गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 21, 2023

राग -रंग (लेखांक २९) राग तिलंग

अनहद शब्द उपज्यो मों घट में, ता को ध्यान करू अष्ट जाम।

खरज रिषभ गांधार मध्यम पंचम धैवत, निषाद पावै जौं अति अभिराम।।

-तानसेन


नादाचे दोन प्रकार मानतात.१.आहात नाद २.सनाहत नाद. आपणास ऐकू येतो तो आहत नाद आणि जो कानाने ऐकू येत नाही त्याला प्रचारात अनाहत नाद असे म्हणतात. अनाहत नाद समस्त आहत नादाचे मूळ किंवा कारण आहे असे मानतात. अशी जरी मान्यता असली तरी आहत नादामध्ये मनाला एकाग्र करण्याची व आनंद देण्याची विलक्षण क्षमता आहे.त्यामुळे आहत नाद लोकरंजक आहे. अनाहत नाद कानाने ऐकू येत नसल्यामुळे तो लोकरंजक नाही. परंतू त्याची गोडी आणि आनंद देण्याची क्षमता आश्चर्यकारक रित्या जास्ती असल्याचे नानक,कबीर,मीरा,सूरदास यांचे मत आहे. कबीराच्या रचनांमध्ये अनेकदा अनहद नादाचा उल्लेख केल्याचे आपणास दिसून येते.इतकेच नव्हे तर पाश्चात्य साधकांमधील 'किट्स' चे खालील वाक्य सुद्धा नानक,कबीर,मीरा,सूरदास यांच्या म्हणण्याला पुष्टी देते. तो म्हणतो... "Heard melodies are sweet but those unheard are sweetest."

     संगीतामध्ये नादाचे महत्व आहेच पण इतर बाबतीतही नाद तितकाच महत्वाचा आहे.एखादा कवी जेव्हा आतून काहीतरी येत असताना एकाग्र होतो तेव्हा नव-नवीन भाव शब्दरूप घेऊन छंदामध्ये स्वतःहून येत असतात. हे येणे कुठून असते हे कवी जाणत नाही.किंवा त्याला ते माहीत नसते,कळत नाही.हे जे येणे आहे ते अनाहत नादाचे देणे असावे असे मला वाटते.भौतिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी एकाग्र होणे आवश्यक असते.जे अनाहत नादाचा माध्यमातून शीघ्र प्राप्त होते. म्हणून कलाकार हा इतरांपेक्षा वेगळा असतो. 

नास्ति नादात्परो मंत्रो न देव: स्वात्मन: पर:।

नानुसंधे: परा पूजा न हि तृप्ते: परं सुखम् ।।

असो!

      आज आपण खमाज थाटोत्पन्न तिलंग रागावर चर्चा करणार आहोत. खमाज थाटातून उत्पन्न झालेल्या सर्वच रागांवर खमाजची छाया दिसून येते.त्याला तिलंग रागही अपवाद नाही. तसेच खमाज व खमाज थाटोत्पन्न रागाचा गोडवा तर अवर्णनीयच आहे.सा ग म प नि सां, सां (कोमल) नि प म ग सा या फक्त पाच स्वरांच्या तिलंग रागावर अनेकांनी स्वरमेळाच्या उतुंग इमारती बांधल्या आहेत.भक्ती,शृंगार, विरह अशा अनेक रसांची उधळण करणारा हा राग आहे. यात रिषभ स्वर वर्ज असला तरी विवादी स्वर म्हणून जेव्हा याचा वापर होतो तेव्हा रागाचा गोडवा अजूनच वाढतो. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमधील 'हंसश्री' हा राग तिलंगशी मिळता जुळता आहे.या रागाची प्रकृती चंचल आहे असे मानतात.त्यामुळे यात ठुमरी, दादरा भजन, गीत, पद इत्यादी प्रकारचं गायिले जातात असे विद्वानांचे मत आहे.याला छेद देणारे कलाकार पण आहेत. खमाज थाटातीलच झिंझोटी राग सुद्धा असाच चंचल,क्षुद्र प्रवृत्तीचा मानल्या गेला आहे.पण यवतमाळच्या एका संगीत संमेलनात कुमार गंधर्वांनी मैफलीची सुरवातच झिंझोटी रागातील मोठ्या ख्यालाने करून रसिकांना आश्चर्यात टाकले.अर्धा तास झिंझोटी आळवला.यावरून रागात क्षुद्र,उच्च, नीच असा काही प्रकार नसतो हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.याचे ध्वनिमुद्रण बराच काळ माझ्याकडे होते.यवतमाळच्या डॉ.उमरेडकरांकडे ते अजूनही असावे. 

