गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, July 2, 2023

राग-रंग, लेखांक १४.


     चारुकेशी 

     चारुकेशी हा राग दक्षिणेकडून उत्तरेकडे आलेला एक अतिशय गोड राग आहे.दक्षिण भारतीय पंडित व्यंकटमखी यांच्या गणितीय बाहत्तर थाट प्रणालीतील सव्वीसाव्वा थाट आहे.कर्नाटक संगीतातील 'मुथुस्वामी दीक्षितार स्कुल'मध्ये याला 'तरंगिनी' म्हणतात.(चारुकेशीचा अर्थ सुकेशा किंवा सुंदर केशसंभार असलेली स्त्री असा पण काढता येतो.) धैवत,निषाद कोमल आणि इतर स्वर शुद्ध असलेला संपूर्ण जातीचा हा राग आता उत्तर भारतीय संगीतामध्ये पण मस्त रुळला आहे.पण याला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमधील कोणत्या थाटात बसवावे हा प्रश्नच आहे!
      
      मुळात उत्तर भारतीय गायन/वादन पद्धती व उत्तर भारतीय गायन/वादन पद्धती अतिशय भिन्न आहेत.उत्तर भारतीय पद्धतीमध्ये गायक/वादकांना आपल्या कलाविष्काराला भरपूर वाव असल्यामुळे त्याला मनाप्रमाणे राग मांडणी करून गाता येते.दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये कलाकारांना ज्या रचना लिहून ठेवल्या आहेत त्या परंपरेने गाव्या/वाजवाव्या लागतात.(काही कलाकार अनेक उत्तर भारतीय राग उत्तर भारतीय पद्धतीने सादर करतानाही दिसतात.)

