हीही गोष्टींचा सुरेल संगम ऐकायला मिळतो.
सुधाकरजींनी त्यांच्या रचनांसाठी वेगवेगळ्या तालांचा चपखल वापर केला आहे.कधी रुपक तर कधी दादरा-केरवा तर कधी अप्रचलित ११ मात्रांचा ताल अशा वेगवेगळ्या तालांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत.अशा अवघड आणि अप्रचलित असलेल्या बौद्धिक तालांचा वापर करताना गझलचे मर्म समजल्या जाणार्या भावनिक तरलतेवर ते कोठेही विपरीत परिणाम होऊ देत नाहीत.
सुधाकरजींच्या रचनांचा शास्त्रीय संगीताशी घनिष्ट संबंध आहे.गझल गायनाच्या परंपरेमध्ये गझल गायकाला सादरीकरण करताना रचनेपेक्षा वेगळा सांगीतिक विस्तार करण्याचे स्वातंत्र्य असते.सुधाकरजींच्या गझल रचना पूर्णपणे स्वतंत्र असूनसुद्धा त्यांच्या रचनांमध्ये गझल गायकाला मुक्तपणे गाण्यासाठी वाव असतो.तो त्याच्या मनाने गाऊ शकतो.
संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये मग ते शास्त्रीय असो,उपशास्त्रीय असो किंवा सुगम संगीत असो,’अस्थाई’ अतिशय महत्वपूर्ण असते.अस्थाईला सुगम संगीतामध्ये धृवपद असेही म्हणतात.संगीत रचनेमध्ये अस्थाई परत परत गायली जावी असे वाटणे हे ती सांगीतिक रचना उत्कृष्ट असल्याचे द्योतक आहे.सुधाकरजींच्या सर्व रचना या प्रकारामध्येच समाविष्ट असतात. अस्थाई जितकी सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असेल तितका तिचा विस्तार करणे सोपे जाते.अस्थाई परत परत गावी असे वाटणे म्हणजेच त्याची धून होणे असे मला वाटते.आणि अशा प्रकारे धून झालेली कोणतीही रचना श्रोत्यांच्या ओठांवर तरळत राहते.सुधाकरजींच्या अनेक सांगीतिक रचना मी ऐकल्या आहेत.त्याचा आनंद घेतला आहे.
जेवढी अस्थाई सांगीतिक दृष्ट्या परिपूर्ण तेवढी ती रचना विस्तार करायला गायकाला जास्त वाव मिळ्तो.अशा प्रकारची सांगीतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली अस्थाई ही त्या रचनेची ताकद बनते.अस्थाईतील शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन त्या शब्दांना यथायोग्य सांगीतिक वृत्तामध्ये (मीटर) बसवणे हे फार बौद्धिक काम आहे.
सुधाकरजींनी हे शिवधनुष्य अतिशय लीलया पेलले असून अशा प्रकारची बौद्धिक चमक त्यांच्या अनेक रचनांमध्ये ऐकायला मिळ्ते.त्यांच्या रचनांमध्ये स्वरवैचित्र्यही पहायला मिळ्ते.(ज्या प्रमाणे शास्त्रीय संगीतामध्ये जोड रागांची संकल्पना आहे त्याप्रमाणे) अशी सांगीतिक रचना करणे ही एक बौद्धिक क्रिया आहे.पण या बौद्धिक क्रियेमध्ये सुद्धा गझलमधील भावनिक तरलतेवर विपरित परिणाम होणार नाही याचे अतिशय योग्य भान त्यांनी ठेवलॆ आहे.सुधाकरजींना त्यांच्या रचनांमध्ये शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक संतुलन अतिशय उत्कृष्टपणे आणि कलात्मकतेने जमलेले आहे.
गझल हा प्रकार प्रामुख्याने काव्य प्रकार असूनसुद्धा त्याचे संगीतमय सादरीकरण हे शास्त्रीय संगीताच्या खूप जवळ जाणारे असते.शिवाय गझलच्या संगीतमय सादरीकरणाच्या रिवाजामध्ये तबला वादकाला त्याचे काम करण्याची संधी उपलब्ध असते.त्यामुळे गझल गायकाबरोबर तबला वादक कोण आहे,त्याची पात्रता काय आहे याची पण गझल गायन ऐकणार्या श्रोत्यांना उत्सुकता असते.गझलच्या सांगीतिक रचनेची जी अस्थाई (धृवपद) असते ती जरी,बरोबर वाजणार्या तालाशी गणिती किंवा ठॊस संबंध दाखविणारी नसली तरी त्यामध्ये त्या तालाच्या आवर्तनाची आकृती सक्षमपणे उभी अहात असते.अशा अस्थाईचे वारंवार सादरीकरण लेहेर्या इतके सक्षम असल्यामुळे तबला वादकाला त्याचे काम सादर करण्याची संधी मिळते.सुधाकरजींच्या रचनांमध्ये सुद्धा ही खासियत दिसून येते.