     मी शिकत असताना तिलंग रागातील 'तवही मंजूळ रसना' हे मराठी गाणे शिकविले होते.'नेट'वर याचा बराच शोध घेतला पण मला सापडले नाही.


● हिंदी चित्रपट गीते...

'मेरी कहानी भूलने वाले तेरा जहां आबाद रहे' रफी. चित्रपट-दीदार, संगीत-नौशाद (१९५१). 

'यही अरमान लेकरं आज अपने घर से हम निकले' रफी. चित्रपट-शाबाद, संगीत-नौशाद (१९५४). 

'मर गये हम जीते जी मालिक तेरे संसार में' लता. चित्रपट-शबाब, संगीत-नौशाद (१९५४). 

'लगन तोसे लागी बलमा' लता. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७). 

'सखी री सून बोले पपिहा उस पार' लता,आशा. चित्रपट-मिस मेरी, संगीत-हेमंत कुमार (१९५७). 

'मुझे ऐ जिंदगी दिवाना कर दे' रफी. चित्रपट-बिंदीया, संगीत-इकबाल कुरेशी (१९६०). 

'रहते थे कभी जिनके दिल में' लता. चित्रपट-ममता, संगीत-रोशन (१९६६). 

'सजन संग काहे नेहा लगाये' लता. चित्रपट-मै नशे में हूँ, संगीत-शंकर जयकिशन (१९६९). 

'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गयी' लता,रफी. चित्रपट-दो रास्ते, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६९). 

'इतना तो याद है मुझे' लता,रफी. चित्रपट-मेहबूब की मेहंदी, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७१). 

'मेरे दिवानेपन की भी दवा नहीं' किशोर कुमार. चित्रपट-मेहबूब की मेहंदी, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७१). 

'कैसे कहें हम प्यार ने क्या क्या खेल दिखाये' किशोर कुमार. चित्रपट-शर्मिली, संगीत-एस.डी. बर्मन (१९७१). 

'गोरी गोरी गांव की गोरी रे' लता,किशोर कुमार. चित्रपट-ये गुलिस्ता हमारा, संगीत-एस.डी. बर्मन (१९७२). 

'क्या यूंही रुठ के जाने को मोहब्बत की थी'

● युट्युबवर उपलब्ध ठुमरी,दादरा,झुला,टप्पा,भजन,माहिया,गझल...

'अब काहे को नेहा लगाये' इंदुबाला देवी. 

'तोरे नैना जादू भरे' उस्ताद बरकत अली खान.

'सजन तुम काहे को नेहा लगाये' उस्ताद अब्दुल करीम खान. 

'तोरे नैना जादू भरे' उस्ताद बडे गुलाम अली खान. 

'सुरत मोरी काहे बिसराई' सिद्धेश्वरी देवी. (पुरब अंग गायकी व बनारस घराण्याची ठुमरी). 

'काहे पिया दिन रैन' हिराबाई बडोदेकर. 

'इतनी अरज मान ले' गिरीजा देवी. 

'कते ना बिरहा की रात' बेगम अख्तर. 

'रतन हिंडोरे झुले' झुला-अलका देव मारुरकर. 

'अखियन निंद न आये' 

'ननदीया कैसे नीर भरू' पंडित ओंकारनाथ ठाकूर. 

'तेरे नैनो ने जादू डारा' उस्ताद सलामत अली खान, उस्ताद नजाकत अली खान. 

'यार दा ओ' टप्पा-मालिनी राजूरकर. 

'मोहे लिनो' त्रितालातील ठुमरी-श्रुती सडोलीकर. 

