गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 12, 2012

१२.१२.१२ हा दिवस संगीत क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय वाईट ठरला.


प्रसिद्ध सतारवादक भारतरत्‍न पं. रविशंकर यांचे आज अमेरिकेत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. अमेरिकेच्‍या सॅन दिआगो शहरात त्‍यांचे निधन झाले. भारतीय संगीत क्षेत्राला हा फार मोठा धक्‍का आहे.

रविशंकर यांनी भारतीय संगीत सातासमुद्रापार नेले. भारतीय संगीताला जगामध्‍ये आदराचे स्‍थान मिळवून देणा-यांमध्‍ये रविशंकर यांचा समावेश होतो. पाश्‍चात्‍य देशांना भारतीय संगीताची नवी ओळख करुन दिली. रविशंकर यांचा तीन वेळा ग्रॅमी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले होते. यावरुन त्‍यांच्‍या संगीत कौशल्‍याची जगाने घेतलेली दखल सिद्ध होते.

रविशंकर यांना 1999 मध्‍ये देशाचा सर्वोच्‍च नाग‍री सन्‍मान 'भारतरत्न'ने सन्‍मानित करण्‍यात आले होते.

रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.


१९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.

१९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रवी शंकरांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, कॅलिफोर्निय़ा; १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यात सहभाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत.

इ.स. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामास पाठिंबा दर्शिविणाऱ्या जॉर्ज हॅरिसन आयोजित न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध कन्सर्ट फॉर बांग्लादेश या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली. पाश्चात्य संगीतविश्वातील विख्यात असामी व व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन यांच्या सोबत केलेले सतार-व्हायोलिन कॉम्पोजिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी बसवण्यास सहाय्यभूत ठरली.

त्यांचे आणखी एक विख्यात कॉम्पोजिशन म्हणजे जपानी बासरी साकुहाचीचे प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व कोटो (पारंपारिक जपानी तंतूवाद्य - कोटो)चे गुरु मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉम्पोजिशन. १९९० सालचे विख्यात संगीततज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना पॅसेजेस ही त्यांची आणखी एक उल्लेखयोग्य रचना. २००४ साली पंडित रवि शंकर फिलिप ग्रासच्या ओरियन रचनेत सतारवादक 

’सुधाकरी’

.

Saturday, November 10, 2012

सिद्धी...


किती काळ जुनी
सांभाळावी  रीत
आयुष्याचा घात
करणारी...

प्रत्येक मर्यादा
हिताची असते
असेही  नसते
सर्वकाळ...

उगिच ज्येष्ठता
सांभाळाया जाता
आपुल्या क्षमता
मातीमोल...

चौकटी बाहेर
पडल्याशिवाय
प्रगतीची ’साय’
मिळेचि ना...

छाप पाडण्यासि
इंग्रजी बोलणे
लोका हे सांगणे
खोटे का गा ?

शक्ती उपासना
करावयासाठी
मजबूत ’यष्टी’
आवश्यक...

पेहराव असाच
करावा नेहमी
कोणतीच कमी
दिसो नये...

चांगले जीवन
जगाया साधन
उत्कृष्ट शिक्षण
आवश्यक...

सुंदर दिसणे
सुंदर बोलणे
सुंदर वागणे
हीच सिद्धी...


सुधाकर कदम

Saturday, October 27, 2012

तरूणाईस...



फेसाळते प्याले 
सिगारेट ’कश’ 
संगीत कर्कश 
आवडते...

तंग कपड्यात
खेटून चालणे 
रात्रीचे धिंगाणे 
नेहमीच...


सिगारेट-मद्य 
नाच-गाणी-पार्टी
नेमक्या या गोष्टी
काय देती...?

असले अनेक 
प्रश्न विचारोनि
भंडावी नेहमी
तरूणांना...

बेजबाबदार 
याच कारणाने
त्यांना ठरविणे
योग्य नसे...

अनुभवासह
वेळही ज्यांपाशी
तेच दूर देशी
आजा-आजी...