मी गेले तीन-चार वर्ष त्यांनी केलेल्या अनेक संगीत रचना ऐकल्या आहेत.त्या मला मनापासून भावल्या आहेत.सुधाकरजींच्या गझला या शास्त्रीय संगीतातील बंदिशींसारख्याच विस्तारक्षम असून,अशा संगीत रचना ताकदीने उभा करणारा कंपोझर म्हणून सुधाकरजींकडे आदराने पाहिले जाते.त्यांचा बराच मोठा काळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेला.विदर्भ,
यवतमाळ या परिसराला कवी,साहित्यिक,
कलाकार अशा मंडळींचा वारसा लाभला आहे.सुधाकरजींनी बर्याच काळापर्यंत प्रसिद्ध कवी,गझलकार कै.सुरेश भट यांच्या समवेत व्यतीत केला.कै.भट हे एक प्रभावी आणि आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते.
त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली व्यक्तीच्या सहवासातून सुधाकरजींनी मराठी गझल ही सर्वमान्य श्रोत्यांपर्यंत पोहचवली.
The very word ghazal strikes a melodius note in the ear. Its soft, rich culture reminds you of such mastros as Ghulam Ali, Mehdi Hassan, Talat Mehmood, Jagjit Singh etc. but here is a ghazal singer with a difference !
Sudhakar Kadam sings ghazal alright, but Marathi ghazals. Sudhakar Kadam is a little man going a long way and a day is not far when his name will become household..
It must be said to Mr. Kadam’s credit that he has acquired an audience of his own and has achieved a good deal of popularity. He has created an impression. Mr. Kadam’s success is all the more glaring because Marathi ghazal is a novelty and is relatively new to many who are familiar with the traditional concept of a ghazal that it is a romantic Urdu poetry.
But Mr. Kadam has a religious devotion to Marathi ghazals and is quite firm in his belief that it will get its due one day and he has proved it in a certain measure by his own success. Mr. Kadam’s success is not limited to this region alone, but he has wo hearts outside Maharashtra also. In fact, it would not be an exaggeration to state that Mr. Kadam has a rythmic equation with Marathi ghazals. It is this proud achievement that Mr. Kadam was selected one of the top ten youths by the Cotton City Jaycees. Of course, success has not come Mr. Kadam’s way easily. He had to strive hard for it - more so in the light of the fact that he developed this new art in a realitively small town like Yavatmal. He had faith in people’s ability to grasp the essentials of this art and appreciate it. result? Mr. Kadam is now a well known figure. He manages all this after doing his regular service. He has many programmes on the Akashwani to his credit..
An admirable aspect of Mr. Kadam’s singing is that he promotes new poetry and poet by singing their compositions and lyrics. His casettes realeased by a Pune company have exceeded sale records.
Mr. Kadam’s speciality is his throw of words coupled with exact modulations. His presentation is perfect and systematic which atonce impresses and touches. Mr. Kadam is accompained by Tabla player Vithhal Kshisagar and Sarangi player Hamid Khan, but more than anything else, it is his voice that has an enduring appeal.
There can be least doubt that the tomorrow belongs to Mr. Kadam
- Mr. S. R. Chaudhari
(The Hitwada, Nagpur,23/4/1984)
छायाचित्र - इचलकरंजी कार्यक्रम १९८१. तबला - शेखर सरोदे, सूत्र संचालन - डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी.
प्राजक्ता असो की मयूर असो, कोणतेही गीत वा गझल द्या, अगदी अंतर्मनातून आणि झोकून देत आपल्या गायकीतून एक एक शब्द रसिकांपर्यंत ताकदीने पोहोचवतात.