'ले चलो गोकुल धाम' पं. बसवराज राजगुरू. 

'तुम काहे को नेहा लगाय' पं. भीमसेन जोशी,उस्ताद राशीद खान. 

'कुंजन में दधी बेचन गयी' शोभा गुर्टू. 

'शाम बिन सजनी जियरा धरे नाही धीर' झपतालातील बोल-बांट ठुमरी. 

'पिया न आये शाम' हुसैन बख्श. 

 'अब काहे को नेहा लगाये' बेगम अख्तर. 

'अब ना सताओ मोहे शाम' पं. अजय चक्रवर्ती. 

'मोहे तुम बिन कलन परे' केरवा तालातील दादरा-पंडित राजन,साजन मिश्र. 

'मोरी एक हूँ न मानी' प्रभा अत्रे. 

'थके नयन रघुपती' भजन-कुमार गंधर्व. 

'धरकन जिया मोरा रे' पं. राजाभाऊ कोगजे. 

'देखो जिया बेचैन' जयतीर्थ मेवूंडी. 

'कहां गिरी रे माथे की बिडीया' दादरा-रघुनंदन पणशीकर. 

'तोरे नैना जादु भरे' जत तालातील ठुमरी-कौशिकी चक्रवर्ती. 

'देखो जिया बेचैन' दादरा-शुभा मुद्गल. 

'एरी अंखीयां रसिली तोरी शाम' पिऊ मुखर्जी. 

'एरी अंखीयां रसिली तोरी शाम' सोहिनी सिंग मुजुमदार.

'ले चलो गोकुल गांव' ओंकार दादरकर. 

'तोरे नैना जादू भरे' मौमिता मित्रा. 

'काहे मोसे नैना लगाये' अद्धा त्रितालातील ठुमरी-संदीप्ता मुखर्जी. 

'सजन तुम काहे को नेहा लगाये' मिता पंडित.

'तोरे नैना जादू भरे' अंजना नाथ. 

'सांवरे सलोने मोरे शाम' उस्ताद लछमनदास संधू. 

'सजिया अकेली दुःख दे' उस्ताद बद्रुज्जमा. 


या व्यतिरिक्त पं. बाळासाहेब पूछवाले,अनोल चटर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, बेगम शिप्रा खान, नीला सिन्हा रॉय, राजोश्री भट्टाचार्य, अवंतिका चक्रवर्ती, धनंजय कौल, प्रबीर बॅनर्जी, संगीता लाहिरी. आशिम कुमार बिस्वास, रमाकांत गायकवाड,गायत्री गायकवाड, अलंक्रीता रॉय. मीनल दातार, डॉ.रागिनी सरना, अर्धेन्दू शेखर बंडोपाध्याय, सुकृत गोंधळेकर, पं. कृष्णा भट, सुश्मिता दास, राजश्री पाठक, पं. मानस चक्रवर्ती, उस्ताद देवेंदर बस्सी, 

'हम कुरबाने जाऊं' मोठा ख्याल-भाई

नरींदर सिंग बनारस. 

'किथे टकरें' पंजाबी माहिया-मेहदी हसन. 

'मैं नजर दे पी रहा हूँ ये समा बदल न जाये'  गझल-जसविंदर सिंग.

● मराठी...

'तारिणी नव वसन धारिणी' नाट्यगीत.माणिक वर्मा.नाटक-संगीत पट वर्धन, संगीत-गोविंदराव पटवर्धन. 

'प्रिया तुज काय दिसे स्वप्नात' आशा भोसले.चित्रपट-जिव्हाळा, संगीत-श्रीनिवास खळे (१९६८). 

'रसिका तुझ्याचसाठी' परवीन सुलताना. अलबम (१९६९). 

'लपविला लाल गगन मणी' संगीत नाटक-स्वयंवर, संगीत-भास्करबुवा बखले. 

'यह राम की प्रेमिका है' गायक/संगीतकार-सुधीर फडके. कवी-ग.दि.माडगूळकर. (गीत

 रामायण).

__________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.रविवार दि.२२/१०/२०२३.


 





संगीत आणि साहित्य :