कुटुंब व्यवस्था
मोडकळी येता 
ही मानसिकता
येणारच...

’आमच्या वेळेस
असे नव्हतेच’
कंटाळती तेच
ऐकोनिया...

तरूण विचार
समजून घेण्या
थोडा वेळ त्यांना
देत जावा...

यातीलच काही
युवा उघडती
विक्रमाची खाती
जागतिक...

-तरूण मित्रांनो-

आनंद घेण्याच्या
जागा भरपूर
करावा विचार
निवडण्या...

तरूणपणाला
इतके सवंग
समजून टांग 
मारू नका...

सुधाकर कदम

Sunday, October 7, 2012

अथ मालिका पुराणम्...


टीव्ही वरी चाले 
स्वप्नांचा व्यापार
तरी ही अपार
लोकप्रिय...

वास्तवापासोनि 
घेई फारकत 
तरी बघतात 
सर्वजण...

प्रत्येक मालिका 
फरफटतात 
कारवाया ऊत 
येवोनिया...

मनोरंजनाच्या 
नावे, फालतुच्या
काळ्या करणीच्या
कथा दावि...

’क’च्या मालिकांनी
सुरवात झाली 
आणि बदलली
रूचि सारी...

स्थानिक लेखक 
आणि कलाकार
लावितात पार
या मालिका...

मूळ कथानक 
ताणोनि ताणोनि
करिती अळणी
दिग्दर्शक...

नाव असो काही
कथानक तेचि
वास्तविकतेचि
ऐसी-तैसी...

’लग्नाच्या गोष्टी’त 
’मला सासू हवी’ 
फिरवा-फिरवी
कथेमध्ये...

खलनायिकांची 
कट कारस्थाने 
रोजच बघणे
नशीबात...

एका भागामध्ये
अर्ध्या जाहिराती
बाकीची भरती 
खोगिरांची...

मोठा टीआरपी 
त्यास जाहिराती
अशी सारी नीति
आजकाल...

नागड्या देहाचा
मांडती बाजार
म्हणे ’कलाकार’
तयासि गा...

जिकडे तिकडे
’उघडा’ बाजार
तारुण्य बेजार
करावया...

प्रेक्षक बिचारे
मनोरंजनाचा
गल्लाभरू ’ठेचा’
पचविती...

भाषा व्याकरण
रसातळा नेई
पालखीचे भोई
मराठीच्या...

सुधाकर कदम

Wednesday, October 3, 2012

सुरेश भटांचे, मला आवडणारे एक सुंदर गीत...


फाटक्या पदरात माझ्या ...

फाटक्या पदरात माझ्या का तुझे मावेल अंबर ?
दानही करशील तू, पण मी असा आहे कलंदर !

कुंतलांनी बांधिला तू धावता बेबंद वारा
पापण्यांनी झाकिला तू एक एकाकी निखारा
सजविला विजनात माझ्या तू वसंताचा पसारा
का अशी केलीस माझी वेदना तू अधिक सुंदर ?

कुठुन मज आले अचानक हे प्रकाशाचे निमंत्रण
मी कसे सोसू अकल्पित हे सुगंधांचे समर्पण
हा कसा माझ्या पथावार रिमझिमे सुकुमार श्रावण ?
आसवांना काय सांगू सुख तुझे छळते अनावर !

मी असा दाही दिशांना वारियाने विखुरलेला 
मी असा माझ्या मनातुन नेहमीचा हरवलेला
हाय हातातून माझ्या मी कधीचा निसटलेला
अन् तरी गीतात माझ्या उमलतो आहे तुझा स्वर !

गायक-संगीतकार
सुधाकर कदम



Saturday, September 15, 2012

मज जमले नाही...