दोघेही संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले रियाजी असल्यामुळे त्यांच्या आवाजाला एक वेगळीच धार आहे.हा वेगळेपणा नेहमी जाणवतोच मग ती घरगुती मैफल असो व जाहीर कार्यक्रम.संगीतकाराच्या मूळ सुरावटीला धक्का न लावता स्वतःच्या कल्पनेने शब्दानुरूप नव-नवे स्वरगुच्छ टाकून गझल रंगविणे ही दोघांची खासियत आहे. दि.२६ डिसेंबर २०२४ ला अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या कार्यक्रमात ही बाब प्रकर्षाने जाणवली. प्रेक्षकांमध्ये अमरावती शहरातील व बाहेर गावाहून आलेले रसिक, गायक,वादक,कवी-गझलकार मंडळी उपस्थित होती. त्यांची मिळणारी उत्स्फूर्त दाद हीच त्यांच्या गायकीची पावती होती.संपूर्ण मैफलीचा संगीतकार म्हणून ही मनःपूर्वक आलेली दाद माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होती.
खालील उर्दू गझल वेळेअभावी दोन शेर घेऊनच संपवावी लागली.नेमका यावेळी प्राजक्ताचा आवाज मस्त तापला होता.गझल मित्रवर्य दिलीप पांढरपट्टे यांची 'दिन लगे है रात सा अब और काँटा फूल सा' ही होती.गझलची सुरवात एका शेराने करून प्राजक्ताने समा बांधला व पुढे गझलच्या शब्दर्थाला साजेशा मुरक्या,बेहेलावे,अचूक शब्दफेक,निखालस शब्दोच्चार अवर्णनीयच...आपण ऐका, आपणासही अनोख्या गझल गायकीची प्रचिती येईल.
रूपक तालातील या बंदिशीला पूरक अशी तबला संगत डॉ.देवेन्द्र यादव,
हार्मोनियम संगत रामेश्वर ताकतोडे,
व्हायोलिन संगत हरीश लांडगे,की बोर्डवर अतिशय संयत व अनुरूप अशी संगत आशिष कदम यांनी केली.सूत्र संचालन रफ़िक़ काज़ी यांचे होते.
काही काही गाण्यांचे योग अप्रतिम असतात.त्यातीलच राज यावलीकरांनी लिहिलेले हे भक्तीगीत. आज पंडित शौनक अभिषेकीच्या हस्ते युट्युबवर प्रकाशित करण्यात आले.बुवांपासून अभिषेकी घराण्याशी संबंध आहेत.आज तिसऱ्या पिढीतील गायक चि.अभेद अभिषेकी याचीही या निमित्ताने भेट झाली.पुण्यात आल्यानंतर मी संगीत दिलेला पहिला अल्बम #अर्चना हा अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वाद घेऊन शौनक आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात केला.( टी सिरीज).पुण्यात आल्यानंतर या अल्बमद्वारे २००६ मध्ये संगीतकार म्हणून सुरू झालेली वाटचाल आजतागायत सुरू आहे.याचे पूर्ण श्रेय बुवांना जाते.माझे अहोभाग्य की संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी माझ्यावर प्रेम करतात.एका फोनवर शौनक अभिषेकी यांनी माझ्यासाठी वेळ काढला.पूर्ण गीत ऐकून छानशी प्रतिक्रिया पण दिली.त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
खाली युट्युब लिंक दिली आहे.एकूणच काम अप्रतिम झाले आहे.आपण जरूर जरूर ऐका आणि प्रतिक्रिया देऊन चॅनल सबस्क्राईब करा.आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत.
कालच्या (१८/१/२०२५) #कुमारगंधर्व पुरस्कार प्रसंगी फेसबुक मित्र, प्रसिद्ध चित्रकार प्रदीप म्हापसेकर यांची भेट झाली.सोबत ज्यांचे हस्ते पुरस्कार वितरण झाले ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन'चे सल्लागार व 'ऑस्कर' अकादमीच्या निवड समितीतील 'ज्युरी' उज्वल निरगुडकर...
विषय - दुसरे अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाई यात पहिला 'गझल साधना पुरस्कार २०२५' बाबत
महोदय
आपण गेली अनेक दशके गझल, कविता, भावगीते यांना संगीतकार म्हणून संगीत देण्याचे कार्य करत आला आहात. सुरेश भट यांच्या अनेक गझलांना आपण आपल्या सुमधुर संगीत रचनांनी संगीतबद्ध केले आहे. त्यांनी आपणास 'गझल गंधर्व' ही पदवी बहाल केली. इतरही अनेक कवींच्या गझल व भावगीतांना आपण संगीतबद्ध केले आहे.