      जागतिक संगीतामधील सप्तक म्हणजे एक चमत्कार आहे.शेतकऱ्याप्रमाणे मशागत करून सात स्वर पेरत जा व आपापल्या कल्पनेप्रमाणे विविध सुरावटींचे पीक घेत रहा. जमिनीतून येणाऱ्या पिकाप्रमाणे अविरत चालणारी प्रक्रिया आहे ही.अर्थात ही जमीन सुपीक करण्यासाठी संगीताचे विशुद्ध शिक्षण,मेहनत व रियाजाचे खत यात घालावे लागते.तसेच शुद्ध सोने मिळविण्यासाठी जसे तप्त मुशीतून जावे लागते .तसे यातून तावून सुलाखून निघाल्यावर मग सोन्याप्रमाणे चकाकणाऱ्या स्वरांच्या लगडी निर्माण होतात.शेतकरी जशी पोटाची भूक भागवतो तशी माणसाची मानसिक भूक हे अस्सल संगीत भागवत असते.कुठल्याही देशाचे वा प्रांताचे असो.संगीत हे संगीतच असते.पाश्चात्य संगीतामध्ये दक्षिण भारतीय संगीताप्रमाणे संगीतकारांनी ज्या रचना करून ठेवल्या त्या रचना जशाच्या तशा सादर कराव्या लागतात. अर्थात अशा रचना करणारे संगीकार उच्च कोटीचे असतात.नव्या नव्या कल्पना साकार करून नवनव्या सुरावटी तयार करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे असते.
      आपले राग म्हणजे खरोखरच एक चमत्कार आहे…एकाच रागात शब्दानुरूप सुरावटी दिल्या तर वेगवेगळ्या भावाभिव्यक्ती करता येते. भले त्या रागाचा गानसमय कोणताही असो. “पुछो ना कैसे मै ने रैन बिताई” हे मन्ना डॆंच्या आवाजातील चित्रपटगीत अहिर भैरव रागात स्वरबद्ध केले आहे.हे गीत केव्हाही ऐका कानाला गोडच वाटते.गानसमयाप्रमाणे विचार केला तर हे फक्त सकाळीच गोड वाटायला हवे…पण तसे होत नाही.याचाच अर्थ असा की गानसमयापेक्षा शब्दांना योग्य तो स्वरसाज चढणे आवश्यक असते.मग तो राग कोणताही असो.याच रागात शंकर जयकिशन या महान संगीतकार जोडीने “बाजे पायल छम छम होके बेकरार” हे वेगळ्या बाजाचे गाणे कंपोज केले आहे.(भलेही ते रॉन उडविन या पाश्च्यात्य संगीतकाराच्या मूळ रचनेवर बेतलेले असू दे) पण ही दोन गाणी केव्हाही ऐकली तरी चांगलीच वाटतात.पिढ्या न पिढ्या अमुक राग अमुक वेळीच गायिल्या जावा हे बिंबवल्यामुळे राग-गानसमयाच्या संदर्भात मेंदूत सगळा केमिकल लोचा झाला असावा,असे मला वाटते….
      सुगम संगीतामध्ये काव्यातील शब्दांचे भाव आणि त्याला अनुरूप केलेली सुरावट यांचं एक नातं असतं. काव्यानुरूप सुरावट असली की,काव्यातील शब्दांनुसार प्रेम,
शृंगार,विरह,कारुण्य,भक्ती,आळवणी,विनवणी असे सर्व भाव रसिकांच्या हृदयापर्यंत थेट पोहोचतात.म्हणून काव्यानुरूप सुरावट असणे महत्वाचे असते.यात शास्त्रीय संगीतातील रागाच्या गानसमयापेक्षा काव्यातील शब्दांना प्राधान्य असल्यामुळे रसिकवर्ग, शब्द आणि स्वरांचा समसमा आनंद घेऊ शकतात.मग ती धून कोणत्याही रागात असो!
     खालील प्रतिथयश व नवोदित कलाकारांनी सादर केलेला चारुकेशी युट्युबवर उपलब्ध आहे...    
पं. रविशंकर, पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा पं. अजय पोहनकर, उस्ताद शाहिद परवेज, उस्ताद राशीद खान, संजीव अभ्यंकर,पं. अजय चक्रवर्ती, पं. तेजेंद्र मुजुमदार, संदीप रानडे, डॉ. एल.सुब्रमण्यम (कर्नाटक पद्धती), चारुकेशी वर्णम (कर्नाटक) प्रतिभा सारथी,वंदना कृष्णमूर्ती, डॉ. जयंती कुमारेश (वीणा), श्री आर.कुमारेश (व्हायोलिन) कर्नाटक पद्धती,
'पिया मोरा रे' हा कौशिकीने गायिलेला दादरा मला खूप आवडतो. सरोज यांनी वाजविलेली दिलरुबा या वाद्यावरील चारुकेशी  धून पण ऐकण्यासारखी आहे.(याचीच तारशहनाई करून पण वाजविल्या जाते.) दीपक पंडित (व्हायोलिन) आणि पारस नाथ (बासरी) यांची जुगलबंदी पण श्रवणीय आहे.
●हिंदी गाणी...
'इक तू जो मिला सारी दुनिया मिली', लता. 'एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है' (एकाच रागातील आनंदी आणि दुःखी गाणं) चित्रपट-हिमालय की गोद मे.
'है मेरे साथ तेरी वफा मैं नहीं तो क्या', लता.चित्रपट-हिंदुस्थान की कसम.'छोड दे सारी दुनिया किसीं के लिए', लता.चित्रपट-सरस्वतीचंद्र. 'है इसी में प्यार की आबरु', लता.चित्रपट-'अकेले है चले आओ जहां हो' रफी. चित्रपट-राज. 'शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम', आरती मुखर्जी, जसपाल सिंग.चित्रपट-गीत गाता चल.
'बैया ना धरो ओ बलमा', लता.चित्रपट-दस्तक. 'वो भुली दासतां लो फिर याद आ गयी', लता. चित्रपट-संजोग.         'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे', मुकेश.चित्रपट-पूरब और पश्चिम. 'बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है', लता.चित्रपट- आरजू . 'जो हमने दासतां अपनी सुनाई आप क्यूँ रोये',लता.चित्रपट-वोह कौन थी. 'मुहब्बत के सुहाने दिन,जवानी की हसीं राते', रफी. चित्रपट-मर्यादा. 'किसी राह में किसी मोड पर कहीं चल न देना तु छोडकर', लता,मुकेश.चित्रपट-मेरे हमसफर  'तेरे नैना क्यूँ भर आये', लता.चित्रपट-गीत. 'झूठ बोले कौवा काटे', लता,शैलेंद्र सिंग.चित्रपट-बॉबी.'बेखुदी मे सनम',लता,रफी.
चित्रपट-हसीना मान जायेगी. 'और इस दिल में क्या रक्खा है', आशा भोसले,सुरेश वाडकर.चित्रपट-इमानदार. 'मेघा रे मेघा रे', लता,सुरेश वाडकर. चित्रपट-प्यासा सावन. 'धरती सूनहरी अंबर नीला', लता, उदित नारायण.चित्रपट-वीर झारा. 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है', कुमार शानु,
साधना सरगम. चित्रपट-दिवाना. 'आहिस्ता आहिस्ता निंदिया तू आ', उदित नारायण,साधना सरगम.चित्रपट-
स्वदेस. 'आज दिल पे कोई जोर चलता नहीं', लता.
चित्रपट-मिलन 'चलो सजना जहां तक घटा चले', लता.
चित्रपट-मेरे हमदम मेरे दोस्त.'जाने जाना ओ जाने जाना', महेश गढवी, सपना मुखर्जी.चित्रपट-जाँबाज 'जब तक सांसे चलेंगी', सवाई भट्ट.चित्रपट-सांसे. 'प्यार क्या होता है',कविता कृष्णमूर्ती,उदित नारायण. 'दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या कीजे', लता. चित्रपट-मुकद्दर का सिकंदर. 'ये मेहंदी के बुटे इनके रंग अनोखे', उदित नारायण,अलका याज्ञीक. चित्रपट-हमको तुमसे प्यार हैं.

'कितक दिन हरि सुमिरन बिन खोये',पं. जितेंद्र अभिषेकी.
'सुन चरखे दि मिठी मिठी कूक', नुसरत फतेह अली. 
झिना झिना झीना रे उडा गुलाल' अर्जित सिंग.
'ओ कडी आ मिल सावल यार वे' कमाल खान.  

'मैं होश मे था तो फिर ऊस पे मर गया कैसे', 'तुम आये हो न शबे इंतजार गुजरी है', 'अब दिल की तमन्ना को अश्कों मे बहाते है','जब उस जुल्फ की बात चली' मेहदी हसन.
'ऐसा लगता है जिंदगी तुम हो',चित्रा सिंग.
'दुःख की लहर ने छेडा होगा','पापी पपीहा बोले,ऎसे मे जी ना डोले',गुलाम अली.
●मराठी...
'अवघे पावन पंढरपूर', पं. जितेंद्र अभिषेकी.
'ऋतू बरवा,ऋतू हिरवा', आशा भोसले.
'खेळ मांडला', अजय गोगावले  चित्रपट-नटरंग.
'हे सुरांनो चंद्र व्हा', अर्चना कान्हेरे.नाटक-ययाती देवयानी.
(संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी असल्यामुळे त्यांनी गायिलेले जास्ती भावते.)
'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी',सुरेश वाडकर.
------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'मंथन' पुरवणी.रविवार २ जुलै २०२३


 





संगीत आणि साहित्य :