गझल

भरतीच्या या सीमा रेषा आखण्यास मज जमले नाही
लाट उसळता पाय टिकवुनी थांबण्यास मज जमले नाही

अस्सल मोती आठवणींचे जपुन ठेविले हृदयामध्ये
शेवटच्या ठोक्या पावेतो पाहण्यास मज जमले नाही

गुंतागुंत अशीच चिरंतन गुंतत गुंतत गोळा होई
या बोळ्याला दूरदूरवर फेकण्यास मज जमले नाही

चुरगळलेला चंद्र मिठीशी हळूच हसतो आणि बिलगतो
दंतव्रणाच्या खुणा हव्याशा टाळण्यास मज जमले नाही

रटाळवाण्या आयुष्याला दळण्याची ही गंमत आहे
किती पाखडा तरी सुखाला चाळण्यास मज जमले नाही

सुधाकर कदम
१५.९.२०१२



Saturday, September 8, 2012

आशाताईंच्या वाढदिवसानिमित्य...



गाणे हीच पूजा 
असे जिचे सूत्र 
अशी  एकमात्र 
आशाताई...

आरोहावरोह 
सूर ताल लय
द्रुत आणि ठाय
आशाताई...

शब्दांचे वैविध्य 
नेमक्या स्वरात 
सांगून जातात 
आशाताई...

खट्याळ ’स्टाईल’ 
अवखळ ढंग 
वेगळाच रंग 
आशाताई...

भूपाळीपासोनि
लावणीपर्यंत 
करिते श्रीमंत 
आशाताई...

गाण्यातली सारी
नजाकत,वर्म
म्हणजेच मर्म
आशाताई...

खटके,मुरक्या 
सरगम ताना 
तर्‍हा दावी नाना
आशाताई...

गाणे जगविते 
हास्य फुलविते 
व तृप्त करिते 
आशाताई...

माझ्या बंदिशींना
स्वर मिळो तुझे
हेचि स्वप्न माझे 
आशाताई...

सुधाकर कदम



Wednesday, August 15, 2012

विद्या बाळ आणि उत्तम कांबळे यांच्या खालील वक्तव्यांवरून सुचलेली रचना...




’देव’ ही संकल्पना माणसानं आपल्या एकटेपणावर,अचानक कोसळणार्‍या संकटांवर मात करण्याचं बळ मिळावं,आपलं दुःख हलकं करण्यासाठी एक मानसिक आधार हवा म्हणून निर्माण केली.त्याला तितपतच महत्व देणं ठीक.परंतूपुढे त्याचे अवडंबर माजवून कहींनी त्याचा धंदा मांडला,काहींनी तर त्याच्या भीतीनं इतरांचं शोषण,लुबाडणूक सुरू केली.संकटसमयी देवाचा धावा करून त्या द्वारे त्या संकटाशी सामना करायची शक्ती मिळवणं ठीक;परंतू त्याचं परावलंबित्व पत्करून,त्याच्या नसलेल्या अस्तित्वावर भार टाकून आपलं भवितव्य त्याच्या स्वाधीन करणं कितपत योग्य आहे ?
-विद्या बाळ- 

...विज्ञानाकडून विभूतीकडे वळून बुवाबाजीच्या नादाला लागून कितीतरी जण लुबाडल्या गेलेत.जिवाला मुकलेत...विज्ञानावर विश्वास ठेवणे म्हणजे म्हणजे श्रद्धाहीन असणे,असे काहीजण समजतात,ते बरोबर नाही.विज्ञान कुणाला श्रद्धाहीन बनवत नाही,तर श्रद्धा घासून-पुसून उघड्या डोळ्यांनी घ्यायला शिकवतं.आयुष्यातील प्रत्येक गोष्ट खरं तर अशीच घ्यायला हवी.विज्ञानवादी होणं म्हणजे नास्तिकवादी होणही नसतं.
-उत्तम कांबळे-

अंधश्रद्धा 

सार्‍या अंधश्रद्धा 
करिती उध्वस्त
आणि अस्तव्यस्त
माणसाला...

भोंदू महाराज 
भरावया पोट 
धंदा करतात 
अध्यात्माचा...

बाबा बापू झाले 
व्यवहारी ऐसे
सत्संगाला पैसे 
मागताती...

