हसत-खेळत बालपण घालविताना अचानक नियतीने पायातील बळच काढून घेऊन तिच्या काखेत कुबड्या दिल्या.तिच्या बालमनावर काय परिणाम झाला असेल ? याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो.पण ती हरली नाही.जसे जमेल तसे शालेय शिक्षण व गायनाचे धडे घॆत आपली संगीत कला विकसीत करून कोल्हापुर वासियांची ’करवीर कोकीळा’ बनली.
स्वतः सुंदर गात असून दिलखुलास दाद देणारी...(असे चित्र आजकाल बघायला मिळत नाही.एका क्षेत्रातील आणि तेही संगीत क्षेत्रातील दोन व्यक्ती एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या पलिकडे काहीच करीत नाही.असो...’कालाय तस्मै नमः’) कार्यक्रमानंतर ती मला आवर्जून भेटली.त्यानंतर आमच्या भेटी,मैफली सुरू झाल्या.जुळून आलेले बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट झाले.ते आजही तसेच आहे.हळू-हळू तिने स्वतःला नसीमा हुरजुकसोबत अपंग संस्थेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.
तिच्या ऐन भराच्या काळात चित्रपटात गायिली,प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे कार्यक्रमही करीत गेली.
श्रीकांत ठाकरेंसारख्या संगीतकाराच्या दिग्दर्शनाखाली गायिली.सुरेल,गोड आवाज,सुंदर गाणॆ,उत्कृष्ट मार्गदर्शन याचे भरवशावर बरेच काही करण्याचा प्रयत्न करीत गेली.या सुरेल प्रयत्नांची दखल मुंबई दूरदर्शनने घ्यावी यासाठी "शब्दांच्या पलिकडले" या तेव्हाच्या लोकप्रिय कार्यक्रमात वर्णी लागावी म्हणून खूप प्रयत्न केले.निर्मिती प्रमुखाला ऐकविण्याकरीता म्हणून खास स्टुडिओमध्य्रे ध्वनिमुद्रण करून गाणी पाठविली परंतू शासकीय पैशाने,ज्यांना प्रसिद्धीची गरज नाही अशा मोठ-मोठ्या कलाकारांना बोलावून आपली टिमकी मिरविणार्या दूरदर्शनने, अशा अनेक चांगल्या होतकरु कलाकारांना ’दूरदर्शनच्या पलिकडे’च ठेवले.हा माझाही अनुभव आहे.
उपयोग दिनकर पोवारांनी बंदिश करताना केला आहे.ही गझल ऐकतांना मला सतत आशबाईंचा भास होत होता.त्या काळात जर मला संगीतकार म्हणून काम मिळाले असते तर मी रजनीकडून निश्चितच गाऊन घेतले असते...