गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 10, 2011

’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’




            मिर्झा गालिब यांची ही गझल म्हणजे म्हणजे दर्दी रसिकांच्या काळजातील जीवघेणी कळ आहे,असे मला वाटते.प्रत्येक माणसाच्या मनात दिल--नादाँ तुझे हुआ क्या है...’ ही भावना कधी ना कधी उद्भवतेच.अशा वेळी आखिर इस दर्द की दवा क्या है...’ हा ही प्रश्न उभा राहतोच.उदासलेल्या मनाला ही गझल त्यामुळेच अतिशय जवळची वाटते.या गझलच्या लोकप्रियतेच्या बाबतीत विचार केला तर,हिच्या इतकी लोकप्रियता दुसर्‌या कोणत्या गझलच्या वाट्याला आली असेल असे मला वाटत नाही.चित्रपटांमध्येही या गझलचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.१९४३ मध्ये हंटरवालीकी बेटी’,१९४९ मध्ये अपना देश’,१९५४ मध्ये मिर्झा गालिब’,आणि पाकिस्थानातील मिर्झा गालिबया चित्रपटांमध्ये ही गझल चित्रपट गीतांच्या स्वरुपात अनुक्रमे पुष्पा हंस’,’तलत-सुरैय्याआणि मल्लिका--तरन्नुम नुरजहान यांनी ही गझल गायिली आहे.या व्यतिरिक्त शाहिदा परविन,सुमन कल्याणपुर,परवेज़ मेहदी,जगजित-चित्रा,शुमोना राय बिस्वास,पिनाज मसानी आबेदा परविन आणि मेहदी हसन यांनी या गझलला आपापल्या परीने गायकीचा रंग देवून सजविली आहे.या मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मला विशेष करून आवडली.शुमोनाची गझल गायकी इतकी सुंदर असतांनाही तिचे नाव रसिकांना पाहिजे त्या प्रमाणात माहित नाही याचे नवल वाटते.तिचा ’dagha-sung by Shumona Roy Biswas' हा अल्बम म्हणजे रसिकांना खरोखरच मेजवानी आहे.ही गायिका इतकी सुंदर गाते की ऐकत राहावे असे वाटते.
          खालील VDO मध्ये शुमोना राय बिस्वास आणि मेहदी हसन यांनी गायिलेली संपुर्ण गझल आहे.शुमोनाची बंदिश पटदीप रागावर आधारित असल्यासारखी वाटते,पण लगेच त्यात इतरही रागांचा उपयोग केल्यामुळे एका रागाचे नाव सांगता येणार नाही.मेहदी हसन यांची बंदिश शुद्ध सारंगया रागात बांधलेली आहे.हा माझा आवडता राग आहे.सारंगाच्या इतर प्रकारापेक्षा हा वेगळाच आहे.याला शुद्ध सारंग का म्हणतात हे ही एक कोडेच आहे.कारण कोणत्याच सारंग प्रकारात न लागणारा तीव्र मध्यमया मध्ये लागतो.या रागाचा गानसमय शास्त्रीय व्याख्येनुसार दुपारचा आहे.पं.जसराजजींनी गायिलेला शुद्ध सारंग मनभावन असून,छोटा ख्याल तर लाजवाबच.संगीतकार ओ.पी.नैय्यर यांनी आशा भोसलेच्या आवाजातील छोटासा बालमा...’या गाण्यात केलेला या रागाचा वापर अवर्णनीय आहे.तसा उपयोग चित्रपट संगीतात अभावानेच आढळतो.या नंतर तसे स्वरशिल्प मेहदी हसन यांनीच उभे केले आहे.त्यातील दोन्ही मध्यमांचा उपयोग तरक्या बात है....!’(याच रागातील हरिहरन यांनी गायिलेली ज़ब्ते ग़म का सिला न दे जाना...’ही गझल रसिकांनी जरूर ऐकावी.म्हणजे शुद्ध सारंगशी आपली मैत्री पटकन होते.)चला तर ऐकू या...दिल--नादाँ......


दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है

हम है मुश्ताक और वो बेज़ार
या इलाही ये माजरा क्या है

मैं भी मुह मे ज़ुबान रखता हूँ
काश पुछो  की मुद्दा क्या है

जबकी तुझ बिन नहीं कोई मौजूद
फिर ये हंगामा अय खुदा क्या है

ये परी   चेहरा   लोग कैसे है
गमज़ा-ओ-इश-आ-ओ अदा क्या है

सब्ज़ा-ओ-गुल कहाँ से आये है
अब्र क्या चीज़ है,हवा क्या है

हमको उनसे वफ़ा की है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है

जान तुमपर निसार करता हूँ
मैं नही जानता वफ़ा क्या है

मैने माना की कुछ नहीं ग़ालिब
मुफ़्त हात आये तो बुरा क्या है

ग़ालिब / शुमोना राय बिस्वास, मेहदी हसन
,


’दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...’





संगीत आणि साहित्य :