जीवघेणे डाव 
टाकोनिया गब्रु 
लुटतात अब्रु 
आश्रमात...

आपलं रोजचं 
रहाट गाडगं 
चालण्यासि वेग 
स्वतः द्यावा...

यश अपयशा 
’तो’चि बा कारक
वाटणं घातक
सर्वालागि...

परावलंबित्व 
यातूनच दिसे
भले-बुरे सोसे
तोचि खरा...

देवाला साकडे 
घालोनि व्हायचे
तेच होई साचे
प्रत्यक्षात...

चांगला माणूस 
म्हणोनि जगावे 
आणिक सोडावे 
कर्मकांड...

ज्याची भीती वाटे
त्याची भक्ती कशी 
हे ही विचारिशी
मनाला गा...

आपल्याला देव 
हवा सखारूप 
तर ते स्वरूप 
स्विकारार्ह...

विसंबल्यामुळे 
स्वयं व्यक्तिमत्व  
आणिक जे स्वत्व
आकळे ना...

आपुल्या प्रयत्ने 
बरे व वाईट
जे काही अफाट
आपुलेच...

भुलणार्‍या वाटे
जावो नये कोणी 
फक्त पस्तावणी
पदरात...

मारुतीची बेंबी 
गार गार म्हणे
बोट घातल्याने
विंचू डसे...

दूध, अभिषेक 
जेवणाचे ’भोग’ 
गरीबांना योग 
का न येई ?

आपुला आपण 
घेवोनि आधार 
हा भवसागर
पार करा...

सुधाकर कदम

Wednesday, August 8, 2012


आवेगी पाऊस...

आवेगी पाऊस 
असा बरसला 
देहासि भिडला
धरणीच्या ...

दाहि दिशातुन 

पिसाटत आला 
भोवती घुमला 
हळुवार ...

धिंगाणा घालोनि

वेडावल्यागत 
गर्जना करित 
लोटावला ...

वाटे पावसाचे 

मलमली वस्त्र 
होवोनि विवस्त्र 
पांघरावे ...

लखलखणारी 

एक वीज रेघ 
शक्तीचे अमोघ 
रूप दावि ...

तडतडणार्‍या 

अगणित सरी 
घाट माथ्यावरी 
ताल धरी ...

नवे धबधबे 

दुधाळोनि आले 
गर्जोनि हासले 
फेसाळत ...

ओसाड मनाच्या 

खडकावरती 
नवी जीवशक्ति 
कोंभाळली ...

टंच ओल्याचिंब 

जुन्या आठवणी 
मनाच्या रिंगणी 
फेर धरी ...

सुधाकर कदम 

Friday, August 3, 2012

सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांची पहिली मराठी युगल-गझल...



                                       
                                                     काट्यांची मखमल                                                                                                                                                       
                                                    (युनिव्हर्सल म्युझिक कंपनी.)
                                                   

Saturday, June 23, 2012

येता येता गेला पाऊस...



singer-SURESH WADKAR & VAISHALI MADE
lyric-DILIP PANDHARPATTE
music-SUDHAKAR KADAM.

अल्बम-काट्यांची मखमल 
(युनिव्हर्सल म्युझिक कंपनी)

(बातचित "Katyanchi Makhmal"...  on 94.3 Radio One with  MJ Suhrud —  Gazal Gandharv Sudhakar Kadam के साथ | Part V)

Saturday, June 16, 2012

पहाटे पहाटे मला जाग आली...




 सुरेश भटांचे हे गीत आतापर्यंत सी.रामचंद्र,सुरेश वाडकर या दिग्गजांनी गायिले आहे.मी सुद्धा १९८० मध्ये स्वरबद्ध करून गायचा प्रयत्न केला.आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे...



Sunday, June 3, 2012


रेशमाची रात...


रेशमाची रात 
हळूच  सरते 
नभांगण रिते 
करोनिया...