आयुष्यभर आपण गझलेवर प्रेम करीत आला आहात. ही सेवा आमच्यासाठी, रसिकांसाठी खूप मोलाची आहे असे वाटते. नवनवीन गझलाना तुम्ही तुमच्या संगीतामुळे ओळख प्राप्त करून दिली आहे.
आपले हे कार्य आम्हाला खूप प्रेरणादायी वाटते. आणि पुढील पिढीसाठीही ते मार्गदर्शक आणि प्रेरणादायी राहीलच, यात काही शंका नाही.
आपल्या गझलेप्रती असलेल्या समर्पित संगीतसेवेचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी आपल्याला २०२५ चा पहिला "#गझल_साधना_पुरस्कार'' आदरपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.
यंदाच्या गझल संमेलनापासून साधना सेवाभावी संस्था, अंबाजोगाई हा पुरस्कार प्रतिवर्षी देणार आहे.
रु. ११०००/-, आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
दिनांक १-२ फेब्रुवारी २०२५ रोजी हे संमेलन अंबाजोगाई येथे पार पडत आहे. या संमेलनाच्या समारंभात संमेलन अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते व उद्घाटक डॉ. संदीप गुप्ते यांच्या उपस्थित हा पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक प्रदान केला जाईल.
आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.
आपला
दगडू लोमटे
साधना सेवाभावी संस्था अंबाजोगाई तथा स्वागताध्यक्ष, दुसरे अ. भा. एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाई
(कला, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्राला वाहून घेतलेली पंजीकृत संस्था)
दि.१३ जानेवारी २०२४
प्रति,
सुधाकर कदम
(संगीत)
स. न. वि. वि.
महोदय,
'एकता कल्चरल अकादमी तर्फे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींना एकता पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.आम्हास कळविण्यास अत्यानंद होत आहे की,'संगीत' क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत अकादमीच्या निवड समितीने २०२४-२०२५ सालासाठी पंडित #कुमार_गंधर्व_स्मृति_पुरस्कारासाठी आपली एकमताने निवड केली गेली आहे.
कृपया, आपण आपली स्वीकृती कळवावी.
'एकता महोत्सवा'त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन'चे सल्लागार व 'ऑस्कर अकादमीच्या निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ
शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी
सायं. ४:०० वाजता गिरगाव येथील मराठी साहित्य संघ नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर समारंभास आपण उपस्थित राहावे,
ही अगत्याची विनंती.
कळावे, कळवावे..
आपले स्नेहांकित,
अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव
प्रकाश ग. जाधव उज्जय आंबेकर प्रकाश पाटील
विरार कार्यालय : ए/२०४, विशाल हेवन, मनवेलपाडा रोड, विरार (पू.)-४०१३०५.
मो.९२२०८९९१२०.
इमेल: ektaculturalacademy@gmail.com फेसबुक पेज: ekta cultural academy
जन्म-१३/११/१९४९.
आद्य मराठी गझल गायक म्हणून सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी गौरविले.ज्या वेळी महाराष्ट्रात मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोणीच करीत नव्ह्ते तेव्हा गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करीत होतो.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो वैयक्तिक कार्यक्रम केलेत. १९८० ते १९८३ या चार वर्षात सुरेश भट आणि मी,मराठी गझल गायकी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून "अशी गावी मराठी गझल"हा कार्यक्रम करीत पदराला खार लावीत एस.टी.ने तर कधी रेल्वेने अक्षरशः महाराष्ट्रभर वणवणलो.या कार्यक्रमाचे निवेदन बहुतेक सुरेश भट करायचे तर कधी कधी सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.(आमच्या या मेहनतीचे फ़ळ सध्याचे गायक चाखत आहेत)
१९८३ मध्ये"भरारी"नामक मराठी गझल गायनाची पहिली वहिली ध्वनिफ़ित तयार केली. मराठी गझल गायकीतील भरीव कामगिरीबद्दल "Outstanding Young Person"(१९८३),"समाजगौरव"(१९९५),"संगीत भूषण"(१९९६),
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),"कलादूत"(२००२),"कलावंत"(२००३),
"शान-ए-गज़ल"(२००५),"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६)"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) वगैरे सन्मान मिळाले.अनेक
म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले.सध्या नवोदित गायकांना मराठी गझल गायकीचे शिक्षण देत आहे.तसेच गझलकार,गायक,वादक यांनी दर महिन्याला एकत्र येण्याकरीता "गझलकट्टा" आयोजित करीत आहे.