शुभ्र धुक्यातून  
उकले पहाट 
उत्साहाचे लोट 
घेवोनिया...


कासव गतीने
दिवस निघतो
उसासे टाकतो
मध्यान्हीला...


तरूवर वेली 
पेंगती उन्हात 
घेवोनि कुशीत 
गोधनाला...


उतरता ऊन्ह 
पोळलेले श्वास
सोडती निश्वास
हळूवार...


सांजवेळ येता 
क्षितिजावरती 
रंगांची  नवती 
नव्हाळते...


रात्रीची चाहूल
लागता,पेटती
समईच्या ज्योती
घरोघरी...


रेशमाची रात 
हळूच चढते 
गात्र गात्र रिते
करावया...

सुधाकर कदम

Tuesday, May 29, 2012


 तांबट रेषा...


भोवतालचा घोर अंध अंधार पाहुनी ना घाबरतो
लटकुन मुटकुन छ्तास तिथल्या दिवाभितासम जागत बसतो

दुर्दैवाने विरून जाता आकाशाची सीमारेषा 
झोक सावरुन,वाट धरोनी स्वप्नदेशीचा प्रवास करतो

रानामधल्या हिरव्या वाटा घेरुन येता कवटाळाया 
धावत धावत,अवखळ खळखळ,निर्झरासवे हळू सटकतो

सुख दुःखाच्या अनुभूतीचे मार्ग अचानक गरगर फिरता
पुण्याईच्या काल प्रवाही भय-अभयाचा हिशेब करतो

जरी अचानक सरून गेला आयुष्याचा घाट उतरता
मावळतीच्या पुर्वांगाला तांबट रेषा हळुच ओढतो 


Sudhakar Kadam

Saturday, May 19, 2012

’गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी...



सुरेश भटांच्या स्वप्नातील आणि माझ्या मनातील गझल गायकी...

                                                                गायक-सुरेश वाडकर
                                                                गझलकार-दिलीप पांढरपट्टे
                                                                संगीत-सुधाकर कदम

                                                               अल्बम-काट्यांची मखमल.
                                                             (युनिवर्सल म्युझिक कंपनी)



Wednesday, May 16, 2012

एक कविता..माझी.


चक्रव्युह

आयुष्याच्या चक्रव्युहातुन कधीच सुटका नसते
नियती त्याला दळण्यासाठी खूंटा मारून बसते

कुणास नसतो ठाव-ठिकाणा,कुणास  नसती गावे
स्वतंत्र त्यांना जगण्यासाठी गाव-शीवही पुरते

ध्येय न कुठले,बंध न कुठले,सोस नसे कुठलाही
जगण्या मधली गंमत सारी विमुक्त होऊन सरते

वजा-बाकिचा हिशेब सारा मांडायासी जाता
हातामध्ये त्याच्या केवल शुन्य नि शुन्यच उरते

जगरहाटिला साक्ष ठेवुनी वास्तव स्वप्ने बघता
स्वप्नांच्या त्या  इंद्रधनूचे  सारे  रंग  धुसरते

कौतुक नाही क्षितिजाच्याही पल्याड बघणार्‍याचे 
जन्म मृत्युच्या फेर्‍यामध्ये पल्याड काही नसते

लक्ष चौ’र्‍यांशी योनी भोगुन पुन्हा जन्म का घ्यावा
मोक्ष जयाला म्हणती ते का असे दूरवर पळते ?

हवा दिलासा आणि भरवसा जगण्याच्या सिद्धीचा
दुर्दैवाने  ललाट   रेषा कणा-कणाने   झिजते

मरण मागण्या हात पसरतो अनाम शक्ती पुढती
परंतू सृष्टी पुन्हा प्रवाही होउन झर-झर झरते



सुधाकर कदम



Sunday, May 13, 2012

"मिलकर जुदा हुए तो..."


           "मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..." ही क़तील शिफ़ाई यांची,जगजीत-चित्रासिंग यांनी गायिलेली सुंदर गझल तोडीनामक रागात अतिशय वेगळ्या प्रकारे,रागस्वरूपाला धक्का न लावता बांधलेली आहे.तोडी रागाची अनेक रुपं आहेत.त्यात आपल्या सारख्या रसिक मंडळींनी खोलात जाण्यात काही अर्थ नाही.कारण तो सुद्धा लेखाचा एक वेगळा विषय आहे.या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌र्‌यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
          तोडी राग जवळ-    जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो
.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला मेलोडीम्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
        अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते आशिर्वादया चित्रपटातील एक था बचपन...’ हे गाणे.त्यानंतर भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग अगा करूणाकरा...’ हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच पिंजराया चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं 
कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.अमर प्रेमया चित्रपटातील 
रैना बीती जाए...’ याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेलीअल्ला हे अल्ला...’ ही सुंदर कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.र त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांनबुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या सूफीसंगीताची खरीओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसा प्रयोग अनूप जलोटा यांनी तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगेया गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.
आपण आज जगजित-चित्रासिंग यांनी तोडी रागात बांधलेली मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम...’ ही गझल ऐकणार आहोत.या गझलच्या मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंड्र सप्तकातील निषादावर सुटते.आणि येथूनच पुढे गंमत सुरू होते,ती अशी की निषादावर मुर्छना करून दुसर्‌या पूर्ण ओळीत भूपरागाची छाया दाखवित पुन्हा कोमल धैवतापासून पहिली ओळ सुरू होते.अशी गंमत प्रबुद्ध संगीतकारच करू शकतो.ऐर्‌या-गैर्‌याचे ते काम नोहे.येथे जगजितसिंग यांच्यातला संगीतकार येथे प्रकर्षाने दिसतो,त्यामुळेच आमचा जीव त्याचेवर जडतो.आणि तो गेल्यावर डोळे भरून येतात.
या गझलमधील प्रत्येक शेरात (कडव्यात) मतल्यामध्ये (ध्रृवपदामध्ये) न घेतलेला पंचमस्वर घेऊन एक वेगळी अनुभूती देण्याची योजनासुद्धा अतिशय तरल अशी आहे.तसेच यात पारंपारिक पद्धती प्रमाणे गायकी न दाखविता एकदम लाइट मूडमध्ये जास्ती वाद्यांचा वापर न करता हळुवारपणे दोघांनी ही गझल सादर केली.तालवाद्य घटम,गिटार आणि सेक्सॉफोनचा अतिशय सुंदर उपयोग यात करण्यात आला आहे.विविध प्रकारच्या वाद्यांचा,कोरसचा वापर करण्याचा पायंडा जगजितसिंग यांनी पाडला.पण हे करतांना शब्दांकडे दुर्लक्ष केले नाही.अशा या गुणी संगीतकार,गायकाची ही गझल आपणास निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे...(कदाचित ही गझल आपण ऐकलीही असेल.)


मिलकर जुदा हुए तो ना सोया करेंगे हम

इक दूसरे की याद में रोया करेंगे हम

आँसू छलक छलक के सतायेंगे रातभर

मोती पलक पलक में पिरोया करेंगे हम

जब दूरियों की आग दिलों को जलाएगी

जिस्मों को चांदनी में भिगोया करेंगे हम

गर दे गया दग़ा हमे तुफ़ान भी क़तील

साहिल की कश्तियों को डुबोया करेंगे हम


क़तील शिफ़ाई



(खाली दोन VDO दिले आहेत.पहिल्या मध्ये क़ैसर-उल-जाफ़री यांची तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे...’ ही अनूप जलोटा यांनी गायिलेली,तोडी रागातीलच गझल आहे.ही गझल जलोटांनी गायकी अंगाने विविध विवादी स्वरांचा उपयोग करत-करत अतिशय चांगल्या प्रकारे नटविली आहे.ही सुद्धा आपणास आवडेलच...)
दुसर्‌यामध्ये मिलकर...’ आहे.




संगीत आणि साहित्य :